(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड

    हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसीचीच पंधरा हजार गाणी आहेत.

  • नानासाहेब धर्माधिकारी

    समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत .

  • बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर

    राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर यांना स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. बालसाहित्यकार आणि चरित्रकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म ११ डिसेंबर १९२५ रोजी झाला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत.

    आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. राजा मंगळवेढेकर यांचे १ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    गीतकार म्हणून राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेली गाणी
    असावा सुंदर चॉकलेटचा
    उर्मिले त्रिवार वंदन तुला
    कोणास ठाऊक कसा
    सती तू दिव्यरूप मैथिली

  • सामाजिक नेत्या, लेखीका, संपादक विद्या बाळ

    विद्या बाळ या स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. ‘स्त्री’ व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे.

    स्त्र‌ियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,' असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात येण्यासाठी विद्या बाळ यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली.

    स्त्र‌ियांना त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांनी करून देणाऱ्या विद्या बाळ यांनी 'स्त्र‌ी' या मासिकात सुमारे २२ वर्षे म्हणजे १९८३पर्यंत काम केले. या काळातच १९८१ मध्ये त्यांनी स्त्र‌ियांच्या समस्यांचा वेध घेणाऱ्या 'नारी समता मंचा'ची स्थापन केली. पुढे त्यांनी 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. स्त्र‌ियांच्या चळवळीशी अतूट बांधिलकी मानणाऱ्या या मासिकाने आज स्वतंत्र ठसा उमटवला आहे. या साऱ्याजणी 'आपण बाया आहोत, हे नाकारत नाहीत. त्या जाणिवेत अडकून पडत नाहीत, त्याचा बाऊही करत नाहीत.

    उलट त्या बाईपणाला ओलांडून व्यक्ती आणि माणूस म्हणून त्या स्वतःची ओळख करून घेऊ इच्छितात,' अशी स्पष्ट भूमिका त्या मांडतात. याच मासिकाशी सलग्न 'सखी मंडळा'ची स्थापनाही विद्या बाळ यांनी केली. स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक विषयांची चर्चा या मंडळामार्फत घडवून आणली जाते. 'बोलते व्हा,' 'पुरुष संवाद केंद्र,' 'अक्षरस्पर्श ग्रंथालय,' 'साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग' या संस्थाही त्यांनी सुरू केल्या. या संस्थांकडे नजर टाकली, लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन अशी त्यांची चौफेर लेखणी आहे.

    कृतीशील कार्यकर्त्या अशीही त्यांनी ओळख आहे. जनजागृतीसाठी रात्री काढलेली 'प्रकाशफेरी,' एकट्या स्त्र‌ियांसाठी परिषद, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद किंवा विविध पथनाट्य, निदर्शने, परिसंवाद, 'दोस्ती जिंदाबाद,'सारखा अॅसिड हल्ल्याविरोधातील जागृतीसाठीचा कार्यक्रम, लिंगभाव समतेसाठी पुरुषभान परिषद आदी अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून घेतले. अनेक कार्यकर्त्या तयार केल्या. शहरी आणि ग्रामीण स्त्र‌ियांना जोडणे हे उद्दिष्ट ठेवून त्या काम करतात.

    त्यांना फाय फाउंडेशन, आगरकर पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसंच सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव सन्मानसुद्धा मिळाला आहे. कथा गौरीची, अपराजितांचे नि:श्वास, शोध स्वतःचा, संवाद, तुमच्या-माझ्यासाठी, कमलाकी, तेजस्विनी, वाळवंटातील वाट अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दिग्दर्शक कुमार सोहोनी

    कुमार सोहोनी यांचे पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. ‘अग्निपंख’ हे नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसर्‍याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले.

  • हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पांडे उर्फ अंजान

    आज १३ सप्टेंबर....हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार मा.लालजी पांडे उर्फ अंजान यांची पुण्यतिथी
    लालजी पांडे उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. लालजी पांडे उर्फ अंजान हे एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. प्रारंभीच्या काळात छोट्या चित्रपटांतून गीतलेखन करणा-या अंजान यांच्या गीताने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गाण्यांतून आपली श्रेष्ठ काव्यप्रतिभा सिद्ध केली. त्यानंतरच्या काळात गरिबांचा अमिताभ म्हणून ओळख असणा-या मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रपटांतील अंजान यांची गीतांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. सुपरस्टार्सच्या कारकिर्दीला आपल्या गीतांनी फुलवणारा गीतकार म्हणून अंजान यांची ओळख आहे.
    अंजान यांना लहानपणांपासूनच हिंदी भाषेची प्रचंड आवड. त्या गोडीतूनच उर्दू साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या काव्यप्रतिभेला नवा आयाम मिळाला. प्रेमनाथ त्या वेळी फार्मात होता. त्याने आपल्या एका चित्रपटासाठी या तरुण लालजी पांडे उर्फ अंजान यांची निवड केली. 1953 मध्ये पडद्यावर झळकलेला ‘प्रिझनर ऑफ गोवळकोंडा’ हा तो चित्रपट. यातील शहिदों अमर है तुम्हारी कहानी आणि लहर ये डोले कोयल बोले ही दोन गीते अंजान यांनी लिहिली. त्यानंतर अंजान यांनी ब-याच छोट्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. जी. एस. कोहली या संगीतकाराबरोबर त्यांचे सूर त्या काळात जुळले. प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ‘गोदान’ चित्रपटासाठी पंडित रवी शंकर यांच्या संगीताने नटलेली अंजान यांची गाणी विशेष गाजली. ओ. पी. नय्यर यांच्या संगीताने सजलेले अब के हसीन रुख पे (बहारे फिर आएंगी) हे त्या काळी गाजलेले गाणेही अंजान यांचेच. त्यानंतर कल्याणजी-आनंदजी या संगीतकारांबरोबर त्यांची वेव्हलेंथ जुळली. मग मात्र अंजान यांनी मागे वळून पाहिले नाही. अमिताभ त्या वेळी चित्रपटांत स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. अमिताभचा ‘जंजीर’ हिट झाला आणि सारे समीकरण बदलले. प्रकाश मेहरांनी मग अमिताभ आणि अंजान अशी टीम जुळवली. त्यातूनच पुढे इतिहास घडला. खून पसीना, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, शराबी ही काही उदाहरणे. चंद्रा बारोटच्या डॉनची गाणीही अंजान यांचीच. कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत, अंजान यांची गीते आणि पडद्यावर अमिताभ या सूत्राने मग रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले.
    अमिताभप्रमाणेच मिथुन चक्रवर्तीच्या गाजलेल्या चित्रपटांची गाणी अंजान यांचीच आहेत. डिस्कोच्या जमान्यातही गीतांतील शब्दांचे महत्त्व अंजान यांनी कुठेही कमी होऊ दिले नाही. उलट अर्थपूर्ण शब्दरचनांनी डिस्कोला प्रतिष्ठा मिळवून दिली. गंगा नदी आणि भोजपुरी भाषा यांचा वापर अंजान यांनी अनेक गाण्यांतून केला. मानो तो मै गंगा माँ हूँ, ना मानो तो बहते पानी (गंगा की सौगंध), खैके पान बनारसवाला (डॉन) यातून त्यांचे बनारसशी असलेले नाते अधिकच दृढ होते. उपमांचा समर्पक वापर हे अंजान यांच्या लेखणीचे आगळे वैशिष्ट्य. सलाम ए इश्क (मुकद्दर का सिकंदर) मधला प्रेमभाव असो, की छू कर मेरे मन को (याराना)मधली प्रेमळ झुळूक; अंजानची गाणी कायम मनात रुंजी घालत राहतात. कहना ही क्या ये नैन एक अंजान से मिले(बॉम्बे)मधली ओढ दिल तो है दिल(मुकद्दर का सिकंदर)मध्ये अधिकच गहिरी होते. जिधर देखूँ तेरी तस्वीर नजर आती है(महान)मधले नैराश्य, इंतेहा हो गयी इंतजार की (शराबी) विरहाची परिसीमा गाठते, तेव्हा अंजानच्या शब्दाने त्यातील गोडी अधिकच श्रवणीय होते. ही अंजान यांच्या शब्दांची जादू होती.
    अमिताभ यांच्या कारकिर्दीत त्यांच्या गाण्यांचा वाटा खूप मोठा आहे. ही बहुतेक गाणी अंजान यांची आहेत. गीतकार समीर हे अंजान यांचे चिरंजीव. मा. अंजान यांचे १३ सप्टेंबर १९९७ निधन झाले.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.Kajaykulkarni / divyamarathi.bhaskar.com
  • संगीतकार मदन मोहन

    मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली. त्यांचा जन्म २५ जून १९२४ रोजी बगदाद, इराक येथे झाला.मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते आणि मदन मोहन यांचा इराकमधला जन्म. १९३२ साली त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली. तेथे त्यांची काळजी आजी आणि आजोबा घेत असत. त्यांचे वडील व्यवसायाच्या शोधात मुंबईला गेले. लखनउ, मुंबई आणि देहरादून ह्या शहरात शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांचे संवेदनशील मन सैन्यात काही रमले नाही आणि १९४६ साली संगीतात काही करावे या उद्देशाने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली.

    सैन्य सोडल्यावर मदन मोहन यांना ऑल इंडिया रेडियोत नोकरी मिळाली आणि लखनौ आकाशवाणीवर ते रुजू झाले. तेथे त्यांची गाठ उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद फैय्याज खान यांच्यासारख्या महान संगीतकारांशी पडली. योगायोगाने, संगीतकार रोशन पण त्याच काळात लखनौ आकाशवाणीवर नोकरीस होते. पण मदन मोहन यांच्यावर खरा प्रभाव पडला तो बेगम अख्तर यांच्या संगीताचा. त्यांची कारकीर्द याच प्रभावामुळे घडली आणि हा प्रभाव शेवटपर्यंत टिकून होता. आकाशवाणीच्या वास्तव्यात त्यांना तेथील महान कलाकारांना ऐकून जे ज्ञान मिळाले तेच त्यांचे संगीताचे शिक्षण म्हणायला हवे कारण संगीताचे रीतसर शिक्षण त्यांना काही मिळाले नाही. फक्त लाहोरच्या वास्तव्यात कर्तार सिंग यांच्याकडून थोडेसे संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. हिराबाई बडोदेकराचा त्यांच्यावर प्रभाव होता व पुण्याच्या सवाई गधर्वची वारीही त्यांनी कधी चुकविली नाही.

    फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात गायक म्हणून झाली १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात. मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. यानंतर ते संगीतकार एस. डी. बर्मन आणि श्यामसुंदर यांचे सहाय्यक झाले. त्यांना संगीत देण्याची पहिली संधी मिळाली १९५० साली ‘आँखें' या चित्रपटात. चित्रपट काही फार चालला नाही पण काही चोखंदळ रसिकांनी संगीताच्या वेगळेपणाची नोंद जरूर घेतली. जेव्हा लता मंगेशकर यांना मदन मोहन यांच्या चित्रपटाकरता गाणार का असे विचारले तेव्हा त्यांचा दोन क्षण विश्वास बसला नाही आणि हसायला आले. याचे मुख्य कारण त्याकाळात मदन मोहन यांची ओळख एक धनिकाचा वाया गेलेले, लहान पोरांबरोबर क्रिकेट खेळणारा पोरगा अशीच होती. आज जेथे वानखेडे स्टेडियम आहे तेथे त्याकाळी एक खुले मैदान होते आणि मा.मदन मोहन तेथे सतत लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळत असत आणि त्यांचे वडील याबद्दल अतिशय नाराज असत. मोठे झाल्यावर जेव्हा जेव्हा ब्रेबॉर्न स्टेडियमवर कसोटी सामने होत, तेव्हा मा.मदन मोहन सामन्यांना नियमित हजेरी देत असत. गॅरी सोबर्स हा त्यांचा आवडता खेळाडू होता. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोणी ओळखीची व्यक्ती भेटली आणि ती त्यांच्याशी संगीतावर गप्पा मारायला लागली तर ते आवर्जून सांगत की हे ठिकाण फक्त क्रिकेटचा खेळ पाहण्याचे आणि त्यावर चर्चा करण्याचे आहे; तुम्हाला संगीतावर काही बोलायचे असल्यास उद्या माझ्या घरी या. सुरुवातीची पाच सहा वर्षे मदन मोहन यांची संघर्ष करण्यात गेली आणि पहिला चित्रपट गाजला तो ‘भाई भाई’, या चित्रपटाची सर्व गाणीही गाजली. मला त्यात आवडलेले एक श्रवणीय गीत आहे, ‘कदर जाने ना’. त्या अगोदर आलेला ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातील ‘देख तेरे इन्सान की हालत’ आणि ‘बस्ती बस्ती पर्बत पर्बत’ ही गाणी गाजली पण इतर गाण्यांची फारशी नोंद घेतली गेली नाही.

    ‘भाई भाई’ भरपूर चालला आणि मा.मदन मोहन यांना प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपटाचा रौप्य महोत्सव होणार पण मा.मदन मोहन यांचे दुर्दैव आड आले. २५ आठवडे पूर्ण व्हायच्या अगोदर चित्रपट पडद्यावरून काढला गेला आणि पहिल्या रौप्य महोत्सवाकरता मदन मोहन यांना आणखी काही वर्षे थांबायला लागले. मदनमोहन अतिशय शिस्तप्रिय संगीतकार होते. स्वच्छता, टापटिप आणि वेळेवर हजर राहणे हे त्याचे गुण होते. खवैय्या तर होताच पण स्वतः उत्तम कुकही होते. ते भेंडी मटण उत्कृष्ट बनवून दोस्ताना खिलवित असे अशी मन्ना डेनी आठवण सा॑गितली होती. हिंदूस्थानी वाद्याचा सुयोग्य वापर हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य होते. मा.प्रभाकर जोग, उत्तम सिंग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक यांच्याशिवाय मदनमोहन यांचे पान हलत नसे. ते सतारीचा विशेष चाहते होते. मा.रईस खान यांनी वाजवलेली 'आज सोचा तो आसू भर आये मधील सतार ऐकून लतादीदी रडल्या होत्या असे म्हणतात. 'रस्मे उल्फत' 'वो चूप रहे तो ' नैनो मे॑ बदरा छाये इ गाण्यामधील सतार अगावर काटा उभा करते. 'नौनिहाल' मधील प. नेहरूच्या अत्यंयात्रेवर चित्रित केलेले 'मेरी आवाज सुनो' हे गाणे ऐकून इदिंराजी॑चे डोळेही भरून आले होते. मा.मदनमोहन यांचे १४ जुलै १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / शैलेश दामले

    मदनमोहन यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=ocGQ2pDnzJs
    https://www.youtube.com/watch?v=bcacqhxf86M

    मदनमोहन व लता मंगेशकर यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=eXRvC91yLcQ&t=1243s
    https://www.youtube.com/watch?v=I8tVaKhVuBo

  • नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

    श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत.

  • विनोदी अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम

    मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.

  • लेखिका अरुणा ढेरे

    ‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे.