लेखसंग्रह

लोकमानस बदलणारी प्रसारमाध्यमे 

Category:

 

आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोक फसत असतील तर त्यांचा गांभीर्याने विचार माध्यमांनी करावा? सेलच्या जाहिराती, नियुक्तीसाठी जाहिराती, फसवणूक जोपासणार असतील तर आदर्शांचे अग्रलेख कशासाठी? दिशाभूल करणार्‍या गोष्टी भूल देवून केल्या जात आहे. एकीकडे वैधानिक इशारा द्यायचा आणि दुसरीकडे मृत्यू स्वस्त करायचा असे किती दिवस चालणार?

लेखसंग्रह

माणुसकीचे विकृतीकरण

Category:

 

हा नाथपंथी डवरी गोसावी समाज अतिशय मवाळ आहे.. गावोगावी फिरून भिक्षुकी करून पोटाची खळगी भरणे एवढाच उद्योग त्यांना ठाऊक.. शिक्षणाच्या बाबतीतहि मागास असलेला हा समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहापासुन बरेच अंतर लांब आहे.. त्यामुळे या समाजाचे एकिकरन तर लांबच परंतु या समाजाचा कधिहि आपल्या मागण्यांसाठी कुठला मोर्चा अथवा समाजास हानी पोहचेल असे कार्य घडत नाहि..

लेखसंग्रह

हातात हात…

Category:

 

‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे.

लेखसंग्रह

हवामान बदलाचे गहिरे संकट!

Category:

 

दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे बदलत्या पर्जन्यमानाचे स्वरूप लक्षात घेऊन शेती पद्धतीतही बदल करण्याची गरज आहे? नैसर्गिक बदलाचे संकेत समजावून घेऊन त्यावर वेळीच उपाय योजल्या गेले नाहीत तर परिणाम अजून दाहक होण्याची भीती आहे. 

लेखसंग्रह

टाकीचे घाव सोसल्या शिवाय ‘देव’ पण येत नाही

Category:

 

‌खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना?

लेखसंग्रह

तीर्थशिरोमणी तीर्थराज अक्कलकोट !

Category:

 

सज्जनहो, आपल्याला प्रश्न पडला असेल की, अक्कलकोटचे महत्व आणि माहात्म्य सर्वांना माहित असताना प्रस्तुत लेखकाने या विषयावर एवढे लिखाण का केले असावे ? तर याचे कारण म्हणजे अक्कलकोटचे महत्व जगात प्रसिध्द आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी, या अक्कलकोटात नेमके काय महत्वाचं आहे ? येथे आल्यावर आपण नेमके काय केले पाहिजे ? याची माहिती व्हावी आणि त्यानुसार आपण अक्कलकोटी आल्यावर वर्तन करावे. या शुध्द हेतूसाठी हे लिखाण केले आहे.

लेखसंग्रह

ब्रह्मानंदाचे माहेरघर स्वामींचे अक्कलकोट धाम !

Category:

 

तुम्हाला हवे असणारे इहलोकीचे व परलोकीचे सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण हे अक्कलकोटच आहे. या अक्कलकोट शिवाय अन्य कोठेही तुमचे कल्याण होणार नाही. तुम्हाला अन्यत्र कोठेही परमानंदाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला हवे असणारे शाश्वत सुख मिळवून देणारे एकमेव ठिकाण म्हणजे स्वामीधाम अक्कलकोट हेच आहे. याशिवाय कुठेही तुमचे हित साधणार नाही. तेव्हा त्वरेने अक्कलकोट जवळ करून, स्वामीपायी धाव घ्यावी, स्वामीचरणी नतमस्तक व्हावे, यानेच तुमचे सर्वस्वी कल्याण होईल.

लेखसंग्रह

मोक्षभूमी अक्कलकोट !

Category:

 

अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष 84 योनींचा फेरा चुकवून अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात.

लेखसंग्रह

ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास……

Category:

 

ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास….. ग्रुप वरील सदस्यांच्या भिन्नकभिन्न मानसिकतेचा सांगोपांग विचार, एक शोध, अनेक बोध..