बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला!
July 7, 2022
वयाच्या सोळाच्या वर्षांपासून व्यंगचित्रकलेला सुरुवात करणारे आणि बी.इ., एम.इ. व एम.बी.ए. असे शिक्षण घेतलेले लेखक विवेक मेहेत्रे सर्वच ठाणेकरांना परिचित आहेत.
May 23, 2014
एका चष्माविक्रेत्या कंपनीची जाहिरात होती- बाई वर्गात येतात आणि फळ्यावर लिहायला लागतात. मात्र, त्यांना लिहिताना बघून मुले बुचकळ्यात पडतात. कारण बाई फळ्याऐवजी भिंतीवर लिहित असतात. चष्मा कंपनीच्या या जाहिरातीतील कल्पक संकल्पनेचा उदगाता होता एक मराठी तरुण उदय पारकर. कोकणच्या मातीचा ठेवा मनात जपणार्या पारकर यांनी जाहिरात जगतात १२७ मानाचे पुरस्कार मिळवले. आता स्वत:ची जाहिरात कंपनी आहेच, पण सिंधुदुर्गात युरोपच्या तोडीचा स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत...
उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख पुढील पानावर वाचा.
उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख वाचा.
September 11, 2015
“ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.
November 7, 2017
December 15, 2010
बबन प्रभू हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
July 26, 2017
वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झालेल्या बर्व्यांनी नक्षलवादी चळवळीसंबंधी “रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता” हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी “स्टडफार्म” (कादंबरी) थॅंक्यू मि. ग्लाड, पुत्रकामोष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि “मा निषाद”, “फाशीगेट” हे कथासंग्रह लिहिले.
July 31, 2017
मराठी कथाविश्वाला जळजळीत वास्तवदर्शी संकल्पनांचा स्पर्श देवून वाचकांना त्यांनी कधी स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल, अशा भयाण परंतु भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विश्वाची सैर, प्रत्यक्ष अनुभवायला कोणी लावली असेल तर ती चारूता सागर ह्यांनीच. गरीब लोकांचे जीवन, त्यांच्या व्यथा, वेदना, अपेक्षा, व माणुस म्हणून इतरांकडून त्यांना किमान मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची रास्त आशा जेव्हा पुर्ण झाली नाही तेव्हा, चारूता सागरांची कथा जन्माला आली.
August 18, 2011
जन्म: १ फेब्रुवारी १९१४
मृत्यू: २०१२
'पौरोहित्य आणि भिक्षुकी यांपुरताच वेदांचा अभ्यास मर्यादित नाही; ती एक जीवनपद्धती आहे व वारशाने चालत आलेल्या त्या पद्धतीचा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसार करण्याची गरज आहे,' हा विचार असणार्या व्यक्ती आज तशा दुर्मिळच. त्या विचारधारेतील एक प्रवाह म्हणजेच रत्नागिरीतील वेदमूर्ती घनपाठी विनायक सीताराम आठल्ये उर्फ आठल्ये गुरुजी.
रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा गावी एक फेब्रुवारी १९१४ रोजी आठल्ये गुरुजींचा जन्म झाला. ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून दशग्रंथांसह घनांत पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वेदमूर्ती नरसिंहभट्ट कानिटकर, वेदमूर्ती महादेवभट्ट पुरोहित व वेदमूर्ती काशिनाथभट्ट केळकर हे त्यांचे गुरू. पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेची परीक्षा, बडोद्यातील श्रावणमास दक्षिणा परीक्षा, पंढरपूर येथील गर्गगुरू विद्यापीठाची परीक्षा व गुजरातच्या अंबाजी देवस्थान येथील अखिल भारतीय वेदस्पर्धा आदींमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. त्यानंतर त्यांनी २५ वर्षे सांगलीतील श्री गणपती संस्थान वेदपाठशाळेत, तर १६ वर्षे रत्नागिरीतील वेद-पाठशाळेत अध्यापन करून अनेक विद्यार्थी घडवले. वेदवाङ्मयाची मौखिक परंपरा टिकवण्यात घनपाठींची मोठी भूमिका आहे. मात्र घनपाठ करणे कठीण समजले जाते. आठल्ये गुरुजींनी त्यात आपले स्थान निर्माण केले. नऊ घनपारायणांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
१९५२ साली सांगलीतून घनपारायणाला सुरुवात केल्यावर त्यांनी मुंबई, मिरज, सोलापूर, कोल्हापूर व पुण्यातही घनपारायणे केली. नांदेड, बाशीर्सह सोलापूरला जटापारायणे व जवळपास २५ वेळा दशग्रंथ पारायणे करून त्यांनी आपली छटा उमटवली.
राज्यपाल व शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्यांना १९७० मध्ये पुरस्काराने गौरविण्यात आले. १९७१ मध्ये शृंगेरीच्या पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते त्यांना वैदिक मार्तंड आणि वैदिक शिरोमणी ही उपाधी देण्यात आली. १९९७ मध्ये पुण्यातील देवदेवेश्वर संस्थानतर्फे त्यांना श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार देण्यात आला. आळंदीच्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठाननेही त्यांना वेदव्यास पुरस्काराने गौरविले; तर वाराणसी येथे महाराज काशिनरेश यांच्या हस्ते सुवर्ण-कंकणाची विशेष भेट त्यांना देण्यात आली. उज्जैनला अखिल भारतीय वैदिक विद्वान अभिनंदन कार्यक्रमात त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि वेदाभ्यासातील एक पर्व संपले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
Vedmoortee Vinayak Seetaram Athalye.
