(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • वेळ – ( TIME )

    वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो.

  • २ जानेवारी

    ३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच तमकीचं दर्शन नको रे बाबा अशा कॉमेंटस्ची रंगत खुलू लागते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सिद्ध होतात. ३१ डिसेंबरची प्रतिक्षा सुरु होते.

    वर्षभर कामाच्या रगाडयात सापडलेल्या मनाला कधी ना कधी विरंगुळा हवाच असतो. हा विरंगुळा या ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्ताने सर्वांना लाभतो. असे आनंदाचे क्षण आपल्या मित्रमंडळींसमवेत अथवा प्रियजनांसमवेत घालविणे हा माणसाचा स्थायीभाव. साहजिकच अशा मौजमजेच्या प्रसंगी आपल्या सोबत कोण असावं याचेही ठोकताळे ठरलेले असतात. समान आवडीनिवडी असलेली मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोदाला उधाण येतं. मनात साचलेलं मळभ दूर करण्याची संधी चालून येते. ३१ डिसेंबरची रात्र या घडीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.

    ३१ डिसेंबर हा दिवस वर्षभरात घडलेल्या घटनांचीही उजळणी करुन जातो. वर्षभरात आपले कोणकोणते आडाखे चुकले, अपेक्षेप्रमाणे कायकाय घडलं नाही आणि कोणते प्रसंग जीवावर घाव घालून गेले याच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. वर्षभरात घडलेल्या सुखद घटनांच्या स्मृती सोबत असतातच. मात्र काय गवसलं यापेक्षा काय हरवलं याची जंत्री मोठी असते. या निराशेवर मात करण्यासाठी उपाय एकच असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमून कटू आठवणींचं ओझं दूर सारायचं. मनाला उभारी देत नव्या वर्षाच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. मरगळ झटकून पुन्हा ताजं तवानं व्हायचं.

    थोडक्यात आप्त जनांबरोबरची पार्टी हे एक निमित्त असतं. या निमित्ताचा आधार घेत स्वतःचं स्वतःला सावरायचं असतं. हे सावरताना समविचारांच्या मंडळींचा, त्यांच्या सोबत रंगणाऱ्या गप्पांचा आधार मोठा असतो. म्हणूनच कदाचित अशा पाटर्यांना साऱ्या जगभर मान्यता लाभली असावी. ३१ डिसेंबरच्या रात्रीला खऱ्या अर्थाने रंगत दिली जाते ती पंचतारांकित अथवा मोठ्या हॉटेलमध्ये. अशा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करण्यात येते. सरत्या वर्षांचं प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचा पुतळा उभा करण्यात येतो. फुलांच्या आणि दीपमाळांच्या सजावटीने सारा परिसर सुशोभित केला जातो. वाद्य संगीताचा शिडकावा मन प्रफुल्लीत करण्यास सिद्ध असतो. सारा माहौल आनंद आणि उत्साहामध्ये आकंठ बुडून जातो.

    मोठ्या हॉटेल्सचा भव्य थाटमाट दिमतीला नसला तरी घराघरातील छोटया पाटयांचा माहौल बहुतांशी तसाच असतो. इथेही खाण्यापिण्याची जय्यत तयारी सज्ज असते. डीव्हीडीतील संगीताचे सूर आसमंतात निनादत असतात. मन प्रफुल्लीत करणारं वातावरण इथेही थोडया फार फरकानं सिद्ध होतं. साधारण दहाच्या सुमारास अशा पाटर्यांना आकार येऊ लागतो. अकरा साडे अकरा पर्यंत रंगत वाढत जाते आणि ठीक बाराच्या ठोक्याला आनंदाचा परमोच्च बिंदू साधला जातो. 'हॅप्पी न्यू इअर'च्या शुभेच्छांनी वातावरण दुमदूमून जाते. मोबाईल्स, फोनच्या रिंगटोन्स निनादू लागतात. बाहेर कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होते. प्रियजनांचे हात हस्तांदोलनासाठी जुळून येतात. नव्या वर्षाचं प्रफुल्लीत चेहऱ्यानं आणि उत्साहाची परिसिमा गाठलेल्या मनानं स्वागत केलं जातं.

    १ जानेवारीची सकाळ उजाडते ती शुभेच्छांच्या सोबतीने. कार्यालयातील सहकाऱ्यांना, नातेवाईकांना फोन जाऊ लागतात. काल रात्री आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं याची देवाणघेवाण सुरु होते. थोडं उजाडल्यानंतर एस.एम.एस. पाठविण्याचे सोपस्कार सुरु होतात. मनापासून नाही तरी उपचार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहींना पाठविणं अपरिहार्य असतं. अशा मंडळींची एस.एम.एस.वर बोळवण केली जाते. अर्थात आपल्याला आलेले एस.एम.एस.याच स्वरुपाचे असणार याचीही जाणीव मनाला चटका लावून जाते. अमक्याने आपल्याला साधा फोन न करता एस.एम.एस.वर भागवलं याची चुटपूट जीवाला लागूनच जाते. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अशा छोटयामोठया कुरबुरींसाठी आज अवसर नसतो. नव्या वर्षाच्या नव्या दिवशी आपण नव्या दमानं घराबाहेर पडतो.

    १ जानेवारीच्या रात्रीही क्वचित एखादी पार्टी अथवा आऊटिंग पार पडतं. त्यानंतर उगवतो तो २ जानेवारीचा दिवस. दोन दिवस आनंदात न्हाऊन निघालेलं मन आता रोजच्या वास्तवाला सामोरं जाण्यास सिद्ध होतं. सहजगत्या रोजचे व्यवहार सुरु होतात. दैनंदिन कामकाजात आपण बुडून जातो. कामांचे ताण, पैशांचे हिशेब, आपापसातले हेवेदावे, सर्व कसं पुन्हा सुरळीत सुरु होतं. अगदी दोन दिवसांपूर्वी आपण वेगळं काही अनुभवलं होतं याचा विसर पडतो. धकाधकीच्या आयुष्यात आपण सामावून जातो. काळाच्या ओघात आणखी एका नव्या वर्षांची संथ वाटचाल सुरु होते.

    - सुनील रेगे

  • हॅास्पिटलमधून बाळ गायब

    गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.

  • अन्नपूर्णा देवीची गोष्ट

    फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता. ‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या. या देवी-देवतांमध्ये ‘इजानागि’ आणि ‘इजानामि’ या दोन देवी देवतांचाही समावेश होता.

  • सर्पदंश

    सन १९९८ मधला श्रावण महिना...नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत....
    ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..
    गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा.
    त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..
    आणिअचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला...दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातीलआदर्श कुटुंब..सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हेअत्यंत
    जवळचे मित्र ...
    सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.
    तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले..
    दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल...मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे...विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे....त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे..
    लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते..मी माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली....
    धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले...मारुती म्हणाला..गाडी मागे वळव...पेशंट संपला...माझ्या हृदयात चर्रर्र झाले...गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते...त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला..कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात...
    या बाईला सर्पदंश झालाय...
    डाँक्टर आहेत का? मी विचारले..
    हो आहेत...
    थांबा मी बोलावते..
    असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..
    पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.
    डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,. तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..
    तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये काकूंनी मारलेला साप होता..
    डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..
    तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या..
    त्यानंतर मला भुकेची तीव्र जाणीव झाली..तो पर्यंत उपवास असुनही भुकेची साधी आठवणही आली नाही हे विशेष..।

    -- श्री.रामदास तळपे (मंदोशी ) ता.खेड जि.पुणे

  • आदित्यराणूबाई

    ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय गं बायांनो, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.

  • फार उशीर झालाय गं मम्मी !

    -- मी कुठं आहे तेच कळत नाही .

    शरीराची तडफड होते आहे .
    शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय .
    डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय.
    गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत .
    पब्लिकची गर्दी जाणवतेय .
    आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय .

    काहीतरी घडलंय .

    पब मधून येताना लाँग ड्राईव्ह करावं लागणार होतं .
    सॅम ला म्हटलं सुध्दा .
    " इतक्या लांब कशाला जायचं ."
    तो म्हणाला ,
    " जायला तर हवंच . अगोदर हुक्का पार्लर . मग आपल्या फार्महाऊस वर जाऊ . तिथं तुझ्यासाठी सरप्राइज आहे .तिथून बहावा पब . आणि लाँग ड्राईव्ह करीत सुसाट येऊ परत . नाहीतरी बहात्तर लाखाच्या निंजा बाइकचा उपभोग केव्हा घ्यायचा ?"

    सॅम नं सगळं ठरवून टाकलं होतं .
    नाही नाही म्हणताना होकार केव्हा गेला तोंडातून , ते कळलंच नाही . कळलं नाही की हुक्का पार्लरचा मोह पडला ? की निंजा बाईकवरची सुसाट लाँग ड्राईव्ह मोहात पाडून गेली ?
    काहीच कळलं नाही .

    मम्मीला एक मेसेज टाकला .

    " मीटिंग लांबत चाललीय , उशीर होईल यायला , तू आणि पपा जेवून घ्या ."

    मला तेव्हा कळलं नव्हतं गं मम्मी , माझेच शब्द असे माझ्यावर कोसळतील ...

    मम्मी , फार फार उशीर झालाय गं !

    सगळंच बिघडलंय .
    तू किती सांगत होतीस , किती शिकवत होतीस .
    मुलीनं कसं वागायला हवं ...
    स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही...
    चारित्र्य महत्त्वाचं ...
    अंगभर कपडे ही आपली सुरक्षा आहे ...
    शरीर उघडं टाकण्यात सौंदर्य नसतं ...
    घर , घराच्या भिंती , दार, दाराची चौकट. त्यातलं आपलेपण ...
    माया , प्रेम , जिव्हाळा...
    नातेसंबंध जपणं, नवीन नाती सांभाळणं ...
    एक ना दोन .
    अनेक गोष्टी सांगायचीस तू .
    आणि मी आय टी त मिळणाऱ्या अठरा लाखाच्या पॅकेजच्या गुर्मीत तुला , तुझ्या विचारांना हसत होते .
    पप्पानी , मला समजावणं सोडून दिलं होतं .
    त्यांच्या दृष्टीनं मी हाताबाहेर गेलेलं प्रकरण होते .
    त्यांचा उदास चेहरा मला कधी जाणवलाच नाही .
    आणि तुझ्या शब्दातील तळमळ , काळजी माझ्या मनापर्यंत कधी पोहोचलीच नाही .

    त्याला कारण होतं अठरा लाखाचं पॅकेज .
    त्याला कारण होता सॅम .

    चांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
    ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
    ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी ...
    मी पहात राहिले .
    तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
    " या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये ."
    त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
    मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
    कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
    ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
    मात्र डोक्यात ' तो ' होता .

    दुसऱ्या दिवशी तो आला .
    --आणि मग त्याचं येणं सवयीचं केव्हा झालं ते कळलंच नाही . माझी साधी टू व्हीलर पार्किंग मध्ये ठेवून मी त्याच्या निंजावर बसायची .
    जाता येता दोन्ही वेळेला .
    तो सॅम होता .
    सॅम .

    त्यानं त्याच्या फिफ्टीन प्लस ग्रुपवर घेतलं .
    तो केवळ पन्नास जणांचा ग्रुप होता .
    एकाच महिन्यात त्याने बकार्डी ब्लास्ट ग्रुपवर घेतलं .
    तो तर केवळ वीस जणांचा ग्रुप होता .

    "कशासाठी आहे हा ग्रुप ? "
    एकदा मी विचारलं सुध्दा .
    तो बेफिकिरी दाखवत हसला .
    "कळेल . जास्त चौकशा न करता लाईफ एंजॉय करणाऱ्यांचा हा ग्रुप आहे . धमाल , मस्ती , खाना पीना , देन गिव्ह अँड टेक ."

    त्याचं बाकी सगळं बोलणं कळलं , पण गिव्ह अँड टेक मात्र कळलं नाही .
    ते कळलं , तेव्हा उशीर झाला होता .
    त्याच्या फार्म हाऊसवर फिफ्टिन प्लस चे काही मेंबर त्या रात्री जमले होते . बकार्डी ब्लास्ट चे पण काही जण आले होते . धुमाकूळ चालला होता . बिअर, शॅम्पेन , हुक्का आणि काय काय चालू होतं .इतक्यात लाईट गेले . अंधार झाला .आणि काय होतंय ते कळायच्या आत कुणीतरी तरुणींच्या अंगावरचे कपडे फेडण्याचा , किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला . माझ्याही अंगाशी कुणीतरी ...
    अचानक लाईट आले .
    आणि जमलेले सगळे पिसाटल्या सारखे तरुणींच्या अंगावर ...

    कुणीतरी ओरडत होतं .
    "गिव्ह अँड टेक ! "
    सावरण्यासाठी , लज्जा रक्षणासाठी जवळ कपडे नव्हतेच . अंधारात कुणीतरी लपवले होते .
    मला शॉक बसला .
    तुटून पडणाऱ्या लांडग्यांनी मग मोबाईल वर शूट करायला सुरुवात केली ...

    आणि मम्मी तुझी आठवण झाली .
    अंगभर कपडे ही सुरक्षा असते हे तुझं वाक्य आठवलं .
    आणि फिफ्टीन प्लस चा सगळं शरीर दाखवणारा ड्रेसकोड आठवला .

    लांडग्यांनी लचके तोडलेच होते पण निर्लज्जपणे ग्रुपवर क्लिप्स टाकल्या होत्या .
    सॅमच्या बाईक वरून येताना घरी तोंड कसं दाखवायचं याचीच चिंता वाटत होती .

    पण तेही सवयीचं झालं .
    कारण क्लिप्स दाखवून ब्लॅक मेलिंग सुरू झालं होतं .

    मम्मी , पप्पा , मला वाटलं होतं तुम्हाला काही कळलं नसेल .
    आणि नव्हतंच कळलं .
    मम्मी तू लग्नाचा सतत विषय काढत होतीस .
    या सगळ्या दुष्ट चक्रातून सुटण्या साठी , मी येईल त्या स्थळाला होकार द्यायचा ठरवलं होतं .

    एका रविवारी बघण्याचा कार्यक्रम होता .
    पण आलेल्या तरुणाने मला बघताक्षणी नकार दिला .
    तू कारण विचारलं , तेव्हा त्यानं चक्क मोबाईल मधली क्लिप दाखवली .
    त्यांनी नाकारलं .
    खूप बोललात तुम्ही मला .
    आणि अचानक तुम्हा दोघांनी बोलणं सोडून दिलं .
    तुम्हाला शॉक बसला होता . हे मला दिसत होतं .
    पण भयंकर दुष्ट चक्रात अडकल्याने काही बोलू शकत नव्हते .

    सगळं सवयीचं झालं होतं .
    कुणाचाही केव्हाही फोन यायचा .
    कोणीही कुठेही बोलवायचा .
    नोकरी तर सुटलीच होती .
    पण पैशासाठी ड्रग पेडलर म्हणून सुध्दा काम करायला सुरुवात केली होती .
    सगळ्या आयुष्याचा विचका झाला होता .
    बकार्डी लाईम , बकार्डी रम , बकार्डी पाईनापल...
    आणि कुठचे कुठचे ब्रँड घशाखाली ओतण्यासाठी ...
    नशेसाठी कुणाकुणाला काय हवंय ते देण्यासाठी ...

    सगळं संपवून बसलेय गं मम्मी .

    फार फार उशीर झालाय मम्मी !

    -- आज तर कहर झाला मम्मी .
    बहावा पब मध्ये राडा झाला .
    आणि एकमेकांना खुन्नस देत सगळे बाहेर पडले .
    सॅमला सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला सुरुवात केली .
    त्याचा त्याला राग आला आणि त्यानं स्पीड वाढवायला सुरुवात केली .
    एकशे वीसच्या पुढे काटा जाताना दिसत होता .
    मी त्याला शिव्या घालायला सुरुवात केली . तेवढंच माझ्या हाती होतं .

    आणि कुठल्यातरी क्षणी निंजा पुढच्या गाडीवर आदळली .
    काय होतंय हे कळायच्या आत मी गाडीवरून उंच उडाले .
    खाली पडताना भयंकर दृश्य दिसलं .
    सॅम ची मान तुटून पडली होती .
    आणि मी अर्धवट शुध्दीत खाली पडले होते .

    पडल्यावर जाणवलं ते इतकंच की मी तुझं काहीही ऐकलं नव्हतं .
    पप्पांचा विचार केला नव्हता .
    पण आता हे सगळं आठवणं व्यर्थ होतं . मम्मी , पप्पा मी मरतेय . तुम्ही आठवताय मला .
    पण आता फार फार उशीर झालाय मम्मी , फारच उशीर ...झालाय ... फार... उशीर ...!
    ----------
    -- तिची तडफड शांत झाली .
    गर्दीला तिची डेड बॉडी दिसत होती .
    सगळे चुकचुकत होते .

    ---आणि फिफ्टीन प्लस चा ग्रुप , बकार्डी ब्लास्ट चा ग्रुप नव्या सावजाच्या शोधात मेट्रो सिटीत हिंडू लागला होता .
    -- ड्रग पेडलर साठी शोध सुरू झाला होता .
    --- हवाला सिस्टीम नव्याने कार्यरत झाली होती .

    ( पूर्णतः काल्पनिक )

    -- श्रीकृष्ण जोशी

  • सोमवारची कहाणी

    एक म्हातारी बाई तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं. गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं. चार तांदुळाचे दाणे घेतले. दोन बेलाची पानं घेतली आणि वाटीभर दूध घेतले. दुपारी म्हातारीबाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं; तुझा गाभारा भरला नाही. माझ्या वाटीभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली खुलभर दूध भक्तीनं अर्पण करते.”

  • बकासुराची गोष्ट

    कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
    ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत.

  • शुक्रवारची कहाणी

    आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत संगितलं. ती म्हणाली, “ बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास धरावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत, तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी.