कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गोजिर्‍या बाळासाठी साजिर्‍या नावाची निवड.

Category:

 

बाळाचं नाव, सुटसुटीत, अुच्चारायला, लिहायला सोपं, प्रचलीत काळाशी सुसंगत असावं आणि त्याचा अुच्चार कानाला नादमधूर वाटला पाहिजे. म्हणूनच स्वर आणि मृदू व्यंजनं असलेली दोन किंवा तीन अक्षरी, जोडाक्षर विरहित आणि मानवी मनाला आणि भावनांना हव्याहव्याशा वाटणार्‍या निसर्गातील घटकांशी आणि वस्तूंशी निगडीत असलेली नावं सर्वांना आवडतात. बाळाचं नाव, बाळाप्रमाणेच सर्वांना हवंहवंसं वाटणारंच असाव्यास हवं, नाही का?

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

तू

Category:

 

तू

जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून

एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस

आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

देख तो दिल कि जाँ से उठता है

Category:

 

प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

मैं खयाल हूँ किसी और का

Category:

 

स्वतःची ओळख हा समस्त मानवजातीतील विद्वान आणि वैज्ञानिकांसमोरील एक कळीचा प्रश्न ठरला आहे. “माणूस कोण?” या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर आतापर्यंत कुणीही देऊ शकलेले नाही. गझलकारांनी मात्र आपापली हृदये लढवून आणि डोकी खाजवून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती प्रत्येकाला रूचतील आणि समजतीलच असे मात्र नाही. सलीम कौसर नावाच्या शायराने स्वतःचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न या अतिसुंदर आणि काहीशा अवघड गझलेत व्यक्त झालेला आहे.