शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

थिबा पॅलेस –  हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात चिपळूण, पोफळी, खाडपाडी, खेरडी, लोटेमाळ, रत्नागिरी, जयगड, देवरुख, दापोली, राजापूर याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पावसजवळ फिनोलेक्स ही शेतीसाठी लागणारे पाईप्स तयार करणारी कंपनी आहे. मासेमारी आणि आंबा व आनुषंगिक उत्पादने हे जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्हा

Category:

 

रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला रायगड हे या जिल्हयाचे प्रमुख वैशिष्ट्य.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

तानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

रायगड जिल्ह्यात आगरी, समाज तसेच कातकरी, ठाकर, वारली या आदिवासी जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्याला भरपूर लांबीचा सागर किनारा लाभला असल्याने मासेमारी करणार्‍या कोळी जमातींची वस्तीही देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

  June 23, 2015