(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल

    हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी म्हणून ओळख असलेले हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल यांचा जन्म १९१६ मध्ये जालंधर येथे झाला. हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. वयाच्या १७-१८ व्या वर्षीपासून त्यांनी लाहोर, अमृतसर, दिल्ली येथील बर्यानचशा मैफिली व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवत गाजवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. अमरनाथ यांनी आपल्या धाकट्या भावांना १९४३ साली मायानगरी मुंबईत धाडलं.

    प्रभातचा ‘चॉंद-१९४४’ हा ह्या जोडीचा पहिला चित्रपट. आणि बघता-बघता ‘दो दिलोंको ये दुनिया मिलने’ ह्या गाण्यानं संपूर्ण अखंड भारतात धुमाकूळ घातला. १९४६ साली पुन्हा या जोडीच्या वाट्याला प्रभातचाच ‘हम एक है’ आला. हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला तीन नवे कलाकार देणार होता. गुरुदासपूर/लाहोरचा देव आनंद, पेशावरचा रेहमान व मंगलोरचा गुरू दत्त पदुकोण. गंमत म्हणजे गुरू दत्त हा या चित्रपटाचा नृत्य-निर्देशक होता. यातील गाणी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाहीत. १९४७ च्या जून मध्ये ‘मिर्झा साहिबान’ प्रदर्शित झाला. ‘मिर्झा साहिबान’ या चित्रपटाचे मूळ संगीतकार अमरनाथ होते, पण १९४५ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले व अन्य काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला व शेवटी बॅकग्राऊंड संगीत व बर्यापच गाण्याचं रेकॉर्डिंग याची जबाबदारी हुस्नलाल- भगतराम यांनी समर्थपणे पार पाडल्याचे एकदा नूर जहानने स्वतः सांगितले होते.

    ‘आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाये’, ‘हाथ सीनेपे जो रख दो’ ही यातील काही आजही आवडीनी ऐकली जाणारी गाणी. या दोघांनी आपली सिने करियर ची सुरवात १९४४ मध्ये प्रदर्शित चित्रपट “चांद” पासून केली. या चित्रपटातील “दो दिलों की ये दुनिया” गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

    १९४८ पासून हुस्नलाल भगतराम जोडी खर्याल अर्थानी नावारूपास आली. ‘प्यार की जीत’ हा सुरैया, रेहमान अभिनीत चित्रपट प्रचंड गाजला व गाजली ही गाणी – ‘तेरे नैनों ने चोरी किया (सुरैया) व ‘एक दिल के टुकडे हज़ार हुए’ (मोहम्मद रफी). मूळची लाहोरची सुरैया ही त्याकाळातील अव्वल दर्जाची अभिनेत्री होती आणि तिची गाणी ती स्वतःच गात असे. तिने ९ सिनेमांमधून ६० च्या आसपास गाणी या जोडीकरिता गायिली आहेत. त्यावरून या जोडीच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते वाचकांना. एवढी गाणी तिची कोणत्याही अन्य संगीतकारा बरोबर नाहीत. ‘वो पास रहें’ (बडी बहन-१९४९), ‘इसका क्या मतलब है’ (सनम-१९५१), ‘बेकरार है कोई’ (शमा परवाना – १९५४) ही काही अविस्मरणीय सुरैय्याची गाणी त्यांच्या संगीतातील. १९४८ साली महात्मा गांधीच्या हत्येनंतर आलेल्या बापूंकी अमर कहानी या चित्रपटाला हुस्नलाल- भगतराम यांनी संगीत दिले होते. मोहम्मद रफी यांनी गायलेले राजेद्र कृष्णा लिखित हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते.

    १९४९ पासून लता मंगेशकर त्यांच्यासोबत आल्या. लता मंगेशकर म्हणजे एक हिरा., शास्त्रीय संगीताची अभूतपूर्व बैठक त्यांच्या स्वरांना, पण पार्श्व्गायनाचे पैलू या हिर्या्ला ज्यांनी पाडले असतील त्यात हुस्नलाल भगतराम यांचा प्रामुख्याने समावेश करणे आवश्यक आहे. लता मंगेशकर यांना प्रत्येक रचना हुस्नलाल पेटी अथवा व्हायोलिनवर वाजवून दाखवत असत आणि त्या मग त्या स्वरांना हुबेहूब आपल्या गायनात उतरवत असत. १९४९-५७ या ८ वर्षांच्या काळात लता मंगेशकर या जोडीच्या २५ च्या वर चित्रपटांतून शंभर हून अधिक गाणी गायल्या. लता मंगेशकर यांच्या कोवळ्या स्वरांतील ‘दर्द’ आपणांस जाणून घ्यायचा असल्यास हुस्नलाल-भगतराम यांना ऐकणे भाग आहे. साहजिकच आहे, ते स्वतःही लताबाईंच्या स्वरांवर तेवढेच भारावलेले असावेत. त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांनी लताबाईंकडून कमालीचे सुरुवाती आलाप गाऊन घेतले आहेत, जे अगदी हृदय हेलावून सोडतात.

    उदाहरणार्थ- ‘जो दिल मे’ (बडी बहन-१९४९), ‘जिगर के टुकडे किये’ (सरताज-१९५०), ‘मोहब्बत मे हंसी’ (स्टेज-१९५१), ‘जुदाई की खबर’ (आंसू-१९५३). कस काढलाय् लताबाईंचा! अन्य माझी काही आवडीची विरह गीतं आहेत – ‘लूट गयी’ (जलतरंग-१९४९), ‘दिल ही तो है’ (आधी रात-१९५०), ‘ठहर हो जानेवाले’ (बिरहा की रात-१९५०), ‘दर्द-ए-जुदाई’ (छोटी भाभी-१९५०), ‘अगर दिल किसीपे’ (गौना-१९५०), ‘आंसू अब तुम’ (काफिला-१९५२).
    असे अजिबात नाही की हुस्नलाल-भगतराम यांनी लता मंगेशकर यांना केवळ विरह गीतंच गायला दिली. ‘चूप-चूप खडे’ (बडी बहन-१९४९), ‘तेरी अंखिया’ (सावन भादो-१९४९), ‘काहे धीरे’ (राखी-१९४९), ‘ना जाना ना जाना मेरे बाबू’ (छोटी भाभी-१९५०), ‘वो आए बहारें’ (अफसाना-१९५१), ‘तेरी गली में (फर्माइश-१९५३) अशी कित्येक साध्या चालीची, परंतु अत्यंत मंजुळ गाणी देखील दिली आहेत. ‘राजा हरिश्चंनद्र-१९५२’ मधील ‘गोरी-गोरी चांदनी’ हे गाणं म्हणजे गोडव्याचा कळस आहे. हार्मोनियम व सतार पूरक आहेत लताबाईंच्या स्वरांना. कहर केला आहे या गाण्यात.

    तसेच ‘आंसू-१९५३’ मधील ‘आँखोंका तारा प्राणो से प्यारा’ रसिकांनी अवश्य ऐकावे. सुरुवातीला व्हायोलिन व त्यांनंतर इंटरल्यूडमध्ये सतार यांचा अप्रतिम वापर या गाण्याची वैशिष्ट्ये हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या लता-रफी यांच्या युगल गीतांबद्दल काय बोलावे? ‘जरा तुमने देखा’ (जल तरंग-१९४९), ‘छोटासा फसाना है’ (बिरहा की रात-१९५०), ‘पास आके हुए’ (मीना बाजार-१९५०), ‘हमे दुनिया को दिल’ (आधी रात-१९५०), ‘दिल लेके दिल दिया’ (स्टेज-१९५१), तू चंदा मै चांदनी (राजा हरिश्चंणद्र-१९५२), ‘दिन प्यार के’ व ‘सून मेरे साजना’ (आंसू-१९५३) ही त्यांची काही अजरामर गाणी. मागे मला बोलताना खय्याम म्हणाले होते की पहाडी धूनवर आधारित ‘सून मेरे साजना’ हे त्यांच्या अत्यंत आवडीचे गीत आहे. इतकेच नव्हे, तर हे गीत त्यांनी व त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी गाऊन देखील दाखवलं. खय्याम व शंकर सुरुवातीच्या काळात हुस्नलाल-भगतराम यांचे सहाय्यक ही होते. मोहम्मद रफी यांच्या करीयर मध्ये हुस्नलाल-भगतराम यांचा मोठा हात आहे. हुस्नलाल-भगतराम यांनी मोहम्मद रफी यांना पहिला ब्रेक दिला होता.

    गीता दत्त, झोहराबाई, मुकेश, तलत मेहमूद, आशा भोंसले, सुमन कल्याणपूर इत्यादी कलाकार देखील त्यांच्याकरिता गायले आहेत. तलतची ही दोन गाणी – ‘मुहोब्बत की हम’ (फर्माइश-१९५३) व ‘ए मेरी जिंदगी’ (अदल-ए-जहांगीर-१९५५) तर सुप्रसिद्ध आहेत. १९५२ पासून ते व्यावसायिक पिछाडीवर पडत गेले, त्यात भर पडली त्यांच्या कौटुंबिक समस्यांची. १९५५ पासून तर त्यांना प्रतिष्ठित सिनेमे मिळणे ही कठीण होत गेले. नशिबी येत होते ते दुय्यम दर्जांचे सिनेमे. तरी देखील, लताबाईंची संपूर्ण साथ १९५७ पर्यंत त्यांना राहिली. ‘आनबान-१९५६’, ‘मिस्टर चक्रम-१९५६’ आणि ‘कृष्ण सुदामा-१९५७’ ही लताबाईंची त्यांच्यासमवेत काम केलेली शेवटची ३ सिनेमे. लताबाई १९५६-५७ साली दुय्यम दर्जांच्या सिनेमात देखील गायल्या आहेत हे कोणास सांगितल्यास विश्वाकस बसणार नाही. ‘तुने कैसी आग लगायी’ व ‘ओ आसमान वाले’ (आनबान), ‘क्यूँ झुकी जाती’ (मिस्टर चक्रम) व ‘ओ क्रिष्णा बिगडी बना दे’ (कृष्ण सुदामा) ह्या गाण्यांमधून लता मंगेशकर यांची आपल्या गुरूंबद्दल असलेली निष्ठा दिसून येते.

    १९५७-५८ पासून पंडित हुस्नलाल भारतभर व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवू लागले, आकाशवाणीवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत. १९५९ च्या सुमारास मुंबई सोडून ते अखेरीस दिल्लीला परतले. चरितार्था खातर पंडित भगतराम १९६५-६६ पर्यंत दुय्यम चित्रपटांत संगीत देत राहिले व सोबत अन्य संगीतकारांचे सहाय्यक म्हणूनही त्यांना काम करावे लागले. हुस्नलाल यांचे २८ डिसेंबर १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / अजय देशपांडे

    हुस्नलाल-भगतराम यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=I_Qf-B0mtak
    https://www.youtube.com/watch?v=fKndjjGwtGM
    हुस्नलाल-भगतराम यांची माहिती. https://www.youtube.com/watch?v=dflf6ixWJ4Q&index=2&list=PLII0LdyKA9i7EWfs2773wJYyXIXF_BVRl

  • कॅप्टन विक्रम बत्रा

    कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

  • माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा

    उत्तम टेनिस खेळणारी मार्टिना नवरातिलोव्हा झेकोस्लोव्हाकियाहून अमेरिकेत आली. ती कायमचे अमेरिकेत राहायचे हा निर्णय पक्का करून.

  • ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील

    महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचं आगरी-कोळी बोलीभाषेतील साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.

  • शिवसेनेचे नेते अनंत तरे

    ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं.

  • ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील लक्ष्मीकांत

    बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत.

  • बालसाहित्यकार आणि कोशकार अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ

    ‘झपाटलेला’, ‘खतरनाक’, ‘चश्मेबहाद्दर’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘आबा झिंदाबाद’, ‘सालीनं केला घोटाळा’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बाबा लगीन’, ‘लाडी गोडी’, ‘पकडापकडी’, ‘वन रुम किचन’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘लावू का लाथ?’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. किशोरी अंबिये यांनी १५० हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे.

  • सिंहासन’कार अरुण साधू

    अरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

  • कवी आणि गीतकार दासू वैद्य

    दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.

    "आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.

    १९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.

    विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.

    दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.

    मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.

    दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.

    'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी

    १९५३ साली त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. १९६१ मधील अध्यक्षीय निवडणुकींत ते रिचर्ड निक्सन यांच्या विरुद्ध उभे ठाकले व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्यांनी खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले.