(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • एकनाथ सोलकर

    हेल्मेट, रिस्टबँड, नीकॅप आदी संरक्षणाची विविध आयुधे फारशी प्रचलित नसताना खेळपट्टीजवळ क्षेत्ररक्षण करणे हेच एक आव्हान समजले जाणाऱ्या काळात फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहून क्षेत्ररक्षणावर कारकीर्द गाजविणारा खेळाडू म्हणून भारताचा एकनाथ सोलकर याचा नावलौकिक होता.

    त्यांच्या नावाने मुंबईत क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे, यानिमित्ताने या महान खेळाडूच्या स्मृती जाग्या होतात. ‘कॅचेस विन मॅचेस’ हे तत्त्व यशस्वी करून दाखविणाऱ्यांमध्ये एकनाथ हा अग्रेसर होता. बिशनसिंग बेदी, एरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर व एस. वेंकटराघवन या भारतीय फिरकी गोलंदाजांच्या यशात एकनाथचा मोठा वाटा होता. झेल हे निर्माण करावयाचे असतात. क्रिकेटमधील श्रेष्ठ फलंदाज खेळपट्टीवर खेळत असताना त्यांचे कोणतेही दडपण न घेता खेळपट्टीजवळच उभे राहून क्षेत्ररक्षण करण्यात एकनाथ हा माहीर होता. आता क्षेत्ररक्षणासाठी जॉन्टी ऱ्होड्ससारख्या महान क्षेत्ररक्षकांचा सल्ला भारतामध्ये घेतला जातो, मात्र ज्या काळात असे परदेशी प्रशिक्षक सहजपणे उपलब्ध नसताना एकनाथने आपले चापल्य, अचूकता आणि झेपावत क्षेत्ररक्षण करण्याची शैली याच्या जोरावर कारकीर्द गाजविली.

    मैदानावर मुख्य ग्राऊंड्समनचे काम करणाऱ्या धोंडू सोलकर यांचा एकनाथ हा मुलगा. पाच भावंडांमधील या एकनाथने शालेय जीवनातच क्रिकेट कारकीर्दीचा ध्यास घेतला होता. त्याच्याकडील गुणवत्तेमुळे त्याला संधी मिळण्यास अडचण आली नाही. त्याने १९६४ मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्याने १९६५-६६ मध्ये लंडन स्कूल्सविरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषविले. एक्की या नावाने लोकप्रियता मिळविलेल्या या खेळाडूस १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. जेमतेम आठ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत त्याने २७ कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने एक शतक व सहा अर्धशतकांसह १०६८ धावा केल्या. त्याने १८ बळी घेतले. या २७ कसोटींमध्ये त्याने ५७ झेल घेत कौतुकास्पद कामगिरी केली.

    १९७१ मध्ये भारतास इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे जो ऐतिहासिक कसोटी विजय मिळाला, त्या कसोटीत त्याने अ‍ॅलन नॉट याचा घेतलेला झेल खेळास कलाटणी देणारा ठरला. त्याने पूर्णपणे शरीर झोकून घेतलेल्या या झेलचे सर्वच प्रसारमाध्यमांनी मुक्तपणे कौतुक केले होते. एकाच वेळी फिरकी व द्रुतगती अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करणारा तो जगातील सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज होता. १९७५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेंकटराघवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात एकनाथचा समावेश होता. एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी फारशी चमकदार झाली नाही. त्याने एक दिवसीय सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मुंबईकडून खेळताना एकनाथने प्रथम श्रेणीच्या १८९ सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये त्याने आठ शतके व ३६ अर्धशतकांसह ६८५१ धावा केल्या. त्याने २७६ बळी घेतले. ३८ धावांमध्ये सहा बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

    एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम त्याने दहा वेळा केला, तर एकाच सामन्यात दहापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी त्याने एकदा केली. प्रसिद्धिपराङ्मुख असलेला एकनाथ हा अजातशत्रू खेळाडू होता. जेवढी त्याने आपल्या नेत्रदीपक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कारकीर्द गाजविली, तेवढे त्याचे फारसे कौतुक झाले नाही. त्याचा फारसा सन्मानही कधी झाला नाही किंवा आपल्यासाठी गौरवनिधी सामना घ्यावा अशीही त्याने कधी विनंती केली नाही. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्याने या जगाचानिरोप घेतला. मात्र त्याचे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण चिरकाल स्मरणात राहील.

  • योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे

    ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते.  २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.

  • विद्याधर गोखले

    ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.

  • उपेन्द्र लिमये

    उपेन्द्र लिमये हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या “जोगवा” मधील “तायप्पा”च्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • बाळशास्त्री जांभेकर

    बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.

  • मुकेश माचकर

    मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते.

  • संजय सोनवणी

    संजय सोनवणी (जन्म १४ ऑगस्ट १९६४): मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक तत्वज्ञ, कवी आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही.

  • प्राजक्ता कैलास टिपाले

    वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली.

  • बाबाराव दामोदर सावरकर

    बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.

  • जोशी (डॉ.) केशव रामराव

    एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते .