संत तुकाराम

भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यावर कळस चढविण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. मराठी काव्यात ‘अभंग‘ प्रकार निर्माण केला. त्यांच्या अभंगाची संख्या ५ हजार आहे. अभंगात सुभाषितवजा पंक्ती आढळतात शुध्द परमार्थाची शिकवण. भक्तीची कास. नामस्मरण व सतसंग यावर अभंगरचना. सगुण-निर्गुण हे आध्यामिक साक्षात्काराचे पैलू.

तुकारामांचा जन्म, पुण्याजवळील देहू गावी, इ.स. १६०८ मध्ये झाला. प्रारंभी ते सुखी संसारी गृहस्थ होते. ते व्यवसायाने वैश्य होते. त्यांची दुकानदारी उत्तम चालली होती. पण दुष्काळ पडला, पत्नी वारली, मुगला गेला. इकडे दिवाळे निघाले. तुकाराम विठ्ठलभक्तीकडे वळले. अभंगरचना करु लागले. महान विठ्ठलभक्त झाले. श्रीविठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार झाला. भक्तिमार्गाचा जयजयकार करीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज‘ म्हणतात. तुकारामांनी आपले लौकिक आणि अध्यात्मिक जीवनातले अनुभव आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत. उत्स्फूर्त आणि उत्कट भावोद्रेकाची ही अभंग -कविता म्हणजे मराठी भाषेचे अक्षर -लेणे आहे.

संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत. ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकप्रिय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.



भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यावर कळस चढविण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. मराठी काव्यात ‘अभंग‘ प्रकार निर्माण केला. त्यांच्या अभंगाची संख्या ५ हजार आहे. अभंगात सुभाषितवजा पंक्ती आढळतात शुध्द परमार्थाची शिकवण. भक्तीची कास. नामस्मरण व सतसंग यावर अभंगरचना. सगुण-निर्गुण हे आध्यामिक साक्षात्काराचे पैलू.

तुकारामांचा जन्म, पुण्याजवळील देहू गावी, इ.स. १६०८ मध्ये झाला. प्रारंभी ते सुखी संसारी गृहस्थ होते. ते व्यवसायाने वैश्य होते. त्यांची दुकानदारी उत्तम चालली होती. पण दुष्काळ पडला, पत्नी वारली, मुगला गेला. इकडे दिवाळे निघाले. तुकाराम विठ्ठलभक्तीकडे वळले. अभंगरचना करु लागले. महान विठ्ठलभक्त झाले. श्रीविठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार झाला. भक्तिमार्गाचा जयजयकार करीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज‘ म्हणतात. तुकारामांनी आपले लौकिक आणि अध्यात्मिक जीवनातले अनुभव आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत. उत्स्फूर्त आणि उत्कट भावोद्रेकाची ही अभंग -कविता म्हणजे मराठी भाषेचे अक्षर -लेणे आहे.

संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत. ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकप्रिय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.

Author