निवृत्त संशोधक-भाभा अणु संशोधन केंद्र, निवृत्त संचालक, विज्ञान लेखक
पटवर्धन, (डॉ.) भूषण
तीन-चार महिन्यांपासून डॉ. भूषण पटवर्धन हे नाव राज्यातील उच्चशिक्षणविश्वामध्ये चर्चेत होते. ते म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या ‘शर्यती’मधील एक प्रमुख उमेदवार म्हणून! काही कारणांमुळे कुलगुरू निवडीचे फासे डॉ. पटवर्धन यांच्यासाठी अनुकूल पडले नाहीत. अर्थात, डॉ. पटवर्धन याला अपयश मानत नाहीत. यामुळे स्थितप्रज्ञ होणे तर त्यांना मुळीच मान्य नाही. बंगळूरू येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद अॅण्ड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’ या संस्थेच्या संचालकपदी डॉ. पटवर्धन यांची झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे.
राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सॅम पित्रोदा यांनी ही निवड जाहीर केली. आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय ज्ञानशाखेचे महत्त्व वेळोवेळी सिद्ध होत असले तरी त्याचा व्यावहारिक वापर करण्यासाठी आरोग्य-उपचार ज्ञानपरंपरांचा समन्वय साधण्यात आपण कमी पडतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदासारख्या ऐतिहासिक परंपरेच्या कसोटीवर उतरलेल्या ज्ञानसाधनेचे शास्त्र, अत्याधुनिक विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध करण्याचे क्षमताविकसन आपण केलेले नाही. या पाश्र्वभूमीवर डॉ. पटवर्धन यांची आयुर्वेद इन्स्टिटय़ूटच्या संचालकपदी नियुक्ती सयुक्तिक ठरत आहे. पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदनगरला प्रो. जॉन बार्नबास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबईच्या हाफकिन संस्थेतून पीएच.डी. संपादन केल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र उद्योगामध्ये संशोधक व व्यवस्थापक या नात्याने भरीव कामगिरी केली. १९९४च्या सुमारास डॉ. पां. वा. सुखात्मे यांच्या प्रेरणेने पुणे विद्यापीठात ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्स’ असा स्वायत्त विभाग सुरू करण्यात आला आणि डॉ. पटवर्धन यांचा विद्यापीठीय अध्यापन-प्रशासनामध्ये प्रवेश झाला. आरोग्यशास्त्र व सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आधुनिक-प्राचीन अशा सर्व ज्ञानपरंपरा, कौशल्ये, प्रणालींचा समन्वय साधून विभागामार्फत समाजाभिमुख संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले. अगदी जागतिक बँकेपर्यंतच्या प्रकल्पांना पुणे विद्यापीठाने संशोधनाचे पाठबळ दिले ते डॉ. पटवर्धन यांच्या या विभागामुळेच! जनतेचा महाविज्ञानसोहळा म्हणून गौरविण्यात आलेल्या २००० सालच्या अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुण्यातील अधिवेशनाच्या मुख्य संयोजन सचिवपदाची जबाबदारी डॉ. पटवर्धन यांनी यशस्वी केली. युरोप-अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगांसमवेत सहकार्य करार करतानाच पुणे महापालिका, जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून तळागाळातील जनतेच्या आरोग्याचे प्रश्न त्यांनी चार भिंतींमध्ये बंदिस्त राहिलेल्या विद्यापीठीय संशोधनाच्या कक्षेत आणले. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाप्रमाणे आंतरआरोग्यशाखीय प्रकल्प उभारण्याचे कार्य डॉ. पटवर्धन यांनी केले आहे. बंगळूरू येथील या संस्थेमार्फत त्याला आंतरराष्ट्रीय व्याप्ती लाभणार आहे. भारतीय उच्चशिक्षणाची निर्यात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणून व त्यानंतर मणिपाल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख या नात्याने त्यांना देशोदेशीच्या उच्चशिक्षण व संशोधन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. डॉ. पित्रोदा, डॉ. रघुनाथ माशेलकर आदींच्या प्रेरणेने केंद्रीय स्तरावर ‘न्यू मिलेनियम टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत वनौषधी विकासाकरिता कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन आघाडीच्या संशोधकांमध्ये डॉ. पटवर्धन यांचा समावेश आहे. ‘प्राचीन शास्त्र-परंपरेचा त्याग केला तरच आयुर्वेदाचे आधुनिकीकरण करणे शक्य आहे, असा गैरसमज आपल्याकडे आहे. त्याऐवजी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्राचीन ज्ञानशाखेला अधिक बळकटी प्राप्त होत आहे. जनुकीय समस्या, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, कर्करोगाबरोबरच एचआयव्ही-एड्ससारख्या व्याधी आदींवर प्राचीन परंपरांमधील शास्त्र आधुनिकीकरणाच्या माध्यमातून प्रयोगशाळांमधून ताडून पाहणे शक्य आहे. त्यासाठी आयुर्वेदावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यासपीठ उभारण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने बंगळुरू येथील ही नवीन जबाबदारी आश्वासक ठरते आहे,’ असे डॉ. पटवर्धन सांगतात.
कोतवाल, मनोहर
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने निर्णायक वळण घेतले त्याच कालखंडात, ब्रिटिश राजवटीत राजकीय आंदोलनांबरोबर कामगारांचेही समांतर लढे सुरू होते. पुढे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात राजकीय चळवळीइतकेच कामगार चळवळीला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कामगार संघटना स्थापन केल्याचे दिसते.
इंटक, आयटक, एचएमएस, बीमएस ही काही त्याची ठळक उदाहरणे. परंतु त्या काळातील नेतृत्वाने राजकीय विचारांची बांधीलकी मानूनही केवळ कामगारांच्या हितासाठी या कामगार चळवळीचे अस्तित्व जाणीवपूर्वक वेगळे व स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. देशातील संघटित व विशेषत: कंत्राटी कामगारांचे ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केले, त्यात भाई मनोहर कोतवाल यांचे नाव अग्रभागी होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या अगदी जागतिकीकरणापर्यंत जे काही बरे-वाईट कामगारवर्गावर परिणाम झाले, या संबंध ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजकीय, आर्थिक व कामगारविषयक घडामोडींचे ते साक्षीदार होते. एक अभ्यासू, लढाऊ आणि कामगार संघटनांमध्येही शिस्तीचा आग्रह धरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अध्ययन सुरू असतानाच त्यांनी लोकसेना संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घेतला. एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ निर्णायक टप्प्यात आली असताना कामगारांचे लढेही ब्रिटिश सरकारपुढे आव्हान म्हणून उभे होते. अशा वातावरणात कामगार चळवळीचे पितामह म्हणून ज्यांना ओळखले जात होते, त्या ना. म. जोशी यांच्या संपर्कात कोतवाल आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बीपीटी रेल्वेमेन्स युनियनच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीत प्रवेश केला. या युनियनचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे एक संस्थापक नेते पी. डी’मेलो यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. देशातील प्रमुख बंदरातील कामगार व गोदी कामगार महासंघाच्या मुख्य प्रवाहात ते आले. पुढे डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी आदी नेत्यांच्या बरोबरीने कोतवाल यांनी गोदी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले. गोदी कामगारांच्या न्याय-हक्काच्या लढय़ांमध्ये ते कायम अग्रभागी राहिले. देशात १९७५ मध्ये लादल्या गेलेल्या आणीबाणीने राजकारणाबरोबर कामगार चळवळही ढवळून निघाली होती. कामगार चळवळींच्या नेतृत्वामध्येही आणीबाणीचे समर्थक व विरोधक अशी विभागणी झाली. मनोहर कोतवाल हे समाजवादी विचारातून तयार झालेले नेतृत्व, परंतु काँग्रेस विचारांशी थोडी जवळीक ठेवणारे होते. अंतर्गत राजकीय मतभेदांचा गोदी कामगार चळवळीवर परिणाम झाला. देशव्यापी बंदर व गोदी कामगार महासंघाचे दोन गट पडले. एका गटाचे नेतृत्व शांती पटेल करीत आहेत, दुसऱ्या गटाचे नेतृत्व एस. आर. कुलकर्णी व मनोहर कोतवाल यांच्याकडे गेले. तरीही नेतृत्वांमधील सामंजस्य, सभ्यता आणि समजूतदारपणामुळे गोदी कामगारांमध्ये कधी अंतर्गत संघर्ष उभा राहिला नाही. निर्णायक क्षणी सारे नेते एकत्र येऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देत. या अर्थाने मनोहर कोतवाल मोठे व वेगळे नेते होते. समाजवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या हिंद मजदूर सभेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. भारतीय अन्न महामंडळातील कंत्राटी कामगारांचा लढा त्यांनी यशस्वीपणे लढविला. सरकारी उपक्रमात काम करूनही या कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत होते. त्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. पुढे कंत्राटी कामगारांचे कोतवाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा.
राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.
डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत.
क्रीडा किंवा खेळ असं म्हटल्यानंतर आपल्यासमोर क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस इत्यादी नाव आपल्यासमोर येतात; परंतु या सर्व खेळांच्या मुळाशी असलेला क्रीडा प्रकार ज्याला आपल्या देशात फारशी प्रसिद्धी मिळत नाही
हृद्य ही मानवाला मिळालेली सर्वात अमुल्य व कलात्मक भेट आहे. सामान्य माणसाला कवित्व देणारे, विवीध भावनांचे पितृत्व स्वीकारणारे, यंत्रांच्या गर्दीमध्ये हरवत चाललेल्या व्यक्तींना संवेदनांचे व हळुवार जाणीवांचे शहारे देऊन त्याला माणुस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे, व त्याच्यातील ‘दर्दीपण’ जोपासणारे हृद्य जेव्हा त्याच्या तांत्रिक बाबींमध्ये गुरफटते तेव्हा नश्वर देहाची परलोक यात्रा सुरू होते. परंतु आज वैद्यकीय क्रांतीमुळे दुर्मिळ हृद्यविकारांवर देखील औषधे व शस्त्रक्रिया जन्मास आल्या आहेत.
प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.''ओटीत घातली मुलगी विहीणबाई ''गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती.''हरीनाम मुखी रंगते''हे गोड भक्तीगीत तसेच ''रुपेरी वाळूत माडांच्या बनात'',''येऊ कशी प्रिया''हि गीते आधुनिक वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली.
ससा तो कसा हे बालगीत,सूर सनईत नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत,गंधित धुंदीत होऊनी सजणा सारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले.
अरुण पौडवाल यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
# Paudwal, Arun
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.
दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.
चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.
१९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.
त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.
भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते " ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.
#DamuAnnaMalvankar
Copyright © 2025 | Marathisrushti