No Picture
लेखसंग्रह

नव्या कुरणांची निर्मिती

Category:

 

साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्‍या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्‍या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.

No Picture
लेखसंग्रह

वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा!

Category:

 

समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.

No Picture
लेखसंग्रह

अनाकलनीय अर्थशास्त्र

Category:

 

परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.

No Picture
लेखसंग्रह

आणखी एक इशारा!

Category:

 

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

— प्रकाश पोहरे

No Picture
लेखसंग्रह

मूर्ख आणि शहाणे! शिका!

Category:

 

समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

लेखसंग्रह

To be chkd-जरा आजूबाजूला बघायला शिका!

Category:

 

बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे. येशू ख्रिस्तांना त्या स्त्रीची दया आली किंवा त्यापेक्षा अधिक गावकर्‍यांच्या बुध्दीची कीव वाटली. पहिला दगड त्या स्त्रीकडे भिरकावल्या जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने उपस्थित जमावाला उद्देशून म्हटले की, या स्त्रीला शिक्षा केली पाहिजे हे मान्य, परंतु ही शिक्षा देण्याचा अधिकार केवळ त्याच व्यक्तीला आहे, ज्याने एखादेही पाफत्य केलेले नाही. येशु ख्रिस्तांच्या या आवाहनाने उपस्थित जमाव अंतर्मुख झाला आणि प्रत्येकाच्या हातातील दगड गळून पडला. ही घटना किंवा कथा बोधप्रद असली तरी त्यातील बोध त्या घटनेपुरताच प्रासंगिक ठरला. पापी, अन्यायी किंवा कर्तुत्वहीन लोकांनी स्वत:लाच न्यायाच्या उच्चासनावर बसवून इतरांकडे दगड भिरकावण्याचा अधिकार बाळगणारी मानसिकता आजही विद्यमान आहे. ती स्त्री त्यावेळी भाग्यवान ठरली, परंतु असे भाग्य त्यानंतर कुणाच्या वाट्याला आले नाही.

लेखसंग्रह

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

Category:

 

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणाऱ्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.

No Picture
लेखसंग्रह

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

Category:

 

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणार्‍या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.

लेखसंग्रह

पारतंत्र्याचे पाश आवळले जात आहेत!

Category:

 

एखाद्या राष्ट्राची शक्ती प्रामुख्याने तीन घटकांवर अवलंबून असते. पहिला घटक म्हणजे त्या राष्ट्रातील नागरिकांना एकमेकांशी बांधून ठेवणारी संस्कृती आणि परंपरा, दुसरा घटक म्हणजे त्या राष्ट्राची व्यापार-उदिमात सामावलेली आर्थिक ताकद आणि तिसरा व सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशाची तरूणाई! हिंदुस्थानला कायम अधिपत्याखाली ठेवू पाहणाऱ्या शक्तींनी या तिन्ही घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले. हिंदुस्थानरूपी कामधेनूचे कायमस्वरूपी दोहन करण्यासाठी ही कामधेनू कायम लाचार करण्याचे षडयंत्र शिजवले गेले. पुन्हा एकदा हिंदुस्थानला हलाल करण्यासाठी कसायांनी आपल्या सुऱ्या परजल्या आणि यावेळी तर इंठाज कसायांचे कौशल्य फिके पडावे, इतके बेमालूम तंत्र वापरले गेले. पहिला आघात या महाकाय राष्ट्राला एकत्र बांधून ठेवणाऱ्या संस्कृतीरूपी धमणीवर केल्या गेला.