“मनसे”ला नवी दिशा
Category:
लेखसंग्रहमुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर हिंसाचार करणार्या दंगेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परवा काढलेला मोर्चा आणि नंतरची विराट जाहीर सभा या संघटनेच्या यापुढील वाटचालीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. एवढ्या प्रचंड संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊनही अत्यंत शांततामय रीतीने ही सभा आणि मोर्चा पार पाडून मनसेने आपली संघटना ही हुल्लडबाजांची संघटना नाही आणि आपल्याकडे यापुढील काळात अधिक गांभीर्याने पाहावे लागेल असेच जणू सूचित केलेले आहे.
संपादक, नवप्रभा
‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ ही संतांची उक्ती त्याची सत्यता किती दृढ करते हे आतापर्यंतच्या आपल्या श्री गणेशाबरोबरच्या प्रवासातून लक्षात आलेच असेल. आता पर्यंत आपण विविध देशातील श्री गणेशांची माहिती मिळविली. त्याबरोबर आता आपण आपल्या राज्यातील आणि भारतातील गणेशांची माहिती मिळविणार आहोत.