(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवगडचे कवी प्रमोद जोशी

    एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही. त्यांच्या कवितेतून अलौकिक काव्य अनुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत असते.

  • रामदास भटकळ

    पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्‍या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एल.एल.बी त्यानंतर मुंबई विद्यापीठून राज्यशास्त्र विषयातून एम.ए.पूर्ण केले.

    १९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील. १९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला.

    “बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.

    “द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथा लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता  चैतन्य ताम्हाणे

    एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.

  • आप्पा गोगटे

    आप्पासाहेबांनी मतदारसंघ टँकरमुक्त होण्यासाठी आपल्या कार्यकालात अपार मेहनत घेतली. शेतकर्‍यांची शेती-बागायती वाचवण्यासाठी आप्पासाहेबांनी अनेक बंधारे मंजूर करून घेतले. जुन्या किंवा आतापयर्ंत प्रचलित असणार्‍या देवगड मतदारसंघातील किनारपट्टी भागात गावोगावी आप्पांच्या कार्याची साक्ष देत हे बंधारे उभे आहेत.

  • प्रसिध्द प्राच्य विद्यापंडीत मॅक्सम्युल्लर

    ’एन्शन्ट संस्कृत लिटरेचर’, ’लेक्चर्स ऑन दी सायन्स ऑफ लॅग्वेज’, ’इंन्ट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन’, ’बायोग्राफिज ऑफ वर्डस’, ’सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे त्यांनी लिहिलेले काही प्रमुख ग्रंथ होत.

  • चित्रपट निर्माते मनमोहन देसाई

    मनमोहन देसाई यांचे वडिल किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते व बंधू सुभाष देसाई निर्माते होते.त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला.

    मनमोहन देसाई यांना बॉलीवुड मध्ये मनजी या नावाने ओळखले जायचे. मनजीनी बॉलीवूड मधील सुरवात आपले बंधू निर्माते सुभाष देसाई याच्या ‘छलिया’ या चित्रपटापासून केली. मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ चित्रपट हिट झाले.

    मनमोहन देसाई यांच्या अमर अकबर एंन्थनी या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड मधील वन मैन इंडस्ट्री बनवले. मनमोहन देसाई यांचे लग्न जीवनप्रभा देसाई यांच्या बरोबर झाले, पण १९७९ ला त्याच्या निधनानंतर त्यांचा अभिनेत्री नंदा यांच्या बरोबर साखरपुडा झाला पण ते लग्न होऊ शकले नाही.

    मनमोहन देसाई यांचे १ मार्च १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वर्षा उसगांवकर

    वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.

    तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.

    नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.

    वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :

    तुझ्यावाचून करमेना
    गंमत जंमत
    खट्याळ सासू नाठाळ सून
    सगळीकडे बोंबाबोंब
    मज्जाच मज्जा
    रेशीमगाठी
    आत्मविश्वास
    हमाल दे धमाल
    कुठं कुठं शोधू मी तुला
    नवरा बायको
    अफलातून
    भुताचा भाऊ
    पसंत आहे मुलगी
    आमच्या सारखे आम्हीच
    मालमसाला
    उपकार दुधाचे शेजारी शेजारी
    पटली रे पटली
    घनचक्कर
    बाप रे बाप
    डोक्याला ताप नाही
    मुंबई ते मॉरिशस
    ऐकावं ते नवलच
    एक होता विदूषक
    शुभमंगल सावधान

    विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)

    ## Varsha Usgaonkar

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • ज्येष्ठ संगीतकार तिमिर बरन

    संगीतकार म्हणून तिमिर बरन हे कलकत्ता येथील न्यू थिएटर्सच्या तीन संगीत दिग्दर्शकांपैकी (आरसी बोरल आणि पंकज मलिक) एक होते. त्यांनी १९३५ मध्ये न्यू थिएटर्सच्या देवदास चित्रपटासाठी संगीत दिले. के एल सहगल यांनी गायलेले “बालम आओ बसो मोरे मन में” आणि के सी डे यांनी गायलेले “मत भूल मुसाफिर” ही या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत.

  • जयवंत द्वारकानाथ दळवी

    कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.

  • मृदुला बर्वे

    पौरोहित्य विषयात संपूर्ण operations असणारी www.oPandit.com च्या संचालिका