(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • आधुनिक मराठी नट, दिग्दर्शक, पार्श्वनाथ यशवंत आळतेकर (अळतेकर)

    १९२४ पासून त्यांनी अनेक मूकपटांत भूमिका केल्या तसेच काही मूकपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे झाला. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ इ. चित्रपट संस्थांमधून नट व दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामे केली. अनेक हिंदी, मराठी तसेच कन्नड व तमिळ बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शक या नात्याने काम केले. रेझिसाँर (दिग्दर्शक/ नाट्यव्यवस्थापक) आळतेकरांनी नंदू खोटे यांच्या ‘रेडिओ स्टार्स’ (१९३२) या नाट्यसंस्थेत सहभागी होऊन, तिच्याद्वारा श्री. न. बेंडे यांची बेबी व चाली, टिपणीस यांचे स्वस्तिक बँक व ठाकरे यांचे खरा ब्राह्मण ही नाटके रंगभूमीवर आणली.

    कालांतराने ‘रेडिओ स्टार्स’ ही संस्था सोडून आळतेकरांनी ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेत नट व सहकारी अशा नात्यांनी नाट्यविषयक मौलिक कार्य केले. पुढे त्यांनी ‘नॅशनल थिएटर अॅतकॅडमी’ ही नाट्याभिनयाचे व आवाज जोपासण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था चालविली. याच संस्थेतील काही विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी इंग्लं डमधील ‘लिट्ल थिएटर्स’ व अमेरिकेतील ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांच्या धर्तीवर ‘लिट्ल थिएटर’ ही संस्था स्थापून (१९४१) तिच्यातर्फे माझ्या कलेसाठी (१९४२),सारस्वत (१९४२) यांसारखी वरेरकरांची काही नाटके रंगभूमीवर आणली.

    रंगभूमीवरील त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी),‘बापूसाहेब’ (रंभा) वगैरेंचा उल्लेख करता येईल. आधुनिक पाश्चात्य नाट्यप्रणालींचे मराठी रंगभूमीवर प्रयोग करण्याचे आणि अभिनय व दिग्दर्शन यांत अभिनवता आणण्याचे श्रेय आळतेकरांस आहे. आळतेकरांच्या स्मरणार्थ ‘अभिनय’ या संस्थेमार्फत मुंबईच्या परिसरातील हौशी नाट्यसंस्थांसाठी १९६४ पासून नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. पार्श्वनाथ आळतेकर यांचे कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मानवी रक्तगट शोधणारा कार्ल लँडस्टायनर

    या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती.

  • चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे

    केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. त्या मुळे त्याला लहानपणापासून पासूनच कलेची आवड होती. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय.नाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

    त्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटच दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही. केदार शिंदेने दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये मुंबईत झाला. 'नाटक ना नाटक नु नाटक' असं या गुजराती नाटकाचे नाव असून 'द प्ले दॅट गोज राँग' या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा अधिकृत रिमेक आहे. बॉलिवूडस्टार शर्मन जोशीनं या नाटकाची निर्मिती केली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • शिवाजी’ हे नाव आयुष्यभर सन्मानपूर्वक धारण करणारा अभिनेता शिवाजी गणेशन्

    विल्लुपूरम चिनय्या गणेशन हे त्यांचे मूळ नाव. दक्षिणेत “श” ऐवजी “स” चा वापर होतो म्हणजे सिवाजी गणेसन. मध्यमवर्गीय तमीळ कुटूंबात त्यांचा जन्म झाला. एकदा शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेल्या नाटकात त्यानां मूख्य भूमिका मिळाली. नाटकाचे नाव होते “शिवाजी कंदा हिंदू राज्यम्” यातील शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. एका सार्वजनकि सभेत त्यावेळचे प्रसिद्ध समाजसेवक ई.व्ही.रामास्वामी यांनी त्यांचा “सिवाजी” असा उल्लेख केला आणि नंतर आयुष्यभर त्यांचे हेच नाव रूढ झाले. काय गंमत आहे बघा तमीळ ‘विल्लुपूरम चिन्नय्याचा’ शिवाजी गणेशन झाला तर मराठी ‘शिवाजी गायकवाडचा’ तमीळ रजनीकांत झाला. आणि दोघेही आपापल्या काळातले श्रेष्ठ अभिनेते ठरले.

  • बी. जी. चितळे डेअरीचे संचालक भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे

    काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले.

  • क्षितिज झारापकर

    लेखक दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.

    दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी 'गोळाबेरीज' या सिनेमात पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधील ३२ व्यक्तिरेखा एकत्र आणल्या असून, त्यात 'म्हैस'चाही समावेश आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • विको’ ब्रँडचे सर्वेसर्वा संजीव पेंढारकर

    विको' ब्रँडचे सर्वेसर्वा संजीव पेंढारकर यांचा जन्म ५ जानेवारी १९६५ रोजी झाला.

    संजीव पेंढारकरांचे आजोबा केशव पेंढारकर यांचे नागपुरात किराणा दुकान होते. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी आपले दुकान बंद करून मुंबईत येऊन “कॉस्माटिक” ब्रँडला “केमिकलमुक्त” पर्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. असा बिझनेस करण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना केशव विष्णू पेंढारकर यांनी मुंबईत येऊन १९५२ साली 'विको (विष्णू इंडस्ट्रीज केमिकल कंपनी) ग्रुप' ची स्थापना केली. संजीव पेंढारकर यांचे वडील गजानन पेंढारकर यांनी त्या बिझनेसला योग्य दिशा दिली आणि संजीव पेंढारकर यांनी त्या 'विको ग्रुप'ला मोठी उंची गाठून देण्याचे काम करीत आहेत.

    'विको ग्रुप'ने रोज वापरातील अनेक प्रोडक्ट्स निर्माण केली आहेत. त्यात वज्रदंती पावडर, वज्रदंती पेस्ट, वज्रदंती (शुगर फ्री), टर्मरिक स्किन क्रिम, टर्मरिक WSO, टर्मरिक स्किन शेव्हीग क्रिम, नारायणी क्रिम यांसारखी अनेक उत्पादने विको लॅब्सने तयार केली आहेत. विको कंपनीचे ‘विको नारायणी क्रीम’ आणि ‘विको हर्बल फेश वॉश’ ही नवीन उत्पादने भारतातच नव्हे तर जगात स्वीकारली गेली आहेत. विकोची सर्व उत्पादने त्या देशातील आरोग्य विभागाच्या आवश्यकतेनुसार विधिवत नोंदणीकृत आहेत.

    कंपनीचा टर्नओव्हर ४०० कोटींहून अधिक असून डोंबिवली, नागपूर व गोवा येथे प्रोडक्शन युनिट आहेत. एवढेच नाही अमेरिका, युके, ओमान, कुवैत, बहारिन, सौदी अरेबिया, उत्तर अमेरिका, मॉरिशस, फिजी, सायप्रस, वेस्ट इंडीज आणि आइसलँड या देशांमध्ये विकोचे प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट होतात. एवढेच नाहीतर 'विको ग्रुप' ने त्याहून मोठी मजल मारत व्यापार, जाहीरात आणि शिक्षण क्षेत्रात मोठे काम करीत आहे. स्पर्धेच्या या युगातही आपला ब्रँन्ड अग्रणिय ठेवाणारे यशस्वी मराठी उद्योजक म्हणूनच ते पाय रोवून आहेत.

    २०१७ मध्ये द नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडिया पुरस्कृत ‘नॅशनल ग्लोरी ऑफ इंडिया’ या पुरस्काराने संजीव पेंढारकर यांना गौरवले आहे.

    संजीव पेंढारकर यांनी 'हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर' हे पुस्तक लिहिले आहे. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

    कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून आलंय. या काळात नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागलेत, अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नवउद्योजकांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी आपण हे पुस्तक लिहल्याचं संजीव पेंढारकर यांनी सांगितलं. तसेच या वर्षी लॉकडाऊन काळात अक्षरश: लाखो लोकांचे रोजगार बुडाले आहेत. हे रोजगार पुन्हा सुरू व्हावेत, उद्योगव्यवसायाला उभारी मिळावी, बेरोजगारी कमी व्हावी म्हणूनच संजीव पेंढरकर यांनी एकाचवेळी ऑनलाइन रेकॉर्डेड कोर्सेस सुरू केले होते.

    संजीव पेंढारकर यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • वीर तानाजी मालुसरे

    शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.

  • हिंदी चित्रपटसृष्टीचे जंपिंग जॅक जितेंद्र

    जितेंद्र हे बॉलीवुडचे केवळ एक लोकप्रिय नायक अथवा अभिनेते नाहीत तर त्याचबरोबर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपट यांचे ते निर्माते आहेत. बालाजी टेलेफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स या उद्योगांचे ते अध्यक्ष आहेत.

  • ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर

    त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे.