सुलक्षणा केवळ गायिकाच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दीत तिने अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जितेंद्र, शम्मी कपूर, राजेश खन्ना या अभिनेत्यांसोबत काम केले होते. उलझन, सलांखे, हेराफेरी, खानदान, वक्त की दीवार, दो वक्त की रोटी हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
त्याच्या ३८ नाटकांपैकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस ॲटड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्यूय’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात.
दूरदर्शन सारख्या कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय रुचेल, पचेल याचा विचार करून, अनेक कथासंग्रह वाचून, त्यातून निवडलेल्या कथांचं नाटयीकरण, पटकथा-संवादासह स्वत: लिहून काढत बसलेले ते असायचे ते.. दुस-या दिवशी, त्या पटकथेचं कॅमेरा स्क्रिप्ट तयार झालं की मग कथेला साजेशी पात्रयोजना, त्यासाठी संपर्क साधणे वगरे.. तिस-या दिवशी दुपारी वाचन. संध्याकाळी कॅमे-याच्या अंदाजानं हालचालींचं नियोजन.. आणि लगेच पुढल्या दिवशी कलागारांत चित्रीकरण, असा त्यांना घटनाक्रम वर्षानुवर्ष होता.
ना.सी. फडके यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते.
सिद्धार्थ जाधव हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा विनोदी अभिनेता. त्याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबई येथे झाला. सिद्धार्थ जाधवने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला. ‘हुप्प हुय्या’ मधील ‘हणम्या’, ‘दे धक्का’ मधील ‘धनाजी’, ‘लालबाग परळ’ मधला ‘स्पीडब्रेकर’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधला ‘उस्मान पारकर’ आणि अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले आहे. मराठी चित्रपटांबरोबरच सिद्धार्थने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलंय. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातही काम केले आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिनही माध्यमात सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अन्य प्रसार माध्यमांमधून चित्रपट व कलाकारांविषयी सातत्याने लेखन करणाऱ्या अशोक शेवडे यांची पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी ख्याती होती. देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या.
दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.
शर्मिला टागोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुरी या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी जबलपुर, मध्य प्रदेश येथे झाला. सत्तरच्या शतकात सर्वसामान्य, नाकासमोर चालणा-या मुलीला ग्लॅमरच्या जगात पाय रोवणे कठीण होते. पण, जया भादुरी यांचा साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली.
जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी 'महानगर' या चित्रपटात संधी दिली.
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'सुमन' मध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि आपल्या 'गुड्डी' या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. 'गुड्डी' चित्रपटही गाजला आणि जया भादुरी यांना लागलीच राजश्री प्रोडक्शनचा की फिल्म ‘उपहार' या चित्रपटाची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी अधिक काम केले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते गुड्डीच्या सेटवर भेटले. बंगाली संस्कृतीनुसार ३ जून १९७३ मध्ये दोघांचा विवाह पार पडला होता. अमिताभ आणि जया बच्चन या जोडीचे 'चुपके चुपके', 'अभिमान,' 'सिलसिला' आणि 'जंजीर', 'एक नजर' 'कभी खूशी कभी गम' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. आज बच्चन परिवार जगातील ग्लॅमरस, प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार आहे. त्यांचे कुटूंब सुपरस्टार असले तरी त्यामागे जया भादुरी बच्चन यांचे मोठे योगदान आहे, हे सर्वज्ञात आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जया भादुरी यांची गाणी व चित्रपट
https://youtu.be/neCQg_V765U
https://youtu.be/kkTj4kyfhN8
https://youtu.be/YBhs0DBcDYs
अमिताभचा १९७७ सालचा अमर अकबर अँथोनी हा अतिशय गाजलेला चित्रपट कोणाला माहित नाही असे होणे नाही. आजही या चित्रपटातील गाणी आणि संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटात अमिताभने साकारलेले अँथोनी नावाचे पात्र फारच गाजले.
लोकांच्या मनावर या पात्राने त्या काळी अधिराज्य गाजवले असे म्हटले तर वावगे ठरू नये. चित्रपटातील अमिताभच्या पात्राचे वर्ण करणारे ‘माय नेम इज़ अँथोनी गोन्सालवीस , मैं दुनिया में अकेला हूं.’ हे गाणं तर आजही गुणगुणण्यासारखे आहे.
आता तुम्हाला आम्ही याच पात्राच्या नावाबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहोत.
तुम्हाला वाटत असेल की अँथोनी गोन्सालवीस हे नाव लेखकाच्या लेखणीतून काल्पनिकरित्या उतरले असेल, पण हे खरं नाही आहे. अँथोनी गोन्सालवीस या नावाचा एक व्यक्ती आपल्या बॉलीवूड मध्ये कार्यरत होता, त्याच्याच नावावरून अमिताभच्या रांगड्या पात्राचे नाव अँथोनी गोन्सालवीस ठेवण्यात आले होते.
आपल्यापैकी बहुतेक जणांना ही गोष्ट देखील ठावूक नसेल की मूळ कथेमध्ये अमिताभच्या पात्राचे नाव अँथोनी फर्नांडीस ठेवण्यात आले होते.
या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं होतं, तर गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी. एकदा हे तिघं मिळून गाण्यांबद्दल चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ‘माय नेम इज़ अँथोनी फर्नांडीस’ या बोलासह गाण जास्त आकर्षक वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी गाण्यात बदल करायचे ठरवले, त्यानुसार पात्राचे नाव देखील बदलून अँथोनी गोन्सालवीस करण्यात आले. मुख्य गोष्ट म्हणजे हे नाव प्यारेलाल यांनी सुचवले होते.
प्यारेलाल यांनी हे नाव सुचवलं कारण त्यांना ज्या व्यक्तीने व्हायोलीन शिकवले त्यांचे नाव अँथोनी गोन्सालवीस होते.
एकप्रकारे या गाण्यामध्ये आणि संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्या गुरुचे नाव वापरून त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा प्यारेलाल यांचा हेतू असावा. त्यांच्या या मागणीला चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी देखील दुजोरा दिला. त्यामुळे अँथोनी गोन्सालवीस हे नाव वापरण्यात आले.
प्यारेलाल यांचे गुरु म्हणजे अँथोनी गोन्सालवीस हे बॉलीवूडमधले पहिले म्युजिक अरेंजर होत. त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक आहे. संगीतकार मदन मोहन पासून ते आर.डी. बर्मन सारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे.
गाण्याच्या दोन अंतरामध्ये म्युजिक देण्याचा ट्रेंड देखील अँथोनी गोन्सालवीस यांनीच बॉलीवूड मध्ये आणला.
संगीतकारांसाठी सर्वात प्रथम स्टाफ नोटेशन्स बनवण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. १९६० साली त्यांनी संगीत क्षेत्रातून संन्यास घेतला होता. २०१२ साली त्यांचे निधन झाले.
भारतीय संगीत क्षेत्रामध्ये असे अमुलाग्र बदल घडवून आणणारा हा व्यक्ती मात्र कधीही रसिकांपर्यंत पोचू शकला नाही, परंतु त्यांचे शिष्य प्यारेलाल यांनी मात्र त्यांना एक अनोखी गुरु दक्षिणा देत अँथोनी गोन्सालवीस हे नाव अजरामर केले.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.
'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मोहम्मद अझिज यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA
Copyright © 2025 | Marathisrushti