चैतन्यमय पर्व
Category:
लेखसंग्रहआषाढ लागतो ना लागतो तोच आखिल वारकरी संप्रदायात उल्हास दाटून येतो. ही सात्विक कुणकुण जणू एक वैश्विक चैतन्याचं पर्वच ठरते नी ह्या चैतन्याची खरी मुहूर्तमेढ रोवली जाते ती जेष्ठ वैद्य सप्तमी पासून सुरु होणाऱ्या वारीच्या रुपाने.वारीला किमान साडेसातशे वर्षाची परंपरा लाभलीये असे म्हणतात .ह्या वारीचं प्रस्थान होतं ते आळंदीहून. जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी अश्वारुढ होते.