भास्करबुवा बखले हे मराठी हिंदुस्तानी संगीतपरंपरेतले गायक, संगीतकार होते..
लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली.
काव्यसुर्य मंगेश पाडगावकर यांच्या सौभाग्यवती यशोदा पाडगावकर यांनी “कुणास्तव कुणीतरी“ हे २००० रोजी प्रकाशित झालेल्या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे साहित्यचिश्वात ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांचे पती मंगेश पाडगांवकर गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधीत, या आत्मवृत्ताला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे.
अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष हिने चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तीने काम केले आहे.. तिचा जन्म १३ मे रोजी झाला.
अमृता सुभाष यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/amruta-subhash/
फाटक, कमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
कमल फाटक म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेतील लोभस व्यक्तिमत्व! लाल निशाण पक्षाच्या कम्युनमधील सर्व मुलांची आई म्हणजे कमलताई.
त्यांना ओळखणारे सर्व त्यांना कमलआई म्हणूनच ओळखत. कमलताई म्हणजे नितळ वागणे, स्वयंशिस्त, कामाचा प्रचंड उरक आणि टापटीप. कम्युनमध्ये सगळी कामे तन्मयतेने त्या करीत असत. कोणत्याही चर्चेत बोलणे जवळजवळ नाही, पण तपशील हवा असेल तर तो त्यांनीच द्यावा. कधीही अटक न झालेल्या त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. पण भूमिगत कामे करणे, पुढाऱ्यांचे गुप्त संदेश पोहोचविणे, कार्यकर्त्यांची काळजी घेणे आदी कामे त्या करीत असत. कमलताईंचा जन्म १९२१ मधला. आजी आणि आई या दोघींचेही संस्कार त्यांच्यावर झाले होते. देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आई-वडिलांकडून मिळाले होते. १०-११ वर्षांच्या कमलताईंना वडील प्रभातफेरीसाठी ओंकारेश्वराच्या देवळात नेऊन सोडत असत. आई न चुकता ‘केसरी’चे वाचन करीत. सोन्याचांदीच्या कपाटात स्वराज्याच्या सनदा ठेवण्याचे विचार त्याकाळी त्या व्यक्त करीत. समजत नसले तरी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना स्वातंत्र्याचाच ध्यास होता. परदेशी साखरेवर बहिष्कार घातल्यामुळे त्यांनी कधी चहा घेतला नाही पण त्यांनी बनविलेल्या चहाची चव कधी बिघडली नाही. स्वयंपाक आणि मुले यांची त्यांना कधीच आवड नव्हती, पण त्यांनी केलेला स्वयंपाक आणि मुलांचे करणे दोन्हीही लाजवाब असायचे. सर्वच कामे त्यांनी कर्तव्यबुद्धीने पण मनापासून केली म्हणूनच त्या कमलआई म्हणून सर्वाच्या हृदयात विराजमान झाल्या. कमलताईंच्या आईला जडीबुटी औषधांची जाण होती. त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील) ग्वाल्हेर संस्थानाचे दिवाण होते. घरात पिढीजात सावकारी होती, पण ती त्यांनी अनुभवलीही नाही. वडील देवाच्या शोधात गेले आणि नंतर परत आले. कमलताईंच्या अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या वडिलांनी खंडाळ्याच्या घाटातील (जुना रस्ता) रस्त्याचे काम केले होते. पुण्यात देवळाजवळच भाऊ फाटकांचे घर. भाऊंबरोबर कमलताईही हॅट घालून आणि सायकलवरून फिरायची. पण घरातून विवाहाला विरोध होता. सदूभाऊ गोडबोले यांनी त्यांचे लग्न लावून दिले. चणे-कुरमुरे (लेनिन मिक्श्चर) खाऊन भाऊ आणि कमलताईंनी अनेक दिवस काढले होते. कमलताईंना वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. भाऊंनी त्यांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य चळवळीतल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घ्यायचे आणि जमेल तितका देश-विदेश पाहायचा हेच त्यांचे ध्येय. कॉ. एस. ए. डांगे आणि त्यांच्या पत्नीचा सहवासही त्यांना लाभला होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अरुणा आसफअल्लींच्या हस्ते झालेले ध्वजारोहणही त्यांनी पाहिले. एस. के. लिमयेंच्या वैद्यकीय उपचाराच्या निमित्ताने त्यांनी सोविएत संघराज्य पाहिले तर ‘मुलगी झाली हो’ च्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया पाहिला. १९७४-७५ मध्ये त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकांतून श्रवणभक्ती करीत. ‘मुलगी झाली हो’ या नाटकातील एका भूमिकेसाठी त्या स्वत:हून पुढे झाल्या. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचा हा उत्साह तरुण कार्यकत्यांना लाजविणारा होता. बरोबरीचे सर्व सोबती, मुलगी, जावई काळाच्या पडद्याआड जात असताना वार्धक्याने थकलेल्या कमलताई शेवटपर्यंत आपले आयुष्य सर्वाच्या कारणी लागावे यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या निधनाने एक सार्थक जीवन काळाच्या पडद्याआड गेले आहे.
श्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.
डी. बी. कर्णिक हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. त्यांनी या वृत्तपत्राला लोकाभिमुख व वाचकप्रिय बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.
अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.
पुण्याच्या दापोडी परिसरात राहणार्या सरस्वते यांनी बजाज कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सौरऊर्जेचा वापर करुन दिवे लावण्याचा प्रकल्प तयार केला, “सोलर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट” या नावाने. आयुष्यात ज्यांना “दिवा” हा प्रकारच माहित नाही त्यांच्यासाठी ही गरज अधिक असणार म्हणूनच सरस्वते यांनी आसाममधील दुर्गम भागात असलेल्या हनग्रुम या हाफलॉंग तालुक्याची निवड केली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti