घासाघासातलं विश्व

ताटासमोर बसताना
हात जोडले जातात नकळत
भूक फक्त पोटाची नसते,
ती असते जगण्याची, ओळखीची, आपलेपणाची.

भाताचा तो शुभ्र श्वास
जमिनीच्या छातीतून उगवलेला,
शेतकऱ्याच्या तळहातावरच्या घट्ट रेषांतून घरापर्यंत पोहोचलेला.
तुपाची एक सोनेरी रेघ
आईच्या मायेची सही घेऊन उतरलेली.

डाळीत विरघळलेले उन्हाळे-पावसाळे,
भाजीच्या हिरवाईत दडलेली
मातीतली ओल आणि श्रमांची चाहूल.
चटणीचा तिखट स्पर्श
जिभेवरच नव्हे तर स्मृतीवरही उठणारा,
लोणच्याच्या आंबटपणात
काळाचा साठवलेला अनुभव.

पोळीचा गोल चंद्र
तव्यावरून आकाशात झेपावल्यासारखा,
प्रत्येक फुगण्यात
स्वप्नांची एक हलकी उसळी.
दह्याचा थंड गारवा
मनातल्या अस्वस्थतेवर हात फिरवणारा.

हे वाढलेलं पान
फक्त पदार्थांची मांडणी नसते
ते असते हातांच्या कष्टांचं वर्तुळ,
मायेच्या नजरेचं छत्र,
आणि घर नावाच्या शब्दाची प्रतिमा.

प्रत्येक घासात
आपण कोण आहोत याची जाणीव असते,
कुठून आलो याची आठवण,
आणि कुणासाठी जगतो याचं उत्तर.

शेवटचा घास घेताना,
ताटात उरते शांतता.
पण ती रिकामी नसते,
ती भरलेली असते कृतज्ञतेने.

कारण वाढलेलं पान म्हणजे
देवापेक्षा मोठं काही असेल तर ते,
आपल्याला रोज जगायला
नव्यानं कारण देणारं
घराचं उबदार विश्व.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे



ताटासमोर बसताना
हात जोडले जातात नकळत
भूक फक्त पोटाची नसते,
ती असते जगण्याची, ओळखीची, आपलेपणाची.

भाताचा तो शुभ्र श्वास
जमिनीच्या छातीतून उगवलेला,
शेतकऱ्याच्या तळहातावरच्या घट्ट रेषांतून घरापर्यंत पोहोचलेला.
तुपाची एक सोनेरी रेघ
आईच्या मायेची सही घेऊन उतरलेली.

डाळीत विरघळलेले उन्हाळे-पावसाळे,
भाजीच्या हिरवाईत दडलेली
मातीतली ओल आणि श्रमांची चाहूल.
चटणीचा तिखट स्पर्श
जिभेवरच नव्हे तर स्मृतीवरही उठणारा,
लोणच्याच्या आंबटपणात
काळाचा साठवलेला अनुभव.

पोळीचा गोल चंद्र
तव्यावरून आकाशात झेपावल्यासारखा,
प्रत्येक फुगण्यात
स्वप्नांची एक हलकी उसळी.
दह्याचा थंड गारवा
मनातल्या अस्वस्थतेवर हात फिरवणारा.

हे वाढलेलं पान
फक्त पदार्थांची मांडणी नसते
ते असते हातांच्या कष्टांचं वर्तुळ,
मायेच्या नजरेचं छत्र,
आणि घर नावाच्या शब्दाची प्रतिमा.

प्रत्येक घासात
आपण कोण आहोत याची जाणीव असते,
कुठून आलो याची आठवण,
आणि कुणासाठी जगतो याचं उत्तर.

शेवटचा घास घेताना,
ताटात उरते शांतता.
पण ती रिकामी नसते,
ती भरलेली असते कृतज्ञतेने.

कारण वाढलेलं पान म्हणजे
देवापेक्षा मोठं काही असेल तर ते,
आपल्याला रोज जगायला
नव्यानं कारण देणारं
घराचं उबदार विश्व.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author