(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारताचे माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत

    भैरोसिंग शेखावत हे भारताचे ११ वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ या कालावधीत हे पद भूषवले होते. तब्बल तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.

      October 23, 2021


  • पखवाजवादक शंकरबापू आपेगावकर

    शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता. शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.

    शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे. शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 9, 2019


  • हरिभाऊ शेजवळ

    प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्‍या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे..

      June 20, 2013


  • इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद स्वामी

    ते गीतेवर सविस्तर प्रवचने करत. प्रभुपाद स्वामींनी वयाच्या ३३व्या वर्षी दीक्षा घेतली व गौंडिय वैष्णव शिकवणुकीसाठी सारे आयुष्य वाहून घेतले.

      September 1, 2021


  • ख्यातनाम मराठी कोशकार चिंतामणी गणेश कर्वे

    ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.

      December 16, 2021


  • श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे

    श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १ जानेवारी १६६२ रोजी झाला. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो.

    "वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली". या विश्वनाथ परशुरामांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. त्यापैकीच बाळाजी विश्वनाथ हे पुढे आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या पेशवेपदी विराजमान झाले. राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता.

    अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्या वरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले.

    बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला, येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत देशावर आले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले.

    पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. पुढे पुढे बाळाजीपंतांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले. १६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत "बालू पंदत" म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत 'दिम्मत सेनापती' आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्याह काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले.

    मे १७०७ मध्ये शाहूंच्या सुटकेनंतर ताराबाईंनी शाहूंना राज्याधिकार नाकारला असताना बाळाजीपंतांनी शाहूंना ओळखले आणि धनाजी जाधवरावांनाही शाहूराजांची ओळख पटवून दिली आणि ताराबाईंचा विरोध पत्करून शाहूराजांना सातार्याीच्या गादीवर बसवले. पुढे धनाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा पुत्र चंद्रसेन जाधवाच्या उपद्व्यापी धोरणांमूळे शाहू महाराजांनी बाळाजींना १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले "सेनाकर्ते" हे पद आणि २५१०२०० रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.

    १७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. महाराजांनी आंग्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेशवे बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवले असतानाच कान्होजींनी पेशव्यांना अटक केले. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते.

    खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्यांदनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही "बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी" असा पुरंदर्यांवना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना "फडनिशी" आणि पुरंदर्यांतना "मुतालकी" बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने 'फितूर दगाबाजी करून' बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली.

    १७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्यांूच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सावडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे१७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना 'सेनापती'पद बहाल करण्यात आले. १७१९ मध्ये सय्यदबंधूंनी दिलीच्या फर्रुखसियर बादशहाला पदावरून काढून 'रफिउद्दौरजत' याला नवा बादशहा केले. त्यामूळे बादशहा सय्यदबंधूंच्या ताब्यात आला.

    इकडे निजाम चिनक्क्लिचखान उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा प्रचंड जळफळाट झाला. त्यामूळे सय्यदबंधूंनाही बाळाजींची आवश्यकता वाटू लागली. याचाच उपयोग करून बाळाजीपंतांनी नवे राजकारण केले आणि मराठी राज्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याचा परिणाम म्हणजे ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा पेशव्यांनी बादशहाकरवी मंजूर करून घेतल्या. आता कोणताही मोंगल सुभेदर खंडणी द्यायला नकार देणार नव्हता. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे राजमाता येसुबाई, शाहूराजांचा सावत्र बंधू मदनसिंह आणि इतर राजपरिवाराची सुटका झाली.

    सय्यदबंधूंच्या विरोधकांनी बाळाजीपंतांचा काटा काढण्याचे ठरवले, पण नेमक्या ऐनवेळेस बाळाजीपंतांच्या पालखीत बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) असल्याने ते ठार झाले. बाळाजीपंत राजपरिवारासह मोठ्या धावपळीने ४ जुलै १७१९ रोजी सातार्यातला पोहोचले. १७१९ च्या पावसाळ्यानंतर कोल्हापूरकर संभाजीच्या कारवायांना रोखण्यासाठी बाळाजीपंत बेळगाव-डिग्रज या भागत गेले आणि मार्च १७२० मध्ये कोल्हापूरकरांवर निर्णायक विजय मिळवून पंत पुन्हा सासवडला परतले. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे २ एप्रिल १७२० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 1, 2018


  • साधनाताई आमटे

    साधनाताई आमटे

    महाराष्ट्रातील नामांकित महिला समाजसेविकांपैकी एक तसंच कुष्ठरोगी, आदिवासी यांच्यासाठी निरपेक्ष मनाने काम करणार्‍या साधनाताई आमटे यांचा जन्म नागपूर येथे ५ मे १९२७ साली झाला.

    कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्‍या मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्यासोबत १९४६ साली त्या विवाहबध्द झाल्या. डॉ. बाबा आमटे यांच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या गुण दोषांवर प्रकाश टाकणारे निर्भीड असे “समिधा” हे आत्मचरित्र लिहिले. हे आत्मचरित्र तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून नावाजले गेले. याशिवाय अनेक दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून त्यांनी आपली एक अत्यंत चौकस व प्रतिभावंत लेखिका ही ओळख मिळविली.

    बाबा आमटे यांच्या जीवनकार्याला व त्यांच्या प्रत्येक निर्णयाला व अभिनव उपक्रमांना, त्यांनी खंबीर व सक्रिय अशी साथ सोबत दिली होती. त्यासोबतच कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत सुध्दा त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने साधना आमटे यांना सन्मानित करण्यात आले होते.

    डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे हे त्यांचे पुत्र त्यांचा आणि बाबा आमटे यांचा वारसा चालवित आहेत.

    ९ जुलै २०११ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन येथे साधनाताईंचे निधन झाले.

      January 9, 2015


  • चंदू पारखी

    उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या, दर्जेदार मुद्राभिनय, स्लपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातीत लवचिकता, हजरजबाबीपणा व अफाट टायमिंग सेन्स!
    चंदू पारखी हे महान विनोदवीरच होते. चंदू पारखी यांनी अनेक नाटक व चित्रपटातून भूमिका केल्या. माझा खेळ मांडू दे या नाटकात चंदू पारखी यांनी छोटा रोल स्वीकारून त्याचे चीज केले.

    चंदू पारखी यांच्यावरील लेख वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

    # Parkhi, Chandu

      June 4, 2017


  • सोपानदेव नथूजी चौधरी

    एक साहित्यप्रेमी कवी म्हणून सोपानदेव नथूजी चौधरी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1907 साली जळगाव येथे झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आई बहिणाबाईं चौधरी यांना अक्षर ओळख नव्हती त्यामुळे शेतात काम करुन त्यांनी घर संसार चालवला. त्यातही कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची, येणार्‍या आपत्तींना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे त्यांचे म्हणावे तसे शिक्षण झाले नाही. परंतु योगायोगाने विष्णू दिगंबर पलुस्कर यांची आणि सोपानदेवाची एकदा भेट झाली. भेटीचं रुपांतर स्नेहात झालं आणि त्यातूनच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व महाविद्यालयात सोपानदेव संगीताचे अध्ययन करु लागले. संगीताची आवड, मातोश्रींचा काव्य लेखनाचा वारसा या स्फूर्तीतून सोपानदेव 1920 च्या सुमारास काव्य रचना करु लागले. प्रतापी प्रतापसिंह आणि पुण्यश्लोक महात्मा हा महात्मा गांधींच्या जीवनावरील पोवाडा हे काव्यलेखन त्यांनी सुरुवातीच्या काळात केले. त्याच काळात नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 1932 `काव्यकेतकी` हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

    त्यानंतर 1949 मध्ये अनुपमा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सोपान देवांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी या एक प्रसिध्द कवयित्री होत्या. अक्षरओळख नसलेल्या बहिणाबाई काम करता करता काव्यरचना करीत. जेव्हा शक्य असेल त्यावेळेस सोपानदेव त्या म्हणत असलेल्या कविता लिहून ठेवत असत. बहिणाबाईंच्या नंतर `बहिणाबाईंची गाणी` या नावाने सोपानदेवांनी त्या पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या आणि महाराष्ट्रभर त्यांचे हे काव्य अतिशय गाजले. सोपानदेवांनी साहित्यातील विविध विषय हाताळले. त्यांनी नवकाव्याची विडंबने लिहिली. महाराष्ट्र संबंधीच्या प्रासंगिक रचना त्यांनी केल्या. खान्देशी भाषेतून `जानपद` गीतेही लिहिली. या शिवाय सोपानदेवांचे कोटिबाज विनोदी काव्यसुध्दा प्रसिध्द आहे. 1962 साली त्यांच्या समग्र कवितांचे संकलन असलेला सोपानदेव हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.

      March 11, 2015


  • हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक पं. विजय कोपरकर

    विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे,विजय कोपरकर यांच्यावर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात करून सुरवातीला मधुसूदन पटवर्धन त्यानंतर सुमारे पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे आणि मग पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सात वर्षे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं.विजय कोपरकर एका मुलाखतीत म्हणतात डॉ. वसंतराव देशपांडे सांगायचे, ""गुरूकडे शिक्षण घेतलं, तरी अभ्यासू नजरेने स्वतःच्या स्वतंत्र विचाराला पर्याय नाही, तरच ते गाणं त्या गायकाचं होतं. ‘‘ हीच वाट चालणारे, भरपूर विद्या मिळवून स्वतंत्र विचाराने स्वतःचं स्थान निर्माण करणारे आजचे प्रतिभावंत गायक म्हणजे मा.विजय कोपरकर. ते गेल्या चाळीस वर्षापासून स्वरसाधना करीत आहे. दिवसातील किमान सात ते आठ तास तंबोऱ्यासह रियाज असतो. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात. बुद्धिमान, व्यासंगी आणि मैफलीचे बादशहा शोभतील अशा दोन गानगुरूंचा सहवास आणि स्वतःचा रियाज, चिंतन यांनी विजय कोपरकर यांनी आपलं गाणं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अस्तु या मराठी चित्रपटातील 'कोहम' हे संस्कृत भाषेतलं गाणं विजय कोपरकर यांनी गायलं आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      February 14, 2017