(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • नावाप्रमाणेच समर्थ अभिनेत्री शोभना समर्थ

    शोभना समर्थ यांचे वडील बँकचे संचालक होते. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नूतन व तनुजा यांची मातोश्री व काजोल, मोहनीश बहेलची आजी. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मामा जयवंत (नलिनी जयवंतचे वडील) यांच्याकडे त्यांचे संगोपन झाले. मामाच्या कडक अनुशासनात राहूनही त्या चोरून चित्रपट बघायची व सिनेतारकां होण्याचे स्वप्न बाळगायच्या.

    वयाच्या १८ व्या १९३४ साली केवळ ५०० रुपये पगारावर 'निगाह-ए-नफरत' या मास्टर विनायक निर्मित चित्रपटात त्यानी काम केले. हाच चित्रपट १९३५ साली मराठीत 'विलासी ईश्वर' म्हणून निघाला. त्या तारका बनल्या. शोभना समर्थ यांचे माहेरचे नाव सरोज शिलोत्री. जर्मनीहून सिनेमेटोग्राफीचे प्रशिक्षण घेऊन आलेले कुमार सेन समर्थ यांच्यासोबत त्याचा विवाह झाला. सरोज शिलोत्रीची 'शोभना समर्थ' झाल्या. त्या काळातील मातब्बर कलाकार मोतीलाल बरोबर सौंदर्य खणी शोभना समर्थ यांची जोडी खूप गाजली.

    'दो खरब जन', 'दो दीवाने' (१९३६), 'कोकिला' (१९३७) हे त्यांचे चित्रपट. त्या काळातील धार्मिक चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार प्रेम अदीब बरोबरही त्यांची जोडी जमली. 'निराला हिंदुस्थान' (१९३८) या सामाजिक चित्रपटानंतर ११ चित्रपटांत ही जोडी कायम होती.

    'साधना' (१९३९), 'सौभाग्य' (१९४०), 'भरतमिलाप', 'स्वामीनाथ' (१९४२), 'रामराज्य' (१९४३), 'उर्वशी' (१९४६), 'विधरांगणा' (१९४७), 'रामबाण' (१९४८), 'रामविवाह' (१९४९), 'रामायण' (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली. या जोडीचे राम-सीताच्या चित्रांचे कॅलेंडर्स त्या काळात घरोघरी दिसत होते. त्यातही 'रामराज्य' या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचा दर्जा दिला. आजही त्या काळातील लोक तिची ओळख 'रामराज्य'मधील सीता म्हणूनच सांगतात.

    प्रारंभिक काळात तिने वास्ती, नझिर, बलवंतसिंग, याकूब, हरीश, चंद्रकांत जयराज, शाहू मोडक, अरुण आहुजा (गोविंदाचे वडील), चंद्रमोहन इ. बरोबर अनेक चित्रपटात कामे केलीत. १९४५ मध्ये पृथ्वीराज कपूर बरोबर 'श्रीकृष्णार्जून युद्ध' व 'नलदमयंती'मध्ये कामे केलीत. त्याच वर्षी 'वीर कुणाल' चित्रपटात मुबारक बरोबर सम्राट अशोकाची राणी 'तिष्यरक्षिता'चे काम करून अभिनयाची सर्वोत्कृष्ट उंची गाठली.

    १९४९मध्ये शोभना पिक्चर्स नामे स्वतःची निर्मिती करून 'हमारी बेटी' चित्रपट काढला. यात तिने आपली ज्येष्ठ कन्या नूतनला नायिकेचा रोल दिला. त्यांनी १९६० साली 'छबीली' चित्रपटाद्वारे दुसरी कन्या तनुजाला चित्रपटात आणले. शोभना समर्थ यांचे निधन ९ फेब्रुवारी २००० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठीतील श्रेष्ठ गीतकार व भावकवी भा. रा. तांबे

    भा.रा.तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल.

  • ज्येष्ठ गायक कुंदनलाल सैगल

    कुंदनलाल सैगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. ती सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायिल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जलंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही.

    गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. १९३१ साली कोलकात्यात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना 'न्यू थिएटर्स' साठी करारबद्ध केले. १९३२ मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर्. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली.

    चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील 'बालम आवो बसो मोरे मन मे' व 'दुख के अब दिन बीतत नही' यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व 'न्यू थिएटर्स' निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. 'न्यू थिएटर्स'ची निर्मिती असलेले सैगल यांचे यशस्वी चित्रपट असे: दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर); जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन) इ. त्याचबरोबर 'एक बंगला बने न्यारा' (प्रेसिडेंट), 'करू क्या आस निरास भई' (दुष्मन), 'सो जा राजकुमारी सो जा' (जिंदगी, १९४०), 'बाबूल मोरा' (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृध्द करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल 'न्यू थिएटर्स'मध्ये होते. या काळात बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली. सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व 'रणजित मुव्हिटोन ' या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले.

    त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील 'दिया जलाओ' हे शुध्द कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. 'न्यू थिएटर्स'च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील 'दो नैना मतवारे' व 'ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे' ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहाँ हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील 'गम दिए मुत्त किल', 'जब दिल ही टूट गया' यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भीडत. सैगल यांच्या गायकीवर शास्त्रशुध्द गायकीचेही संस्कार झाले होते. उस्ताद फैयाज खाँ यांची तालीमही काही दिवस त्यांना मिळाली होती. सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले.

    गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, 'चाह बरबाद करेगी '(शाहजहाँ), 'ऐ कातिब-ऐ तकदीर' (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच 'राधेरानी देय डालो ना' (पूरन भगत), 'जीवन का सुख आज प्रभु मोहे' (धूप छाँव) व 'मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले 'सो जा राजकुमारी' हे अंगाईगीत तसेच 'बाबूल मोरा' ही भैरवीतल्या करूण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगलयांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती. बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये प्रदर्शित झाला. सहगल किर्तीच्या शिखरावर पोहोचले. तरीही डोक्यात हवा न जाता नम्र आणि साधेच राहिले.एकदा त्यांचा चाहता मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आला.परिस्थिती गरीब होता.त्याची इच्छा होती सहगल साहेबानी मुलीला लग्नात आशिर्वाद द्यावेत.सहगल साहेबांनी होकार दिला.त्याच दिवशी एका धनीकाने खाजगी महफिलीला बोलावले.दहा हजार रुपये बिदागी देण्याचे प्रलोभन दाखवले.पण ते आमंत्रण सहगल नीं नाकारले.त्या गरीब चाहत्याच्या मुलीच्या लग्नाला गेले.तिथे बसायला खाट सुद्धा नव्हती.सहगल आनंदाने जमीनीवर बसले.आशिर्वाद दिलेच शिवाय आपल्या गायनाने जमलेल्याना आनंद दिला.

    प्रसिद्ध खलनायक के एन सिंग आणि सहगल यांची मैत्री होती. दोघेही माटुंगा येथे जवळ जवळ रहात असत.के एन सिंग आणि गजानन जागीरदार मित्र होते.ते एके दिवशी गजानन जागीरदार यांना सहगल यांच्या घरी घेऊन गेले. सहगल यांना स्वत: स्वैपाक करण्याची.वेगवेगळे पदार्थ करण्याची फार हौस होती.सहगल यांनी के एन सिंग आणि जागीरदार यांना आग्रहाने जेवायला बसवले. मद्यपान झाल्यावर सहगलना गाणी ऐकायची लहर आली. जागीरदार यांच्या गाडीतून आणखी चार लोक फोरास रोड ला गेले. गाडी पहाताच दलालांची गर्दी जमली. गाणारीण कोण आहे याची सहगल साहेबांनी चौकशी सुरु केली .तेव्हढयात सहगल ना कोणीतरी ओळखले आणि काही मिनीटात सगळ्या फोरास रोडवर बातमी पसरली.सगळे व्यहवार थांबले.सहगल ना पहायला अमाप गर्दी झाली. सगळ्यांनी सहगल ना गाण्याचा आग्रह केला. अखेर सहगल जागीरदारांच्या मोटारीवर चढले. तिथे बसून एक गाणे म्हणले. गाणे ऐकायला गेलेले सहगल गाणे ऐकवून आले.

    कुंदनलाल सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.

    लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
    तुझ्याच कंठामध्ये अवचित
    मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
    बुलबुल बसले बनात रुसुनी।

    कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
    अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
    घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ मराठी विश्वकोश

  • निरूपा रॉय

    बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला. बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

    १९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं.

    निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे. निरुपा यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ग्रामीण कथाकार शंकर पाटील

    ‘धिंड,‘नाटक’,‘मिटिंग’ यासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या शंकर पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे झाला.

    शंकर बाबाजी पाटील यां चे शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले) व गडहिंग्लज येथे व कोल्हापूर येथे बी. ए. बी. टी. पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली. सुरुवातीस आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम सहाय्यक अधिकारी काम केत असताना शंकर पाटील यांनी १९५९ मध्ये एशिया फौंडेशनच्या शिष्यवृत्तीतून ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला व टारफुला ही कादंबरी लिहिली.

    “टारफुला’ या कादंबरीत कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचे चित्र उभे करणारी तीन पिढ्यांची कहाणी लिहिली. “कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य इतके लोकप्रिय झाले की त्याचे दोन हजार प्रयोग झाले. त्याशिवाय गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. ग्रामीण तमाशा त्यांनी शहरी लोकांपुढे वगनाट्यातून आणला व त्याला प्रतिष्ठाही मिळाली. प्रामुख्याने ग्रामीण कथाकार व चित्रपट कथाकार म्हणून लौकिक मिळवलेल्या शंकर पाटील यांचा १९६० ते ७० हा कथालेखनाचा बहाराचा काळ होता.

    ग. प्र. प्रधानांसह आठवी ते दहावीसाठी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन करणारे शंकर पाटील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी होते. ‘वळीव’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ‘भेटीगाठी’,‘धिंड’,‘बावरी शेंग’,‘खुळय़ाची चावडी’,‘फक्कड गोष्टी’,‘खेळखंडोबा’,‘आभाळ’ असे सरस कथासंग्रह देणा-या पाटील यांना अनेक कथासंग्रहांना व चित्रपट कथांना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले. “वावटळ’ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला इ चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले.

    याशिवाय पिंजरा, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, पाहुणी, लक्ष्मी इ. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले.शंकर पाटील यांनी ५९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. शंकर पाटील यांचे ३० जुलै १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

    शंकर पाटील यांचे कथा कथन
    https://www.youtube.com/watch?v=Gk6EzPcknko

    https://www.youtube.com/watch?v=588U6yjkPhw
    https://www.youtube.com/watch?v=RY9GzHOR_SE

  • संगीतकार शंकरराव व्यास

    कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून पलुसकर यांनी त्यांना आपल्या बरोबर घेतले. पलुसकर यांनी स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात ९ वर्ष शिक्षण घेतले. नंतर ते अहमदाबाद येथील राष्ट्रीय विद्यालय येथे शिक्षक झाले. पलुसकर यांनी लाहोर येथे स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात प्राचार्य म्हणून गेले. १९३८ मध्ये शंकरराव व्यास हिन्दी फिल्म संगीतच्या क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. १९३८ मध्ये आलेल्या ‘पूर्णिमा’ या चित्रपटात काही गाणी गायली. गायना बरोबर चित्रपटातील रचना त्याच्या गाजू लागल्या होत्या. व्यास यांच्या संगीतबद्ध, भक्ति प्रधान गाणी लोकांना आवडू लागली होती १९४० मध्ये ‘सरदार’, ‘नरसी भगत’ व १९४२ मध्ये ‘भरतमिलाप’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

    रामराज्य’चे दिग्दर्शक विजय भट्ट महात्मा गांधींना ‘रामराज्य’ दाखवायला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. लव यशवंत निकम तर कुश मधुसूदन होते. प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’मध्ये याच यशवंताने बाल ज्ञानेश्वराची भूमिका केली होती. मन्ना डे यांनी हिंदी व मराठी या दोन्ही चित्रपटांत पाश्र्वगायन केले होते. हा चित्रपट गाजला तो शंकरराव व्यास यांच्या सुमधुर संगीतामुळे! विशेषत: रंजनावर चित्रित झालेल्या व सरस्वती राणे यांनी गायिलेल्या भीमपलासी रागातील ‘बीना मधुर मधुर कछु बोल’ या गाण्यामुळे! असा भीमपलासी गेल्या सत्तर वर्षांत परत कधी ऐकायला मिळाला नाही. त्यांना विजय भट यांच्या ‘रामराज्य’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. खरे तर हे गाणे के. सी. डे यांनी म्हणावे अशी संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांची इच्छा होती. पण के. सी. यांनी मन्नादांचे नाव सुचविले.

    मन्नादांचा आवाज व्यास यांना आवडला. या चित्रपटाचे संगीतकार होते शंकरराव व्यास. या चित्रपटातील राग वर आधारित गाणी खूप लोकप्रिय झाली होती, ‘भारत की एक सन्नारी की हम कथा सुनाते हैं...’ ‘वीणा मधुर मधुर कछु बोल...’। शंकरराव व्यास यांनी ही दोन्ही गाणी राग काफी व भीमपलासी मध्ये रचली होती. व्यास यांची कुशलता केवळ फिल्म संगीत मध्ये नव्हती तर त्यांनी शास्त्रीय गायन, संगीत शिक्षण और ग्रन्थकार म्हणून काम केले. फिल्म के साथ कई उल्लेखनीय तथ्य जुड़े हुए हैं, जिनमें शंकरराव व्यास यांनी पार्श्वगायक मन्ना डे यांच्या कडून ‘रामराज्य’ चित्रपटातील गाणी गावून घेतली होती. शंकरराव व्यास यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • लेखक – दिग्दर्शक रजत कपूर

    रजत कपूर हे प्रामुख्याने ग्लॅमरस बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा म्हणून ओळखला जातो. रजत कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे.

  • चंद्रकांत रघुनाथ गोखले

    अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. "चित्ताकर्ष' ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं. वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

    ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात "बेबंदशाही' आणि "पद्मिनी' यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. "नटसम्राट', "पुण्यप्रभाव', "भावबंधन', "राजसंन्यास', "बॅरिस्टर', "पुरुष', "पर्याय' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. "बॅरिस्टर' हे त्यांचं आवडतं नाटक होतं. "पुरुष' या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. "रायगडचा राजबंदी' या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.

    कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. मा.चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मास्टर भगवान

    डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली.

  • दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक कमलेश्वर

    दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पड्द्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण.