(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • (डॉ) विजया वाड

    (डॉ) विजया वाड

  • अनंत पै

    अनंत पै

    Anant Pai Popularly known as Indian educationalist and creator of Indian comics, in particular the Amar Chitra Katha series in 1967, along with the India Book House publishers, and which retold traditional Indian folk tales, mythological stories, and biographies of historical characters. In 1980, he launched Tinkle, a children’s anthology, which was started under Rang Rekha Features, India’s first comic and cartoon syndicate, that lasted till 1998, with him as the Managing Director.
    Today, Amar Chitra Katha

  • गाडगीळ (प्रा.) धनंजयराव

    गाडगीळ (प्रा.) धनंजयराव

    (१९१०-१९७१)

    पुणे येथील अर्थशास्त्र संस्थेचे दीर्घकाळ संचालक.

    नियोजन, कृषी अर्थशास्त्र, किंमतविषयक धोरण यांचा विशेष अभ्यास. महाराष्ट्रतील सहकारी चळवळीत विशेष रस. सहकाराचे तत्त्व रूजावे व वाढावे म्हणून विविध पातळयांवर अखंडप्रयत्न.

    राज्यातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या प्रवरानगर येथील संस्थापनेमागील मुख्य प्रेरणा प्रा. गाडगीळ यांची. रिझर्व बँकेचे सल्लागार.

    काहीकाळ राज्यसभेचे सदस्य. १९६७-७१ या काळात भारतातील योजना आयोगाचे उपाध्यक्ष. कृषिविकासातील समस्या, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण, नियोजनाची विविध प्रतिमानेयावर गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये संशोधनासाठी मार्गदर्शन केले.

    काही काळ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले.

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नेतृत्त्व केले.

  • सौरभ चांदेकर

    कला क्षेत्र व तंत्रज्ञानाच्या विश्वाकडे कल असणारी कल्पनाशक्ती यांचा सुरेख मिलाफ साधला की एका व्यावसायिक चित्रकाराचा जन्म होतो. हे चित्रकार आपली निर्माणशक्ती कागदावर उतरवून केवळ त्यांच्या वैयक्तिक संग्रही ठेवित नाहीत तर जाहिराती, डिझायनिंग, ग्राफिक्स, व एखाद्या कंपनीच्या वस्तूंचा खप वाढविण्याकरिता त्या शक्तीचा फलदायी उपयोग करतात. ग्राहकांना विशीष्ठ ब्रँडस् कडे चुंबकांप्रमाणे आकर्षित करण्यात अशा कलाकारांचा सिंहाचा वाटा असतो, व बाजारात अशा हाडाच्या कलाकारांना प्रचंड मागणी असते.

  • हरीष सदानी

    स्त्रियांच्या प्रश्नांविषयी अनेक स्त्री संघटना काम करताना दिसतात. पुरुषांनाही स्त्रियांपासून कायद्याने संरक्षण देण्यासाठी सध्या दबावगट तयार होतो आहे. मात्र या परिस्थितीत स्त्रियांच्या संरक्षणासाठी व त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी पुरुषांनी तयार केलेली मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज) ही संस्था अपवादात्मक ठरावी. एकमेकांचा आदर करीत, व एकामेकांबद्दलचा विश्वास वृध्दिंगत करून स्त्री-पुरुषांना सहजीवन जगता यावे यासाठी अंधेरीतील ही संस्था काम करते. विश्वस्त म्हणून या संस्थेचे काम करणार्‍या हरीष सदानी यांना महाराष्ट्र फाउण्डेशनने पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेला गौरविले आहे.

  • स्वानंद कुलकर्णी

    स्वानंद कुलकर्णी

    स्वानंद कुलकर्णी हे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेतील नामांकित नाव. साम मराठी, एबीपी माझा, टी.व्ही ९ महाराष्ट्र आणि झी २४ तास अश्या वृत्तवाहिनी मध्ये पत्रकार तसंच निर्माता या पदावर काम केले होते.

  • हरिभाऊ शेजवळ

    प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्‍या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे..

  • हेमंत करकरे

    हेमंत करकरे

    हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.

  • सोनोपंत दांडेकर

    ह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते.

  • हितेंद्र ठाकूर

    महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान आमदार महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६१ साली झाला. १९८८ साली वसई तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर आरूढ होऊन आपल्या राजकीय कारकिर्दाची सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत १९९० मध्ये कॉंग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले व ते सर्वात तरुण आमदार म्हणून बहूमतांनी निवडून आले. पुढे आपल्या कार्यकर्तुत्वाने सतत चौथ्यांदा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. कालांतराने हितेंद्र ठाकूर यांनी “बहुजन विकास आघाडी”ची पक्षची स्थापना केली.सध्या तालुका पंचायत समिती, चारही नगर पालिका व बहुसंख्य ग्रामपंचायतीवर त्यांच्या वसई विकास मंडळाचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्हा परिषद व ठाणे जिल्हा सहकरी बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत त्यांच्ये मत निर्णायक असते विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांना विधान परिषदेवर तीनदा निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे तसंच अभिनेते गोविंद आहुजा उर्फ गोविंदा यांना लोकसभेवर निवडून आणण्यात देखील त्यांचा खारीचा वाटा होता.

    वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय (मराठी व इंग्रजी माध्यम), कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वि. वा. ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले. वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, नेत्राचिकिटसा, रक्तदान ,ज्येष्ठ नागरिकानसाठी ओळखपत्रे, अपंगांसाठी उपकरणांचे वाटप कार्यक्रमांचे आयोजन; झोपडपट्टी धारकाना स्वंयंपाक गॅसची वाटप.त्याचप्रमाणे वसई-विरार भागात अनेक सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन हितेंद्र ठाकूर यांच्याकडून होत असते यांचे विधायक व सामाजिक काम व सर्वसमावेशक बेरजेच्या राजकारणामुळे वसई तालुक्यांतील विविध पक्ष्यांचे अनेक नेते त्यांचे नेतृत्व मान्य करतात.