विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।

राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।

नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।

आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।

दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।

सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmai.com



विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।

राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।

नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।

आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।

दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।

सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmai.com

Author