(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • गझलसम्राट मेहंदी हसन

    “पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, “अब के हम बिछडे‘, “रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, “तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या.

  • ईबोला रोग नायजेरियातून रोखणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह

    गेल्या अनेक वर्षांपासून ईबोला आफ्रिकन देशांना त्रास देतोय. कोरोनाप्रमाणेच ताप, सर्दी, खोकला, फुफ्फुसांना सूज अशी लक्षणं या ईबोलामधे दिसतात. मात्र, कोरोनापेक्षा हा विषाणू कित्तीतरी घातक असल्याचं तज्ञांचं मत आहे. ईबोलाच्या पहिल्या पेशंटला हॉस्पिटलमधे रोखून हा भयानक साथरोग नायजेरिया देशात पसरण्यापासून वाचवणाऱ्या नायजेरियन डॉक्टर अमेयो स्टेला अडाडेवोह यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. 

  • बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद

    आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.

    मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला "दो बिघा ज़मीन" व "प्यासा" " या चित्रपटात छोटी मोठी कामे केली. पहिला ब्रेक परवरिश या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भाऊ म्हणून रोल केला. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोक्यो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांना त्यांना कॉमेडियन म्हणून खूप आवडले. नंतर मेहमूद यांनी त्याच्या स्वत:चे प्रॉडक्शन हाउस चालू केले. प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस-कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठ च्या दशकातील हिट चित्रपट पड़ोसन. पड़ोसनला अजून ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते.

    मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते. 'सु्ंदर' सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर महमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच 'हमजोली' सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.

    हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेला मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्यासुध्दा भाग पाडले. 'कुंवारा बाप', 'लाखो में एक जैसा'सारख्या सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये महमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. 'कुंवारा बाप' ही महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता.

    आई एस जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर महमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा हिंदी चित्रपटांमधून काम केले.

    मेहमूद यांचे २३ जुलै २००४ रोजी निधन झाले. मेहमूद यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन

    मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. १८१७ साली जेम्स पार्किन्सन याने प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. या आजाराला ‘पार्किन्सन रोग’ असे म्हणतात. या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो.

  • लेखक जयवंत दळवी

    जयवंत दळवी यांच्या कादंबऱ्या आणि नाटके पाहिली तर मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्यात दिसतात.

  • आदिनाथ कोठारे

    आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९८४ रोजी झाला. बालपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी होती.. महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे याला 'माझा छकुला' या चित्रपटातून लाँच केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून दिली होती. अभिनय करता करता आदिनाथ यांनी एम.बी.ए. पूर्ण केले होते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला झपाटलेला २, खबरदार, इश्कवाला लव्ह, पछाडलेला, निळकंठ मास्तर असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.

    अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर 'सरगम' या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

    शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली.

    चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले. आदिनाथ आणि उर्मिला हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • आरती प्रभू

    एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई या गावी झाला.आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणार्याल मा.आरती प्रभूंच्या यांच्या वडिलांना अर्थार्जनासाठी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी स्थलांतर करावं लागलं. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना ताबडतोब तेथून ही स्थलांतर करावं लागलं, आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले, पण त्यांच्या शिक्षणात सतत काहीना काही कारणांनी खंड पडत राहिला, पण १९६० मध्ये ते एस.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण त्याआधीच खानोलकरांनी लेखनाला सुरुवात केली होती. “ब्लार्क” मध्ये त्यांची कथा व कविता प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर सत्यकथेच्या अंकात जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली; पण सत्यकथांमध्ये “शुन्य श्रुंगारते” या कवितेला प्रसिद्धी मिळाली आणि पुढे तर त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या. या सर्व कविता खानोलकरांनी “आरती प्रभू” या टोपण नावाने लिहिल्या. १९५८ सालच्या मराठी साहित्य संमेलनात, त्यांना कविता वाचनाची संधी मिळाली. उदरनिर्वाहासाठी खानोलकरांनी पुन्हा मुंबई गाठली; तिथे आकाशवाणी केंद्रात स्टाफ आर्टिस्ट म्हणून रुजू झाले. त्याच काळात “जागोवा” हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यांची “पाठमोरी” ही कथा सत्यकथेत तर “झाडे नग्न झाली” ही त्यांची कादंबरी रहस्यरंजनच्या दिवाळी अंकात छापून आली. त्यामुळे खानोलकरांच्या लेखनाला अधिक गती मिळाली. खानोलकरांनी सर्व प्रकारच्या वाड्मयात मुशाफीरी केली यामध्ये अनुवाद, स्फुटलेखन, बालवाड्मय, एकांकिकांचा समावेश होतो. “एक शुन्य बाजीराव”, “सगेसोयरे”, “अवध्य”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “कालाय तस्मै नम:” सारख्या दर्जेदार, रहस्यमय नाटकांनी रंगभूमी तर गाजवली, पण खानोलकरांच नाव सर्वतोमुखी झाले. खानोलकरांनी लिहिलेल्या कादंबर्याय ही अतिशय गाजल्या. त्यातील “चानी” आणि “कोंडुरा” या त्यांच्या दोन कादंबर्यांमवर चित्रपट ही प्रदर्शित झाले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर मा. सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही मा.व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. “दिवेलागणं” आणि “नक्षत्रांचे देणे” हे कविता संग्रह रसिकांना खुप भावले. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः मा.हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना', ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या मा.आरती प्रभू नावाच्या माणसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली, ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळाली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. मा.आरती प्रभू यांचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    "नक्षत्रांचे देणे" आरती प्रभू.
    http://www.youtube.com/playlist?list=PLA40EEA6EDB80BFAF

    मा.आरती प्रभू यांच्या कन्या सौ. हेमांगी नेरकर यांच्याशी साधलेल्या संवादातून मा.आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व प्रहार मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
    http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2/

    काही गाणी आरती प्रभू यांची
    ये रे घना
    लवलव करी पात डोळं
    तू तेंव्हा तशी
    ती येते आणिक जाते
    समईच्या शुभ्र कळ्या
    "तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल
    मा.आरती प्रभू यांचे प्रकाशित साहित्य.
    गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
    कोंडुरा (कादंबरी, १९६६)
    अजगर (कादंबरी, १९६५)
    रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
    त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
    आपुले मरण
    जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
    दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
    नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
    पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
    पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
    सनई (कथा संग्रह, १९६४)
    राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
    चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
    एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
    सगेसोयरे (नाटक, १९६७)
    अवध्य (नाटक, १९७२)
    कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
    अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)

  • बालकुमार साहित्यिक लीलावती भागवत

    लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले.

  • जेष्ठ कलाकार नयना आपटे

    त्यांची आई शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या.त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी आईकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. 'आयुष्यात कुठलाही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही,' हे तत्त्व आयुष्यभर अमलात आणलेल्या शांताताईंनी ते छोट्या नयनाच्याही मनात उतरवलं. शिक्षणाबरोबर गाण्याचा रियाज आणि शरीरसौष्ठव जपण्यासाठी पोहणे, बॅडमिंटन, नृत्य इ. क्षेत्रांत त्याना आवड होती. बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल अशा सर्व सुखसोयींनी सज्ज असंच घर होतं. त्यामुळे बाहेरच्या जगाशी, वातावरणाशी नयनाचा फारसा संबंधच येत नसे. त्यामुळे मित्र-मैत्रिणीही नव्हत्या.

    नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी 'पुण्यप्रभाव' या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या 'झाशीची राणी' या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं. १९५८ साली 'रणजित स्टुडिओ'चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या 'चंडीपूजा' या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम मा.नयना आपटे यांनी केले होते. २४ फेब्रुवारी १९६४ ला मा.शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा. अठरा वर्षं पूर्ण होईपर्यंत तिच्या मालकीचं काहीच होणार नव्हतं. त्यामुळे राहता बंगला, खूप मोठी मालमत्ता याची मालकीण असूनही बंगल्याला सील ठोकण्यात आलं. त्याही स्थितीत एस्.एस्.सी.ला ८४ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची उत्कृष्ट कामगिरी तिने केली होती. आई गेल्यावर ती काही महिने पुण्याला जाऊन राहिली. पण स्वत:च्या पायांवर उभं राहाण्याची जिद्द, अभिनय, महाविद्यालयीन शिक्षण, शास्त्रीय संगीताच्या जोरावर त्या पुन्हा मुंबईत परत आल्या. अशातच १९६५ मध्ये दत्ता धर्माधिकारींच्या 'दैवे लागला चिंतामणी'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली 'अंमलदार' या मराठी नाटकात राजा गोसावींबरोबर नायिका रंगवल्यावर नयना आपटेंची पुढे १५ वर्षं राजा गोसावींबरोबर जोडी जमली. साठ विनोदी नाटकांतून या जोडीने कामं केली. या नाट्यप्रवासात त्यांना चित्तरंजन कोल्हटकर, शशिकांत निकते, अरविंद देशपांडे, दाजी भाटवडेकर, दामू केंकरे यांच्याकडून गद्य नाटकातील भूमिकांमधले बारकावे अभ्यासता आले. मा.नयना आपटे यांनी आजवर ६५ मराठी नाटकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. गुजराथी नाटकांमधूनही त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. 'मिली', 'चुपके चुपके' या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. सहा गुजराथी चित्रपट, दूरदर्शनवरील हिंदी-मराठी मिळून १६ मालिका त्यांच्या नावांवर आहेत. एवढी कामगिरी बजावूनसुद्धा त्या कधीच थकल्या नाही. महाराष्ट्राची शान ठरलेल्या संगीत रंगभूमीसाठी कोणी नुसता आवाज दिला तरी मी माझी सर्व कामे बाजूला ठेवून तिच्या सेवेला हजर राहीन, असं म्हणणा-या नयना आपटेंचा उत्साह आजही केल्यानंतरही तितकाच अदम्य आहे. तरुणांनाही लाजवणारा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ गायीका अमीरबाई कर्नाटकी

    अमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कलाराकारांचे घराणे. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांसनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला.