(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रीय चित्रकार बाबुराव नारायण सडवेलकर

    बाबुराव सडवेलकर यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये व महाविदयालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. त्यांचा जन्म २८ जून १९२८ रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय जीवनातच चित्रकार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या ठायी निर्माण झाली व ह्या प्रेरणेने त्यांनी ‘ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ’, मुंबई येथे उच्च कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला.

    रंग व रेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका त्यांनी संपादन केली. त्यानंतर ‘ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ’मध्ये १९५३ ते ७१ या काळात त्यांनी चित्रकला बाबुराव सडवेलकरबाबुराव सडवेलकरविभागात अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केले. अध्यापन करीत असताना ‘ फुलब्राइट स्मिथमुंट ’ उपकमांतर्गत शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला गेले व आधुनिक कलाशिक्षण-पद्धतींचा व तंत्रांचा तेथे त्यांनी अभ्यास केला. तत्पूर्वी अधिव्याख्याता असताना ते बाँबे ग्रूप ऑफ आर्टिस्टचे सभासद होते. या ग्रूपतर्फे त्यांनी सहा वर्षे प्रदर्शने भरविली.

    सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या रूपभेद या कला नियतकालिकाचे ते संपादक होते. १९६७ साली महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या कला संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. कला संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव व संस्मरणीय ठरली. १९५५ ते ७४ या काळात त्यांनी स्वत:च्या चित्रांची सहा एकल प्रदर्शने (वन मॅन शो) भरविली. त्याचप्रमाणे अमेरिकेत प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड व न्यूयॉर्क येथे त्यांनी स्वत:च्या चित्रांची एकल प्रदर्शने भरविली. अनेक आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनांतून व कलामहोत्सवांतून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली. उदा., व्हेनिस, पॅरिस, साओ पाओलो येथील व्दैवार्षिक प्रदर्शने; तव्दतच मॉस्को, टोकिओ, सायगाँव (हो-चि-मिन्ह) येथील त्यांची प्रदर्शने.

    अमेरिकेत १९५० ते ६० या दशकात बहरलेला पाश्चात्त्य अमूर्त (अॅकबस्ट्रॅक्ट) चित्रकलेचा नवप्रवाह मुंबईच्या कलाक्षेत्रात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. पॉल क्ले या स्विस आधुनिक चित्रकाराचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. त्यांची अमूर्त शैलीतील वैशिष्टयपूर्ण गाजलेली चित्रे म्हणजे वन वर्ल्ड (१९५७), लूनॅटिक (१९५९), द अर्थ - I (१९६२), इमेज ऑफ द सिटी (१९६३), द कॉस्मिक सिटी II (१९७४), फ्लाइट ऑफ द लूनर रॉक (१९७४), फ्लोटिंग सिटीज (१९८१) इत्यादी. त्यांच्या अमूर्त चित्रांतील प्रतिमा वस्तूच्या सारभूत तत्त्वाच्या सूचक असतात. त्यांच्या चित्रांतील प्रतिमा-प्रतीकांतून रूपकात्मक, गूढ, आध्यात्मिक भाव सूचित केले जातात. त्या दृष्टीने चित्रांची शीर्षकेही अन्वर्थक वाटतात. त्यांच्या चित्रांमध्ये साधलेल्या रंग व आकार यांच्या सुसंवादी मेळातून अपूर्व सौंदर्य प्रतीत होते. व्यक्तिचित्रे रंगविण्यातही त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळविले. सुरूवातीच्या काळात त्यांनी विपुल व्यक्तिचित्रे रंगविली.

    बॉबी, रीटा, दादाजी, गे हेम्स, विजू ही त्यांनी रंगविलेली काही उत्कृष्ट व्यक्तिचित्रे होत. चेहऱ्यावरील भावदर्शनातून व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे, ही त्यांच्या व्यक्तिचित्रांमागील प्रेरणा होती. तैलरंगाप्रमाणेच जलरंग-माध्यमावरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. मुंबईतील अनेकविध स्थळांची शेकडो चित्रे अपारदर्शक रंगांत रंगवून त्यांनी मुंबईचे आगळेवेगळे रंगमय सचित्र दर्शन घडवले. छटायुक्त (टिंटेड) कागदाच्या नैसर्गिक छटेचा कौशल्यपूर्ण वापर, रंगांचे द्रूत फटकारे, रंग व छाया-प्रकाशाचे मनोहारी दर्शन इ. वैशिष्टयंमुळे ही चित्रे लक्षणीय ठरली आहेत. भित्तिचित्रण (म्यूरल) व भित्तिलेपचित्रण (फेस्को) तंत्रांचाही त्यांचा गाढा, सखोल व्यासंग होता.

    खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील व एस्. के. एफ्. फॅक्टरीतील भित्तिचित्रे (म्यूरल्स) हे मोठे प्रकल्प त्यांनी सांघिक पद्धतीने काही विदयार्थ्यांच्या साहाय्याने पूर्ण केले. मुंबई दूरदर्शनवरून त्यांनी अनेक कलाविषयक कार्यकम सादर केले. चित्रकथी या लोककला-परंपरेवर त्यांनी अनुबोधपट तयार केला. चित्रकला वअन्य ललित कला यांविषयी त्यांनी सैद्धांतिक व उपयोजित स्वरूपाचे मौलिक लेखनही केले आहे. वर्तमान चित्रसूत्र (१९९६) हा त्यांचा कलाविषयक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : बाँबे आर्ट सोसायटीची सुवर्णपदके (१९५४, १९५५, १९५६, १९५८ व १९५९). ‘ नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ’ नवी दिल्ली; ‘ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ’, मुंबई; ‘ पंजाब नॅशनल म्यूझीअम ’, चंडीगढ; ‘ टाऊन हॉल म्यूझीअम ’, कोल्हापूर इ. संस्थांमध्ये त्यांची चित्रे कायमस्वरूपी संग्रहीत करण्यात आली आहेत. बाबुराव नारायण सडवेलकर यांचे २३ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. मराठी विश्व कोश

  • धैर्यधर’ – मास्टर दीनानाथ मंगेशकर

    स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता.

    बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. "मानापमान"मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले !

    गरिबी-श्रीमंतीचा झगडा, शौर्याच्या पार्श्वभूमीवरील शृंगाररसाने ओथंबलेले मानापमान नाटक ! त्याला कालमानाचे, वेशांतराचे बंधन कशाला ? म्हणून मास्टर दीनानाथांनी आपल्या पहिल्या रुपामध्ये आमुलाग्र बदल केला. पहिल्या अंकातील साधा लष्करी नोकरीमधला एक सेनापती, आपल्या वधूची निवड करावयास येतो, म्हणजे तो गणवेशात नसणारच ! दुस-या अंकाचेवेळी, छावणीभोवती चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असतो, त्यावेळी त्याला गणवेश हवाच ! तिस-या अंकात त्याला पृथ्वीवर महाराजांकडून तीन चांदीची सरदारी आणि पंचवीस लाखांची जहागिरी मिळालेली असते, म्हणजे धैर्यधर त्याच दिमाखात दिसावयास हवा ! चौथ्या अंकात त्याचा ऐश्वर्यभोगांकित शृंगाररस सादर करावयाचा आहे म्हणून मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेतील वेशाविश्करण वेळोवेळी बदलून, रंगभूमीवर आणले, याचे नाट्याचार्य खाडिलकर ह्यांनी खूप कौतुक केले. ते म्हणाले, "माझे हे नाटक कालमानानुरूप आणि विधानककुशल आहे, असा जो मला सुरुवातीपासून एक आत्मविश्वास होता, तो या स्थित्यंतरित मास्टर दीनानाथांच्या भूमिकेनेही बळावला !"

    रणदुंदुभी नाटकामधील मास्टर दीनानाथांची तेजस्विनीची भूमिका बघून, श्रीमान पसारे अप्पा ह्यांनी मास्टर दीनानाथांना बक्षीस म्हणून चांदीची ढाल आणि तलवार दिली होती. ह्या चांदीच्या ढालीचा आणि तलवारीचा उपयोग मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेसाठी केला !

    मानापमान नाटकामध्ये धैर्यधराची भूमिका करतांना, दुस-या अंकात, मास्टर दीनानाथांचा वेष इंग्रजी चित्रपटातील एखाद्या जुन्या काळच्या सेनापातीप्रमाणे दिसे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते रुदाल्फ व्हलेंटिनो हे अशा पद्धतीचा पोषाख करीत. या सेनापतीच्या पोषाखात मास्टर दीनानाथ रुबाबदार दिसायचे !

    मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या पदांना रसानुकुल नव्या चाली लावल्या. "माता दिसली" या पदात, "नेत सकल रणवीर रणासी" ही ओळ गातांना मास्टर दीनानाथ तानांची उसळी घेत. रणवीरांचे ठिकाण रणांगण हे ते पटवून देत असत, "चंद्रिका ही जणू" हे पद मास्टर दीनानाथ दुर्गा रागात गायचे. त्रिताल बदलून, रूपक तालात, म्हणायचे. "दे हाता या शरणांगता" या पदाच्यावेळी तर हा वीरपुरुष केवळ वनमालेच्या दृष्टीक्षेपात घायाळ झाल्यामुळे हतबल, दीन होऊन, तिची प्रेमभराने मनधरणी करीत असल्याचा गोड भास रसिकांना होत असे. "रवी मी चंद्र कसा" ही चाल मास्टर दीनानाथांनी कवीच्या भावनांची सुयोग्य गुंफण करून केली, असे वाटते. धैर्यधराच्या त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी ठेक्याची योजना केली.

    "प्रेमसेवा शरण" हे ऐकतांना तर रसिक प्रेक्षाकांची खात्री व्ह्यायची, की रणांगणावरील हा सेनापती, रमणीच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालून घायाळ झालाय ! मूळ भिमपलास मधले हे पद मास्टर दीनानाथांनी मुलतानी अंगाने म्हणण्यास सुरुवात केली. मास्टर दीनानाथांच्या ह्या भूमिकेला, या पदांना संगीतप्रेमींनी प्रत्येक खेळास उदार आश्रय दिला. प्रत्येकवेळी वन्समोअर मिळणारे पद होते, "शूरा मी वंदिले"!

    मानापमानच्या प्रयोगास सुरुवात होताच, मास्टर दीनानाथांच्या उत्साहाला जणू उधाण फुटायचे ! आपल्या नवीन चाली रसिकांना आपण कधी ऐकवितो, असे त्यांना व्ह्यायचे. नाटकातील संभाषणे आवरून, ते गाण्यावर स्थिर होत असत. गाण्याची सुरुवात करतांना, मास्टर दीनानाथ पेटीवाल्यांच्या साथीची वाट पाहायचे नाहीत. त्यांच्या गाण्यावरून, जणू पेटीवाल्यांनी सूर लक्षात घ्यायचा ! रंगभूमीवरच्या गायनात पेटीची साथ न घेता, गाण्याची अचूक फेक करणारे मास्टर दीनानाथ पहिलेच !

    मानापमानमध्ये "माता दिसली समरी" या प्रथम पदापासून ते "प्रेम सेवा शरण" या अखेरच्या पदापर्यंत, प्रत्येक पदाला, प्रत्येक वेळी टाळ्यांच्या कडकडाटात वन्समोअर मिळविणारे दीनानाथ साक्षात "स्वरनाथ" होते !

    एकदा शनिवारी कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये मानापमानचा प्रयोग जाहीर झाला होता. त्याच दिवशी, त्याच वेळी, कोल्हापूरमध्येच देवल क्लबमध्ये मंजीखाँसाहेबांचे गाणे ठरले होते. बाबा देवल चिंतातूर झाले. ते वसंत देसाई ह्यांना म्हणाले, "अरे वसंता, आज आपल्याकडे मंजीखाँसाहेबांचे गाणे आणि तिकडे दीनाचे मानापमान, सगळेजण तिकडेच जाणार". हे ऐकताच वसंत देसाई ह्यांनी आनंदाने जोरात टाळी वाजवली !

    पॅलेस थिएटर हाउसफुल्ल होते. धैर्यधराची भूमिका केलेल्या विद्यमान नटांनी कळत-नकळत "बलवंत"च्या या धैर्यधराला चार-आठ वेळा पैसे खर्चून मानाचा मुजरा केला होता.
    बळवंत संगीत मंडळीने हैद्राबादहून आपला मुक्काम मुंबईस आणला, तेव्हां एकट्या मानापमान ह्या नाटकावरच मुंबईचा मुक्काम नवीन नाटकाप्रमाणे अत्यंत यशस्वी केला.
    नटसम्राट बालगंधर्व, विनायकराव पटवर्धन, कृष्णराव फुलंब्रीकर, बापूराव पेंढारकर, आदी कलावंतांनी, मास्टर दीनानाथांची धैर्यधराची असामान्य भूमिका औत्सुक्याने पाहून गौरविली !

    गोवा येथील मानापमानचा प्रयोग पाहून, लयभास्कर कपिलेश्वरी ह्यांनी मास्टर दीनानाथांना विचारले, "भाळी चंद्र"ची ठेवण आपण अशी कां योजली ?" त्यावर मास्टर दीनानाथ उत्तरले, "धैर्यधर जर मस्तकावर चंद्र धारण केलेला सुचवलाय, तर अशा उंच स्वरांची ठेवण नको कां ? प्रथम भावना आणि मग स्वर निर्माण झाला." मास्टर दीनानाथांचे हे उत्तर, कपिलेश्वरी ह्यांना मनोमन पटले !

    श्रीमदजगत्गुरू श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी ह्यांनी मास्टर दीनानाथ ह्यांना, वैशाख वद्य ४ शके १८४४ म्हणजेच १४ मे १९२२ रोजी अमरावती येथे, "संगीतरत्न" हे बिरूद बहाल केले. त्याचे पूर्वपुण्य मास्टर दीनानाथांना धैर्यधराच्या निमित्ताने मिळाले !

    बलवंत संगीत मंडळीने, १९३८ मध्ये कंपनीच्या पुनरुज्जीवनानंतर पहिला "रणदुंदुभी"चा तर दुसरा प्रयोग "मानापमान"चा केला होता. तेव्हांची एक आठवण ! त्या दिवशी पुणे येथे नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचा पहिला अंक झाल्यावर, मास्टर दीनानाथांचे स्नेही दादासाहेब जेस्ते त्यांना भेटण्यासाठी रंगपटात गेले. पाहतात तो काय ? मास्टर दीनानाथ तापाने कण्हत होते. जवळच औषधाची बाटली होती. "एवढा ताप आहे, तर आज काम कां करता ?" असे जेस्ते ह्यांनी विचारले. त्यावर मास्टर दीनानाथ म्हणाले, "संपूर्ण महिन्यात बलवंत संगीत मंडळीने लावलेली सर्व नाटके, माझ्या अनुपस्थितीमुळे बंद करावी लागली." प्रेक्षक तर मास्टर दीनानाथांशिवाय नाटक पाहण्यास तयार नव्हते. कंपनी चालविणे भाग होते. त्यामुळे तापातसुद्धा काम करणे, हे मास्टर दीनानाथांनी

    आद्यकर्तव्य मानले होते. विशेष म्हणजे दुस-या अंकापासून त्यांनी नेहेमीप्रमाणे आपले आकर्षक गायन सादर केले !

    या दिलदार आणि दानशूर धैर्यधराने गिरगावच्या एका शाळेच्या इमारत निधीसाठी मदत म्हणून "मानापमान"चा प्रयोग केला होता.

    धुळ्याला १९४१ मध्ये बलवंत संगीत मंडळीची इतिश्री झाल्यानंतर, केवळ लोकाग्रहास्तव मास्टर दीनानाथांनी सांगली मुक्कामात मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका केली. ती रंगभूमीवरील त्यांची शेवटची भूमिका ठरली ! हा प्रयोग राजाराम संगीत मंडळीने केला होता. कंपनीचे मालक गंगाधरपंत लोंढे ह्यांनी मास्टर दीनानाथांना आग्रहपूर्वक विनंती केली होती.

    सांगली मुक्कामात १९४१ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारावून टाकणारा हा एक प्रसंग ! मास्टर दीनानाथांनी, "दे हाता शरणांगता" ह्या पदातील "आपदा भोगी नाना" या ओळी म्हणताच, त्यांना गहिवरून आले. भावनेने ओथंबलेल्या स्वरात, पद चालू असतांनाच ते म्हणाले, "मला याच ठिकाणी आपदा भोगाव्या लागल्या." मास्टर दीनानाथांचे, हे वाक्य उपस्थित रसिक श्रोतृवृंदाने ऐकले मात्र आणि काही क्षण, सा-या थिएटरमध्ये गंभीर अशी शांतता पसरली. प्रत्येकाच्या चर्येवर मास्टर दीनानाथांविषयी वाटणारी सहानुभूती दिसू लागली. या व्यावहारिक जगात मास्टर दीनानाथांचे म्हणणे काय चूक होते ?

    नाटकातील हा "धैर्यधर" कलावंत, वास्तव जीवनातही कृतीने आणि वृत्तीने तसाच "धैर्यधर" होता !

    {मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झालेला लेख}

    लेखक : उपेंद्र चिंचोरे

  • हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील कलाकार अनुपम खेर

    अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरवात १९८२ साली “आगमन” या चित्रपटाने झाली. पण १९८४ सालचा महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटाने मा.अनुपम खेर यांचे नाव झाले. ‘सारांश’मध्ये बी. व्ही. प्रधान या शाळेच्या निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांची भूमिका करायची होती. या भूमिकेसाठी निर्मात्यांना कोणी तरी प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार हवा होता. त्या वेळी या भूमिकेच्या मानाने तरुण असलेल्या अनुपम खेर यांनी ही भूमिका आपण उत्तम वठवू शकू, असा विश्वास दिला होता. अनेक घडामोडींनंतर अखेर ही भूमिका त्यांच्या पदरी पडली आणि त्यांची कारकीर्द सुरू झाली. बॉलीवूडमध्ये ‘हम आपके है कौन’, ‘डॅडी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सारख्या व्यावसायिक चित्रपटांपासून ते ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’, ‘खोसला का घोसला’, ‘मैने गांधी को नही मारा’सारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमधलीही त्यांची वाट जुनीच आहे. ज्या वेळी ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे मोजकेच कलाकार हॉलीवूडमध्ये काम करत होते त्याच वेळी अनुपम खेर यांनी तिथली वाट धरत ‘बेंड इट लाईक बेकहॅम’, अँग लीचा ‘लस्ट, कॉशन’ आणि वूडी अॅडलनचा ‘यू विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर’ अशा हॉलीवूडपटांमधून काम केलं होतं. अकॅडमी अॅशवॉर्ड विजेता ठरलेला रॉबर्ट डी निरो यांचा ‘सिल्वर लाइनिंग्ज प्लेबुक’ हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला हॉलीवूडपट आहे. त्याशिवाय, हॉलीवूड अभिनेता गेरार्ड बटलर बरोबर ‘द हेडहंटर कॉलिंग’ या मार्क विल्यम दिग्दर्शित हॉलीवूडपटातही त्यांनी काम केलं असून हे दोन्ही चित्रपटाही त्यांनी काम केले आहे. अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपटात व १०० हून अधिक नाटकात काम केले आहे. पाचशेव्या चित्रपटाचं नाव ‘द बिग सिक’ असं असून मायकेल शोवॉल्टर दिग्दर्शित या चित्रपटात ऑस्कर विजेता अभिनेता हॉली हंटर, झो काझन आणि रे रोमानो हे हॉलीवूड कलाकार काम केले आहे. मा.अनुपम खेर यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे. एक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे. त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.

    अनुपम खेर भारतीय फिल्म सेंसर बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. ते भारतीय नेशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्ष सुद्धा होते. १९७८ मध्ये याचे ते विद्यार्थी सुद्धा होते. २००७ मध्ये अनुपम खेर यांचे प्रिय मीटर सतीश यांच्या सोबत मिळून करोल बाग फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. या प्रोडक्शन खाली तेरे संग हि पहिली फिल्म होती. २०११ मध्ये मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री जयाप्रदा सोबत मल्याळम भाषी रोमांटिक ड्रामा प्राणायाम चित्रपट सुरु केला होता. त्यांनी मराठीतही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी, कश्मीरी, मल्याळम भाषांच्या विविध अंगाने अभिनय केला आहे. २००९ मध्ये कार्ल फ्रेड्रिंकसन यांच्यासाठी उडी मधील अनिमेशन मधील बांगलादेश निर्मिती वरील ड्रामा फिल्मसाठी करारबद्ध केले गेले आहे. २०१६ मध्ये ABP न्यूज वरील भारताच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सूत्र संचालन केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मालक दाजीकाका गाडगीळ

    दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८च्या प्रारंभी ‘मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले.

  • सुविख्यात नृत्यांगना सीतारादेवी

    नर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले.

  • सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी

    विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.

  • टॉम ॲ‍ण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच

    १९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम ॲ‍ण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या नव्या सिरीजची निर्मिती केली.

  • वॉल्टर एलिआस डिस्नी

    अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला 'मिकी माऊस' गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न.

    ‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या , न कळणार्याय कामात अडकून पडते. वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली.

    ‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. १९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टिमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले.

    मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला. (१९२८). या काळापर्यंत मूकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला. १९३७ सालची Snow white & the Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला.

    वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या साऱ्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्याठ वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते.

    मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची. यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. १९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला.

    वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सलग २० वर्षे एबीसी अॅ ण्ड एबीसीसारख्या मोठ्या चॅनलवर प्रसारित होत होती. वॉल्ट डिस्नेने जे पैसे कमावले तेच त्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट डिस्नेलँडमध्ये गुंतवले. 1१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये शेकडो एकर जमिनीवर डिस्नेलँड तयार करताना वॉल्ट डिस्नेने सांगितले होते की, मनोरंजन आणि कुतूहल असलेल्या या जागेला तोपर्यंत पूर्णत्व येणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये कल्पनाशक्ती आहे. कॅलिफोर्निया, आरलँडो, पॅरिस, टोकियो आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले डिस्नेलँड खरोखर परीकथेतील कल्पनेप्रमाणे आहे. त्यांनी जन्माला घातलेले कार्टून, डिस्नेलँड आणि अॅटम्युझमेंट पार्क आजही मनोरंजन जगात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे.

    लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे.
    वॉल्ट डिस्ने यांचे निधन १५ डिसेंबर १९६६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर

    छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले.

    इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या. शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते.

    शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. गेल्याच महिन्यात त्यांचे ‘अजरामर उद्गार’ हे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते. इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते. निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

    शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या. निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • क्रीडा समीक्षक सुनंदन लेले

    आपल्या सर्वांना सुनंदन लेले हे एक क्रीडा समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत क्रिकेट खेळाकरिता आपल्या
    लिखाणातून खूप मोठे योगदान दिले आहे.