(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • गजानन वाटवे

    आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.

  • संत रामदासस्वामी (समर्थ रामदास)

    समर्थ श्री रामदासस्वामी

  • शरद पवार

    माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव.

  • मृणाल देव-कुलकर्णी

    मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

  • केशवराव भोसले

    राजश्री शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार त्यांनी संगीत मृच्छकटिक ह्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले.

  • गीतकार भालचंद्र गजानन खांडेकर

    लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म २८ जून १९२२ रोजी झाला.

    “चंद्रप्रकाश”, “गंधसमीर” हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. “श्लोक केकावली”, “संजीवनी” या काव्याची तसेच “सं. एकच प्याला”, “सं. शारदा” या नाटकांची संहितासंपादने त्यांनी केली.

    जन्मदिनाच्याच तारखेस, २८ जून १९९० रोजी त्यांचे निधन झाले.

    #Bhalchandra Gajanan Khandekar

  • केतकी देसाई

    देसाई, केतकी

    ‘मूळची पुण्याची’ ही केतकी देसाईची ओळख मराठीजनांना सुखावणारी जरूर आहे, पण केतकीने आपले विश्वनागरिकत्व सिद्ध केले आहे.. किंबहुना त्यामुळेच तिचे कौतुक. रवांडासारख्या मागास आफ्रिकी देशात ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) सारख्या - विद्यार्थ्यांना परवडणारे लॅपटॉप उपलब्ध करून देणाऱ्या योजनेला मर्यादितच यश का मिळते आणि हे यश वाढवून, जगभरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ कसा मिळेल, याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी केतकीसह तिच्या तिघा सहपाठय़ांनी उत्तमपणे पार पाडली आहे आणि यावर ‘हल्ट ग्लोबल केस चॅलेंज’च्या पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. केतकी ही कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘हाइन्झ कॉलेज’मध्ये सार्वजनिक धोरण-व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट) शिकते आहे. जग बदलण्याचा आटापिटा स्वत: करू नका.. बदलांमध्ये अनेकांचा वाटा असतो, त्यापैकी योग्य वाटेकऱ्यांची सांगड घालून देणे हे काम अधिक महत्त्वाचे माना’ हा संस्कार या अभ्यासक्रमामुळेच केतकीवर झाला आणि हे आपल्याला कितपत करता येईल या विचारातूनच आपण कॉलेजतर्फे या जागतिक महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी झालो, असे तिने म्हटले आहे.

    पथकामध्ये चौघेजण असल्याने मतभेदांना वाव भरपूर होता. पण निर्णय म्हणजे मतभेदांचे व्यवस्थापन, हे एकदा ओळखले की प्रश्न सुटतात, असा केतकीचा विश्वास आहे. केतकीचे नेतृत्वगुण यापूर्वीही सिद्ध झाले आहेत. अमेरिकेतून जगभर पोहोतच असलेल्या ‘टेड’ या विचारविनिमय चळवळीचे कार्नेजी मेलन विद्यापीठातील केंद्र केतकीच्या अध्यक्षतेखाली चालते. ‘नेटवर्क ऑफ इंडियन प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेच्या पीट्सबर्ग शाखेची ती सह-अध्यक्ष होती. वैद्यक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांची सांगड घालण्याचे आव्हान असलेले तीन प्रकल्प तिने यापूर्वी पूर्ण केले आहेत. यानंतर, जगभरातील मुलांचे शिक्षणाचे प्रश्न कोणते हे आधी समजून घेऊन मग ‘ओएलपीसी’सारख्या योजनांच्या यशापयशाचा मार्ग कसा आहे व कसा असायला हवा हे ठरवण्याच्या स्पर्धेत आपण उतरायचे आहे, हे केतकीने ओळखले आणि तिथे तिचे विश्वनागरिकत्व झळाळले!

  • डॉ. रखमाबाई जनार्दन सावे

    Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली.

  • कृष्ण बळवंत निकुंब

    “उज्वला” या काव्यसंग्रहामुळे कवी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. “ऊर्मिला”, “अनुबंध”, “अभ्र”, “पंख-पल्लवी” आदी काव्यसंग्रह तसेच “सायसाखर” हा बालगीतसंग्रह आणि “मृगावर्त” हे खंडकाव्यही त्यांनी लिहिले. “पारख” हा त्यांचा जुन्या-नव्या कवितांचे समीक्षण करणारा लेखसंग्रह असून १८७० ते १९२० या काळातील कवितेचा इतिहासही त्यांनी लिहिला होता.

  • डॉ. रामचंद्र काशीनाथ भिडे उर्फ डॉ. नंदू भिडे

    डॉ. रामचंद काशीनाथ भिडे हे 'फास्ट ट्रॅक ओपन हार्ट सर्जरी' करणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. 'सुप्रापीप' या आज सर्जनप्रिय झालेल्या सुरक्षित तंत्राचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. त्यांनी दहा हजारांवर हृदयशस्त्रक्रिया केल्या होत्या. असंख्य रुग्णांना त्यांनी मृत्युशय्येवरून परत आणून जीवनदान दिले. वैद्यकीय क्षेत्र आज अनैतिक व्यवहारांमुळे बदनाम होत आहे. अशा काळात डॉ. भिडे प्रथम आपली लाईफ स्टाईल बदलून शस्त्रक्रिया कशी टाळता येईल याचा सल्ला पेशंटांना देत असत.

    या संशोधनाचे पेटंटही डॉ. भिडे यांना मिळाले होते. गरीबांना आपल्या संशोधनाचा फायदा व्हावा; अशी त्यांची भूमिका असे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या संशोधनाची दखल घेण्यात आली होती.

    नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात मानद हृदय शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार्‍या डॉ. भिडे यांनी ज्येष्ठ प्राध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेली कामगिरी तर फार मोलाची ठरली. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचे विद्यार्थी यांना त्यांनी सलग नऊ वर्षे मार्गदर्शन केले. आपल्या देशातील तसेच अमेरिकेतील असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्र, गुजरात व केंद सरकारचे पुरेसे सहकार्य न मिळाल्याने नाइलाजाने त्यांना जर्मनीला जावे लागले. स्वभावाने नम्र, व्यवसायात प्रामाणिक आणि प्रसिद्धीपासून दूर असे डॉ. भिडे सतत देशाचाच विचार करत.

    ते ज्युदो आणि अॅथलेटिक्सचे चॅम्पियन होते. वक्तृत्व, परिसंवाद आणि लेखनात त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. ठाण्यात ते भाड्याच्या घरात राहत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

    अधिक संशोधन, प्रयोग व प्रशिक्षणाकरिता त्यांनी मृत्युच्या चार-पाच महिन्यापूर्वीच जर्मनीला प्रयाण केले. जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या जर्मनीमधील हार्ट अॅन्ड डायबेटीस सेंटरमध्ये त्यादृष्टीने त्यांची आगेकूच चालू होती. ब्रिटिश कौन्सिलनेही त्यांच्या संशोधनासाठी अनुदान मंजूर केले होते.

    हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया करून त्यांना नवी जीवनसंजीवनी देणार्‍या डॉ. भिडे यांना काळाच्या पडद्याआड नेलं ते सुध्दा एका ह्रदयविकारानेच. डॉ. भिडे यांच्या अकाली निधनाने कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या प्रयत्नातील भारतातला मोठा संशोधक, शास्त्रज्ञ तसेच एक समाजसेवक हरपला आहे.

    डॉ. भिडे अवघ्या पन्नास वर्षांचे होते. सारा मित्रपरिवार आणि पेशंटही त्यांना 'नंदू भिडे' या नावानेच ओळखत. त्यांचे कृत्रिम हृदय प्राण्यांना बसविण्याचे प्रयोग सुरू होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)