(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • रामकृष्ण विठ्ठल लाड

    भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते.

  • दिलीप नरहर हेर्लेकर

  • कमलाकर नाडकर्णी

    नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक (आगामी) ही पुस्तके लिहिली आहेत.

  • सुलोचना चव्हाण

    सुलोचना चव्हाण यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात लावणीचा जागर सतत होत राहिला. ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘देव माझा मल्हारी’ अशा कितीतरी लावण्या रसिकांच्या ओठांवर सतत तरळत होत्या.

  • अजित वाडेकर

    कसोटी क्रिकेट संपले की क्रिकेटपटू काय करतात? कुणी आपल्या कार्यालयाचे काम इमानेइतबारे करायला लागतो. किमान पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटू तरी हे करायचे. काही क्रिकेटपटू क्रिकेट प्रशिक्षकाच्या पेशाकडे वळतात. काहींनी समालोचकाचा माईक हातात धरला. काहींनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीज् सुरू केल्या. काहींनी क्रिकेट प्रशासन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अजित वाडेकरांनी काय केलं?

    अजित वाडेकरांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयाला न्याय दिला. फावल्या वेळात त्यांनी अपंग क्रिकेटपटूंसाठी संघटन कार्य करायला सुरुवात केली. १९८८ मध्ये अपंग क्रिकेटपटूंची संघटना स्थापन झाली. तेव्हापासून आजतागायत या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज या संघटनेने २३ राज्यांच्या संघटनांना आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे. रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक क्रिकेट स्पर्धाच्या धर्तीवर ही संघटना अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करते. ३ वर्षांपूर्वी या संघटनेने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते.

    भारताने ही मालिका जिंकली होती. अपंगांसाठीच्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा विचार ही संघटना करीत आहे.अपंग क्रिकेटपटूंच्या या भरारीला पंख देण्याचे काम अजित वाडेकरांनी केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आयपीएलसारख्या लिगवर करोडो रुपये उधळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघटनेला मात्र अद्याप अपंगांना मदतीचा हात द्यावासा वाटत नाही हे क्रिकेटचे दुर्दैव. सुदैवाने अपंग क्रिकेटपटंना अजित वाडेकरांसारखा मसिहा भेटला. ज्याने आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा अपंगांच्या क्रिकेटसाठी वापर केला. आपल्या नोकरीतील पदाचा लाभ अपंगांच्या क्रिकेटसाठी केला.

    वाडेकरांच्या या कार्याची दखल सातासमुद्रापलिकडच्या अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतली. त्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी स्थान दिले. सर गारफिल्ड सोबर्स, विवियन रिचर्डस, मायकेल होल्डिंग, सुनील गावसकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी अजित वाडेकरांना बसविले. १९७१ ला वेस्ट इंडिजला कॅरिबियन द्विपसमूहात मालिकेत पराभूत करता येते हे स्वप्न वाडेकरांनी प्रत्यक्षात उतरविले होते. ब्रिटिशांना त्यांच्याच भूमीवर मालिकेत लोळविण्याचा पराक्रम वाडेकरांच्या भारतीय संघाने केला होता.

    १९७१ नंतर भारतीय क्रिकेट संघाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन वाडेकरांनी बदलायला लावला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला, वाडेकरांनी प्रशिक्षक बनून तब्बल साडेतीन वर्षे विजयी संघ बनविले. वाडेकरांच्या यशाचा तो परिसस्पर्श सुदैवाने अपंग क्रिकेटपटूंनाही लाभला. वाडेकरांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा मदर टेरेसा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला.

    सातासमुद्रापलिकडच्या लोकांना वाडेकरांमध्ये दिसले ते आपल्या इथल्या लोकांना दिसले नाही हे मोठे दुर्दैव आहे. मोदी यांची प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या अन्य गोष्टींनी कलंकित झालेल्या भारतीय क्रिकेटला गरज आहे ती जुन्या, बुजूर्ग क्रिकेटपटूंना मानसन्मान देण्याची. विनू मांकड, विजय हजारे, र्मचट, अमरनाथ, यांच्यासारख्या क्रिकेटपटूंच्या स्मृती जतन करून ठेवण्याची; त्यांची स्मारके उभी करण्याची. अजित वाडेकरांच्या कार्याचा, क्रीडाकौशल्याचा गुणगौरव अमेरिकेत होऊ शकतो, मात्र त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत का नाही? मुंबईच्या क्रिकेटने देशाला महान क्रिकेटपटू दिले. त्या महान क्रिकेटपटूंची ओळख भावी पिढीला कायमस्वरुपी राहावी याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशनने ‘हॉल ऑफ फेम’च्या धर्तीवर काहीतरी उभे करण्याचीगरज आहे.

    पदाधिकाऱ्यांच्या फोटोच्या गर्दीत हरविलेल्या क्रिकेटपटूंना पुढे आणण्याची गरज आहे. अजित वाडेकरांना मुंबई क्रिकेट संघटना विसरली. पण क्रिकेटची फारशी ओळख नसलेल्या ठिकाणी त्यांच्या नावाची पूजा बांधली जाते. हा विजय कुणाचा? अजित वाडेकरांच्या कर्तृत्वाचा तो निश्चितच गौरव आहे. त्यांना पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या विशाल दृष्टीकोनाचा तो एक पुरावा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यासारख्या संघटनांमधील दूरदर्शीपणाच्या अभावाचे ते एक द्योतक आहे.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • सदाशिव पांडुरंग देशपांडे

    निवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले

  • अभिजीत फाळके

    तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि 'आपुलकी' चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी 'अॅग्रो टुल बॅंक' सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं...

    अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.

    अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख वाचा.

    phalke-abhijit-modified

  • कवी प्रदीप

    भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.

  • ओमी वैद्य

    अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.

  • राजाराम चंद्राजी नाखवा

    ठाण्यामध्ये खेळांचा उत्कर्षा कसा होईल याचा पाया राजाराम नाखवा यांनी रोवला. त्यासोबतच शरीर सौष्ठत्व स्पर्धेला चालना मिळावी आणि याची आवड ठाण्यातील तरुणांमध्ये निर्माण करण्यात ही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे . ठाण्यामधील आद्य व्यायामशाळा म्हणून जिचा गौरव केला जातो, त्या चोंदणी कोळीवाडा येथील श्री.आनंद भारती व्यायामशाळेच्या स्थापनेत आर्थिकदृष्ट्या सहकार्य केले आहे . या व्यायामशाळेचे संस्थापक म्हणून देखील ते अनेक वर्षे कार्यरत होते.