(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत

    ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे.

  • सिनेपत्रकार सतीश जकातदार

    सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत असत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत.

  • द्वारकानाथ कोटणीस

    डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते. वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते.

    डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात.

    १९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दुसर्याय महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले. कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला. चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला. डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे.
    देवदूत' ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत डॉ. कोटणीस यांनी अनंत हालअपेष्टा सोसून तेथील रुग्णांसाठी जे अथक परिश्रम केले, ती कहाणी तशी सर्वश्रुत आहे. या कादंबरीत बरेच तपशील वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे डॉ. कोटणीस यांच्या बालपणापासूनचे स्वभावाचे पैलूही कळतात. लेखकाने परिश्रमपूर्वक आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. कॅंटन, चांगशा, हॅंको, वूहान असा या वैद्यकीय पथकाचा खडतर प्रवास. अपुर्याण साधनांनिशी, युद्धाच्या छायेत रुग्णांवर उपचार, ठिकठिकाणी स्वागत, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी हे सारे डोळ्यांपुढे साकार होत जाते. कोमिटांग सरकार आणि कम्युनिस्ट यांच्यातील दुराव्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींचेही चित्रणही येथे येते. औषधाच्या अॅम्प्यूलमध्ये डिस्टिल वॉटर भरण्याचा काळाबाजारही होत होता. भारतीय डॉक्टर आठव्या पलटणीत काम करत होते. ती कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली होती. पुढे माओ, चौ एन लाय यांच्याशी डॉक्टरांच्या गाठीभेटी झाल्या. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. सामान्य चिनी जनता मोठया जिद्दीने, जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढयात उतरलेली पाहून डॉक्टरांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी आपल्या या निरीक्षणांचा, अनुभवाचा कसा फायदा करून देता येईल, असे विचार येत. ते तेथील नेत्यांशी चर्चा करीत. दुर्दैवाने डॉक्टरांचा चीनमध्येच मृत्यू झाला.

    ४ नोव्हेंबर १९३९ ला डॉ. कोटणीस, डॉ. अतल, डॉ. बसू हे येनानकडून सिआन मार्गे च्यू तेह यांच्या आठव्या पलटणीच्या सरसेनापतींच्या प्रमुख ठाण्याकडे निघाले. ते २१ डिसेंबर १९३९ ला मुक्कामाला पोचले. वाटेत बर्फाच्छादित डोंगर, अवघड वळणे या प्रवासाचे वर्णन वाचण्यासारखे आहे. किती प्रतिकूल परिस्थितीत, मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय डॉक्टर रुग्णसेवा करीत होते, ते वाचून मन थक्क होते. नवखा देश, नवखी माणसे, हवामान प्रतिकूल, मृत्यूची सदैव छाया, सुरवातीला भाषेची अडचण या सगळ्या परिस्थितीत गनिमी काव्याने जखमी सैनिकांवर उपचार करणे, शस्त्रक्रया करणे हे केवढे मोठे आव्हान होते! डॉ. कोटणीस दुसरे बेथ्यून झाले. त्यांना काळी ई हा प्रेमाचा किताब मिळाला. को चिंग लान ही ध्येयवादी, प्रेमळ, समविचारी पत्नी मिळाली. पण तिला छोटया इंग व्हा या आपल्या मुलाला सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला. डॉ. कोटणीस यांचा ध्येयवेडा, शिस्तप्रिय पण प्रेमळ स्वभाव, समर्पण वृत्ती विविध प्रसंगांतून मनावर ठसते. हे यश लेखकाचे आहे. पुस्तकात छान छायाचित्रेही आहेत. त्यातून हा इतिहास मनात जागा होण्यास मदत होते. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. मा.डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अमूल गर्ल चे निर्माते युस्टस फर्नाडिस

    एएसपी’ या जाहिरात कंपनीचे कार्यकारी संचालक सिल्वेस्टर दाकुन्हा यांनी १९६६ साली अमूल बटरच्या जाहिरातीची जबाबदारी घेतली. १९४५ सालीच अमूल बटरची एक जाहिरात तयार करण्यात आली होती पण लोकांना ती आवडली नव्हती. दाकुन्हा यांनी आयकॉन बदलण्याचे ठरविले. भारतीय ग्राहकांना आपला वाटेल असा चेहरा जाहिरातीद्वारे या दोघांना लोकांसमोर आणायचा होता. हे आपलेपण एका लहान मुलीशिवाय दुसरे कोण निर्माण करु शकणार? यावर दोघांचे एकमत झाले व या मुलीचा जन्म झाला.

  • संगीतकार वसंत प्रभू

    आज १३ ऑक्टोबर
    आज संगीतकार वसंत प्रभू यांची पुण्यतिथी.
    जन्म:- १९ जानेवारी १९२४

    मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.

    वसंत प्रभू यांचे खरे नाव व्यकंटेश प्रभू. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला "वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी "एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही "शब्द‘-"स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी "सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे "गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
    जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा‘
    मा.आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं "गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी "गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
    ‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा मा.अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. मा.वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत.

    मा.वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मा.मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
    मा.वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.वसंत प्रभू यांना आदरांजली.

    १३ ऑक्टोबर १९६८
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.मा.मधु पोतदार
    मा.वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
    चाफा बोलेना
    चंद्र तोच अन्‌ तेच तारे
    चंपक-गोरा कर कोमल
    चांद मोहरे चांदणे
    जन पळभर म्हणतिल
    जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
    जय देवी मंगळागौरी
    जिथे सागरा धरणी मिळते
    जीर्ण पाचोळा पडे तो
    तुझे डोळे पाण्याने भरले
    तूच कर्ता आणि करविता
    तें दूध तुझ्या त्या
    दिनरात तुला मी किती

  • सुप्रसिद्ध कवी अनिल

    कवि अनिल यांनी १९३० च्या सुमारास काव्यलेखनास सुरवात केली. त्या काळात जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या रवीकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा त्यांची कविता वेगळी असल्यामुळे लोकांना ती आवडली. त्यांची सुरवातीची कविता ऋजू , भावपूर्ण , सौम्य शब्दाच्या कलेची होती. ‘फुलवात’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर तीन वर्षाने आलेल्या ‘ प्रेम ‘ आणि ‘ जीवन ‘ या संग्रहात त्यांनी मुक्तछंदात दीर्घ कविता लिहिली त्यामुळे कवि अनिल मराठी मुक्तछंदात्मक कवितांचे प्रणेते समजले जातात. त्यानंतर त्यांनी कला आणि संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर भाष्य करणारे ‘ भग्नमूर्ती ‘ हे खंडकाव्य लिहिले .

  • कामगार वर्गाचे अभ्यासक डॉ. अजित सावंत

    राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला.

  • दिग्गज कसोटीपटू, यशस्वी कर्णधार अजित वाडेकर

    अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपले करिअर निवडले व यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.

  • भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते सलिल अंकोला

    सलील अंकोला यांनी एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर ते अभिनयाकडे वळले.आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं होतं. दुर्दैव असं की अंकोला यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला.

  • नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे

    डॉ.वि.भा.देशपांडे यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी झाला. नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. डॉ. वि. भा. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात वावरत होते. डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. त्यांची २०१५ सालापर्यंत ५१ पुस्तके प्रकाशित झाली होती. डॉ.वि.भांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे.

    ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ‘,‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणाऱ्या विभांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेल्या अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिले 'नाट्यभ्रमणगाथा'. नाटके पाहण्यासाठी, नाटकांशी संबंधित माणसांना भेटण्यासाठी अनेक प्रांतांमध्ये त्यांनी भ्रमंती केली, त्याचीच ही भ्रमणगाथा. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्सना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी आहेत. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी ओघवत्या शैलीत लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यातून उलगडले आहेत. डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्नाीकर मतकरी यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. याआधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. वि.भा.देशपांडे यांचे ९ मार्च २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    वि.भा.देशपांडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान
    आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा, कालचक्र : एक अभ्यास, नटसम्राट : एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यभ्रमणगाथा, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती), नाट्यव्यक्तिरेखाटन, पौराणिक-ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख), निवडक नाट्य मनोगते,मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड), माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक,

    वि.भा.देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार/सन्मान
    उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार, जयवंतराव टिळक गौरव पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, माधव मनोहर पुरस्कार, रंगत-संगत सन्मान,राजा मंत्री पुरस्कार, वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार, वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार, इंदिरा-भालचंद्र पुरस्कार.