(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार

    प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार

    प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार कार्तिक कुमार हे पं. रविशंकर यांचे शिष्य, व मैहर घराण्याचे वादक.

  • अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख

    भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे स्पेशल फायनान्सियल अँबेसेडर म्हणून अमेरिकेला पाठवले. पुढे त्यांना स्वतंत्र भारताचे तिसरे वित्तमंत्री म्ह्णून पद मिळाले ते त्यांनी जुलै १९५६ पर्यंत सांभाळले. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.

  • संगीतकार, गायक तलत अझीझ

    ‘उमराव जान’मधली ‘जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें’ किंवा ‘बाजार’मधले ‘फिर छिडी रात, बात फुलों की’ किंवा ‘डॅडी’मधले अनुपम खेरवर चित्रित झालेले ‘आईना, मुझसे मेरी पहली सी सुरत दे दे’ ही त्यांची गाणी हीट झाली..

  • सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर

    दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.

  • चित्रपट अभिनेत्री डिंपल कापडिया

    राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुल प्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. त्यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी झाला. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, ऋषीकपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता."बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरूण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.

    १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या "सागर" मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली. "सागर" चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश", "द्रिष्टी", "लेकिन" आणि "रुदाली" या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला चित्रपटात महत्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है","प्यार मे ट्विस्ट, "फिर कभी", "तुम मिलो तो सही", "बिईँग सायरस","लक बाय चान्स","दबंग", "पटियाला हाऊस" आणि "कॉकटेल" मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट

    स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८
    भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.

    मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वीहे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्याहमुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.

    या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.

    त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
    आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.
    मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना "बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!" अशी जबरदस्त आहे...
    हि एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरूषाच्या नावाने आहे...
    मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छ.शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल.

    १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.या प्रांतात उंच अशा डोंगररांगा आहेत.या डोंगररांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक".हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये एक 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते, त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून देऊ. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांनी ही परवानगी दिली.

    नंतर आपल्या लोकांनी 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' म्हणत एका रात्रीत किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ हार्मोनियमवादक पं. डॉ. विद्याधर ओक

    डॉ. विद्याधर ओक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांचा जन्म १५ जून १९५२ रोजी झाला. डॉक्टर, शास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, लेखक, संगीत संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ असं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. डॉ. विद्याधर ओक हे कलाक्षेत्राला ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकाॅलॉजिस्ट म्हणून माहीत आहेत.

    कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ज्ञ म्हणून चाळीसहून अधिक वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध विषयांवर संशोधन आणि लेखन ते करत असतात. घरी संगीताची उत्तम परंपरा असल्याने बालवयातच त्यांनी आईकडून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. ज्येष्ठ हार्मोनियमवादक गोविंदराव पटवर्धन यांचं शिष्यत्व घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ डॉ. ओक हार्मोनियम वादनात रममाण आहेत. बॅडमिंटनच्या अनेक आंतरशालेय ज्युनियर चॅम्पियनशिप त्यांनी जिंकल्या आहेत.

    १९६९-७० दरम्यान रुईया कॉलेजमधून विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर जी.एस. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक चषकांवर त्यांच्या नावाची मोहोर आहे. बुद्धिबळामध्येही ते प्रवीण आहेत. डॉ. विद्याधर ओक आणि ‘२२ श्रुतींची हार्मोनियम’ हे समीकरण रसिकांच्या मनात घट्ट रुजलेलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनासाठी विविध ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलं आहे. २२ श्रुतींच्या विश्लेषणाबरोबरच सतार, सरोद, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, एकतारी, तंबोरा या वाद्यांवर २२ श्रुतींच्या अचूक जागा कुठे वाजतील याचं तारेचं ‘पर्सेंटेज प्रमाण’ डॉ. ओक यांनी त्यांच्या संशोधनात दिलेलं आहे. ज्येष्ठ मोहनवीणा वादक विश्वमोहन भट्ट यांनी ‘या संशोधनासाठी तुला नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे’, असे गौरवोद्गार काढले होते.

    डॉ. विद्याधर ओक यांच्या संगीत, औषधशास्त्र, संशोधन, लेखन आणि ज्योतिष या क्षेत्रांतल्या योगदानासाठी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा केशवराव भोसले पुरस्कार, उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे ‘पु. ल. देशपांडे पुरस्कार’, ठाणे महानगरपालिकेचा ‘ठाणे भूषण पुरस्कार’, सावरकर न्यासतर्फे ‘विनायक दामोदर सावरकर पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक) ज्ञानोबा माझा (म. टा. सन्मान) यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

    ‘मित्र जिवाचा’, ‘मनोरंजक स्वभावशास्त्र’, गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवनचित्रावर प्रकाश टाकणारं ‘गोविंद गुणदर्शन’, २२ श्रुती, श्रुती गीता, ‘ताजमहाल’ हे संगीत नाटक, ‘श्रुतीविज्ञान व रागसौंदर्य’ आणि नुकतंच प्रकाशित झालेलं ‘पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य’ या पुस्तकांचं लेखन डॉ. विद्याधर ओक यांनी केलय. सध्याचे आघाडीचे हामोर्निअम वादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक हे डॉ. विद्याधर ओक यांचे चिरंजीव. आदित्य ओक यांचा जादूची पेटी हा कार्यक्रम सध्या खूप गाजत आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका वंदना मिश्र (पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर)

    ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी…मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर. मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व.

  • डॉ. दीपक अमरापूरकर – सामान्यांचा “असामान्य डॉक्टर”

    डॉ. दीपक अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे यकृताचे तज्ज्ञ डॉक्टर..! बॉम्बे हॉस्पिटलची शान, अचूक निदान करणारा, अतिशय बुद्धिमान डॉक्टर..! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्‍याच्या मदतीला कायम तयार असायचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.

  • अनेक नाट्य कंपनीचे सूत्रधार व नाट्यनिर्माता गोट्या सावंत

    नेपथ्य, कपडेपट, प्रकाशयोजना, संगीत, लेखन, अभिनय, नाट्य कंपनीचे सूत्रधार ते नाट्यनिर्माता या साऱ्या आघाड्यांवर गोट्या सावंत यांनी काम केलं आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकापासून सावंत यांनी सूत्रधाराची भूमिका वठवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडे रंगनिल, तृप्ती, जगदंबा, स्वरा मंच, सिने मंत्र, त्रिकुट, जॉय कलामंच, विन्सन अशा काही निर्मिती संस्थाच्या साठी काम केले आहे.