व्यक्ती-परिचय

कोरगावकर भा. ल.

Category:

 

काही काही माणसांकडे दुसर्‍यांना थकवणारी अफाट ऊर्जा असते. असेच वरदान भा ल कोरगावकर यांनाही लाभले आहे. म्हणूनच तर आता वयाची पंचाहत्तरी गाठत असतानाही त्यांच्या डोक्यातल्या कल्पना आणि पायाला लागलेल्या भिंगर्‍या अखंड गरगरत असतात.

  April 19, 2011


व्यक्ती-परिचय

चंद्रकांत केळकर

Category:

 

चंद्रकांत केळकरांचा पेशा शिक्षकाचा असला तरी, त्यांचा पिंड सक्रिय कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. गेली तीस-चाळीस वर्षे त्यांनी केलेलं परिवर्तनाच्या चळवळीतील लिखाण, संघटन कौशल्य, चळवळीतील कृतिशीलता अशा चौफेर वाटचालीची दखल घ्यायालाच हवी .

  April 19, 2011


व्यक्ती-परिचय

चेतन कांबळे

Category:

 

चेतन जनार्दन कांबळे यांची आजवरची वाटचाल म्हणजे माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरचा संघर्ष अशा तिन्ही मार्गांनी झगडत राहणे. औरंगाबादच्या भावसिंगपुरा या खेड्यातील या तरुणाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या त्रिसूत्रीवर ठाम विश्वास आहे.

  April 19, 2011


व्यक्ती-परिचय

जिव्या सोमा मशे

Category:

 

लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे

  April 19, 2011


व्यक्ती-परिचय

जयसिंग चव्हाण

Category:

 

नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

  April 19, 2011


कॉ. कृष्णा खोपकर
व्यक्ती-परिचय

कॉ. कृष्णा खोपकर

Category:

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कृष्णा खोपकर यांच्या राजकीय जीवनाचा आरंभ १९४२च्या भारत छोडो आंदोलनापासून झाला.

  April 19, 2011


व्यक्ती-परिचय

चंदाबाई तिवाडी

Category:

 

संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.

  April 19, 2011


अवर्गिकृत

संसारातील समस्यांचे उत्तर आत्महत्या नव्हे !

Category:

 

महागाई, स्पर्धा, दगदग, धावपळ, अनिश्चित दैनंदिन जीवनामुळे सर्वच जनता हवालदिल झाली आहे. त्यात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते, काही महिला जाचाला बळी पडताना दिसतात तर काही कंटाळून व वैतागून हतबुद्ध होऊन आत्महत्या करीत आहेत. पण याने प्रश्न सुटणार तर नाहीच पण गुंता मात्र नक्की वाढणार. महिलांच्यात नैसर्गीरीत्याच श्रद्धा सबुरी असते पण कधी कधी मन बुद्धीच्या ताब्यात न राहिल्याने काही वेगळे प्रसंग बघायला मिळतात.

  April 19, 2011