झोप कधीही घेता येते,
थकल्या मनाला विसावा देता येतो…
पण स्वप्नांना पंख देण्याची वेळ
नेहमीच थांबून राहत नाही.
वयाच्या एका टप्प्यावर
धाडसाची उर्मी कमी होत जाते,
उंच भरारी घ्यायची इच्छा असली
तरी पावलं थोडी थबकतात.
म्हणूनच वेळ हातात असताना
आकाशाला स्पर्श करून घ्या,
कारण झोप तर कधीही घेता येते…
पण झेप घेण्याचं वय
पुन्हा परत येत नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Author
Post Views: 3