मराठे आणि दिल्ली – १८वे शतक – भाग ५
Category:
लेखसंग्रहऑगस्ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्लीपती बनण्यासाठी अनुकूल नव्हती. स्वारीस निघाल्यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्वारीत मराठ्यांना येऊन मिळण्याविषयी पत्रे पाठवली होती. अब्दालीशी लढायला आल्यावर आणि त्यासाठी हिंदुस्थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्यावर आणि स्वतः अब्दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्यावर, मराठ्यांना त्यावेळी दिल्लीपती कसे होता आले असते ?