(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय

    मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय यांचा जन्म २ मार्च १९२४ रोजी झाला.

    गुलशन राय यांचे नाव बॉलीवूडमध्ये एक चित्रपट निर्माते म्हणून स्मरणात ठेवले जाते ज्यांनी त्यांनी निर्मिती केलेल्या मल्टीस्टारर चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली. गुलशन राय यांनी वितरक म्हणून करिअरची सुरुवात केली. गुलशन राय यांनी त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स बॅनर खाली १९७० मध्ये आलेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातून निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

    'जॉनी मेरा नाम' मध्ये देवानंद, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ, आय एस जोहर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७३ मध्ये गुलशन राय यांनी पुन्हा एकदा देवानंद आणि हेमा मालिनी यांच्या जोडीने जोशिलाची निर्मिती केली. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट तिकीट खिडकीवर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही.

    १९७५ साली प्रदर्शित झालेला 'दीवार' हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो.
    यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' या चित्रपटातून दोन्ही भावांमधील द्वैत उत्तम प्रकारे मांडण्यात आले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला, त्याचप्रमाणे निरुपा रॉयलाही आईच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्धी मिळाली.

    १९७७ मध्ये गुलशन राय यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना घेऊन 'ड्रीमगर्ल'ची निर्मिती केली होती. 'ड्रीमगर्ल'ही तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'त्रिशूल' चित्रपटाद्वारे गुलशन राय यांनी अनेक मल्टीस्टारना एकत्र आणले. या चित्रपटात संजीव कुमार, वहिदा रहमान, अमिताभ बच्चन, शशी कपूर, हेमा मालिनी, राखी, पूनम ढिल्लन, सचिन, प्रेम चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

    यश चोप्रा दिग्दर्शित 'त्रिशूल'मध्ये गुलशन राय यांनी पिता-पुत्रांमधील संघर्ष रुपेरी पडद्यावर आणला. 'त्रिशूल' तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९८२ साली प्रदर्शित झालेला 'विधाता' हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांमध्ये गणला जातो. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाने पुन्हा एकदा सुपरस्टार्सची फौज उभी केली. 'विधाता'मध्ये दिलीप कुमार, संजीव कुमार, शम्मी कपूर, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरी, सुरेश ओबेरॉय आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
    १९८५ मध्ये गुलशन राय यांनी 'युद्ध'ची निर्मिती केली होती. त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचा मुलगा राजीव राय यांच्याकडे सोपवली. 'युद्ध'ला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले.१९८९ मध्ये गुलशन राय यांनी आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट 'त्रिदेव' तयार केला. राजीव राय दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी, अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.

    यानंतर गुलशन राय यांनी मोहरा आणि गुप्ता सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुलशन राय यांचे ११ ऑक्टोबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    pd - April 27, 2024


  • गायिका सावनी शेंडे

    सावनी शेंडेला स्वरांचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचा जन्म १८ ऑगस्ट १९७९ रोजी झाला.आजी कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या रूपाने गाण्याची शाळाच सावनीच्या घरी होती. कुसुम शेंडे या किराणा घराण्याच्या गायिका; तसेच संगीत नाटकाच्या पिढीतील उत्तम कलाकार होत्या.

    वडील डॉ. संजीव शेंडे यांनाही शोभा गुर्टू यांचे मार्गदर्शन लाभले. दादरा, ठुमरी अशा उपशास्त्रीय गायनात त्यांचा हातखंडा आहे. लहानपणी आजीचा आणि वडिलांचा रियाज कानावर पडल्याने हळूहळू तिचा कान गाण्यासाठी तयार होऊ लागला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच प्रेक्षकांसमोर गाण्याची संधी त्यांना मिळाली. लहानपणीच सावनीची क्षमता उमगल्यामुळे तिचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. त्यानंतर बाराव्या वर्षी तिला राष्ट्रपतींसमोर गाण्याची संधी मिळाली.

    सावनीने आजीकडून किराणा घराण्याचे, तर डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, अहमदाबाद, मुंबई, कोलकता, बंगळुरू यांसह देशभरात विविध ठिकाणी तिचे गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. सावनीने "कैरी' या मराठी चित्रपटासाठी पार्श्व गायन केले आहे. "सावली' चित्रपटासाठी सावनी यांना पुरस्कारदेखील मिळाला आहे. पं. जसराज गौरव पुरस्कार, माणिक वर्मा मेमोरिअल पुरस्कार अशा पुरस्कारांच्या सावनी मानकरी आहे.

    "झाले मोकळे आकाश' या मालिकेचे शीर्षकगीत सावनी हिने गायले आहे. त्यासाठी तिला "रापा इंटरनॅशनल पुरस्कार' मिळाला आहे. "हृदय स्वर' हे सावनीचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात तिने स्वतः रचलेल्या काही बंदिशी आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट
    http://www.sawanishende.com/

    pd - August 18, 2017


  • दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम

    जॉन यांनी २०११ मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अजूनही त्यांच्याच नावानं सुरू आहे. सध्याच्या घडीला जगात 50 कोटी ग्राहक जॉन यांच्या अँटी व्हायरसचा वापर करतात.

    pd - June 27, 2022


  • मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब – पद्मा चव्हाण

    आज १२ सप्टेंबर.. लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांची पुण्यतिथी

    त्यांचा जन्म दि. ७ जु्लै १९४८ रोजी झाला...

    पद्मा चव्हाण या मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्‍या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी 'मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब' असे छापलेले असे.

    पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ - विकीपीडीया

    pd - September 12, 2016


  • दिग्दर्शक नितीन देसाई

    लोकसत्ता मधील नितीन देसाई यांच्या वरील लेख.
    ‘‘गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत मनालीला पोचलो. भल्या पहाटे माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. गुलजारजी आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्याखोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ साठलेलं दिसत होतं. पूर्वेस पहाटरंगाची मस्त उधळण होत होती. गुलजारजी म्हणाले, ‘‘नितीन, मुझे ऐसा दृश्य चाहिये।’’ त्यांच्या अपेक्षेनुसार सेट करायचा प्रयत्न मी चित्रनगरीत केला. ते आले, सेट पाहिला, काहीही न बोलता त्यांनी मला हलकेच मिठी मारली. म्हणाले, ‘‘तुम्हारे सेट को हर अँगलसे जस्टिफाय करने की कोशीश करुंगा।..’’

    ‘पानी पानी रे’ हे गाणं आठवून पाहा, त्यांनी आपला शब्द सत्यात उतरवला..’’ सांगताहेत भूत, वर्तमान आणि भविष्यकाळालाही साकार करणारे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई.

    पुणे-मुंबई जुन्या हायवेवरून माझी गाडी ९० अंशाचं वळण घेऊन कर्जतच्या दिशेने डावीकडे वळते. अर्धा किलोमीटर आत गेल्यावर एक भव्य दरवाजा सामोरा येतो..

    त्या भारदस्त दरवाजावर पाटी असते – एन्. डी. स्टुडिओ!
    मी गाडीतून खाली उतरतो, त्या दरवाजाला स्पर्श करतो, खाली वाकून मातीला नमस्कार करतो.
    अंगांग थरारतं माझं!
    डोळ्यांसमोर उभी राहतात मागची ४०-४५ वष्रे!

    वरळीची ती बी.डी.डी. चाळ, मुलुंडसारख्या उपनगरातली ती वस्ती, माझी वामनराव मोरारजी शाळा, शाळेतल्या चित्रकला स्पर्धा, नंतरचं जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला आणि तेथून रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये जाणं, वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वत:ची कलर लॅब काढणं आणि नितीश रॉय यांच्या ‘तमस’च्या सेटवरचा तो पहिला दिवस.. आणि आज ५० एकरांवर उभा असलेला आमचा भव्य एन. डी. स्टुडिओ!
    ..सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. त्यावेळी वाटतं, हे माझं काहीच नाही. कोणीतरी अज्ञातातून हाकारत-पुकारत, आंजारत-गोंजारत तर कधी फटकारे मारत माझ्याकडून हे सारं करवून घेत आहे. माझी त्या अज्ञात शक्तीवर अतूट श्रद्धा आहे, जिनं माझी निवड केली ह्य़ा कला क्षेत्रासाठी. त्या अनाहत नादाचा मी ऋणी आहे, जो मला सतत हाकारत असतो.

    एका विशिष्ट दिशेने नेत असतो- सर्जनशीलतेच्या! हा प्रवास सतत सुरूच आहे, जेव्हापासून मला जाणीव झाली की तुझा जन्म रंगांसाठीच आहे. त्या रंगांच्या शोधात मी इथवर आलो. प्रत्येक टप्प्यावर मला जाणवत आलं की हे रंग आपलं जगणं उजळवून टाकतात, इंद्रधनुषी करतात. या रंगांच्या उधळणीवर आपलं नियंत्रण हवं नाही तर ते आपल्याला फरफटवत नेतात. या रंगांवर नियंत्रण आलं की मग मात्र ते त्या ठरावीक चौकटीत धुंद करतात, नवसर्जन देतात. या महाराष्ट्राच्या मातीचा तांबडा रंग, सह्य़ाद्रीचे काळेकभिन्न फत्तर, झाडा-झुडपांचे हिरवेगार रंग, विठोबा-रखुमाईचा गजर करत भगव्या पताका नाचवणारे वारकरी, निळंभोर आकाश या साऱ्याविषयी मी कृतज्ञ आहे. ही कृतज्ञताच मला इथवर घेऊन आली आहे. नाही तर वरळीच्या साध्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मी सव्वाशे चित्रपट, शेकडो जाहिराती, काही मालिकांची चित्रपटांची निर्मिती आणि बरंच काही अवघ्या २५ वर्षात कसा करू शकलो असतो?

    माझी मुलुंडची शाळा वामनराव मोरारजी. पहिल्याच दिवशी शाळेत जोशीबाईंनी कविता शिकवली तो दिवस आठवतोय- टप टप पडती अंगावरती, प्राजक्ताची फुले! बागेत न जाताही केशरी देठाच्या नाजूक चणीच्या पांढऱ्याशुभ्र फुलांनी माझ्या मनावर मोहिनी घातली. शब्दांनी मनात रंगांची उधळण केल्याचा तो अनुभव मला लख्ख आठवतोय! नंतरचा तास चित्रकलेचा होता. चित्रकलेच्या शिक्षकांनी कोणतेही आकार काढायला सांगितले होते. मी काय काढलं ते मला आठवत नाही, पण शिरोडकरसरांना त्यातील रेषांमागील फोर्स जाणवला असावा. सरांनी माझ्याकडून मग भरपूर मेहनत करून घेतली.

    कॅम्लिनच्या प्रत्येक स्पध्रेला बसायचो, बक्षिसं मिळवायचो. माझी रंगांबद्दलची ओढ वाढत गेली. त्यात आम्ही मुळातले कोकणातले, पाचवल्याचे. प्रत्येक सुट्टीत पहिल्या दिवशी पाचवल्याला जायचं. वाटेत कोकणातल्या घाटाचं सौंदर्य अधाशासारखं पाहत बसायचं. आजचं कोकण बदलतंय, उद्यमशील बनतंय, पण मनातलं कोकण तसंच आहे! आम्ही मुलं वेगवेगळे खेळ खेळायचो. त्यात राम-रावण युद्ध, शिवाजी महाराज आणि मोगल युद्ध हे आवडते. त्यासाठी हत्यारं लागायची. ती मी झटपट तयार करायचो. धनुष्य-बाण, तलवारी, मुकुट वगरे सारे! तिथल्याच झाडांच्या फांद्यांमधून मला आकार गवसायचे. आमच्या सिनेजगतात सर्व गोष्टी वेगात कराव्या लागतात, त्याची बीजं कदाचित तिथं असावीत.

    मी दहावीची परीक्षा पास झाल्यावर आई-बाबांसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जाण्याचा बेत सांगितला. वेगळी पायवाट चोखाळण्याचं शिक्षण त्यांनीच दिलं होतं. मी जे. जे.ला जाऊ लागलो. पण नंतर मी रहेजामध्ये प्रवेश घेतला, कारण मला रेल्वेप्रवास आवडत नाही. रहेजाला जायला बस होती. पण दोन्हीकडे माझ्यावर उत्तम शिक्षकांचा प्रभाव पडला. प्रभाकर कोलते आणि टिकेकरसरांचा प्रभाव जास्त होता. कोलतेसरांनी एक प्रकल्प दिला होता- ‘६४ ब्लॉक्समधल्या ५२ ब्लॉक्सचा वापर करून सर्व ब्लॉक्स भरले गेले आहेत असा आभास निर्माण करणारे चित्र तयार करणे’; आजही तो प्रकल्प कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मला उपयोगी पडतो. उपलब्ध सामग्रीतून सर्व काही निर्माण करता आलंच पाहिजे, याचा तो धडा होता. कोलतेसर कॅनव्हासच्या प्रतलावर ज्या प्रकारे रंगांची उधळण करतात, ती पाहणे, अभ्यासणे मनोज्ञ असते.

    रहेजामधलं शिक्षण संपताच काय करायचं हा प्रश्न नव्हताच, मी कलर लॅब काढायची ठरवली होती; त्यावेळी माझ्या बाबांनी कर्ज घेण्याचा सल्ला तर दिलाच पण वरती म्हणाले, ‘‘कर्ज जरूर काढ, टाटा-बिर्ला हेही कर्जं काढतात, पण वेळच्या वेळी त्याचे हप्ते भरून त्याची परतफेड कर.’’ वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वत:ची कलर लॅब काढली. झपाटय़ानं जम बसला. मित्र सोबत होतेच. तेवढय़ात माझ्या मामीनं कला दिग्दर्शक नितीश रॉय यांचं एक काम माझ्याकडे दिलं. मी ते किचकट काम वेळेच्या मर्यादेत दिलं. ते खूश झाले. मामीजवळ त्यांनी निरोप पाठवला, ‘‘कला दिग्दर्शनात यायचंय का?’’ मी सहजपणे ‘हो’ म्हणून गेलो. त्या एका होकारात जीवनातले सगळे होकार भरले गेले.
    ९ मे १९८६ रोजी मी ‘तमस’च्या सेटवर फिल्मसिटीत दाखल झालो आणि आजवर तेथेच आहे.

    रॉयसाहेबांनी माझ्या हाती काही रेखाटनं ठेवली आणि मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये हात घातला. नंतरचे सलग १३ दिवस, १३ रात्री मी सेटवर होतो. हे झपाटलेपण माझ्यात पहिल्यापासून आहे. नितीश रॉय, गोिवद निहलानी, श्याम बेनेगल यांच्या सान्निध्यात ही बाब अधोरेखित झाली. बेनेगलसाहेबांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या सेटवर ४८० दिवसांपकी ४७५ दिवस सलग होतो. त्या काळात अवघे पाच दिवस मी घरी गेलो होतो. त्यातील तिसऱ्या खेपेला माझ्या यामाहा मोटारसायकलला अपघात झाला. मला हॉस्पिटलमध्ये सलाईनही लावलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी सेटवर पोचलोही होतो. बेनेगलसाहेब म्हणालेही, ‘‘यार क्या आदमी है तू, चला जा घर और आराम कर ले.’’ पण माझा आराम तो सेटच होता.

    कोणताही चित्रपट किंवा मालिका (मग तो चांगला असो की टुकार) हा एक टीम एफर्ट असतो. ती संघभावना असते. तुमच्या हाती आधी स्क्रिप्ट सोपविले जाते. ते वाचून कला दिग्दर्शकाला अभ्यास करून रेखाटनं करावी लागतात. माझी पहिली स्वतंत्र मालिका चाणक्य! ती ऐतिहासिक स्वरूपाची मालिका होती. मी खूप अभ्यास केला. तो करून चर्चात भाग घ्यायचो. कला दिग्दर्शकाला त्याने तयार केलेली रेखाटनं कॅमेरामन, दिग्दर्शक, कथालेखक, पटकथालेखक, निर्माता या साऱ्यांसमोर सादर करावी लागतात. त्या चच्रेतून मग अंतिम रेखाटनं बनतात, त्यांच्या आधारे सेट उभे राहतात. त्या सेटची रंगसंगती, कलावंतांच्या कपडय़ांची रंगसंगती, पाश्र्वभूमी याचा मेळ बसवावा लागतो. पूर्वी कला दिग्दर्शकाला आपल्या देशात महत्त्व नव्हतं, पण गेल्या २५ वर्षांत कला दिग्दर्शकाचं स्थान महत्त्वाचं मानलं जातंय.

    कला दिग्दर्शकाला विशिष्ट कालावधीतला संपूर्ण काळ नेपथ्यातून उभा करावा लागतो. प्राचीन काळातील एखादा किल्ला, एखादे शहर, एखादी बाजारपेठ उभी करावी लागते. आग्रा किल्ला बांधायला ३२ वष्रे लागली होती, पण ‘जोधा अकबर’साठी मला तो उभा करायला फक्त तीन महिने मिळाले होते. रायगडावरची बाजारपेठ उभी करायला आम्हाला पंधरवडा मिळाला होता, पण दोन्ही ठिकाणची विश्वासार्हता आम्ही सांभाळली होती. ते आव्हान असतं. मला आव्हानं स्वीकारायला आवडतात.

    ‘चाणक्य’च्या वेळी माझ्या आई-बाबांना घेऊन मी सेटवर गेलो होतो. एकेक गोष्ट आईला दाखवत होतो, ‘‘हा राजवाडा, ही बाजारपेठ, हे गुरुकुल..हे करवसुली केंद्र.’’ तिनं विचारलं, ‘‘हे ठीक आहे रे, पण तू नेमकं काय केलंस?’’ मी तिचा हात धरून सेटच्या मागच्या बाजूला गेलो, सारं समजावून सांगितलं. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. दोघांचेही समाधानी चेहरे पाहिले. त्या कृतार्थधारांतच माझं आयुष्य सामावलं गेलंय.

    मी स्वतंत्ररीत्या केलेला पहिला चित्रपट म्हणजे अधिकारी ब्रदर्सचा ‘भूकंप’. माझं कला दिग्दर्शक म्हणून नाव झालं ते विधू विनोद चोप्राच्या ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’मुळे. ‘पिरदा’च्या वेळी माझं काम त्याला आवडलं होतं. ‘पिरदा’तली बोट आठवून पाहा, तो सारा सेट होता. मी त्या बोटीच्या भिंतींना असणारे अस्तरही अभ्यास करून दाखवलं होतं, त्याचा वापर दिग्दर्शकाला नीट करून घेता आला होता. विनोदनं मला ‘१९४२..’ चं स्क्रिप्ट दिलं. १९४२च्या पाश्र्वभूमीवरील तो चित्रपट. चंबा ते डलहौसी हा सारा पट्टा आम्ही फिरलो, स्केचेस केली, फोटो काढले. स्क्रिप्ट आणि क्लायमॅक्स फायनल झाला आणि आम्ही ठरविलं की सगळं शूटिंग चित्रनगरीत करायचं. एप्रिल-मे मध्ये मी चित्रनगरीतल्या परिसराचा अभ्यास करून लोकेशन ठरवलं. तिथला तलाव, त्याच्या काठावर व तलावात सेट उभा कसा करता येईल यावर नोट्स तयार केल्या. नोव्हेंबरमध्ये मीटिंग होती. टीममधल्या जुन्या लोकांना वाटलं की तलावावर सेट उभा करायचा, जेमतेम पाच-सहा वर्षांचा अनुभव असणाऱ्या या मुलावर कसा भरवसा ठेवायचा? खूप भवती न् भवती झाली. आमच्या टीमचे पाच-सहा महिन्यांचे श्रम पणाला लागलेले. माझा चेहरा उतरला. अखेर विनोद चोप्रा म्हणाला, ‘‘आपण यावर उद्या निर्णय घेऊ.’’

    दुसऱ्या दिवशी नऊ वाजता मीटिंग ठरलेली. मी भल्या पहाटेच तलावाच्या काठावर जाऊन बसलेलो. विचारात मग्न. आठच्या सुमारास माझ्या खांद्यावर हात पडला आणि आवाज आला, ‘‘क्या तू भी वही सोच रहा है, जो मं सोच रहा हूँ?’’ मी उत्तरलो, ‘‘हां विनोद!’’ नऊ वाजता आम्ही जमलो. विनोद चोप्रा म्हणाला, ‘‘डिस्कशन वगरे कुछ नहीं करना है। नितीन काम कर रहा है। सब लोग अपने अपने काम में जूट जाओ।’’ आणि मग मी मागे वळून पाहिलेच नाही. गोिवद निहलानी, गुलजारसाहेब, केतन मेहता, एन्. चंद्रा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साली, विनोद चोप्रा, राजू हिरानी, इंदरकुमार, डेव्हिड धवन, आता सूरज बरजात्या, प्रभुदेवा अशा सर्व पिढय़ांतील दिग्दर्शकांसोबत काम करायची संधी मिळाली. त्या प्रत्येकानं मला काही ना काही शिकवलं.

    संजय लीला भन्सालीसोबत माझा अनेक वर्षांचा ऋणानुबंध! ‘डिस्कव्हरी’च्या वेळी तो एडिटिंग करायचा. ‘देवदास’च्या वेळी आम्ही आधी झालेले नऊ ‘देवदास’ पाहिले. ते पाहिल्यावर संजय मला म्हणाला, ‘‘यासारखं आपण काहीही करायचं नाही. आपण भव्य, अतिभव्य करायचं.’’ ऐश्वर्या रायचं म्हणजे पारोचं घर केवढं तरी मोठं केलं. त्याच्या पाचपट मोठी देवदासची हवेली बनली. या प्रत्येक वेळी मला कोलतेसरांनी दिलेला ६४ ठोकळ्यांचा तो प्रकल्प उपयोगी पडला. दिलेल्या वेळेत, दिलेल्या खर्चात आणि दिलेल्या अवकाशात तुम्हाला काम करावं लागतं. हा तो धडा होता. मला वेळ वाया घालवलेला आवडत नाही. म्हणूनच सकाळी आंघोळ झाल्यावर माझ्यासमोर पांढरा शर्ट आणि जीन्सची पँट असते, ती घालायची व कामाला लागायचं. कोणते कपडे घालायचे यापेक्षा विचार करायला किती तरी गोष्टी आहेत ना! टाईम मॅनेजमेंट हवी.

    गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत शोधत मनालीला पोचलो. विमानतळावर उतरताना प्रचंड बर्फ सभोवती दिसत होता. आम्हाला जवळच्या एका पर्वतावर जायचं होतं. आम्ही पाच जण होतो. गुलजारसाहेब, कॅमेरामन मनमोहनसिंग, सुदेशजी आणि आणखी एक जण! सुदेशजी आणि मनमोहनसिंग म्हणाले, ‘‘नको जाऊ या.’’ गुलजारजींना पर्वतावर जायचंच होतं, मलाही जायचं होतं. मी, ‘‘जाऊ या’’ म्हणालो आणि मग आम्ही पोचलो. रात्री गुलजारजींची शायरी ऐकली. थोडंसं उशिरा झोपलो आणि भल्या पहाटे गुलजारजीनी माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. ते आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्या-खोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ साठलेलं दिसत होतं. पूर्वेस साडेपाचच्या पहाटरंगाची मस्त उधळण होत होती. आम्ही अनिमिष नेत्रांनी ते अद्भुत पाहत होतो. पुन्हा ते कधीच दिसणार नव्हतं.

    निसर्गाची तीच तर किमया आहे. तो एकदाच एखादी कलाकृती निर्माण करतो. त्याला स्वत:लाही ते दृश्य परत निर्माण करता येत नाही. कलावंतालाही तसंच असायला हवं. माझे सेट्स मी परत बनवत नाही. त्यात बदल हवाच. तसा लाल रंग माझ्या सेट्समध्ये पुनरावृत्त होताना दिसतो, पण तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारे येतो. तसा हा रंग हाताळता येणे अवघड, पण एकदा का त्याच्यावर ताबा मिळाला की त्याच्यासारखा रंग नाही. गुलजारजी म्हणाले, ‘‘नितीन, मुझे ऐसा दृश्य चाहिये।’’ नंतरचे तीन दिवस आम्ही तिथं अडकून पडलो होतो. त्या परिसरात सेट उभा करता येणं शक्य नव्हतं. गुलजारजींच्या अपेक्षेनुसार सेट करायचा प्रयत्न मी चित्रनगरीत केला. ते आले, सेट पाहिला, काहीही न बोलता त्यांनी मला हलकेच मिठी मारली, पाठ थोपटली, (आजही पाठीवर ती प्रेमळ थाप जाणवते). ते म्हणाले, ‘‘तुम्हारे सेट को हर अँगलसे जस्टिफाय करने की कोशिश करूंगा।’’ लक्षात घ्या हे गुलजारजी बोलताहेत. ‘पानी पानी रे’, हे गाणं आठवून पाहा. तो सारा सिक्वेन्स चित्रनगरीत उभा राहिलाय.

    आशुतोष हाही माझा जुना मित्र. त्याच्या सर्वच चित्रपटांसाठी मी काम केलंय. ‘पहला नशा’पासून आजपर्यंत प्रत्येक! ‘पहला नशा’ आणि ‘बाजी’ हे त्याचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण त्यांची दखल मात्र घेतली गेली. ‘लगान’ हा अफलातून अनुभव. आमीर आणि आशु. दोघेही प्रतिभावंत, चिकित्सक. आम्ही लोकेशन्स शोधत फिरत होतो. ‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगवरून परत येताना अचानक भूजचा परिसर दिसला. आमीर आणि आशुतोष दोघांना मी आणखी जागा दाखवल्या. पण आम्ही भूज फायनल केलं आणि नंतर घडला तो इतिहास होता.

    मी या चित्रपटसृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे यातील प्रत्येक घटकावर माझं प्रेम आहे. इथला पसा मी इथेच खर्च करतो. आज कर्जतला आम्ही स्टुडिओ उभारला. या स्टुडिओमुळे या परिसरातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला, स्थानिकांचं अर्थकारण बदललं. बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार येथे येऊन राहतात, शूटिंग चालतं. या मातीचं मी देणं लागतो, ते अल्प कुवतीप्रमाणे मी परत देण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच तर भारताचा स्वाभिमान असणाऱ्या शिवछत्रपतींवर एक मालिका माझ्या हातून घडली, बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा देता आली, स्वरांचा जादूगार असणाऱ्या बालगंधर्वावर त्याच दृष्टिकोनातून चित्रपट बनवला. तरुणांच्या आयपॉडवर बालगंधर्वाची गाणी आली, हीच मोठी गोष्ट झाली. मला सर्वच अनुभव घ्यायला आवडतात. अनेक वर्षे पडद्यामागे राहिल्यावर, पडद्यावर अभिनय करूनही पाहिला. कला दिग्दर्शनानंतरची पुढची पायरी दिग्दर्शनाची. तीही ओलांडली. यशापयश महत्त्वाचे नाही, पण प्रयत्न महत्त्वाचे असतात. ते मी करत राहतो, करत राहीन.

    एक सांगू का, रंगांच्या उधळणीतच मला माझा परमेश्वर सापडतो. माझी अनुभव घेण्याची क्षमताच मुळी रंगांत आणि विविध आकारात सामावली गेली आहे. जेव्हा एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक माझ्याशी चर्चा करत असतो तेव्हाच ते कथानक माझ्यासमोर शब्दांच्या नव्हे, तर चित्राकृतींच्या माध्यमातून उभं राहतं.

    रंग, आकार माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागतात. लेखन करण्यापेक्षा १०-१२ स्केचेस काढून माझ्या मनातील भाव मी पटकन व्यक्त करू शकतो. ही स्केचेस करतानाही माझ्या मनात जाणीव असते की, त्या अनुभवाला मी साक्षात करू शकत नाही, पण त्या अनुभवाचा वेध मात्र नक्की घेऊ शकतो. या वेध घेण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता सामावली गेली आहे. प्रस्तुत लेखनामध्ये वारंवार ‘मी’ हे प्रथम पुरुषी सर्वनाम येते आहे. पण मी हे जाणून आहे, यामागचा बोलविता धनी वेगळाच आहे, ‘तो’ हे सर्व करून घेत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत थोडासा बदल करून काही मांडू इच्छितो :
    ‘तेणे कारणें रंगेन। रंगीं अरूपाचे रूप दावीन।
    अितद्रिय परि भोगवीन। इंद्रियांकरवी॥’’

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    शब्दांकन-नितीन आरेकर

    pd - August 6, 2017


  • बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्‌विंकल खन्ना

    बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्‌विंकल खन्नाचा जन्म २९ डिसेंबर १९७४ रोजी पुणे येथे झाला. राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्नाची जन्मतारीख एकच २९ डिसेंबर.

    प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्‌विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ट्‌विंकलने २००१ साली अक्षय कुमार सोबत लग्न केले. काही निवडक चित्रपट केल्यानंतर ट्विंकलने २००१ मध्ये फिल्मी दुनियेला रामराम ठोकला आणि इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तसेच लेखीका म्हणून नाव कमवले. ट्‌विंकल खन्नाय यांनी लिहिलेल्या मिसेस फनीबोन्स या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे ती २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरली. मिसेस फनीबोन्स या तिच्या पुस्तक प्रकाशनानंतर तिने आता गृहसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह बाजारात आणलेला आहे. तो 'द व्हाईट विन्डो' या ब्रॅँन्डने प्रसिद्ध आहे.

    अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अक्षय कुमार व ट्विंकलची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. असे म्हटले जाते, की ट्विंकलचा मेला हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे मेला हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. जर मेला हा चित्रपट त्यावर्षी हिट ठरला असता, तर आज अक्षय-ट्विंकल पती पत्नी नसते. जानेवारी २००१ मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    pd - December 29, 2018


  • लोकगायक प्रल्हाद शिंदे

    २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.

    pd - June 28, 2022


  • ज्येष्ठ हिंदी व गुजराथी नाटकातील अभिनेत्री दिना पाठक

    ज्येष्ठ हिंदी व गुजराथी नाटकातील अभिनेत्री दिना पाठक यांचा जन्म ४ मार्च १९२२ रोजी झाला. दिना पाठक पूर्वाश्रमीच्या नी गांधी. त्या महिला अॅक्टीवेटीस्ट देखील होत्या आणि 'भारतीय महिला नॅशनल फेडरेशन' (NIFW) अध्यक्ष राहिल्या होत्या. हिंदी आणि गुजराती चित्रपटात दिना पाठक यांनी सहा दशकांत १२० चित्रपटांत अभिनय केला.

    त्यांचे मीरा गुजराथी हे नाट्य भवाई लोकनाट्य शैली मध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे चालू होते. त्यांच्या गोल माल आणि खूबसुरत मधील संस्मरणीय भूमिका प्रसिध्द आहे. त्यांनी कोशिश, उमराव जान, मिर्च मसाला आणि मोहन जोशी हाजीर हो चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या. दिना पाठक यांचे ११ ऑक्टोबर २००२ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकी पिडीया

    pd - November 11, 2017


  • संपादक व प्रकाशक अरुण दिगंबर शेवते

    शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यास क्रमात सामील केले आहे.

    pd - April 30, 2022


  • जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला

    जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .

    प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़.

    बेबी शकुंतला यांनी यानंतर ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्या सारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले होते. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत.

    पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला. बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ. इंटरनेट

    pd - November 17, 2018