स्वप्नांच्या वाटेवर मी चालत होतो,
मनात आशेचे दिवे पेटले होते.
निरागस शब्दांनी नाती जोडली,“मनापासून जगण्याची शिक्षा”
भावनांचे धागे अलगद विणले होते.
मनातल्या भावना जपून ठेवल्या,
शब्दांतून त्यांना अर्थ दिला.
नात्यांच्या त्या कोमल धाग्यांना
मी प्रामाणिकपणाचा स्पर्श दिला.
कुणाला दुखवायचा हेतू नव्हता,
मनात फक्त प्रेमच जपले होते.
पण काळाच्या या कठोर वळणावर,
का नियतीनेच माझी साथ सोडली?
नजरेत प्रश्नांचे सावट दाटले,
उत्तर मात्र कुठेच दिसेना.
मनाला समजावत राहिलो तरी,
दुखणे काही कमी होईना.
जगाच्या हिशेबात कदाचित
भावनांना किंमत नसते कधी.
मनापासून जगण्याची शिक्षा
बहुतेक अशीच मिळते कधी.
नजरेत अनेक प्रश्न दाटले,
उत्तर मात्र शांत राहिले.
हृदयाने जे काही दिलं होतं,
तेच का जगाला खटकलं असेल?
आणि मग मनात एकच प्रश्न घुमतो…
*अपराध माझा असा काय झाला?*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212