लेखसंग्रह

बडोदा वस्तूसंग्रहालय

Category:

 

वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती.

साहित्य - ललित

दिवाळीची पोस्त

Category:

 

पोस्टमनची आणि त्या मुलीची हळूहळू चांगली दोस्ती जमली. दिवाळी जवळ आली होती. पोस्टमनला काय द्यावे याचा विचार ती मुलगी करत होती. तिला एक युक्ती सुचली. पत्र घेण्यासाठी दार उघडल्यावर तिला रोज दिसायचे की पोस्टमनची पावले मातीत उमटली आहेत.

साहित्य - ललित

व्यवसाय

Category:

 

दोघी मैत्रिणी बोलत असतात. दोघी गृहिणी असतात. एक जण दुसरीला सांगते “अगं, मी ड्रायव्हिंग लायसेन्स काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्याने मला विचारले तुमचा व्यवसाय काय? मी म्हणाले मी आई आहे” त्याने तुच्छपणे माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला “म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा करत नाही तर तुम्ही नुसत्याच गृहिणी आहात.

लेखसंग्रह

दिल्ली नावामागचा इतिहास

Category:

 

दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय.

लेखसंग्रह

मुंबई ते ठाणे रेल्वे – १७१ वर्षे…

Category:

 

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले.