नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे.
June 10, 2021
जूनच्या शेवटच्या शनिवारी सौ. बरोबर टिक्की खाण्याचा बेत केला होता. पण दैव आडव आलं. हृद्याने दगा दिला. सर्जरी नंतर घरी आल्यावर आपल्या मनातील बेत सौ.ला सांगितला. ती म्हणाली, आता वर्षभर टिक्की वैगरे विसरा. पुन्हा खाटल्यावर पडल्यास मी काही सेवा करणार नाही. त्याच दिवशी रात्री स्वप्न पडलं…..
August 10, 2014
संसार म्हटले की कटकटी या आल्याच या संसारामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटा संसार यामध्ये मुला मुलींची संख्या एक किंवा दोन असते. वडिलांच्या पासून काही ना श्रीमंती लाभलेली असते याला छोटा संस्था म्हणतात. मोठा संसार म्हणजे घरात दहा पंधरा माणसे त्यात मिळवणारे कमी लहान मुलांचा व मुलींचा कपडा लता. शाळेची फी पाटी पुस्तक या वस्तू आल्यास या वस्तू असल्याशिवाय शाळा शिकता येत नाही. माणूस जगायचा झाला तर त्याला अन्न, वस्त्र, व निवारा या तीन गोष्टी असल्या म्हणजे माणूस जगू शकतो.
December 23, 2022
९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले.
February 16, 2022
या सृष्टीत वनस्पतीचे जीवन हे मानवापेक्षा कितीतरी आधीचे आहे. वनस्पतीनांही जीव असतो, हे सर्वश्रुतच आहे परंतु या वनस्पतींच्या जीवनातील विविधता, निसर्गाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या बुद्धिमान पद्धती आणि त्यांच्यातील विविध यंत्रणा आणि कार्य यांची अधिकारी माहिती दिली आहे. वनस्पतींची अद्भुत कार्यशैली : डॉ. किशोर नेने नचिकेत प्रकाशन : पाने : ९६ , किंमत : १००/- रू. 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
September 29, 2012
सावरकर भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचा आग्रह होता, आपली मातृभाषा समृद्ध असायला हवी त्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव कशासाठी हवा? त्यांचे म्हणणे होते की problem न म्हणता समस्या म्हणा.
October 9, 2022
पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते. पाटावर बसवून तेल लावून गरम पाण्याने न्हाऊ घालून खणाची साडी नेसवली जाते. दोन्ही बाजुच्या कडेला पाच बांगड्या अडकवून. मंगळसुत्र एखाद्या दागिना घालून नथ अडकवून पाटावर बसवली जाते. मग यथासांग पुजा करुन गुळाची पोळी खीर असा नैवेद्य दाखवला जातो. समोरच्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवले जाते. कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हे वैशिष्ट्य असते.आज आमच्या घरी सून बाईंनी चैत्र गौरीची पुजा केली आहे.
July 3, 2022
मराठी ‘अभिमान’गीत म्हणायचं आणि मग ‘आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’ असंही म्हणायचं हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी फक्त मूळ कवितेचंच ध्वनिमुद्रण केलं.
March 24, 2018
मसुरा आहे साधारण मध्यभागी …… म्हणजे कणकवली आणि मालवण पासून साधारण सारख्या अंतरावर …. गाव एकदम हिरवागार ……तेजस्वी पाचूसारखा …. घनदाट अरण्याचं कोंदण असलेला …लालमातीच्या देखण्या टेकड्यांचा …. त्यावरच्या काजूच्या बागांचा … गर्द आमरायांचा …. आणि त्यात वसलेल्या साध्या पण सुंदर घरांचा …. एक एक घर बघत राहावं असं …. सांडलेलं तेल टिपून घ्यावं … असं स्वच्छ अंगण आणि त्यात मनाला प्रसन्न करेल असं तुळशीवृंदावन …
September 9, 2018
कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम होणार म्हटले की अगोदर पानसुपारी आणणे आवश्यक असते. आणि तो विधी सुरू होण्यापूर्वी पानसुपारी देवापुढे ठेवून घरातील वडील धाग्यांना नमस्कार करुनच पुजेला बसायचे असते. दोन पान म्हणजे भक्ती आणि भाव तर सुपारी म्हणजे ज्ञान. सत्यनारायण. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पुजा. मंगळागौर. संक्रांतीला पानसुपारी आवश्यकच असते. त्यामुळे लग्नात आणि हळदीकुंकूवाला अगोदर हळदीकुंकू लावले की लगेच दोन पाने आणि त्यावय सुपारी देवून मगच इतर. इथे मैत्री व प्रेम याचे प्रतिक म्हणून दोन पाने त्यावर आगत्याची सुपारी याचा शिक्कामोर्तब झालाच असे. म्हणूनच काही जणांकडे सुपारी फुटली की लग्न ठरले असे समजतात....
मग पानसुपारी हे हळदीकुंकूवाला आणणे आणि पूर्ण सुपारी ऐवजी सुपारीचे तुकडे. नतंर म्हैसूर सुपारीच्या पुड्या ही प्रथा सुरू झाली. असे आलेली पाने स्वच्छ धुवून घरातील वृद्ध मंडळी खात असत पानदानात ठेवून. नाहीतर जे कुणी खात असतील त्यांना देत. आता तर पानसुपारी कुणी देत नाहीत. सणासुदीला. कार्यात जेवणाची पंगत उठली की विडा दिला जायचा. आता काही हॉटेल मध्ये ही प्रध्दत आहे. आणि घरातून तांबूल देतात. तुळजापूरला देवीला पानाची प्रभावळ असते. रेणुका मातेला दररोज तांबूल असतोच. पण पुढे पैजेचा विडा. खून करण्याची दिलेली सुपारी. बैठकीत पानाला महत्त्व आले. मात्र हे क्षेत्र आपल्या संस्कृतीत बसत नाही. पान औषधी वनस्पती आहे. त्यामुळे बाळंतपणात रोज दोन वेळा जेवणानंतर विडा देतात. बाळाचे पोट गुबार झाले की एरंडेल तेल लावून किंचित गरम करून पोटावर ठेवले की कमी होते ( हे आमच्या काळी होते. आता नाही) पानाची चंची पुढे केली की झाली मैत्री. गेट टु गेदर याच पद्धतीने करतात शेतकरी कामकरी. नुसते भजे करणे अशुभ समजले जाते तेव्हा घरातील दोन तीन पाने हाताने तुकडे करून भजी केले तरी चव छान येते. काही ठिकाणीची पाने विडे प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की कुणी विडा दिला तर तो अगदोर उकलून पाहून मग खावे. आणि पानाने भिंती रंगवू नये. अजून बरेच काही आहे पानमहात्म्य...
मग या पानसुपारीला धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
August 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti