ठाण्यातील शहरास “सांस्कृतिक शहर” हे नावलौकिक प्राप्त करुन देणार्या कलाकारांपैकी एक होतकरु अभिनेता पराग मधुकर बडेकर. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली.
ते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.
रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.
अत्यंत कष्टातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्ससारख्या कंपनीत मिळालेली नोकरी त्यागणे, हे खरेतर चैत्राम पवार यांच्यासाठी कठीणच होते. पण जेथे मोठे झालो, त्या बारीपाड्याचा विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी नोकरीची वाट सोडली आणि शेती, पाण्याचे स्त्रोत, रानभाज्या, आदिवासींना स्वत:ची ओळख असे अनेक उपक्रम राबवत त्यांनी बारीपाड्याचा चेहरामोहराच पालटून टाकला आहे.
बारीपाड्याचा परिवर्तनमंत्र
कायदेतज्ञ अशी ओळख असणार्या रामराव आदिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
नृत्य क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कामाचा आदर्श निर्माण करणार्या गणेश राऊत यांचं शिक्षण शिवाजी विद्यालयातून झालं आहे. उत्तम खो-खो पटू असले तरी क्रीडा क्षेत्रातील राजकारणामुळे विचार बदलावा लागला.
सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल यांनी 'हिग्ज बोसॅन' या मूलकणांच्या आकारमानाबाबत संशोधन केले आहे. त्याची दखल जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांनी घेतली आहे...
विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य उकलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणांचा शोध जगभरातील अनेक शास्त्रज्ञ घेत आहेत. या कणांना ‘दैवी कण’ (गॉड्ज पार्टिकल) असेही संबोधले जाते. त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपात जमिनीखाली तयार केलेल्या सर्न प्रयोगशाळेत अचाट आकाराचा ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या कणांच्या वस्तुमानाबाबत मूळचा पुणेकर असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल या शास्त्रज्ञाने अनोखे संशोधन केले असून, त्याची जगभरातील भौतिकींमध्ये चर्चा आहे. डॉ. कोतवाल हे याबाबत अमेरिकेत संशोधन करतात.
त्यांनी व त्यांच्या चमूने दैवी कणांचे (डब्ल्यू बोसॉन) मोजमाप करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यांच्या तंत्रानुसार या दैवी कणांचे आतापर्यंतचे सर्वात अचूक वस्तुमान शोधण्यात यश आले आहे. त्याची अचूकता ०.०२ टक्के इतकी जवळ जाणारी आहे, असे अमेरिकेतील शिकागोजवळ असलेल्या ‘फर्मी नॅशनल अॅक्सीलरेटर लॅबोरेटरी’ या ख्यातनाम प्रयोगशाळेने जाहीर केले आहे. डॉ. कोतवाल यांच्या या यशामुळे गेली ४० वर्षे विविध शास्त्रज्ञांनी या कणांबाबत घेतलेला ध्यास एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे बोसॉन या मूलकणांचे अस्तित्व असल्याचा सिद्धांत प्रसिद्ध दिवंगत पदार्थशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यावरून या कणांना ‘बोसॉन’ असे नाव देण्यात आले. आता याच कणांचे अचूक वस्तुमान शोधून त्यात भर टाकण्याचे कार्य कोतवाल यांच्या रूपाने एका भारतीयानेच केले आहे. डॉ. कोतवाल हे अमेरिकेतील नॉर्थ क्ररोलिना राज्यातील डय़ुक विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी अमेरिकेत अभियांत्रिकी व अर्थशास्त्र याविषयांची पदवी घेतली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. करून त्यांनी शिकागोजवळील ‘फर्मी’ प्रयोगशाळेत संशोधनकार्य सुरू केले. ‘डब्ल्यू बोसॉन’ कणांच्या संशोधनाबरोबरच ‘टॉर क्वार्क’ या मूलकणांचे अचूक वस्तुमान शोधण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. त्यांना अमेरिकेतील राष्ट्रीय स्तरावरील ‘आऊटस्टँडिंग इनव्हेस्टिगेटर अॅवॉर्ड’ व ‘स्कोन फेलोशिप’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. पदार्थविज्ञानातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकन फिजिक्स सोसायटीने त्यांना विशेष फेलोशिप प्रदान केली आहे.
डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ध्यास हा कणाकणाचा ! हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा.
ध्यास हा कणाकणाचा !

MM-050; VV-0056
<!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. ध्यास हा कणाकणाचा ! -->
(1902-1971)
यांचे पूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड. दलित समाजातील तळमळीचे कार्येकर्ते. स्वातंत्र्य लढयात आणि दलितांच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग. रिपब्लिकन पक्षाचे खुप वर्षे काम केले. त्या पक्षाचे माजी अध्यक्ष. अनेक वर्षे आमदार आणि खासदार म्हणून अनुभव. प्रबुध्द भारत या नियतकालिकाच्या संपादनात सहभाग. डॉ. आंबेडकर बरोबरीने बौध्द धर्माचा स्वीकार.
कादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर
Copyright © 2025 | Marathisrushti