बिराजदार, हरिश्चंद्र
जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.
त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
हरी नारायण आपटे हे मराठी कादंबरीकार होते. मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. १८ कादंबर्या लिहीणार्या आपटयांची ‘पण लक्षांत कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते.
आज २१ सप्टेंबर
शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.
गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.
जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकाच्या प्रयोगाला ऑर्गन ची साथ केली होती.
विशेष हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदराव यांनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, ते स्वतः उत्तम तबला वादकही होते. त्यामुळे लय, ताल यावर त्यांचे प्रभुत्व होते.
१९४० साली मुंबईला आल्यावर पं गोविंदराव साहित्य संघाच्या संगीत नाटकांना ऑर्गनची साथ करू लागले. त्या वेळी देवधर स्कूल ऑफ म्युझिक व मनहर बर्वे यांच्या विद्यालयात पं. कुमार गंधर्व व पं.राम मराठे यांची ओळख झाली, तेव्हा पासून अखेर पर्यत पं गोविंदराव यांनी त्यांना साथ केली. कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे - मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.
पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. हार्मोनियम व ऑर्गन वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ते आपल्या शिष्यांना शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे.
गोविंदराव पटवर्धन यांना पेटीवर्धन पण म्हणत असत. त्यांना गोविंदराव असे म्हणलेले रुचत नसे, ते नम्रतेने म्हणत गोविंदराव म्हणायच्या योग्यतेचे एकच पं गोविंदराव टेंबे मला नुसतेच गोविंदा म्हणा, खरेतर आपल्या गुहाघरवासीयांनी गोंद्या म्हणून हाक मारलेले त्यांना आवडायचे. अनेक संगीत कार्यक्रमांमधून, संगीत नाटकांतून त्यांनी साथसंगत केली. आलापी, तान वाजवण्यातली सफाई होती. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं होते, व स्वत:त अक्षरश: मुरवलं होते.
गोविंदराव पटवर्धन यांच्या एकसष्ठी सत्कारात पु.ल नी त्यांच्या बरोबर हार्मोनियम वादन केले होते, तेव्हा पु.ल मार्मीकतेने म्हणाले होते, पोटात व पोटरीत गोळा येतो हे माहिती होते पण बोटातही गोळा येतो हे आज प्रथम समजले.
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य म्हणून डॉ.विद्याधर ओक यांना ओळखले जाते. त्याच्या इतर शिष्यांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, मकरंद कुडले, विघ्नेश्र्वर जोशी, अशी नावे घेता येतील. आदित्य ओक तर लहानपणापासून गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकत आला आहे. तो पण त्यांचाच शिष्य.
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे ३० जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
गोविंदराव पटवर्धन एक हार्मोनियम बरोबरच उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. त्यांच्यासंबधी काही प्रसंग
एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊ दे" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.
पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले भाषण.
http://www.marathisrushti.com/mvideos/speeches-by-pu-la-deshpande-about-pt-govindrao-patwardhan/
पं. गोविंदराव पटवर्धन यां चे व्हिडीओ
www.youtube.com/watch?v=0JWkKjxNGNc
www.youtube.com/watch?v=5qXM9L3bjBA
www.youtube.com/watch?v=_c-JWigeh3I
https://www.youtube.com/watch?v=JM1jtZJRLxE
https://www.youtube.com/watch?v=eYjUcsXukMY
https://www.youtube.com/watch?v=m8KcijSZvEY
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन (31-Jan-2017)
शब्दास्वरांचे जादुगार पं. गोविंदराव पटवर्धन (8-Oct-2017)
#PtGovindraoPatwardhan #GovindraoPatwardhan
छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता, हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले. महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.
“कला” व व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात अनोखा ठसा, त्यात ही वेगळेपण करुन ते टिकवणारी फारच कमी मंडळी आपल्याला पहायला मिळतात, असंच “सदा उल्हासित व्यक्तिमत्व स्वाती खंडकर”
जलतरण क्रीडाप्रकारात ठाण्याचे नाव मोठं करण्यात वाटा असलेला सौरभ सांगवेकर हा जलतरणपटू म्हणजे अनवाटांनी जाऊनही आपल्या आयुष्याचं ध्येय गाठणारा ध्येयवादी आहे.
वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अल्पवयीन भारतीय खेळाडुंनी दाखविलेले प्राविण्य आता जगमान्य झाले आहे. या क्रीडाप्रकारांमध्ये नव्यानेच आता एका आणखी आव्हानात्मक प्रकाराची भर पडली आहे ती म्हणजे जलतरण व जगभरातून वाखाणल्या गेलेल्या या क्रीडाप्रकाराच्या रथी महारथींमध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर अढळ ध्रुवस्थान मिळविणारी चिमुरडी म्हणजे स्वप्नाली यादव.
एक साहित्यप्रेमी कवी म्हणून सोपानदेव नथूजी चौधरी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1907 साली जळगाव येथे झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आई बहिणाबाईं चौधरी यांना अक्षर ओळख नव्हती त्यामुळे शेतात काम करुन त्यांनी घर संसार चालवला. त्यातही कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची, येणार्या आपत्तींना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे त्यांचे म्हणावे तसे शिक्षण झाले नाही. परंतु योगायोगाने विष्णू दिगंबर पलुस्कर यांची आणि सोपानदेवाची एकदा भेट झाली. भेटीचं रुपांतर स्नेहात झालं आणि त्यातूनच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व महाविद्यालयात सोपानदेव संगीताचे अध्ययन करु लागले. संगीताची आवड, मातोश्रींचा काव्य लेखनाचा वारसा या स्फूर्तीतून सोपानदेव 1920 च्या सुमारास काव्य रचना करु लागले. प्रतापी प्रतापसिंह आणि पुण्यश्लोक महात्मा हा महात्मा गांधींच्या जीवनावरील पोवाडा हे काव्यलेखन त्यांनी सुरुवातीच्या काळात केले. त्याच काळात नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 1932 `काव्यकेतकी` हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
त्यानंतर 1949 मध्ये अनुपमा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सोपान देवांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी या एक प्रसिध्द कवयित्री होत्या. अक्षरओळख नसलेल्या बहिणाबाई काम करता करता काव्यरचना करीत. जेव्हा शक्य असेल त्यावेळेस सोपानदेव त्या म्हणत असलेल्या कविता लिहून ठेवत असत. बहिणाबाईंच्या नंतर `बहिणाबाईंची गाणी` या नावाने सोपानदेवांनी त्या पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या आणि महाराष्ट्रभर त्यांचे हे काव्य अतिशय गाजले. सोपानदेवांनी साहित्यातील विविध विषय हाताळले. त्यांनी नवकाव्याची विडंबने लिहिली. महाराष्ट्र संबंधीच्या प्रासंगिक रचना त्यांनी केल्या. खान्देशी भाषेतून `जानपद` गीतेही लिहिली. या शिवाय सोपानदेवांचे कोटिबाज विनोदी काव्यसुध्दा प्रसिध्द आहे. 1962 साली त्यांच्या समग्र कवितांचे संकलन असलेला सोपानदेव हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.
बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला.
“एस्तेर राज्ञीचरित्र”, “दानिएकलचे मानसिक धैर्य” या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे.
संगीत दानिएल व संगीत योसेफ ही नाटके त्यांनी लिहिली.
Soloman Shalom Aptekar
सूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले गीत त्यांच्याच लेखणीतून आले.
Copyright © 2025 | Marathisrushti