जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ठाणे शहर म्हणजे संगीतरत्नांची खाणच आहे. संगीतभूषण राम मराठे यांसारखे ज्येष्ठ गायक याच ठाण्यातले. त्यांच्या पासून सुरु झालेली ही परंपरा आज अभिमान वाटावी इतकी उच्च दर्जाची झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री व कळसुत्रीकार मीना नाईक यांचा जन्म १९ जून १९५१ रोजी झाला.
मीना या समाजभान असणारी रंगकर्मी व कळसुत्रीकार म्हणून ओळखल्या जातात. मीना नाईक या माहेरच्या मीना सुखटणकर होत.मीना नाईक यांचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यांनी १९७२ मध्ये मुंबईतील जे जे इंस्टिट्यूशन ऑफ एप्लाइड आर्ट येथून जे डी आर्टस् पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले तसेच मुंबई विद्यापीठामधून बी. ए. १९८० व म.ए. १९८३ साली पूर्ण केले.
१९७६ ते १९७८ या काळात त्यांनी पेपेट्री मध्ये अभ्यास केला. त्या वेळी त्यांना पेपेट्रीमध्ये मध्ये जपान फौंडेशन आणि भारत सरकार कडून दोन शिष्यवृत्ती मिळाल्या होत्या.
मीना नाईक यांनी समाजातील अनेक संवेदनशील विषयावर लघुपट व ऍनिमेशन चित्रपट तयार केले आहेत. त्यांनी 'वाटे वरती काचा ग' या नाटकाद्वारे बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. काही काळापूर्वी मीना नाईक यांनी बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या ‘कळसूत्री’-निर्मित ‘अभया’ या एकल – महिला हा नाट्यप्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत झाला होता.
२०१० मध्ये त्यांना दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनी कडून हिरकणी ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
याच बरोबर त्यांनी दूरदर्शन वरचे किलबिल, अमृत मंथन अशा अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
मीना नाईक यांनी यशवंतराव चव्हाण या चित्रपटात अभिनय केला आहे. नुकताच काम केलेला चित्रपट म्हणजे हृदयांतर.अभिनेत्री व निर्मात्या मनवा नाईक या त्यांच्या कन्या होत. ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’ या चित्रपटात मीना नाईक आणि मनवा नाईक या दोघी मायलेकी प्रथमच एकत्र काम करताना दिसल्या होत्या.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्यभट)
जन्मस्थळ: यावली-जिल्हा अमरावती तिसरी पर्यंत शिक्षण. ईश्वरभक्तीकडे ओढा, भजनांची आवड, आकडोजी महाराज नाथपंथीय-त्यांना गुरूस्थानी. त्यानी त्यांचे नाव तुकडोजी ठेवले. भजन व कीर्तनाव्दारे राष्ट्रीय वृत्ती जागविणे. गोरगरिबांची सेवा हिच ईश्वरसेवा. ग्रामसुधारणेवर भर, ग्रामगीता ग्रंथ, अनुभव सागर, भजनावली ग्रंथ, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली, आदेश रचना, १९३५ ला मोझरी येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना, जनसेवेचे केंद्र बनविणे. बावनकाशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह.
जनसेवा नि राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वरसेवा असा दिव्य संदेश देणारे कर्ते समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचे जन्मगाव माणिक पण त्यांचे गुरू अडकुजी महाराज त्यांना प्रेमभरानं ‘तुकडा‘ म्हणून हाक मारीत. शाळेत अन गुरूंबरोबर गोड आवाजात भजने गाणारा. ‘तुकडा, पुढे खंजिरीच्या तालावर राष्ट्रीय कीर्तन करणारा महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ख्यातनाम झाला. अल्पवयातच त्यांना दारिद्र्य, भटकंती नि सामाजिक छळाच्या अग्निदिव्यातून पार पडावे लागले. गुरूमाऊलीच्या कृपेने आत्मसाक्षात्कार होऊन परमात्म्याशी सायुज्जीकरण झाले. ध्रुव प्रल्हादचा आदर्श समोर ठेवीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याविषयी त्यांनी म्हटलंय ‘धरावया एकान्ती मुद्राध्यान झाली परिस्थिती कारण.
आपले साहित्य, भजन, कीर्तन अन प्रवचनातून सर्वांगीण लोकप्रबोधन करणारे तुकडोजी महाराज जनसामान्यांचे चालते बोलते लोकविद्यापीठच होते. गावोगावी फिरून त्यांनी समाज जागृती केली. विवाह पध्दती, महिलोन्नती, रूढी निर्दालन, अंत्यविधी, शिक्षण पध्दती, प्रपंचपरमार्थ वर्णव्यवस्था, संघटना सामर्थ्य, आदर्श ग्रामराज्य आदी विषयांवर सुधारणावादी, क्रांतीकारक विचार मांडले. भोळ्याभाबडा जनतेला बोधामृत पाजलं, मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण केलं. सामाजिक सुधारणेची, देशभक्तीची, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ग्रामोध्दार नि विधायक कार्याची प्रेरणा दिली. समाजदोषांवर कठोर कोरडे ओढले.
दारूबंदी नि व्यसनमुक्ततेचा हिरिरीने प्रचार केला. हरिजनांसाठी मंदिर खुली केली. जनमानसात खोलवर रूजलेल्या धर्म अन भक्ती भावनेला न दुखवता समाज सुधारणा नि राष्ट्रधर्माचे मर्म लोकांच्या गळी उतरवले. खंजिरीवर ‘गायिलेली त्यांची जोषपूर्ण भजने आणि गीत महाराष्ट्राच्या गावागावंतून, कोपर्याकोपर्यांतून गाजली, मनामनात रूजली, निःहृदयात ठसली.
लोकजीवनात ती विलक्षण लोकप्रिय झाली. ‘पत्थर बनेंगे बॉम्ब, लोक बनेंगे सेना‘ यासारखी त्यांची वीरश्रीयुक्त गाणी आजही अंगावर रोमांच उभे करतात. सबके लिये खुला है* मंदिर ये हमारा* मतभेद को भुला है मंदिर यह हमारा..हे स्वर श्रोत्यांना भावविभोर करतात.
मूळ साहित्यिक पिंड असलेल्या तुकडोजींनी वयाच्या सोळाव्या वर्षीच ‘आंनदामृत‘ या ग्रंथांची रचना केली. पुढे आणखीही ग्रंथ लिहिले. पण त्या सर्वात उत्कृष्ट आहे ‘ग्रामगीत‘. जणू लोकवेदच. खेडापाडातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या सुबोध भाषेत अवतरलेली ‘ग्रामगीता‘ म्हणजे सतत तेवणारा नंदादीपच. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, रामदासांचा दासबोध अन तुकडोजींची ग्रामगीता यामध्ये एक प्रकारचे विलक्षण साम्य आढळते.
‘जनसामान्यांच्या उध्दाराची तळमळ या तिन्ही ग्रंथामागील प्रेरणा आहे. ग्रामीण जीवनाशी समरस झालेल्या तुकडोजींनी ग्रामअगीतेतून ग्रामोध्दाराचा महामंत्र दिला. त्यांचा हा आदर्श साकार झालाय मोझरी जि. अहमदनगर येथील ‘गुरूकुंज‘
आश्रमाच्या रूपानं. ग्रामविकासावर भर देताना ते म्हणतात ‘गावांगावासी जागव* भेदभावा समूळ मिटवा* उजळा ग्रामोन्नतीचा दिवा**‘ या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे सुरू केलेले ‘ग्राम स्वच्छता अभियान खरोखरीच सार्थ वाटते. ते म्हणतात, ‘कलेनेच माणसाची ओळख* एरव्ही कोण पुसतो ‘ ग्रामगीतेतील त्यांचे विश्वकुटुंब नि मानव धर्माचे विचार धर्मांधाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ग्रामगीतेतील ‘महिलोन्नती या भागात त्यांनी स्त्रीजीवनाच्या बारीक सारीक समस्यांचा उहापोह केलेला आहे. त्यातून त्यांचे ‘स्त्री शिक्षण व स्त्री सबलीकरणाविषयीचे द्रष्टेपण सिध्द होते.
आपल्या जीवित काळात त्यांनी वेळोवेळी, राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली चिमूर सत्याग्रहात तसेच ‘चलेजाव‘च्या स्वातंत्र्य लढात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुरूदेव मुद्रणालय, अन सेवामंडळ स्थापन करून त्यांनी गुरूदेव मासिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यांच्या महान कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘राष्ट्रसंत‘ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. ३ जुलै. ११४९ रोजी त्यांनी पंढरपूर येथे आयोजित केले. विश्वधर्मपरिषद अन विश्वशांती संमेलनात ‘हर देशमे तू, हर वेशमे तू* तेरे नाम अनेक तू एकही है* हे त्यांचे प्रख्यात भजन गाऊन त्यांनी सर्वांना आकर्षित केले. भारत-चीन, भारत-पाक युध्दाच्या वेळीस सीमेवर जाऊन आपल्या देशभक्तीपर गीतांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. २२ ऑक्टोबर, १९६८ रोजी ही महान विभूती अनंतात विलीन झाली.
अर्मा बॉम्बेक यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९२७ रोजी बेलब्रूक अमेरिका येथे झाला.
अर्मा बॉम्बेक या अमेरिकेन लोकांची अत्यंत लोकप्रिय आणि जिचं साहित्य प्रचंड वाचलं जातं, अशी प्रसिद्ध विनोदी कथाकार!
त्यांनी घरगुती प्रसंगावर आणि रोजच्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या प्रसंगांवर अत्यंत खुसखुशीत भाषेत मिश्कील लेखन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
७० आणि ८०च्या दशकात त्यांचे ‘विट्स एंड’ हा सिंडिकेटेड कॉलम आठवड्यातून तीन वेळा जवळपास ९०० वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायचा. तिचं प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर असायचंच. मातृत्व आणि बालसंगोपन हे तिचे विशेष जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्या संदर्भात तिचं धमाल विनोदी लेखन प्रसिद्ध व्हायचाच अवकाश, की लगेच त्याच्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या.
दी ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ओव्हर दी सेप्टिक टँक, इफ लाइफ इज ए बोल ऑफ चेरीज व्हॉट अॅम आय डुइंग इन दी पिट्स?, फॅमिली – दी टाइज दॅट बाइंड.. अँड गॅग, आंट एर्माज कोप बुक, मदरहूड दी सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन, अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. अर्मा बॉम्बेक यांचे २२ एप्रिल १९९६ रोजी निधन झाले.
सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. त्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली.
मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.
त्यांचा जन्म ८ मार्च १९३१ रोजी झाला.त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.
१९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सितारों से आगे’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार एस. डी. बर्मन यांनी मनोहारी सिंग यांना संधी दिली. ‘सट्टा बाजार’ चित्रपटातील ‘तुम्हे याद होगा’ या गाण्यातील त्यांचे सॅक्सोफोनवादन लोकप्रिय झाले होते. ‘सबसे बडा रुपैया’ आणि ‘चटपटी’ या दोन चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणूनही ते काम पाहत होते.
शालिमार चित्रपटातील 'हम बेवफा हरगीज न थे', दाग चित्रपटातील 'मेरे दिल मे आज क्या है', मेरा साया चित्रपटातील 'तू जहॉं जहॉं चलेगा मेरा साया', कटी पतंगमधील 'ये शाम मस्तानी', मेरे जीवन साथीमधील 'ओ, मेरे दिल के चैन', शोरमधील 'एक प्यार का नगमा है' तसेच 'दर्या किनारे एक बंगला ग पोरी' अशा शेकडो गाण्यांना त्यांनी सॅक्सो फोनच्या सूरांचा साज चढविला. त्यामुळे त्या गाण्यांची लोकप्रियता वाढली.
शंकर-जयकिशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत-पॅरेलाल आदी नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा नेपाळ सरकारने गौरव केला होता. मनोहारी सिंग यांचा ‘सॅक्स अपील’ नावाचा अल्बमही प्रकाशित झाला होता.
मनोहारी सिंग यांचे १३ जुलै २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.
ते गीतेवर सविस्तर प्रवचने करत. प्रभुपाद स्वामींनी वयाच्या ३३व्या वर्षी दीक्षा घेतली व गौंडिय वैष्णव शिकवणुकीसाठी सारे आयुष्य वाहून घेतले.
भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरू. ‘महारथी कर्ण’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘हिरवा चुडा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.
दीनबंधू मित्र हे प्रसिद्ध बंगाली नाटककार व प्रहसनकार म्हणून विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या काही काव्यरचनाही लोकप्रिय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti