(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी कवी, शाहीर अनंत फंदी

    उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण.

    यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा पण केला. त्यांचे तमाशांतील साथी होते, एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हे कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे.

    अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले' अनंत फंदी यांचा ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळानी गौरव केला होता. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.

    ‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.

    शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. मा.अनंत फंदी यांचा मुलगा सवाई फंदी हेही कवी व कीर्तनकार होते. अनंत फंदी यांचे निधन ३ नोव्हेंबर १८१९ रोजी झाले.

    काही रचना अनंत फंदी यांच्या समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. फटका काव्यप्रकाराचे जनक म्हणजे कवी अनंतफंदी! कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका:
    बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
    संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
    चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
    अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
    नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
    भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
    मायबापांवर रुसूं नको
    दूर एकला बसूं नको
    व्यवहारामधिं फसूं नको
    कधीं रिकामा असूं नको
    परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
    संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
    वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
    बुडवाया दुसर्यााचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
    मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
    एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
    हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
    दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
    बहुत कर्जबाजारी हो‍उनि बोज आपुला दवडुं नको
    स्ने ह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
    विडा पैजेचा उचलुं नको
    उणी तराजू तोलुं नको
    गहाण कुणाचें बुडवुं नको
    असल्यावर भिक मागुं नको
    नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
    कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
    दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
    आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
    उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
    बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
    आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
    असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
    सुविचारा कातरूं नको
    सत्संगत अंतरूं नको
    द्वैताला अनुसरूं नको
    हरिभजना विस्मरूं नको
    गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
    सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको.

    अनंत फंदी यांच्या विषयी मा.होनाजी बाळानी एक कविता लिहिली आहे.

    फंदी अनंद कवनाचा सागर । अजिंक ज्याचा हातखंडा ॥
    चमत्कार चहूंकडे चालतो । सृष्टींवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥
    मूळ संगमनेर ठिकाण त्याचा । कीर्ति उदय जैसा अर्की ॥
    नविन तर्हार नारळी डोयीला । पदर पागोटयाची फिर्की ॥
    वाचावंत संपत्ती सारखी । बहुतांचें तनमन हारकी ॥
    लांगे लुंगे कवि भेदरले । अवघ्यांवर त्याची गुर्की ॥
    समोर गातां कोणी टिकेना । मनामधीं बसली कर्की ॥
    धन ज्याचा हातचा मळ । केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥
    फंदी आनंदी छंदी वरदी । ब्राह्मण त्याव

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर

    मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.

    स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. १९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

    १९८६ मध्ये त्यांनी "गडबड घोटाळा' व "तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी "अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले. "कळत नकळत' व "तू तिथे मी' या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. "अस्मिता चित्र'चा "चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी "मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

    संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने "तू तिथे मी', "सातच्या आत घरात', 'आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले. "सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. "अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.

    स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी "अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. 'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत. स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    स्मिता तळवलकर यांचे चित्रपट : तू सौभाग्यवती हो, गडबड घोटाळा (१९८६), कळत नकळत (१९८९), चौकट राजा (१९९१), सवत माझी लाडकी (१९९३), शिवरायाची सून ताराराणी (भूमिका : येसूबाई) (१९९३), तू तिथे मी (१९९८), सातच्या आत घरात (२००४), आनंदाचे झाड (२००६), चेकमेट (२००८), टोपी घाला रे (२०१०), अडगुळं मडगुळं (२०११), एक होती वाडी (२०११), जन्म (२०११), श्यामचे वडील (२०१२), या गोल गोल डब्यातला (२०१२), प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१३)
    मालिका : घरकुल, पेशवाई, अवंतिका, ऊनपाऊस, कथा एक आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी, उंच माझा झोका.
    नाटके : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या (भूमिका : जनाबाई), दुर्गाबाई जरा जपून.
    पुरस्कार : कळत नकळत (राष्ट्रीय पुरस्कार), तू तिथे मी (राष्ट्रीय पुरस्कार व महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार), सवत माझी लाडकी (महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार), महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (2010).

  • शाहीर अनंत फंदी

    अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले

  • उद्योगपति कमलनयन बजाज

    त्यांना महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला. ते देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना ते सर्वात आधी देशाचा विचार करीत होते.

  • बॉलिवूडमधील ‘काका’ राजेश खन्ना

    चालण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले.

  • ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी कृष्णराव चोणकर

    इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

  • संजय शंकर गायकवाड

    संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.

    व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे.

    ## Sanjay Shankar Gaikwad

  • चंद्रकांत कामत

    संगीतातील लय ही एक अत्यंत प्रतिभावान संकल्पना आहे. स्वरांना लयीच्या आकृतीमध्ये बांधून ठेवण्याची ही कल्पना ज्या कुणाला सुचली, त्याचे या पृथ्वीवरील समस्त मानवजातीवर अनंत उपकार आहेत. संगीताला या लयीमुळे एक प्रकारचा चुस्तपणा, बंदिस्तपणा आला. या बांधीव मांडणीमुळे संगीताच्या सौंदर्याच्या कल्पनेतही बदल झाले. मैफलीत कोणत्याही गायक वा वादकाबरोबर तबल्याची संगत करणाऱ्या वादकाला मुळात गाणे कळणे अत्यंत आवश्यक असते.

    गाणे कळणे आणि त्यावर नितांत प्रेम करणे हे गुणधर्म असलेला तबलावादकच कलावंताला अप्रतिम साथ करू शकतो. आयुष्यभर अनेक दिग्गजांबरोबर अशी लयीची संगत करणारे पंडित चंद्रकांत कामत यांचे निधन म्हणजे एका लयदार व्यक्तिमत्त्वाची अखेर आहे. अतिशय शांत आणि कमी बोलणारे कामत जेव्हा तबला आणि डग्ग्यासमोर बसायचे, तेव्हा त्यांना ब्रह्मांडाचाच साक्षात्कार होत असला पाहिजे. तबला आणि डग्गा या दोन वाद्यांमधून येणाऱ्या वेगवेगळय़ा ध्वनींचा एकरूपतेने आविष्कार करणाऱ्या तबलानवाजांची एक परंपराच भारतीय संगीतात आहे.

    चंद्रकांत कामत हे स्वत: उत्तम तबलावादक असले तरीही त्यांनी आपले सारे कलाआयुष्य तबल्यावर साथसंगत करण्यात घालवले. कलावंताबरोबर साथ करणे ही काही केवळ तांत्रिक आणि यांत्रिक गोष्ट नसते. प्रत्येक कलावंताची प्रतिभा वेगळी, त्याची मांडणी वेगळी, स्वभावाचे कंगोरे वेगळे आणि प्रत्यक्ष मैफलीत त्याला फुटणारे निर्मितीचे धुमारेही वेगळे! या सगळय़ाची जाणीव ठेवून साथ करणारा कलाकार हा तेवढय़ाच उंचीचा असतो. पंडित चंद्रकांत कामत यांनी ती उंची गाठली होती. पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. गायक आणि संगतकार यांच्यात अद्वैत निर्माण झाल्याशिवाय गाणे खुलत नाही.भीमसेनजींच्या अनेक अजरामर मैफलींमध्ये हे अद्वैत हजारो रसिकांनी अनुभवले आहे.

    भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी कामतांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. तबल्यावर लय धरताना कलावंताचा मूड समजून घेणे आवश्यक असते. कलावंताला नवे काही सुचण्यासाठी साथीदार तयारीचा असावा लागतो. केवळ लय पकडून ठेवली म्हणजे गाणे रंगते असे होत नाही. कलावंताला त्या स्वरांमध्ये चिंबवण्यासाठी लयीचे कोंदण मिळवून देणे तेवढेच महत्त्वाचे असते. कामतांच्या तबलावादनात या सगळय़ा गोष्टी होत्या. आजकाल मैफलीत साथ करणारे वादक काहीवेळा आगाऊपणा करतात. कलावंतापेक्षा आपणच काकणभर सरस कसे आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसा सोस कामत यांनी कधी केला नाही. त्यामुळेच भावगीतापासून ते अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत सगळय़ा संगीत प्रकारात त्यांनी आपली मुद्रा उमटवली.

    लहानपणी वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर त्यांनी बालनट म्हणून काम करायला सुरुवात केली तरी त्याच वयात तबला शिकण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. नाटक कंपनी बंद पडल्यामुळे कामत पुण्यात आले आणि त्यांनी कथक कलाकार रोहिणी भाटे यांना तबल्याची साथसंगत करण्यास सुरुवात केली. भाटे यांना तब्बल पंधरा वर्षे त्यांनी तबलासंगत केली. याच काळात आकाशवाणीमध्ये तबलावादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि सुमारे पस्तीस वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केले. या काळात जी. एल. सामंत यांच्यासारख्या कसलेल्या गुरूकडून आणि सामताप्रसाद यांच्यासारख्या दिग्गजाकडून तबलावादनातील अनेक नवे धडे घेण्यात कामत यांना जराही कमीपणा वाटला नाही. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधील त्यांची हजेरी कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही आश्वासक असे. त्यांच्या कलाजीवनात त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळालेच, पण पुणे महापालिकेकडून गौरव करण्यात आला. भरत आणि सुभाष या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा कलेचा वारसा सुरू ठेवला आहे, हे कलावंतासाठी भाग्याचेच म्हटले पाहिजे.

    चंद्रकांत कामत यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (11-Jul-2017)

    ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (26-Nov-2018)

    VV

  • व्हायोलीन वादक व गायक पं गजाननबुवा जोशी

    विख्यात व्हायोलीन वादक व गायक मा. पं गजाननबुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी झाला.

    ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले आहे.

    हातचे राखून न ठेवता आपल्याकडचे सारे शिष्यांना देणाऱ्या गुरूंपैकी गजाननबुवा एक होते. संगीताचा विद्यार्थी म्हणूनच जगायचे, वावरायचे हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे शेवटपर्यंत ते विद्यार्थी म्हणूनच वावरले, जगले व शिकत राहिले. दौऱ्याहून परतल्यानंतर आपले अनुभव सांगतील म्हणून सगळे उत्सुक असायचे, पण बुवा खिशातून एखादा कागदाचा कपटा काढून त्यावर लिहून आणलेली बंदीश शिकविण्यात दंग होऊन जायचे. वाळूतून तेल निघेल एवढी मेहनत घेणाऱ्यांपैकी गजाननबुवा एक तालिया होते. स्वरांचा सच्चा असलेला हा माणूस व्हायोलिन केवळ वाजवतच नसे, तर त्यांचे व्हायोलिन गात असे. गाणे बोलायचे नाही तर ते गाण्याशी बोलायचे, असा हा आदळआपट न करणारा महान तालिया होता.

    गजाननबुवा जोशी यांचे २८ जून १९८७ निधन झाले. गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ रेकॉर्डिंग इंटरनेटवर उपलब्ध आहे.

    http://www.gajananbuwajoshi.com

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #PtGajananbuvaJoshi #GajananbuaJoshi

  • पंडित निवृत्तीबुवा सरनाईक

    १९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली.