शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्हा

Category:

 

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत ज्ञानेश्वर –  वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान मानलं जातं. तसंच टोमॅटोची भाजी, शेवेचा रस्सा हे पारंपारिक खाद्यपदार्थ प्रसिध्द आहेत.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्हयाची भौगोलिक माहिती

Category:

 

औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

जगप्रसिध्द अजंठा लेणी – सोयगांव तालुक्यात औरंगाबादपासून सुमारे १०० कि.मी अंतरावरील अजिंठा येथे जगप्रसिद्ध कोरीव लेणी आहेत. ही लेणी रंगीत भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे एकूण तीस लेणी असून, इ.स. पूर्व २०० ते इ.स. ६५० या काळादरम्यान ही लेणी खोदली गेली आहेत.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. औरंगाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योजनापूर्वक रीतीने १९३२ मध्ये सुरू झाली.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

औरंगाबाद हा पर्शियन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ शाही गादीने वसवलेले शहर असा आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ – इ.स. १७०७) ह्या मोगल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले असावे, असे मानले जाते. सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकुटसारख्या राजघराण्यांनी औरंगाबाद वसवले व आर्थिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. या राजवटींबरोबरच यादव, मुघल व निजाम यांच्याही राजवटी या भागाने अनुभवल्या.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.