बरकत आलेल्या व्यवसायात स्थिरावले की, शारीरिक चपळाई कमी होण्याचा धोका असतो. कोल्हापूरच्या आकाश कोरगावकर ने एमबीए झाल्यावर पेट्रोल पंपाच्या व्यवसायावर पकड मिळवलीच, पण त्याचवेळी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतराजीतल्या साहसस्पर्धेत महाराष्ट्राचे नाव नेले. चार किलोमीटर पोहणे, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असा तिहेरी प्रवास त्याने १० तास ६ मिनिटांत पार केला...
त्याचे 'आकाश' च वेगळे
(१ ऑगस्ट १७३४ - ११ डिसेंबर १७८३)
उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वार्या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली, पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकडया तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या, पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पूण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साहय करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता. तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले, पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेस स्वस्थ बसून राहिला.
चांगदेव महाराज हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होत. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले. यांच्या गरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात.
त्यानंतर चांगदेव व निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. त्यानंतर मुक्ताबाई चांगदेवांची गुरु बनली सन १३०५ (शके १२२७) मध्ये यांनी समाधी घेतली.
शिक्षणतज्ज्ञ, बालवाङ्मयकार महादेव काशीनाथ कारखानीस यांनी शिक्षकांसाठी पुस्तके लिहिली होती.
पुस्तकांच्या दुनियेत सगळय़ात महत्त्व मिळते ते लेखकाला! त्याच्या प्रतिभेतून एखादी कलाकृती निर्माण होते तेव्हा त्याचे सारे श्रेय त्या निर्मिती करणाऱ्या लेखकालाच मिळते. त्या लेखकाने लिहिलेले शब्द पूर्वी लोखंडी खिळय़ांत आणि आता संगणकावर जुळवणाऱ्या ‘कंपोझिटर’चे किंवा जुळवलेले शब्द तपासणाऱ्या मुद्रितशोधकाचे किंवा पुस्तकाची छपाई करणाऱ्या आणि त्याचे बाइंडिंग करणाऱ्या कुणाचे नावही सहसा कधी प्रकाशात येत नाही.
(कायद्याने मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करणे आवश्यक असते, त्यामुळे ते छापले जाते, एवढेच!) एवढे सगळे झाल्यानंतर त्या पुस्तकाचे वाचकांपर्यंत जाणे ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट! त्यासाठी असणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांना तर कुणी ओळखतही नाही. पुस्तकांची भव्य दालने उभारणाऱ्यांची ही गत, तर रस्त्यावर बसून अल्प दरात ज्ञानदान करणाऱ्याला कोण कशाला पुसतो? पुण्यात भरलेल्या ८३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाने मात्र रस्त्यावर पुस्तक विक्री करणाऱ्या पुण्यातल्या एका ज्ञानभक्ताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करून एक औचित्यपूर्ण पायंडा पाडला असेच म्हणावे लागेल. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराच्या बाहेरच्या कट्टय़ावर गेली ४० वर्षे जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसाय करणारे वसंत आठवले यांच्या मनात उद्घाटन करत असताना कोणत्या भावना उचंबळून आल्या असतील? त्यांच्या दृष्टीने साहित्याच्या पंढरीत आपण वारकरी म्हणून सहभागी झाल्याचा कृतार्थ भाव असणे स्वाभाविक असले, तरी पुस्तकांच्या दुनियेतील सर्वात शेवटच्या पायरीवरचा हा पालखीचा भोई किती महत्त्वाचा आहे, याचे भान यानिमित्ताने साहित्य व्यवहारातल्या सगळय़ांनाच आले, हे फार चांगले झाले. आपले वडील यशवंत नारायण आठवले यांनाश्रेय देताना वसंत आठवले यांना त्यांचा जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आठवतो. वडील रंगभूमीवर छोटय़ा-मोठय़ा भूमिका करत होते आणि त्यांचा गंधर्व संगीत नाटक मंडळींशी जवळचा संबंध होता. (‘एकच प्याला’च्या शेवटच्या प्रयोगात त्यांनी बालगंधर्वाबरोबर ‘सुधाकर’ची भूमिका केली होती!) चित्रपटांच्या आगमनानंतर मराठी रंगभूमीची जवळजवळ वाताहत झाली आणि यशवंतरावांना त्यांचा छंद उपयोगी पडला. तेव्हा वसंतराव तारुण्यात पदार्पण करत होते. बालगंधर्व हे वसंतरावांचेही दैवतच! बालगंधर्वावरील पुस्तकाच्या किमान पंधराशे प्रती विकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. किलरेस्कर ऑईल इंजिन्समधील ग्रंथालयातल्या नोकरीतून त्यांनी १९८५मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वीपासूनच म्हणजे ७१पासून त्यांनी जुन्या पुस्तकांच्या विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांचे सोबती म्हणून आठवले यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. जुनी पुस्तके ही केवळ त्यातील साहित्यमूल्यांमुळेच विक्रीयोग्य होतात, याचे उत्तम भान वसंतरावांकडे आहे. त्यामुळे उत्तम पुस्तके मिळवणे आणि ती योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे यातील जो अपूर्व आनंदाचा भाग आहे, तो वसंतरावांना अनेक वेळा मिळाला आहे. जरी त्या पुस्तकांच्या विक्रीतून मिळणारा पैसा यथातथाच असला, तरी त्यांना पुस्तकाचे मूल्य फार उत्तम रीतीने जाणवते, असा निर्वाळा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आणि संशोधकांनी दिला आहे. अनेक साहित्यिकांशी जवळची ओळख किंवा मैत्री असली, तरी वसंतरावांच्या चेहऱ्यावर त्याचे जराही प्रदर्शन कधी होत नाही. त्यांच्या दृष्टीने पुस्तकांचे प्रेम हेच खरे आणि टिकाऊ! गेली अनेक वर्षे सरस्वती मंदिराच्या कट्टय़ावर पुस्तके विकणाऱ्या या पुस्तक विक्रेत्याला रद्दीवाला म्हणून संबोधण्याची कुणाची हिंमतही होणार नाही, असे कार्य या व्यक्तीने केले आहे. शनिवारवाडय़ाचा १८१८ (म्हणजे ज्या वर्षी ब्रिटिशांनी याच वाडय़ावर युनियन जॅक फडकवला.) आणि १८२८ मधील नकाशा पुणे महानगरपालिकेला मिळाला, तो केवळ वसंतराव आठवले यांच्यामुळेच! जुन्या पुस्तकांमधील ज्ञानाचे अचूक निदान करता येण्यासाठी आवश्यक अभ्यास असणारा हा ज्ञानसाधक साहित्य संमेलनामुळे रस्त्यावरून साहित्याच्या व्यासपीठावर विराजमान झाला, हीच महत्त्वाची गोष्ट!
आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात मोठं नाव कमावलेला अभिनेता आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘ सैराट ‘ ह्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलेल्या मराठी चित्रपटात त्याला मुख्य अभिनेता साकारण्याची संधी प्राप्त झाली. त्या चित्रपटात त्याने परश्या नामक पात्र साकारले होते.
ठाण्यातील शहरास “सांस्कृतिक शहर” हे नावलौकिक प्राप्त करुन देणार्या कलाकारांपैकी एक होतकरु अभिनेता पराग मधुकर बडेकर. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली.
डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत.
मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.
शिवाजी सावंत यांच्या `मृत्युंजय` कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने हुलकावणी दिलेली असली, तरी लोकपीठाने ही कांदबरी चांगलीच उचलून धरली. या कादंबरीची एक लाखाची प्रत नुकतीच छापली गेली. भारतीय ज्ञानपीठ संस्थेचाच `मूर्तीदेवी` पुरस्कार या कादंबरीला मिळाला वाड्गमयाद्वारा भारतीय जीवनमुल्याचे चित्रण करणारा लेखक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो, अजुन तरी एकमेव मराठी लेखकाला मिळालेला हा पुरस्कार आहे.
सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 ला आजर्याच्या लाल मातीत झाला. कोल्हापुरच्या राजाराम हायस्कुलमध्ये त्यांनी वीस वर्ष अध्यापन केले. पुढे लोकशिक्षण मासिकाचे संपादन काही काळ केले. सावंत ह्यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी `मृत्यूजंय` लिहिली. कर्णाच्या या कथेने मराठी घरातल्या तीन-तीन पिढंयाना वेड लावले. ज्ञानपीठ संस्थेने त्यांचा हिंदी अनुवाद प्रसिध्द केला. त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. गुजराती अनुवादाला गुजरात सरकारचे पारितोषिक मिळाले.
त्यांच्या `छावा`, `लढत`, `युगंधर` या कादंबर्यांनाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. मृत्युंजय प्रमाणेच कृष्णाच्या जीवनावरील `युगंधर` ही विविध भाषांत अनुवादिली गेली. कन्नड, मल्याळम, बंगाली, राजस्थानी, गुजराती व हिंदी या भारतीय भाषांमध्ये रूपांतरीत झालेल्या या कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वत्र पोहचले. या खेरीज इंग्रजीमध्येही ती पोहचली. `छावा` ही संभाजी राजांचे जीवन रेखाटणारी कादंबरी, श्रीकृष्णाच्या चारीत्रावर आधारीत `युगंधर` ही कांदबरी तसेच `मोरावळा` , `असे मन असे नमुने` ही व्यक्तिचरीत्रे लिहली. त्यांच्या कसदार लेखनाला भारतीय ज्ञानपीठाचा `मुर्तिदेवी` पुरस्कार मिळाला. गुजराथी रूपातंराला `साहित्य अकादमी पुरस्कार`, बडोदे साहित्य संमेल्लन व कामगार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद.
Copyright © 2025 | Marathisrushti