बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला
देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.
देवेन वर्मा यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.
त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते.
देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचा जन्म २४ जानेवारी १९२७ रोजी सियालकोट पंजाब येथे झाला.
१९७४ मध्ये ‘आप की कसम’ हा जे ओमप्रकाश यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. आखिर क्यूँ आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे. अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्याआधी निर्माते अशी त्यांनी ओळख होती.
१९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला. आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन,, गेट वे ऑफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. जे ओमप्रकाश हे राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा.
हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांचे ते वडील होते. जे ओमप्रकाश यांचे ७ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=nNd7MznqvkU
https://www.youtube.com/watch?v=L4w4T6FuQ-Q
https://www.youtube.com/watch?v=nNd7MznqvkU&t=23s
तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मैसूर मध्ये झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल वल्ली असे त्यांचे खरे नाव.
मात्र, त्यांची आई प्रेमाने त्यांना 'अम्मो' या नावाने हाक मारत. वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला.
काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती. पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.
एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते. जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=2yN-YJHQvq8
शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी राजकारणात मिळविलेले यश हे महत्त्वाचे मानले जाते. रस्त्यावर पोस्टर चिकटविणारा कार्यकर्ता ते उपराष्ट्रपती हा त्यांचा प्रवास खडतर होता. एक सालस व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१८ मध्ये व्यंकया नायडू यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली.
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चि.वि.जोशी. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून १९११ मध्ये बी. ए. आणि १९१६ मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. १९२० सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. १९२८ पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. मा.चि.वि.जोशी यांचे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. सहा फूट सहा इंच उंची असलेले टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन येथे झाला होता. टोनी ग्रेग यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. परंतु, वडील स्कॉटलंडचे असल्यामुळे टोनी ग्रेग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ग्रेग यांनी अष्टपैलू कामगिरी करताना ५८ कसोटींत ४०.४३ सरासरीने ३ हजार ५९९ धावा केल्या. तसेच मध्यमगती आणि ऑफब्रेक मारा करत १४१ विकेट्स टिपल्या. मात्र २२ वनडेच त्यांच्या वाटय़ाला आल्या. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने १९७६-७७ मध्ये भारताचा दौरा केला. त्यावेळी पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन कसोटी मोठ्या फरकाने इंग्लंडला जिंकून देण्यात ग्रेग यांचे मोलाचे योगदान राहिले. कर्णधार म्हणून भारताचा यशस्वी दौरा रहिला.
सर्वोत्तम कामगिरी करूनही वर्ल्ड सिरिज क्रिकेटमुळे टोनी यांची इंग्लंडसाठीची कारकीर्द केवळ पाच वर्षाची राहिली.
वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी ग्रेग यांनी अनेक आघाडीच्या आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटूंनाही वळवून घेतले. यामुळे संबंधित क्रिकेट बोर्डाच्या टीकेचे ते लक्ष्य बनले. वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळल्याने टोनी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपुष्टात आली. वर्ल्ड सिरिज बंद झाल्यानंतर ग्रेग ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द संपविल्यानंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली.
समालोचक म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. क्रिकेटचा चांगला अनुभव तसेच रोखठोक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘चॅनेल नाइन’मधून तब्बल ३३ वर्षे क्रिकेट समालोचन केले. खेळादरम्यान काही मजेशीर प्रसंग घडला की, ग्रेग यांच्या खोचक समालोचनाने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध व्हायचे. मैदानावरील अंपायर्सच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या (डीआरएस) प्रणालीला विरोध केल्यानंतर ग्रेग यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. टोनी ग्रेग यांचे निधन २९ डिसेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पथेर पांचाली,अपराजितो,अपूर संसार,(‘अपू चित्रपटत्रयी’), अभिजन, चारुलता, शतरंज के खिलाडी आणि असे अनेक दर्जेदार चित्रपट देणारे सत्यजित रे. त्यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे झाला. सत्यजित रे यांना प्रेमाने "माणिकदा‘ असे ही म्हटले जाई. नावाप्रमाणे ते भारतीय सिनेमातील एक "माणिक‘ होते. अमूल्य रत्न होते. सत्यजित रे यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, कलेच्या ओढीमुळे १९४० साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतन मध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार-कलातज्ञाचे तेथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. तेथून बाहेर पडल्यावर १९४३च्या सुरुवातीला ‘डी. जे. केमर अँड कंपनी’ या ब्रिटिश जाहिरातसंस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजविण्यात त्यांचा हातखंडा होता. नोकरीत असतानाच त्यांची चित्रपटाची रुची आणि व्यासंग वाढत गेला. रे त्यावेळी अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेख लिहीत असत. १९४७ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ सुरू केली. १९५० मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरिता इंग्लंकडला पाठविण्यात आले. तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. मात्र त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली, ती मुख्यत्वे डी सिका या दिग्दर्शकाच्या द बाय्सिकल थीफ या चित्रपटामुळे. १९५० मध्ये भारतात परतल्यावर त्यावेळी येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झां रन्वार यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. तत्पूर्वी बिभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेने त्यांच्या मनात घर केले होतेच. त्याच कथेवर चित्रपट काढावा असे त्यांना इतक्या तीव्रतेने वाटू लागले, की बोटीतून हिंदुस्थानात परत येत असतानाच त्यांनी त्यावर चित्रपटकथा लिहायला सुरुवात केली होती. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रणकाळ अगोदरच लांबत गेला होता आणि पैशाचे सर्व प्रवाह आटले होते.
योगायोगाने पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल, असे घोषित केले. त्यामुळेच ३-४ वर्षे रखडलेला चित्रपट १९५५ साली एकदाचा पुरा झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरविणार होती. संस्थेच्या रे यांना परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पहिलाही होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखविण्याबद्दल मागणी आली. अशी अमोल संधी दवडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यानंतर सु. दोन महिन्यांनी चित्रपट भारतात, म्हणजे कलकत्त्यात दाखविण्यात आला. पथेर पांचालीच्या न्यूयॉर्कच्या प्रदर्शनामुळे अनेक दूरगामी फायदे झाले. तज्ञांना तो चित्रपट इतका आवडला, की तेथील एक प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी १९५६ च्या कॅन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखविण्याची व्यवस्था केली. पथेर पांचाली मधील वास्तवता व कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि ‘मानवतेचा अत्युत्कृष्ट आलेख’ अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली. कॅनखेरीज अनेक देशांत पथेर पांचालीला पारितोषिके मिळाली आणि सत्यजित रे यांना या पहिल्याच चित्रपटाने दिगंत कीर्ती मिळवून दिली. पथेर पांचाली या कथामालिकेत पुढे त्यांनी अपराजितो (१९५६) व अपूर संसार (१९५९) हे आणखी दोन सलग चित्रपट निर्माण केले. ही ‘अपू चित्रपटत्रयी’ विशेष मान्यता पावली. त्यांची पटकथा पुस्तकरूपात उपलब्ध आहे (द अपू ट्रिलॉजी, इं. भा. शंपा बॅनर्जी, १९८५). दरम्यान रे यांनी परश पथर (१९५७) आणि जलसाघर (१९५९) हे दोन चित्रपट तयार केले. त्यांचा देवी हा चित्रपट (१९६०) बंगालच्या सरंजामदारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर होता. या पहिल्या सहा चित्रपटांना पं. रवि शंकर, विलायतखाँ, अली अकबर खाँ असे नामवंत संगीत दिग्दर्शक लाभले होते. नंतरच्या सर्व चित्रपटांना मात्र स्वतःच उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनी संगीत दिले आहे. १९५५ ते १९८५ या तीन दशकांत रे यांनी पंचवीस चित्रपट व काही अनुबोधपट निर्माण केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक अनुबोधपट त्यांनी १९६१ मध्ये तयार केला.
शिवाय टागोरांच्या कथेवरील तीन कन्या हा चित्रपटही त्याच वर्षी निर्माण केला. त्यानंतर कांचनजंगा व अभिजान (१९६२), महानगर (१९६३), टागोरांच्या कथेवरील चारुलता (१९६४), कापुरुष ओ महापुरुष (१९६५) आणि नायक (१९६६) इ. उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. चिडियाखाना (१९६७) व गोपी ग्याने बाघा ब्याने (१९६८) हे त्यांनी खास मुलांसाठी तयार केलेले चित्रपट होत. अरण्येर दिन रात्री व प्रतिद्वंदी (१९७०), सीमाबद्ध (१९७१) आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील, १९४३ च्या मानवनिर्मित दुष्काळाचे चित्रण करणारा अशनी संकेत (१९७३) हे त्यांचे नंतरचे चित्रपट. सोनार केल्ला हा आणखी एक बाल-चित्रपट त्यांनी १९७४ साली काढला. १९७५ ते १९८५ या दशकातील रे यांचे चित्रपट म्हणजे जनअरण्य (१९७५), शतरंज के खिलाडी (१९७७), स्वतःच लिहिलेल्या गुप्तहेर कथेवर आधारित जय बाबा फेलुनाथ (१९७८), हीरक राजर देशे (१९८०) आणि अनेक वर्षे मनात घोळत असलेल्या टागोर कथेवरील घरे बैरे (१९८४). मा.सत्यजित रे हे चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत होत. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रांत त्यांनी विपुल निर्मिती केली. चित्रपटाप्रमाणेच साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्याने संदेश या नियतकालिकाचे पुनरुज्जीकवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला आहे. तसेच त्यांनी स्वतःही विपुल कथावाङ्मय निर्माण केले आहे. त्यांचे अवर फिल्म्स देअर फिल्म्स (१९७६) हे पुस्तकही चित्रपटसमीक्षेत मोलाची भर घालणारे आहे. चित्रपटक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या विविध कला-संस्कारांचे संमिश्र प्रतिबिंब त्यांच्या चित्रणशैलीवर पडणे स्वाभाविक होते.
पडद्यावरील आकृतिबंधाची रचना, प्रमाणबद्धता, दृश्यप्रकार, चित्रणकोन, अवकाशीय खोली, रंगसंगती, त्याचबरोबर बाह्य प्रतिमा व संगीत, कॅमेऱ्याची आशयानुरूप हालचाल, त्याद्वारे साधली जाणारी पोषक लय व तीच लय दृढ करणारे संकलन, नैसर्गिक ध्वनींचा केलेला मार्मिक उपयोग असे घटक रेंच्या चित्रपटात क्षणोक्षणी दृग्गोचर होतात. त्यासाठी त्यांचे चित्रपट एकदा पाहून पूर्णपणे आस्वादले जाऊ शकत नाहीत. कारण चित्रपट वेगाने पुढेपुढे सरकतो. प्रथम पहात असताना त्यांच्या इतर बारकाव्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. विशेषतः पथेर पांचाली या त्यांच्या पहिल्या कलाकृतीत साधी साधी दृश्ये केवळ रचनात्मकतेमुळे दृष्टीला सुखावणारी वाटतात. रे यांचे मोठेपण केवळ दर्जेदार कथावस्तू पडद्यावर पेश करण्यात नसून, ते भारतीय कथाशय चित्रपट-माध्यमाच्या सर्व घटकांच्या योग्य, कलात्मक संयोगातून प्रेक्षकाप्रत पोचविण्याच्या त्यांच्या प्रभावी शैलीतून सिद्ध झाले आहे. रे यांनी १९५९ पासून आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचे ज्यूरी म्हणून अनेक देशांत काम केले होते. त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते, रामॉन मागसायसाय पारितोषिक, ‘ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्’तर्फे गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मा.सत्यजित रे यांना मिळाला होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सत्यजित रे यांचा गौरव केला होता. फ्रान्स राष्ट्रातर्फे ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च बहुमानाचा किताब रे यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मीत्तरां यांच्या हस्ते कलकत्ता येथे देण्यात आला. अनेक देशांतील चित्रपटविषयक पारितोषिके आणि मानसन्मान सातत्याने तीस वर्षे मिळविणारा सत्यजित रे यांच्यासारखा भारतीय कलावंत तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. आगंतुक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.या अवलियाच्या कामाचा गौरव १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कार पुरस्कार देऊन करण्यात आला. सत्यजीत रे हे ऑस्कार मिळवणारे एकमेव भारतीय दिग्दर्शक होते. सत्यजित रे यांचे यांचे २३ एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी संगीताच्या इतिहासात वसंत या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९२४ रोजी झाला. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. त्यातील एक संगीतकार वसंत प्रभू.
वसंत प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले.मा.वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. मूळ गाव पाणे मंगरूळ, वडीलांचा हॉटेल व्यवसाय, बालवयापासूनच मेळ्यात गाणं-नृत्य-अभिनय करून ह्यांत रसिकमान्य झालेला “वसंत प्रभू‘ नावाचा तरुणही संगीतात काहीतरी करण्यासाठी धडपडत होता. त्याच वेळी “एचएमव्ही‘चे वसंतराव कामेरकर ह्यांनी प्रभू ह्यांची योग्यता ओळखून त्यांना एचएमव्हीत संगीतदिग्दर्शक म्हणून नोकरी दिली होती. दामूअण्णा माळी म्हणून प्रभू ह्यांचे एक मित्र होते. दामूअण्णा आणि पी. सावळाराम ह्यांचीही मैत्री होती. दामूअण्णांनी सावळाराम ह्यांची प्रभू ह्यांच्याशी ओळख करून दिली. ही “शब्द‘-“स्वरा‘ची भेट म्हणजे रसिकांसाठी “सुवर्णयोग‘च ठरला. कारण, भावगीत विश्वा्त सावळाराम-प्रभू ह्या द्वयीनं सोन्यासारखी एकाहून एक गाणी दिली. माणूस जसा नशीब घेऊन जन्माला येतो, तशीच गाणीसुद्धा नशीब घेऊनच जन्माला येतात! ह्या द्वयीची अशी अनेक गाणी नशीबवान ठरली. त्यातल्या एका गाण्याचं नशीब जास्तच जोरावर होतं. ते प्रचंड गाजलं. वर्षानुवर्षं वाजत राहिलं. अनेक वेळा ऐकूनही ताजंतवानंच राहिलं. प्रत्येक पिढीला आवडणारं ते गाणं आहे “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?
जा, मुली जा, दिल्याघरी तू सुखी रहा...
आचार्य अत्रे ह्यांनी ह्या गीताचं कौतुक करताना म्हटलं होतं “गंगा-जमुना‘ हे गाणं एका पारड्यात व इतर सगळी गाणी दुसऱ्या पारड्यात घातली तरी “गंगा-जमुना‘चं पारडं जड होईल!‘‘
‘सखी शेजारीणी’ हे गाणे गाण्यासाठी वसंत प्रभू यांनी अरुण दातेच पाहिजेत अशी खास फर्माईश केली होती. तेव्हा अरुण दाते हे प्रसिद्धीस आले नव्हते. वसंत प्रभू यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. संगीतकार वसंत प्रभू, जनकवी पी. सावळाराम आणि लता मंगेशकर या त्रयीने मराठी भावसंगीताची मुहूर्तमेढ रोवली. या त्रयीची अजरामर गीते अजूनही आपल्या ओठी आहेत. वसंत प्रभू यांचे चरित्र मानसीचा चित्रकार तो या नावाने मधु पोतदार यांनी लिहिले आहे.
वसंत प्रभू यांचे १३ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधु पोतदार
वसंत प्रभू संगीत दिलेली काही गाणी
चाफा बोलेना
चंद्र तोच अन् तेच तारे
चंपक-गोरा कर कोमल
चांद मोहरे चांदणे
जन पळभर म्हणतिल
जन्मोजन्मीं तुम्हीच यावे
जय देवी मंगळागौरी
जिथे सागरा धरणी मिळते
जीर्ण पाचोळा पडे तो
तुझे डोळे पाण्याने भरले
तूच कर्ता आणि करविता
तें दूध तुझ्या त्या
दिनरात तुला मी किती
एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असणार्या् दिलीप कुलकर्णी यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधुन चरित्रात्मक भुमिका साकारल्या होत्या. मा.सुरेश खरे यांच्या “एका घरात होती” या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. “बखर एका राजाची”, “अफलातून”, “घरोघरी” ही नाटके व “चौकट राजा”, “आक्रित”, “रात्र आरंभ” या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘ओली’ या नाटकात त्यांनी शरीरभाषेचा केलेला वापर हा अभिनेता म्हणून एक आदर्श वस्तुपाठ होता. संवेदनशील मनाच्या मा.दिलीप कुलकर्णी यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे,याचा सतत ध्यास असे.”आपलं बुवा असं आहे!” ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात अप्रतिम भूमिका ठरली होती.
दिलीप कुलकर्णी यांचे २२ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
“स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti