(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • जेष्ठ किराणा घराण्याच्या गायिका, गंगूबाई हनगळ

    “कन्नड कोकिळा" अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. सोळाव्या वर्षी त्यांचे गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. १९३७ पासून सवाई गंधर्वानी कुंदगोळ या हुबळीपासूनच्या जवळच्या गावात त्यांना संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घरी जाऊन गंगुबाई शिकत होत्या, त्या वेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी तेथे दुसरे सहाध्यायी होते. नंतर ते गंगुबाईंचे गुरुबंधू झाले. १९३८ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाई हनगळ यांचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ साली पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. त्यांना गमकाच्या अंगाने गायला खूप आवडे; जे स्त्री गायिका सहसा गात नसत. नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे.

    गंगुबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वयगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षणा नंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली.

    मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगिताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तीगीत व गझल गायानाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक जी. एन जोशी व गंगूबाई हनगळ यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत असत. गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल यांना अनेक पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे.त्यात त्यांची छायाचित्र, ध्वनिमुद्रिका, तानपुरे पहायला मिळतात.

    गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी 'दि साँग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. फक्त पाचवी शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. १९९२ ते १९९४ त्या कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या होत्या. गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा

    साधारण चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टार पद मिळवू शकले नाहीत. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी 'नरसी भगत' आणि 'शारदा' मध्ये अभिनय केला आहे. किशोरवयात 'अंगुलीमाल' मध्येही काम केले आहे. विनोद मेहरा यांचा प्रथम चित्रपट १९७१ साली रीटा हा होता, सोबत होती तनुजा ते १९७१ मध्ये राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी याचा बरोबर 'लाल पत्थर' मध्ये युवा नायकाच्या रूपात सादर झाले. विनोद मेहरा यांच्या फिल्म करियर ला मौसमी चटर्जी ने हात दिला, शक्ती सामंत यांची फिल्म अनुराग (१९७२) मध्ये मौसमी-विनोद प्रथम एकत्र आले. मौसमी चटर्जी यांनी एक दृष्टिहीन युवती चा रोल अतिशय उत्तम केला होता. विनोद मेहरा यांनी एक आदर्शवादी नायकाची भूमिका केली होती. नायकाला आपल्या पित्याच्या इच्छे विरुद्ध मौसमी बरोबर लग्न करावयाचे असते.

    या नंतर त्यांनी उस पार (बसु चटर्जी), दो झूठ स्वर्ग नरक या चित्रपटात मौसमी बरोबर नायक म्हणून काम केले. तो काळ मल्टीस्टार फिल्म चा होता. विनोद खन्ना, राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेन्द्र, जीतेन्द्र, अमिताभ असताना विनोद मेहरा यांना जादा सिनेमे मिळाले नाहीत. त्यांनी दक्षिण भारतीय फिल्म डायरेक्टर्स कृष्णन्‌ पंजू , आर.कृष्णमूर्ति, एस. रामानाथन्‌ तथा दसारी नारायण राव बरोबर काम केले. विनोद मेहरा व रेखा याची जवळीक व रोमांस याची चर्चा बॉलीवुड खूप दिवस चालू होती. त्यांनी लग्न केल्याची चर्चा होती. खर खोटे काय ते विनोद व रेखा यांनाच माहीत.... तसे यांनी विनोद मेहरा तीन लग्ने केली होती. मीना ब्रोका पहली पत्नी, बिंदिया गोस्वामी दुसरी, तिसरी किरण. विनोद मेहरा यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    विनोद मेहरा यांचे काही चित्रपट
    लाल पत्थर (१९७२), अनुराग (१९७२), सबसे बड़ा रुपैया (१९७६), नागिन (१९७६), अनुरोध (१९७७), साजन बिना सुहागन (१९७८), घर (१९७८), दादा (१९७९), कर्तव्य (१९७९), अमर दीप (१९७९), जानी दुश्र्मन (१९७९), बिन फेरे हम तेरे (१९७९), द बर्निंग ट्रेन (१९८०), टक्कर (१९८०), ज्योति बने ज्वाला (१९८०), प्यारा दुश्र्मन (१९८०), ज्वालामुखी (१९८०), साजन की सहेली (१९८१), बेमिसाल (१९८२), स्वीकार किया मैंने (१९८३) लॉकेट (१९८६) प्यार की जीत (१९८७)

  • माजी केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

    २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यांनी केंद्रात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षासाठी कार्यरत आहेत.

  • मराठमोळी मॉडेल सुपर उज्वला राऊत

    रेम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय मॉडेल होती. उज्वला राऊतने मिलिंद सोमण बरोबर किंगफिशर कैलेंडर हंट स्पर्धेत जज म्हणून काम केले होते. उज्ज्वला राऊतने Elle, Time and Official अशा मासिकाच्या साठी कव्हर गर्ल काम म्हणून काम केले आहे. उज्ज्वला राऊत पहिली भारतीय मॉडेल आहे के जिने फेमस लॉन्जरी व अमेरिकन डिझायनर विक्टोरिया सीक्रेटच्या साठी रॅम्प वॉक केले आहे.

  • मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार गणपती वासुदेव बेहेरे

    गणपती वासुदेव बेहेरे उर्फ ग.वा. बेहेरे हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक आणि संपादक होते. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९२२ रोजी झाला.

    त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. ग.वा. बेहेरे यांचे वडील रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत.

    त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले.

    शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती.

    ग.वा.बेहेरे यांचे ३० मार्च १९८९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए.

    जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. त्यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात.

    निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्यार नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते. जी.ए. कुलकर्णी यांच्या निळासावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळले होते.

    जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.

    त्यांची ग्रंथसपदा: निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया, रक्तचंदन इत्यादी कथासंग्रह.

    जी. ए. कुलकर्णी यांचे ११ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • विनोदी अभिनेता जॉनी वॉकर

    जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.

  • पार्श्वगायक मुकेश

    मुकेश यांनी खऱ्या अर्थाने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५ पासून ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून.

  • ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड

    आपल्या वाद्यांच्या परीसस्पर्शाने गाण्याचं सोनं करणारे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड यांच्या कलाकर्तृत्वाला दिलेला उजळा.

  • जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर माता हारी

    जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर माता हारी यांचा जन्म ७ ऑगस्ट १८७६ रोजीनेदरलँडमधील लियुवर्डेन या छोट्या गावी झाला.

    गुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते. म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून सोडलं होतं. या स्त्री हेरांमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाच घेतलं जातं असेल तर माता हारी हीचं!

    जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!

    माता हारी हे त्यांच टोपण नाव. एका डच कुटुंबात या असिम सौदर्यवतीचा जन्म झाला. त्यांच खरं नाव होतं गेरत्रुद मार्गरेट जेले. पुढे काही काळ त्यांनी पॅरीस मध्ये व्यतीत केला. त्यांचे सौदर्य आणि अद्कारी लाजवाब होती. त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या आणि याच गोष्टीच्या आधारे त्यांनी भल्या भल्या गुप्त मोहिमा लीलया पार पाडल्या होत्या. माता हारी यांना भारतीय नृत्यकले बद्दल खास आकर्षण होतं. त्यांनी भारतीय नृत्यकला आत्मसात केली आणि त्यात त्या पारंगत देखील झाल्या.

    आपल्या नृत्यादरम्यान त्या अनेक मादक हालचाली करून समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायच्या. ज्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्तींना त्यांच्याबद्दल आकर्षण होते. “माता हरी” या जर्मन सेनेकडून काम करायच्या. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात आपल्या मादक नृत्याने शत्रूसेनेतील अनेक ऑफिसर्सना भुलवून, त्यांच्याशी जवळीक निर्माण करून अत्यंत गौप्यनीय माहित गोळा करण्याचे काम माता हरी यांनी केले. प्रसंगी शरीरीसंबंध ठेवून त्यांना वश करायच्या आणि गुप्त माहित्या काढून घ्यायच्या आणि जर्मन सेनेला पुरवायच्या. माता हारी यांचे पती नेदरलँड्सच्या सैन्यामध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची इंडोनेशिया मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या समवेत माता हारी देखील इंडोनेशिया मध्ये आल्या, तेथे येऊन त्यांनी एक डान्स ग्रुप स्थापन केला. याच दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चे माता हारी असे टोपण नामकरण केले.

    माता हारीचा मलय अर्थात इंडोनेशियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य! नवऱ्यासोबतच्या रोजच्या भाडंणाला वैतागून त्यांनी घटस्फोट घेतला आणि आपले बस्तान पॅरीस मध्ये हलवले.

    पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमध्ये प्रवास केला होता. याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले. फ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तहेर संस्थांना शंका होती की माता हारी या जर्मनीला गुप्त माहित्य पुरवतात या आरोपाबद्दलचे त्यांच्याजवळ ठोस पुरावे देखील नव्हतें, तरी माता हारी यांच्यावर डबल एजंटचा आरोप लावण्यात आला. याच आरोपाच्या आधारावर फ्रान्समध्ये १५ ऑक्टोबर १९१७ रोजी माता हारी यांना अखेर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट