मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
विंदा करंदीकर’ हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते.
बालगंधर्व या टोपणनावाने ओळखले जाणारे नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी गायक-अभिनेते होते. संगीतनाटकांतील गायन व अभिनयासाठी - विशेषकरून स्त्री-पात्रांच्या अभिनयातील कामासाठी त्यांची ख्याती होती. ते पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. बालगंधर्व ही पदवी बाळ गंगाधर टिळकांनी दिली.
जन्म 26 जून 1888 साली. संगीत रंगभुमीचा बहुमोल अंलकार. मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस असे होते. लोकमान्य टिळकांकडून वयाच्या 11 व्या वर्षी बालगंधर्व म्हणून कौतुक. किर्लोस्कर नाटक मंडळीत शारदेची पहिली स्त्री भुमिका केली. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना. प्रभात कंपनीच्या धर्मात्मा बोलपटात एकनाथाची भुमिका 1929 पुणे येथील 24 व्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते. बालगंधर्वांनी सिंधु, रूक्मिनी, शारदा या प्रमुख स्त्री भुमिका केलेल्या होत्या. पद्मभुषणाने सन्मानित. त्यांचा मृत्यु 15 जुलै 1967 साली झाली.
मराठी रंगभूमीवरील एक अव्दितीय गायक नट. पुर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस 1906 ते 1955 या पन्नास वर्षाच्या कालखंडात स्त्रीभूमीका आणि नंतर पुरूष भूमीकाही करून बालगंधर्वांनी रसिकांना संतूष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. जन्म पुणे येथे. वडीलांचे पुर्ण नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस व आईचे नाव अन्नपुर्णाबाई असून पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्याशी बालगंधर्वाचा विवाह 1907 साली झाला होता. त्यांना पाच आपत्य झाली. पुढे लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर 1940 बालगंधर्वांनी प्रसिद्ध गायिका गोहराबाईंशी नोंदणी पद्धतीने 1952 च्या सुमारास विवाह केला. गोहराबाईंशी त्यांचा परिचय 1937 मध्येच झाला होता. नारायणरावांचे शिक्षण इंग्रजी दुसर्या इयत्तेपर्यंतच झाले. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा व गंधर्वतुल्य आवाज, या देणग्या त्यांना जन्मतच लाभल्या होत्या 1898 साली लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले; `हा तर बालगंधर्व आहे` असे सहजस्फूर्त उद्गार त्यांनी काढले, असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव `बालगंधर्व` म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या अंगातील उपजत गुणांचे चीज व्हायचे असेल, तर त्यांनी नटाचा व्यवसाय करावा असे त्यांच्या काही निकटवर्तियांना वाटत होते. किर्लोस्कर नाटक मंडळी ही त्या काळातली अग्रेसर संगीत नाटयसंस्था होती. तिचे संस्थापक अण्णासाहेब किर्लोस्कर आणि तिला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन बसविणारे गायक नट भाऊराव कोल्हटकर यांनी निर्माण केलेली थोर परंपरा महाराष्ट्राच्या परिचयाची होती. लोकमान्य टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा आशिर्वाद घेऊन, 1905 सालच्या गुरूव्दादशीला बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. 1906 सालच्या सुरूवातीला बालगंधर्वांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकातील शंकुतलेची भूमिका केली. ती पाहून भाऊराव कोल्हटकर यांच्याबरोबर अस्तंगत झालेले किर्लोस्कर नाटक मंडळीचे सौभाग्य आज तिला परत लाभले, असे तत्कालीन नाटय रसिकांना वाटले. त्यावेळी नारायण दत्तात्रेय तथा नानासाहेब जोगळेकर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे अर्ध्वयू होते.
त्या काळात नाटकांमध्ये स्त्रियांनी काम करणं निषिध्द मानलं जाई. त्यामुळे स्त्रीभूमिकाही पुरुषच करत असत. बालगंधर्वांच्या स्त्री-भूमिकांमध्ये विविधता होती. अचूक निरीक्षण व सौंदर्यदृष्टी यांमुळे अस्सल स्त्री भूमिका साकारण्यात बालगंधर्व यशस्वी होत. त्यांच्या भूमिकांमधील वेष व केशभूषेचं अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत. बालगंधर्व या भूमिकांशी तदरुप होऊन जात असत. त्यामुळे आपण या स्त्रीभूमिकांमध्ये एका पुरुषाला पाहात आहोत, अशी पुसटशी जाणीव देखील प्रेक्षकांना होत नसे. बालगंधर्वाच्या अभिनयाचा हा एक वैशिष्टयपूर्ण पैलू होता.
1913 मध्ये बालगंधर्वांनी गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्याबरोबर भागीदारीमध्ये गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. पुढे टेंबे आणि बोडस या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर बालगंधर्व या कंपनीचे एकटे मालक झाले. संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळच होता. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी असे श्रेष्ठ नाटककार या काळात झाले. बालगंधर्वांनी `शाकुंतल` मध्ये शकुंतला, सौभद मध्ये सुभदा, मृच्छकटिक मध्ये वसंतसेना, `मानापमान`मध्ये भामिनी, `संशयकल्लोळ` मध्ये रेवती, शारदा मध्ये शारदा, मूकनायक मध्ये सरोजिनी, स्वयंवर मध्ये सिंधू ही स्त्री पात्रं रंगवली . 4 जून 1955 रोजी त्यांनी ’एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका. त्यांनंतर त्यांनी रंगभूमीवरुन निवृत्ती स्वीकारली. रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्द व रसिकांचं भरभरुन मिळालेलं प्रेम यामुळे संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपतीपदक देऊन तर पुढे पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
1933 च्या सुमारास भारतात बोलपटाचं युग सुरु झालं. त्यामूळे रंगभूमीकडे येणार्या प्रेक्षकांना ओहोटी लागली. बालगंधर्वही काही काळ चित्रपंटांकडे वळले. 1935 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या `धर्मात्मा` या चित्रपटांत त्यांनी संत एकनाथांची भूमिका केली. मात्र बालगंधर्व चित्रपटांत रमले नाहीत. त्यांच्या ओढा रंगभूमिकडेच होता. म्हणूनच 1936 मध्ये ते पुन्हा रंगभूमीकडे परतले. 1939 पासून त्यांनी नाटकांमधून पुरुष भूमिका सादर करायला सुरुवात केली. `मानापमान` मध्ये धैर्यधराची आणि `मृच्छकटिक`मध्ये चारुदत्ताची भूमिका ते करु लागले. पण प्रेक्षकांना त्यांच्या स्त्री भूमिकाच अधिक प्रिय होत्या.
बालगंधर्व हे गायक-नट होते. त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. ख्याल, नाटकांमधील त्यांची अनेक पदं गाजली. शास्त्राचा बाज राखून अभिनयाला अनुकूल असं गाणं त्यांनी गायलं. त्यांची गाणी घराघरांमध्ये पोहोचली. नाटयसंगीताची अभिरुची निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य करणार्या बालगंधर्वाचा 1967 साली मृत्यू झाला.
बालगंधर्वांचे मराठीसृष्टीवरील लेख.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (27-Jun-2017)
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (17-Jul-2017)
मराठी चित्रपटांमधली यशस्वी “वुमन फिल्ममेकर” तसंच प्रतिभावान व संवेदनशील अभिनेत्री, दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या स्मिता तळवलकरांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७२ साली दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली.
ब्रिटिशकाळ असो वा स्वातंत्र्यानंतर आलेली लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामातील निष्ठा कधीच ढळू न दिलेल्या मोजक्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये ई. एस. मोडक यांचा समावेश होता. ब्रिटिशांची चोख सेवा करतानाही एतद्देशीयांविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाचा तसेच त्यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीचा दाखला यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी दिला आहे. मोडक यांचा जन्म साताऱ्यात २५ मार्च १९२० रोजी झाला. वडील जिल्हाधिकारी होते. शिकायला ते पुण्याच्या शाळेत आले. नंतर मुंबईतील महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळविली.
त्याच काळात ब्रिटिशांची इंडियन पोलिस परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि १९४२ मध्ये साताऱ्याला सहायक पोलिस अधीक्षक पदावर रुजू झाले. ४२ च्या आंदोलनाचा तो काळ होता आणि त्या परिसरात स्वातंत्र्यसैनिकांनी पत्री सरकार स्थापन केले होते. सरकारी कामे ठप्प करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात येई. त्या काळातील परिस्थिती मोडक यांनी कौशल्याने हाताळली. प्रसंगी वसंतरावदादा पाटील यांना अटक करावी लागली. तरीही त्यांचे सर्वाशी संबंध सौहार्दाचेच राहिले. याच धामधुमीत १९४३ मध्ये किरण सेनगुप्ता या बंगाली युवतीबरोबर त्यांनी विवाहाचे नाजूक बंधही गुंफले. साताऱ्यानंतर विजापूर, अहमदाबादजवळील खेडा, कोल्हापूर, सोलापूर आणि नंतर मुंबई येथे पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती मिळाली. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यावर पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मानही १९६५ मध्ये त्यांना मिळाला. १९६६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव सुचविले आणि त्यांनी ते सार्थही ठरविले. पोलिस महासंचालकपदी त्यांची नेमणूक १९७६ मध्ये झाली आणि ते १९७८ मध्ये निवृत्त झाले. प्रामाणिक, हुशार आणि कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते. कामाबाबत जितके कडक तितकेच ते वैयक्तिक संबंधांमध्ये मृदूही होते. त्यांचे जीवन अनेक नाटय़मय घटनांनी भरलेले होते. याचे रोमहर्षक वर्णन ‘सेंटिनेल ऑफ सह्य़ाद्री’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. पुण्यात गणेशोत्सवातील हल्याची दंगल हाताळताना तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी गोळीबार न करण्याचा आदेश मोडक यांना दिला, पण मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तो रद्द केला. त्यानंतर आपण असा आदेश दिलाच नव्हता असे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. त्याबाबतचे प्रसंग मोडक यांनी नाटय़मयरीत्या मांडले आहेत. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात झाल्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश करू दिला जाणार नाही, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मोरारजी देसाई मुंबईत आले. त्यावेळचा तणाव शमविण्यासाठी त्यांनी मोरारजींची गाडी अचानक रस्ता बदलून सुरक्षितपणे पोहोचवली. ठाकरे यांना अटक करण्याची कारवाई असो वा दंगलीस सामोरे जाण्याचा प्रसंग, त्यातून मोडक यांच्यातील कणखर प्रशासकच दिसला. दंगल कशी हाताळायची, पोलिस दल कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी तयार केली होती. जातीय दंगली होऊ नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याबाबतचे आपले स्पष्ट मत ते मांडत. पोलिस दलातील राजकीय चबढब त्यांना सहन होत नसे. पोलिस दलातील नेतृत्व कसे असावे याबाबत ते लिहितात, ‘नेतृत्वाचा आपल्या संघावर विश्वास असावा. स्वयंनियंत्रण, आत्मविश्वास, देशाभिमान, निष्ठा हे गुण नेत्यात असलेच पाहिजेत.’ धावपळीच्या कामामधून वेळ काढून ते अफाट वाचन करीत. सम्राट अशोकाच्या जीवनावर तब्बल १४१ पुस्तके वाचून त्यांनी कादंबरी लिहिली. त्यांच्या अखेरच्या दिवसांत ती प्रकाशित होण्यासाठी त्यांच्या संजय आणि रवि या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न केले. मात्र काही महिन्यांपूर्वीच पत्नी इहलोक सोडून गेल्याने हताश झालेल्या मोडक यांची प्रकृती ढासळली. गेल्या आठवडय़ात मोडक काळाच्या पडद्याआड गेले आणि दुसऱ्याच दिवशी ही कादंबरी प्रकाशित झाली. सर्वच क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप असण्याच्या या काळात मोडक यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची गरज अधिकच भासणार आहे.
वाड्मयीन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, साहित्य विश्वाचा अचूक संदर्भग्रंथ, परखड समीक्षक, व्यवहारात पारदर्शक, लिखाणासोबत स्वभावातही नितळपण..अशा अनेक वैशिष्टय़ांनी व्यक्तिमत्व सजलेले असल्याने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत रामचंद्र वर्तक यांच्या निधनाचा धक्का अवघ्या मराठी साहित्य विश्वाला बसणे साहजिकच. रायगड जिल्ह्य़ातील महाड या गावी २७ जुलै १९३० रोजी प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा जन्म झाला.
प्राथमिक शिक्षण मुंबईतील छबिलदास शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. विद्यार्थीदशेतच त्यांची लेखनकलाही बहरत होती. वर्धा येथील गोविंददास सक्सेरिया महाविद्यालयात प्राध्यापकी स्वीकारल्यानंतर हा पेशा व प्रवासाच्या आवडीमुळे त्यांच्या लेखनकलेस खतपाणी मिळाले. पुणे विद्यापीठातून ‘सन १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा प्रवास’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे हं.प्रा.ठा., बिटको आदी महाविद्यालयांमधून त्यांनी प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. पी.एचडी आणि एम.फिलसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. १९९० मध्ये नाथीबाई ठाकरसी महिला महाविद्यालयातून ते निवृत्त झाले. कथाकार, समीक्षक, उत्कृष्ट वक्ता म्हणून असलेली त्यांची कामगिरी नवोदितांसाठी आदर्शवत अशीच. नाशिकमध्ये कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सान्निध्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व साहित्यिकदृष्टय़ा अधिकच बहरले. आपल्या साहित्यामधून त्यांनी वाचकाला जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. ‘वळणावरचे साकव’ या व्यक्तिचित्रणसंग्रहातून ते सहजपणे वाचकाला अंतर्मुख करून जातात, तर ‘माळंदे’ या ललित लेखसंग्रहातून त्यांच्या खेळकर लेखनशैलीचा सहज सुंदर आविष्कार पहायला मिळतो. प्रवास करताना केवळ ‘पाहाणे’ नव्हे, तर ‘अभ्यासणे’ या त्यांच्या वृत्तीचे दर्शन ‘लू यू चीन,’ ‘देशादेशांतून’ या प्रवासवर्णनसंग्रहांमधून दिसते. ‘मराठी ललित गद्य’, ‘सफर बहुरंगी रसिकतेची’, ‘संशोधनाची लेखनशैली’ ही त्यांची समीक्षा व संशोधनपर पुस्तके. मुक्त विद्यापीठासाठी १६ पुस्तकांचे लेखन करणाऱ्या प्रा. वर्तक यांचे ‘पारंब्या’, ‘फुलपंखी दिवस’, ‘अंकुर’, ‘मनमोर’, ‘धून’, ‘केटलिक वार्ताओ’ (गुजराती) हे कथासंग्रहही प्रसिध्द आहेत. ‘कॉन्व्हर्सेशन विथ स्टॅलिन-एक शर्थीची झुंज’ या समीक्षात्मक व संशोधनात्मक ग्रंथाचीही साहित्यवर्तुळाने विशेष दखल घेतली. याशिवाय त्यांच्या नावावर ‘मराठी नियतकालिकांचा इतिहास खंड २, २४,’ ‘प्रभाकर पाध्ये-समग्र वाड:मयदर्शन’, ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड १३’ आदी ग्रंथ आहेत. लघुकथा, प्रवासवर्णन, व्यक्तिचरित्रे, ललित गद्य या प्रकारांमध्ये स्वैर मुशाफिरी करणारे वर्तक समीक्षक म्हणून अधिक ओळखले गेले. नवीन लेखकांचे तर ते गुरूच. आपल्या पुस्तकासाठी वर्तक यांनी दिलेला अभिप्राय नवलेखकांना बहुमोलाचा वाटे. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे विद्यापीठाने साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार त्यांना प्रदान केला. याशिवाय डॉ. य. वा. परांजपे, किलरेस्कर, मराठी साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा मु. ब. यंदे पुरस्कार त्यांना अधिक भावत असे. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्य, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्यभूषण परीक्षा समितीचे अध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. येत्या २७ जुलै रोजी ८१ व्या वर्षांत ते पदार्पण करणार होते. वाढदिवस कशा पध्दतीने साजरा करावयाचा, या नियोजनात पत्नी, दोन मुले यांसह मित्रांना मग्न ठेवत ते स्वत: परलोकीच्या प्रवासाला निघून गेले.
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.
पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.
डॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते.
Copyright © 2025 | Marathisrushti