शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्‍या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. नरनाळा अभयारण्य हे मेळघाटचे प्रवेशद्वार आहे.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.गेल्या काही वर्षांपासुन द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

उत्तम प्रतीचा कापूस या जिल्ह्यात पिकत असल्यामुळे हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो.

शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नेवासा

Category:

 

नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.