(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • सुचेता कडेठाणकर

    कडेठाणकर, सुचेता

    सुचेता कडेठाणकर या पुणेकर युवतीच्या नावापुढे आता ‘पहिली भारतीय व्यक्ती’ असे विशेषण लागले आहे. जे भल्याभल्यांना जमणार नाही असे आव्हान तिने यशस्वीरीत्या पेलले- ते म्हणजे जगातील सर्वात मोठे थंड वाळवंट असलेले मंगोलियातील गोबी वाळवंट पार करण्याचे!

    इनमीन पाच फूट उंचीची मूर्ती, पण आपल्या कामगिरीद्वारे तिने स्वत:ची खरी उंची दाखवून दिली. एखाद्या गोष्टीसाठी झोकून देऊन, तिचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर सर्वकाही साध्य आहे, हे तिने या कामगिरीतून सिद्ध केले. गोबीच कशाला? कोणत्याही वाळवंटातून चालण्यासाठी शरीराचा तर कस लागतोच आणि मनाच्या कणखरपणाचीही कसोटी लागते. अथांग पसरलेल्या गोबी वाळवंटात- जिथे चुकूनच कधीतरी माणसाचे दर्शन होते- सलग ५२ दिवस चालून सुचेताने या दोन्ही कसोटय़ा लिलया पार केल्या. सुचेता तशी मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेली. पुण्यात कसबा पेठेतील वाडय़ात आई, वडील आणि लहान बहीण अशा कुटुंबात वाढली. इतिहास, संस्कृत, मराठी व पत्रकारिता या विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला दोन वर्षे ‘लोकसत्ता’ साठी काम केले, नंतर मुक्त पत्रकार म्हणून लिहू लागली. पुढे चांगले पैसे मिळवून देणाऱ्या ‘टेक्निकल रायटिंग’ मध्ये प्रवेश केला. विविध आयटी कंपन्यांसाठी ती असे लेखन करू लागली. त्यातून चांगले अर्थार्जन होत असल्याने अशा प्रकारचे छंद पूर्ण करणे सोपे गेले. शाळेत असल्यापासूनच भटकंती, डोंगरवाटा पालथ्या घालणे आणि शरीराचा कस लागणाऱ्या साहसी क्रीडाप्रकारांची आवड! त्यातूनच सह्य़ाद्रीचे कडे-कपारी, हिमालयाच्या रांगा व एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत तिने अशी भटकंती केली. लांब अंतराच्या सायकल स्पर्धा तसेच, पुणे, दिल्ली, मुंबई येथे भरल्यिा जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन्समध्ये तिने अनेकदा भाग घेतला आहे. पुण्यातील खडतर अशा ‘एन्डय़ुरो अ‍ॅडव्हेंचर रेस’ चे एकदा विजेतेपदही मिळविले. लेखन व वाचनाच्या छंदाबरोबरच साहसी क्रीडाप्रकारांची आवड जोपासणेही सुरू होते. तिचे करिअर स्थिर होत असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यांच्याशी तिची खूप मानसिक जवळीक असल्याने तिला हा मोठा आघात होता, पण त्यातून उभी राहून सुचेताने टेक्निकल लेखनाचे करिअर वाढविले. सुरुवातीला ‘एअरटाईट नेटवर्क्‍स’ व नंतर ‘सिमॅन्टेक’मध्ये तिने विविध पदांवर काम केले. सध्या ती ‘प्रिन्सिपल इन्फर्मेशन डेव्हलपर’ या पदावर तिथे आहे. मधल्या काळात मागे पडलेली साहसी क्रीडाप्रकारची आवड तिने गेल्या काही वर्षांमध्ये वाढविली आणि गोबी मोहिमेची तयारी सुरू केली. त्यासाठी बरेच कष्ट घेतले आणि अखेर एक स्वप्नपूर्ती करून दाखविली. हे सर्व करून दाखविणारी सुचेता अतिशय शांत आहे. तिच्या स्वभावात बडेजाव मिरविणे नाही. त्यामुळे कितीही उंचीवर पोहोचली तरी तिचे पाय जमिनीवरच असतात, मित्र-मैत्रिणींमध्ये ती तितकीच मिळून-मिसळून, खळखळून हसणारी असते. आता आणखीही काही आव्हाने तिच्या मनत घोळत आहेत. ती निश्चितपणे त्यांचा वेध घेईलच.. त्यासाठी सुचेताला भरपूर शुभेच्छा!

  • नम्रता शशांक पुणेकर

    त्वचारोगतज्ज्ञ असतानाही वेगळे काही करण्याची जिद्द बाळगून नम्रता शशांक पुणेकर यांनी अलंकारविक्री क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्या सरकारी परवानाधारक महिला सुवर्णपारखी म्हणून लौकिक मिळविलेल्या नम्रता आता आयटी कंपनीच्या मालक आहेत. जळगावकन्येचा औरंगाबादेत आल्यानंतरचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

    नम्रता शशांक पुणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला सुवर्णपारखी हा लेख पुढील पानावर वाचा.

    नम्रता शशांक पुणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला सुवर्णपारखी हा लेख वाचा.

    punekar-namrata-shashank-modified

  • सर्वाधिक वयाचे निवृत्त हयात पोलीस अधिकारी विश्वेश्वर चटर्जी

    इंडियन पोलीस सर्व्हिस हे नावही ज्या काळात 'पोलीस सेवेला दिलं गेलं नव्हतं, त्या काळात पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर रूजू झालेले आणि निवृत्त हयात पोलीस अधिकाऱ्यांमधले देशभरातले सर्वाधिक वयाचे ज्येष्ठतम पोलीस अधिकारी म्हणून गणले जाणारे विश्वेश्वर चटर्जी रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. चटर्जी ब्रिटीश सत्ताकाळात पोलीस सेवेत दाखल झालेले १९४० च्या बॅचचे अधिकारी. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांपैकी ९१ वर्षे वयाचे रणजीत गुप्ता हयात आहेत. बंगालमधल्या सेरामपूरमध्ये गुप्तांनी चटर्जीनंतर सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून काम केले.

    स्वाभाविकपणेच चटर्जी गेल्याचे कळताच त्यांच्या आठवणी जागवल्या त्या गुप्तांनी. चटर्जी मूळचे अविभक्त बंगालचे. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर चटर्जी पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास चटर्जी कोलकाता पोलीस दलात उपायुक्त पदावर होते. हाझरातील अॅलेंबरी कंपनीतील कामगार आंदोलन हाताळण्याची जबाबदारी चटर्जीवर होती. चटर्जीनी ते आंदोलन कौशल्याने हाताळलेच, पण गुप्तचर खात्यात काम करीत असताना आपल्यातील अंगभूत नेतृत्वाची, राजकीय विश्लेषणाची आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या चिकित्सक अभ्यासाची चुणूकही राज्यकर्त्यांना दाखवून दिली.

    १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत-चीन सीमावर्ती भागासाठी स्वतंत्र रक्षक दल स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकारने केला तेव्हा स्वाभाविकपणेच चटर्जीची निवड त्या दलाच्या प्रमुखपदासाठी करण्यात आली. हा सीमावर्ती भाग सव्वा दोन हजार किलोमीटरचा. त्याचं रक्षण करण्यासाठी लागणारं दल खरं तर कितीतरी मोठ्या संख्येचं. पण प्रारंभी अवघ्या चार बटालियन्सच्या जोरावर दलाचं काम सुरू झालं.

    आज लडाखमधल्या काराकोरम खिंडीपासून अरूणाचल प्रदेशातल्या दिफू ला पर्यंत या दलाचं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. माऊंटेनिअरिंग, डिझास्टर मॅनेजमेंटबरोबरच न्यूक्लिअर, बायॉलॉजिकल आणि केमिकल डिझास्टर्स हाताळण्याचं काम हे दल करतं. प्रारंभीच्या काळात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दलासाठी स्वंत्र महासंचालक नव्हताच. चटर्जीनी पहिलं दशकभर दलाचे महानिरिक्षक र चटर्जी म्हणून काम पाहिलं, पण या काळात आणि त्यानंतर त्यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाला जो आकार दिला, जी दिशा दिली, तिनं भारताच्या सर्व सुरक्षा दलांमधलं मानाचं दल म्हणून इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल ओळखलं जाऊ लागलं. १९६४ मध्ये एलिंट नावाचं एक गुप्तवार्ता अभियान चालवण्यात आलं. एलिंटचा अर्थ होता, 'इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्ट अॅण्ड अॅनॅलिसिस ऑफ इंटेलिजन्स'. १६ ऑक्टोबर १९६४ ला चीननं आपल्या पहिल्या अण्वस्त्र उपकरणाची चाचणी केली. चीनची अण्वस्त्रक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याची धास्ती त्या घटनेनंतरच अमेरिका आणि भारताच्या मनात उत्पन्न झाली. चीननं ज्या ठिकाणी ही चाचणी केली ते ठिकाण इतकं सुदूर आणि आडबाजूला होतं की गुप्तचरांकडून त्याविषयीची माहिती सहजासहजी मिळणं शक्यच नव्हतं. सीआयएनं रॉ आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या सहकार्यानं 'एलिंट' हे शोध अभियान हाती घेतलं ते त्यासाठी. नंदादेवी शिखर मोहीमेच्या नावाखाली एम. एस. कोहली या गिर्यारोहकानं त्या शिखरावर एक शोध-उपकरण बसवायचा प्रयत्न केला. ते उपकरण बसलंही, पण पाठोपाठ हिमवादळ आलं आणि मोहीम अर्धवट सोडून तुकडीला परत यावं लागलं. पुन्हा एकदा तीच मोहीम हाती घेण्यात आली, पण उपकरण जे हरवलं ते हरवलंच. १९७४ मध्ये चटर्जी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा बराचसा काळ त्यांनी सामाजिक सेवांसाठी घालवला. दक्षिण दिल्लीतील सत्यनारायण मंदिराचे ते संस्थापक होतेच पण रायसीना बंगाली स्कूलचेही ते तीन दशकांहून अधिक काळ अध्यक्ष होते. इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनशी त्यांचे निकटचे संबंध तेव्हापासून राहिले ते अखेरपर्यंत!

  • मंगेश पाडगावकर

    ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.

  • पूर्व पाकिस्तानचे राजकारणी शेख मुजिबुर रहमान

    मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही.

  • उर्दू शायर जिगर मुरादाबादी

    जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे मा.जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्यान कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले. १९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल’ या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड

    जिगर मुरादाबादी यांची शायरी.
    यूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में
    जिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |
    .वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,
    जिस में ओस के बूँदों की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,
    उनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,
    उनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,
    मदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |

    अली सिकंदर “जिगर” मुरादाबादी का जनम 1890 में हुआ था,
    जब भी वो किसी मुशायरे में शेर पेश करते,कह देते
    ”जिगर थाम के बैठो,अब मेरी बारी है”
    और इरशाद इरशाद के गूँज से पूरा माहोल झूम उठता |
    उसी लेख से कुछ शेर प्रस्तुत है.
    दिल खोल के दाद दीजिएगा,अपने जिगर का मामला है |

    हमने सिने से लगाया दिल न अपना बन सका
    मुस्कुरा कर तुमने देखा दिल तुम्हारा हो गया |
    —————————————————–
    अब उनका भरोसा वो आए ना आए
    आ ए ग़मे–मोहोब्बत तुझ को गले लगाले |
    ——————————————————
    बनाकर अपने हाथों आशिया बर्बाद करते है
    जो तेरा काम था वो भी हम सय्याद करते है |

  • गायिका गीता दत्त

    गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूड्सची आणि बाजाची गाणी गायिली.

  • ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मृणालिनी जोगळेकर

    उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.

  • इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा

    क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या वडिलांचे नाव मर्विन डिसूझा आणि आईचे नाव स्लीविया डिसूझा आहे. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलमधून पूर्ण केले आणि त्यानंतर तिने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

  • कविवर्य प्रा. शंकर वैद्य

    ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली.