(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • अतुल भोसेकर

    कामासाठी देशभर भ्रमंती करताना प्राचीन ऐतिहासिक स्थाळांनी त्यांच्या मनावर मोहिनी घातली. इतिहासाला आपल्याशी बोलायचय, मात्र आपण त्याची भाषा समजून घेत नाही, हे जाणवल्यावर अतुल भोसेकर यांनी प्राचीन लिपींच्या जतनाचा ध्यास घेतला. आठ राज्यांतला व्यवसाय सांभाळताना प्राचीन लिपींचे नमुने गोळा केले. या लिपींचे शिक्षण शाळा, कॉलेज व विद्यापीठांत देण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

    इतिहासाचा दूत

  • माधव मंत्री

    फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्‍या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ साली नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शालेय जीवनातच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. तर १९५१ मधील इंग्लंड दौकर्‍यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती. 

  • दिलीप धोंडे

    तुकाराम डॉट कॉम या वेबसाइटद्वारे संत तुकाराम यांची गाथा आणि अन्य साहित्य जगातील वाचकांपर्यंत नेण्याचा ध्यास दिलीप धोंडे यांनी घेतला आहे. तुकारामांचे साहित्य १४ भारतीय आणि आठ परदेशी भाषांमध्ये उपलब्ध करुन दिले आहे.

    ध्यास तुकारामांचा

  • भाऊसाहेब उबाळे

    सातार्‍यात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेला एक मुलगा हुषारी आणि इच्छाशक्तीच्या बळावर लंडनमध्ये अर्थशास्त्रातील पीएच . डी . मिळवतो आणि पुढे कॅनडाचे मानवी हक्क आयुक्त हे पद भूषवीत जगभरातील मानवी हक्क यंत्रणांवर आपला ठसा उमटवतो, हे कर्तृत्व अपवादात्मकच. भाऊसाहेब उबाळे या एका मराठी माणसाच्या नावे ते जमा असावे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब.

    भाऊसाहेबांचे वडील सरकारी कर्मचारी असले, तरी स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या मूल्यांचे भाऊसाहेबांवर बालवयातच संस्कार झाले. कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. नोकरी करीत त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ त्यांनी सरकारी नोकरीही केली. पुढे गाठीला फारसे पैसे नसतानाही त्यांनी लंडनला प्रयाण केले. उबाळे यांनी तेथे अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळवली. या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.

    १९७५ मध्ये त्यांनी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पात्रता असूनही त्यांना तेथे सुमारे दोन वर्षे कारकुनाखेरीज अन्य नोकरी दिली गेली नाही. हा अर्थातच वांशिक भेदभावाच्या मनोवृत्तीचा परिणाम होता. उबाळे यांनी समाजातील सर्व घटकांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्या काळात ईस्ट इंडियन्स तसेच पाकिस्तानी स्थलांतरितांच्या विरोधात कॅनडात हिंसक दंगे होत होते. उबाळे यांनी या हल्ल्यांचा तपशीलवार अभ्यास करून अहवाल तयार केला. पत्रकारितेतील अनुभवाचा वापर करीत, त्यांनी एका लहान मुलीच्या हस्ते तो जाहीर सभेत सरकारला 'सादर' केला . 'अहवालात काय आहे हे मला कळत नाही, पण माझं भविष्य त्यावर अवलंबून आहे,' हे त्या मुलीचं विधान माध्यमांनी उचलून धरलं आणि नंतर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभेत या अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या ! 'उबाळे अहवाल' म्हणूनच तो ओळखला जातो. कॅनडातील समाजातील बहुविधता जपतानाच, त्यातील विविध वांशिक गटांत भावनिक एकजिनसीपणा आणणे, संधीच्या समानतेचे तत्त्व रुजविणे, याकरिता उबाळे कार्यरत राहिले.

    कॅनडा सरकारनेही देशाचे मानवी हक्क आयुक्त तसेच वांशिक संबंध आयुक्त या पदांवर त्यांची नियुक्ती करून, त्यांच्या कल्पकतेचा आणि तळमळीचा सुयोग्य वापर करून घेतला. गरिबी निर्मूलन हा मानवी हक्कांचाच अविभाज्य भाग आहे, यावर त्यांचा भर होता. त्यामुळे मानवी हक्क चळवळीबरोबरच, 'इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉव्हर्टी इरॅडिकेशन' ही संस्थाही त्यांनी स्थापन केली होती आणि त्यातून ग्रामीण विकासाला चालना देणारी कामे केली जात होती.

    कॅनडात १९७५ सालापासून वास्तव्य असलेल्या आणि तेथील राजकीय - सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेल्या भाऊसाहेबांनी जगाचा निरोप घेतला तो मात्र त्यांच्या मायदेशात आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जेथे झाले त्या पुण्यात.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • गजानन वाटवे

    आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.

  • मधु मंगेश कर्णिक

    मधु मंगेश कर्णिक

  • किशोर लिंबाणी

    किशोर लिंबाणी अनेक वर्षांपासून ठाणे शहर विभागाचे युवक मंडळ उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. सामाजिक कार्यासोबतच धार्मिक कार्यातही ते सहभाग नोंदवत आहेत.

    हरिद्वारच्या कच्छी लालाराम आश्रमात नऊ महिने साधुसंतांच्या सेवेसाठी ते भेट देत असतात. समाजातील गरीबांवर मोफत औषधोपचार करणे हे या आश्रमाचे प्रमुख कार्य असून, या कार्याला पुर्णत्वास नेण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत तसंच महिलांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा कटाक्ष आहे.

    क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक वह्या वाटप, प्रभागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, वृक्षलागवड त्याचप्रमाणे ठाणे निर्धार अभियानात उत्साही सहभाग, तसंच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वेटलिफ्टींग चा खेळ सुरू करावा यासाठी पत्रव्यवहार आणि प्रयत्न, जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृतीप्रती विद्यार्थ्यांसाठी अर्धा डझन वह्या अशी अनेक कल्याणकारी कामे किशोर लिंबाणी यांच्याकडून करण्यात आली आहेत.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • पांडुरंग श्रीधर आपटे

    गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्‍हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत.

    १९ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

    Pandurang Shridhar Apte

  • दत्तात्रेय व्यंकटेश केतकर

    दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.

    'जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी' , ' जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)', 'ज्ञानेश्वर - ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ' ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.

    ## Dattatrey Vyankatesh Ketkar

  • पल्लवी रेणके

    पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्‍या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरात, चांगल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या संध्या उपलब्ध असूनसुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच. त्या स्वत: ‘गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या आहेत.