Birth: 1st February, 1914.
Birth Place:At/Post Bhadkambe, Taluka-Sangmeshwar, District-Ratnagiri (Maharashtra State)
Death: Year 2012
Educational Background:
Ghanat Degree with DashGranthi in Rugveda shakal branch. Studied at different places under the guidance of different authorities in Vedic Studies from 1924 to 1940. 1-Vedmoortee Narsimhabhatta Kanitkar at sakharapa. 2-Vedmoortee Mahadeobhatta Purohit at Malkapur. 3-Vedmoortee Kashinathbhatta Kelker at Sangli.
Distinguishing Achievements at Exams:
A) Exam held by Vedshastrotejak Sabha, Pune.
B) Shravanmas Dakshin Pariksha, Baroda(Vadodara)Gujarath.
C) Gargeguru Vidyapeeth, Pandharpur.
D) All India Ved competition held by Ambaji Deosthan, Gujarath.
Teaching Experience:
A) 25 years at Vedpathshala, Ganpati sansthan, Sangli from 1947 to 1972.
B) 16 years at Vedpathshala, Ratnagiri from 1973 to 1989.
Ved Parayane (reiterations):
A) Ghana Parayane - Sangli 1952, Solapur 1952, Mumbai 1957, Kolhapur 1962, Miraj 1970, Pune 1971.
B) Jala Parayane – (i) Solapur, (ii) Barshi, (iii) Nanded.
C) DashGranthi Parayane – About 20 to 25.
Participation in different Vedic Programmes like Swahakar: Has participated in about 100 to 125 Sanheeta Swahakar Programmes.
Honours & Rewards:
A) Honoured by Hon. Governor & Education Minister of Maharashtra in 1970 with cash of Rs. 5000/-
B) Was honoured by Jagatguru Shankaracharya of Shringeri Sharapeeth in 1971 at Pune with the purse of Rs. 5000/- and Maharashtra. Was conferred upon the epithets (titles) ‘Vedic Martanda’ and ‘Vedic Shiromani’.
C) Received Dakshina and Suvarnakankan (Golden Bracelet) from Maharaja Kashi Naresh at Varanasi in 1974.
D) Maharshi Vedvyas Pratisthan of Alandi honoured with Vedvyas award and testimonial in 1996.
E) In February 1997, “Shri Deodeveshwar Sansthan, Parvati, Pune” bestowed upon a purse of Rs. 5000/-, Shawl, Testimonial and “Shrimant Nanasaheb Peshwe Award” (Religious and Spiritual)
F) The Central HRD Minister Hon. Murli Manohar Joshi, honoured with the reward of Rs. 10000/- and Mahavastra in August 2000, at Ujjain in “Akhil Bharatiya Vedic Vidwan Abhinandan” programme.
Special Activities: Unimpeded service to “Smartgni” since 1980 at his residence at Ratnagiri.
(Reference: www.vedshaladeorukh.org)
August 8, 2017
मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्ससाठी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच झालेल्या 'सीमॅट' या परीक्षेत व्हीजेटीआयच्या प्रियंवदा म्हडाळकरने मुलींमध्ये पहिला नंबर मिळवत बाजी मारली.
दहावीमध्ये शाळेतून पहिली...बारावीला कॉलेजमधून तिसरी...इंजिनीअरिंगला व्हीजेटीआय कॉलेजमधून चारही वर्षं पहिल्या पाचात आणि आता सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या राष्ट्रीय परीक्षेत देशभरातून मुलींमध्ये पहिली येण्याचा घसघशीत मान तिने मिळवला. व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणार्या प्रियंवदा म्हडाळकर या विद्यार्थीनीने मिळवलेलं हे सुयश आहे.
सीमॅटच्या ४०० मार्कांच्या या परीक्षेत २८८ मार्क मिळवत प्रियंवदाने बाजी मारली. मुलींमध्ये पहिली आलेली प्रियंवदा देशातून ४३ व्या क्रमांकावर आहे. 'फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी मी गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच तयारीला लागले होते. आयआयएमसाठी कॅटची परीक्षासुद्धा दिली होती. यानंतर आयआयएम-कोझीकोडेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सीमॅटची परीक्षा मी एक ऑप्शन म्हणून दिली होती,' असं प्रियंवदा सांगते. इंजिनीअरिंगनंतर आयआयएममधून एमबीए आणि त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. 'दोन वर्षं जॉब करून त्यानंतर पुन्हा एकदा कॅटची परीक्षा देऊन आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवायची प्रयत्न मी करणार आहे. आयएएस अधिकारी बनून देशासाठी काम करत विकासामध्ये हातभार लावण्याचा माझा निर्धार आहे,' असं ती आपण कमावलेल्या यशाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलताना सांगते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti