लेखसंग्रह

महिकावतीची प्रभादेवी

Category:

 

मूळ महिकावती म्हणजे आजचे केळवे माहीम – जिल्हा पालघर. अनेक राजवंशांनी महिकावतीवर राज्य केले. व्यापारसमृद्ध शूर्पारक (म्हणजे नालासोपारा) आणि महिकावती संपूर्ण दक्षिण आशियात प्रसिद्ध होते. रोम राज्याशी इथला वाणिज्यसंपर्क भरपूर होता.

लेखसंग्रह

समाज प्रबोधनातून रोखली जाईल स्त्री – भृणहत्या ….

Category:

 

स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते.

लेखसंग्रह

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

Category:

 

स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत.

लेखसंग्रह

एका पुतळ्याची ‘कर्म कथा’

Category:

 

१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्‍यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्‍या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली.

लेखसंग्रह

व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

Category:

 

आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे.

लेखसंग्रह

प्रकाशन व्यवसायातील स्थित्यंतरे

Category:

 

पुस्तकाच्या छापील किंमतीवर ७०,८० व (खोटं वाटेल पण) ९०टक्के कमिशनचा हट्ट धरणे, स्वीकृत हस्तलिखीत प्रकाशकाडून हरवले गेल्यास, त्याचे सोयरसुतक न मानता त्याबद्दलची कसलीही भरपाई न देणे, पुस्तक प्रकाशनाचे समारंभ लेखकांला त्यांच्यश खर्चाने करायला लावून, त्याद्वारे आपल्याच प्रकाशन संस्थेची विनाखर्च जाहिरात करणे; अशा कटू अनुभवांना नवलेखकांना सध्या सामोरे जावे लागते.

लेखसंग्रह

सुमंत उवाच… लेखमालिका परिचय

Category:

 

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे

लेखसंग्रह

मराठी भाषेचा ‘पण’!

Category:

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. मात्र आजही हे संदर्भ सद्य परिस्थितीत जसेच्या तसे लागू पडतात.