माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती.
अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं.
आजमितीला त्यांची एकूण ३२ ‘अनंताची अभंग भजने’, ‘अनंताची अभंग गीते’ व ‘कोळीगीते व नृत्यगीते’ या शीर्षकाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. टी सिरिज, एच.एम.व्ही, कृणाल यांसारख्या प्रख्यात ध्वनीकंपन्यांची रेकॅार्ड कॅसेटस् यांचा आकडा सहज सांगता येण्यासारखा नाही.
बालसाहित्यिक, चरित्रकार, कवी व “आनंद” मासिकाचे संपादकपद ३५ वर्षे सांभाळणारे गोपीनाथ तळवलकर यांनी प्रौढसाक्षरांसाठीही लिखाण केले.
कोतवाल, मनोहर
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने निर्णायक वळण घेतले त्याच कालखंडात, ब्रिटिश राजवटीत राजकीय आंदोलनांबरोबर कामगारांचेही समांतर लढे सुरू होते. पुढे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात राजकीय चळवळीइतकेच कामगार चळवळीला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कामगार संघटना स्थापन केल्याचे दिसते.
इंटक, आयटक, एचएमएस, बीमएस ही काही त्याची ठळक उदाहरणे. परंतु त्या काळातील नेतृत्वाने राजकीय विचारांची बांधीलकी मानूनही केवळ कामगारांच्या हितासाठी या कामगार चळवळीचे अस्तित्व जाणीवपूर्वक वेगळे व स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. देशातील संघटित व विशेषत: कंत्राटी कामगारांचे ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केले, त्यात भाई मनोहर कोतवाल यांचे नाव अग्रभागी होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या अगदी जागतिकीकरणापर्यंत जे काही बरे-वाईट कामगारवर्गावर परिणाम झाले, या संबंध ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजकीय, आर्थिक व कामगारविषयक घडामोडींचे ते साक्षीदार होते. एक अभ्यासू, लढाऊ आणि कामगार संघटनांमध्येही शिस्तीचा आग्रह धरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अध्ययन सुरू असतानाच त्यांनी लोकसेना संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घेतला. एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ निर्णायक टप्प्यात आली असताना कामगारांचे लढेही ब्रिटिश सरकारपुढे आव्हान म्हणून उभे होते. अशा वातावरणात कामगार चळवळीचे पितामह म्हणून ज्यांना ओळखले जात होते, त्या ना. म. जोशी यांच्या संपर्कात कोतवाल आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बीपीटी रेल्वेमेन्स युनियनच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीत प्रवेश केला. या युनियनचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे एक संस्थापक नेते पी. डी’मेलो यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. देशातील प्रमुख बंदरातील कामगार व गोदी कामगार महासंघाच्या मुख्य प्रवाहात ते आले. पुढे डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी आदी नेत्यांच्या बरोबरीने कोतवाल यांनी गोदी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले. गोदी कामगारांच्या न्याय-हक्काच्या लढय़ांमध्ये ते कायम अग्रभागी राहिले. देशात १९७५ मध्ये लादल्या गेलेल्या आणीबाणीने राजकारणाबरोबर कामगार चळवळही ढवळून निघाली होती. कामगार चळवळींच्या नेतृत्वामध्येही आणीबाणीचे समर्थक व विरोधक अशी विभागणी झाली. मनोहर कोतवाल हे समाजवादी विचारातून तयार झालेले नेतृत्व, परंतु काँग्रेस विचारांशी थोडी जवळीक ठेवणारे होते. अंतर्गत राजकीय मतभेदांचा गोदी कामगार चळवळीवर परिणाम झाला. देशव्यापी बंदर व गोदी कामगार महासंघाचे दोन गट पडले. एका गटाचे नेतृत्व शांती पटेल करीत आहेत, दुसऱ्या गटाचे नेतृत्व एस. आर. कुलकर्णी व मनोहर कोतवाल यांच्याकडे गेले. तरीही नेतृत्वांमधील सामंजस्य, सभ्यता आणि समजूतदारपणामुळे गोदी कामगारांमध्ये कधी अंतर्गत संघर्ष उभा राहिला नाही. निर्णायक क्षणी सारे नेते एकत्र येऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देत. या अर्थाने मनोहर कोतवाल मोठे व वेगळे नेते होते. समाजवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या हिंद मजदूर सभेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. भारतीय अन्न महामंडळातील कंत्राटी कामगारांचा लढा त्यांनी यशस्वीपणे लढविला. सरकारी उपक्रमात काम करूनही या कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत होते. त्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. पुढे कंत्राटी कामगारांचे कोतवाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा.
स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली.
अजित प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत.
मराठी साहित्यात सामाजिक वास्तवाचे भान असावे, या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे साहित्यिक डॉ. मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख. विचारमंथनातून निमिर्तीक्षम साहित्यसेवा आणि अध्यापनातून कृतिशील संवेदना जपणारे जाधव समतावादी परंपरा पुढे नेणारे असे कवी.
साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, या त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. या जाणीवेतूनच दलित साहित्याकडे ते पाहतात.
समाजव्यवस्थेचे बळी ठरलेल्या दलितांच्या आत्मभानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहसंवेदनेची आहे. दलित कविता ही मराठी कवितेचे एक वैशिष्ट्यपूर्ण वळण आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला जीवनानुभव त्यांना स्पर्श करतो. दलित कवींच्या तिसर्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी शेषराव धांडे यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दलित कवितेवर होणारा आक्रस्ताळेपणाचा आरोप ते खोडून काढतात. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा, स्थितिशीलता आणि परिवर्तन, आक्रोश आणि विदोह यातील फरकावर ते नेमके भाष्य करतात.
'दलित स्त्रियांची आत्मकथने', 'प्रत्ययपर्व', 'साहित्य : शोध आणि बोध' यांसारखी त्यांची पुस्तके समीक्षकांनी गौरविली आहेत. समतावादी साहित्य संमेलन असो वा भटक्या-विमुक्तांवरील राष्ट्रीय चर्चासत्र, जाधव आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आलेली सुधारणावादी भूमिका आग्रहाने मांडतात.
त्यांनी हिंदी भाषेतही मुशाफिरी केली आहे. कवी अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाच्या 'सायरन के शहर' या अनुवादाला डॉ. जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हिंदीतील सहा समकालीन मान्यवर कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.
फैजपूर येथे अध्यापन करून १९९५ मध्ये ते पुण्यात आले. पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपद सांभाळताना त्यांची कृतिशीलता अधिक स्पष्ट होते. मराठी विषयात व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण काळाबरोबर जाण्याच्या त्यांच्या आग्रहाला पुष्टी देते.
अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सहा महिन्यांचा मराठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालवाङ्मयाचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास व्हावा, अशी निराळी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
डॉ. जाधव यांना बुलढाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
अनिकेत केळकर हा मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिका सृष्टीत कार्यरत असलेला एक अभिनेता. त्याने हिंदी सृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केलेली आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti