विसर म्हणणे सोपे, विसरता येत नसते,
मनातले गाव कधी सोडता येत नसते.
ज्यांच्यासाठी आयुष्य वणव्यात जाळले आपण,
त्यांनाच नाव आपले आठवता येत नसते.
चेहऱ्यांवर हास्याचे मुखवटे लाख असतात,
डोळ्यांतले सत्य मात्र लपवता येत नसते.
सावलीही सोडून जाते, ऊन कलायला लागले की,
माणसांना माणूसपण जपता येत नसते.
म्हणून आता कुणाकडून अपेक्षा नकोच ठेवू,
या जगाला कुणाचे दुःख पेलता येत नसते.
कुणासाठी कितीही जगलात, शेवट एकटाच असतो.
चार दिवस अश्रू वाहतात... आणि पाचव्या दिवशी जग पुन्हा हसतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
विसर म्हणणे सोपे, विसरता येत नसते,
मनातले गाव कधी सोडता येत नसते.
ज्यांच्यासाठी आयुष्य वणव्यात जाळले आपण,
त्यांनाच नाव आपले आठवता येत नसते.
चेहऱ्यांवर हास्याचे मुखवटे लाख असतात,
डोळ्यांतले सत्य मात्र लपवता येत नसते.
सावलीही सोडून जाते, ऊन कलायला लागले की,
माणसांना माणूसपण जपता येत नसते.
म्हणून आता कुणाकडून अपेक्षा नकोच ठेवू,
या जगाला कुणाचे दुःख पेलता येत नसते.
कुणासाठी कितीही जगलात, शेवट एकटाच असतो.
चार दिवस अश्रू वाहतात… आणि पाचव्या दिवशी जग पुन्हा हसतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 6