(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी कवी, शाहीर अनंत फंदी

    उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण.

    यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा पण केला. त्यांचे तमाशांतील साथी होते, एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हे कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे.

    अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले' अनंत फंदी यांचा ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळानी गौरव केला होता. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.

    ‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.

    शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. मा.अनंत फंदी यांचा मुलगा सवाई फंदी हेही कवी व कीर्तनकार होते. अनंत फंदी यांचे निधन ३ नोव्हेंबर १८१९ रोजी झाले.

    काही रचना अनंत फंदी यांच्या समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. फटका काव्यप्रकाराचे जनक म्हणजे कवी अनंतफंदी! कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका:
    बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
    संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
    चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
    अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
    नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
    भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
    मायबापांवर रुसूं नको
    दूर एकला बसूं नको
    व्यवहारामधिं फसूं नको
    कधीं रिकामा असूं नको
    परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
    संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
    वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
    बुडवाया दुसर्यााचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
    मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
    एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
    हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
    दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
    बहुत कर्जबाजारी हो‍उनि बोज आपुला दवडुं नको
    स्ने ह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
    विडा पैजेचा उचलुं नको
    उणी तराजू तोलुं नको
    गहाण कुणाचें बुडवुं नको
    असल्यावर भिक मागुं नको
    नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
    कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
    दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
    आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
    उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
    बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
    आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
    असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
    सुविचारा कातरूं नको
    सत्संगत अंतरूं नको
    द्वैताला अनुसरूं नको
    हरिभजना विस्मरूं नको
    गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
    सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको.

    अनंत फंदी यांच्या विषयी मा.होनाजी बाळानी एक कविता लिहिली आहे.

    फंदी अनंद कवनाचा सागर । अजिंक ज्याचा हातखंडा ॥
    चमत्कार चहूंकडे चालतो । सृष्टींवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥
    मूळ संगमनेर ठिकाण त्याचा । कीर्ति उदय जैसा अर्की ॥
    नविन तर्हार नारळी डोयीला । पदर पागोटयाची फिर्की ॥
    वाचावंत संपत्ती सारखी । बहुतांचें तनमन हारकी ॥
    लांगे लुंगे कवि भेदरले । अवघ्यांवर त्याची गुर्की ॥
    समोर गातां कोणी टिकेना । मनामधीं बसली कर्की ॥
    धन ज्याचा हातचा मळ । केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥
    फंदी आनंदी छंदी वरदी । ब्राह्मण त्याव

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • शिरीष दत्तात्रय लाटकर

    “पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. 

  • भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान ऊर्फ नवाब ऑफ पतौडी (धाकटे)

    १९६७ साली त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरूद्ध विदेशी भूमीवर सर्वप्रथम टेस्ट सिरीज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. १९६१ ते १९७५ या काळात ते भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळले.

  • प्रसिद्ध गीतकार शायर साहिर लुधियानवी

    साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी.

    त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ज्ञान पीठ पुरस्कार विजेत्या 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर!

    नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिर यांनी अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. मा.गुलजार हे मा.साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!

    जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा.. .... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारे...मा.साहिर लुधियानवी हे शायर आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे. जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली आहेत. मा.साहिर लुधियानवी यांचे २५ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    साहिर लुधियानवी यांची गाणी

    https://www.youtube.com/shared?ci=-Le4BMzrr2c

    https://www.youtube.com/shared?ci=4Qp_V08TtQI
    भारत पाकिस्तानमधील युद्धाबाबत साहिर लुधियानवी यांनी रचलेली कविता

    खून अपना हो या पराया हो
    नस्ले-आदम का खून है आखिर
    जंग मशरिक मे हो कि मगरिब मे (मशरिक = पुर्व, मगरिब = पश्चिम)
    अम्ने-आलम का खून है आखिर (अम्ने-आलम = विश्व शान्ती)
    बम घरोंपर गिरे के सरहदपर
    रूहे-तामीर जख्म खाती है (रूहे-तामीर = निर्मीतीचा आत्मा)
    खेत अपने जले कि औरोंके
    जस्ति फाकोंसे तिलमिलाती है (जस्ति - जीस्त = जीवन)
    इस लिये ए शरीफ इन्सानो
    जंग टलती रहे तो बेहतर है
    आप और हम सभीके आंगनमे
    शम्मअ जलती रहे तो बेहतर है

  • हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील अभिनेत्री

    भारतीय हिंदी चित्रपटाचा वरील काळ सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. त्या काळातील नर्गीस, मधुबाला, मीनाकुमारी, बहिदा रेहमान, नुतन, वैजयंतीमाला, साधना या अभिनेत्रींनी सर्वाथाने गाजवला. या तारका रसिक मनाच्या कोंदणात अजूनही विराजमान असून त्यांच्या सौदर्याचा अभिनयाचा नृत्यांमधील पदन्यास, पदलालित्याचा मोहमयी प्रवास अभिनयातील वैविध्यता जाणून घेणे रंजक आहे

  • वसंत वासुदेव परांजपे

    वसंत वासुदेव परांजपे हे भारताचे चीनमधील माजी राजदूत होते. भारत आणि चीन यांच्यात अगदी जवळीकीचे संबंध असायला हवेत, असे परांजपे यांना वाटत असे, त्यासाठी ते त्यांच्या मार्गाने प्रयत्नही करत असत. चीनमध्ये त्यांचा मित्रवर्ग आणि चाहतावर्ग मोठा होता.

    चीनमध्ये ते चिनी भाषा शिकायच्या उद्देशाने गेले आणि ती शिकून होताच त्यांना परराष्ट्र सेवेत घेण्यात आले. परराष्ट्र सेवेत त्यांना आधी चीनचाच विभाग सांभाळण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांना चीनमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यांची निवड पंडित नेहरूंनी केली होती. ते १९७४ ते १९७८ या काळात ते इथियोपियामध्ये राजदूत होते. १९७८ ते १९८२ या काळात दक्षिण कोरियामध्ये त्यांची राजदूतपदी नियुक्ती झाली. भारतीय परराष्ट्रसेवेतून ते १९८२ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते कधीच स्वस्थ बसले नाहीत. त्यांचा चीनविषयीचा अभ्यास चालूच राहिला.

    भारतात परतल्यावर ते गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. परांजपे हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. बी.ए.ला त्यांनी भाऊ दाजी लाड शिष्यवृत्ती मिळवली. १९४७ ते १९५० या काळात चीनमधले शिक्षणही त्यांनी चिनी शिष्यवृत्तीवर केले.

    परांजपे यांचे चिनी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांचा चीनविषयक गाढा अभ्यास पाहून भलेभले राजकारणी आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी थक्क होऊन जात. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या विद्वत्तेचे चाहते होते. पंडित नेहरू यांच्या चीन भेटीच्या वेळी परांजपे हे त्यांचे दुभाषा प्रतिनिधी होते. चीनचे तेव्हाचे पंतप्रधान झाऊ एन लाय यांच्याशी नेहरू यांनी केलेल्या सर्व राजकीय चर्चेचे ते नुसते साक्षीदारच नव्हते तर त्या चर्चेतले उत्कृष्ट संवादकही होते.

    १९५४ मध्ये माओ झेडाँग यांच्यातल्या चर्चेचेही ते संवादक होते. १९६० मध्ये नेहरू आणि झाऊ यांच्यात यांगून, नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेत त्यांचा दुभाषा या नात्याने सहभाग होता. बांडुंगमध्ये पार पडलेल्या शिखर परिषदेला नेहरूंनी आपल्याबरोबर परांजपे यांना घेतले होते.

    परांजपे यांना चिनी भाषेतही वेगळ्या नावाने ओळखले जात होते. ‘बै चुनहुई’ या नावाने ते परिचितांमध्ये ओळखले जात. पन्नासच्या दशकात जेव्हा ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेचे दिवस होते तेव्हा चीनमध्ये काम करायला मिळणे हाही त्यांच्या दृष्टीने मोठा योग होता.

    त्यांच्याविषयी ‘हिंदू’ दैनिकात लिहिताना सुजन चिनॉय यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चिनॉय हे तेव्हा भारताच्या परराष्ट्र खात्यात चिनी विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहात होते.

    त्यांचा वेषही अगदी साधा असे. साधा खादीचा अध्र्या बाह्यांचा शर्ट, विजार आणि पायात स्पोर्ट्स् शूज!. ते पुणे शहरात वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातले पहिले रहिवासी. तिथेही ते साधेपणानेच राहायचे, असे डॉ. विश्वास मेहेंदळे सांगतात.

    नेहरू काळापासून परांजपे यांचे चालू असलेले चीनविषयक प्रेम अगदी अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होईपर्यंत चालूच होते. राजीव गांधी पंतप्रधानपदी आले तेव्हा त्यांचाही बीजिंगचा दौरा निश्चित झाला. डिसेंबर १९८८ मध्ये त्यांच्याबरोबर दुभाषा म्हणून कोण जाऊ शकेल याविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा परराष्ट्र कचेरीत पुन्हा एकदा परांजपे यांचेच नाव घेतले गेले. राजीव गांधींच्या दौऱ्यातही त्यांचा समावेश झाला.

    गेल्या वीस वर्षांमध्ये चीन बराच बदलला असल्याचे मत परांजपे यांनी आपल्या नोंदींमध्ये केले आहे. चीन बदलला म्हणजे त्याचे आणि भारताचे संबंधही सुधारतील, असे भाकीत त्यांनी केले होते. १९८७ ते १९९१ या काळात चीनमध्ये राजदूतपदी सी.व्ही. रंगनाथन होते. ते लिहितात की, चीनमध्ये आपले आगमन होण्यापूर्वी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी पी. एन. हक्सर आणि परांजपे यांना चीनमध्ये पाठवले होते. हक्सर हे राजीव गांधी यांचे खास दूत होते. रंगनाथन पोहोचले त्याच दिवशी त्यांना प्रा. वू शियाओफिंग यांनी मेजवानीसाठी पाचारण केले. शियाओफिंग हे बीजिंग विद्यापीठात संस्कृत शिकवायचे. ते परांजपे यांचे खास मित्र. त्या प्रसंगी त्यांनी कालिदासाचे मेघदूत आपल्याला मुखोद्गत असल्याचे दाखवून सर्वाना चकित केले होते. परांजपे यांना मात्र ते नवीन नव्हते. त्यांच्या मित्रपरिवारात ‘रामचरितमानस’चे चिनी भाषेत रूपांतर करणारे प्रा. जी. शियालिन, इंदिरा गांधी यांचे शांतिनिकेतनमधले सहाध्यायी प्रा. जिंग दिंगहान यांचाही समावेश होता. त्यांच्या चीनविषयीच्या ज्ञानाने प्रत्येकजणच भारावून गेल्याचे पाहायला मिळायचे.

    ८ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले.

    (संदर्भ : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांची माहिती, लोकसत्ता मधील व्यक्तिवेध सदर.)

  • कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर

    साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…

  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

    ‘शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

  • जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.

  • थोर समाजसेवक बाबा आमटे

    समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.