(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अधुनिक सन्यास आश्रमी जीवन

    एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते वाचत होते. हाती माळ होती. पाण्याच्या कडीचा तांब्या, फुलपात्र, छोटी टोपली त्यांत कांही फळे, दोन-चार पुस्तकें.

    मी जाण्याच्या बेतात असता, त्यांचेच लक्ष मजकडे गेले. त्यानी हात करुन मला बोलावले. त्यानी आपली कान टोपी बाजूस सारली. मला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. ते वसंतराव काळे होते. "ओळखलत मला? "

    " हो ओळखल की-- - आपण वैद्यकीय संचालक ---- ---- ---- मी क्षणभर थांबलो. आपण कांही चुक तर करीत नाही ना ? ह्याची मनांत कल्पना आली. त्याना बघून १५ वर्षापेक्षा जास्त काळ गेलेला होता. मी संभ्रमांत पडलो. पण लगेच त्यानीच माझी शंका दुर केली. " होय तुम्ही मला ओळखलंत. जा प्रथम दर्शन करुन या. मग बोलूत. "

    मी ह्या प्रकाराने, त्यांच्या अशा स्थितीत व अशा ठिकाणी त्याना बघणे मनाला चटका देणारे वाटले. मी समोरच्या मंदीरातील गाभाऱ्यांत बघत होतो. श्री देवीची उज्वल प्रतिमा दुरुन दिसत होती. मी मंदीराच्या पायऱ्या चढू लागलो.

    डोक्यांत विचारांचे काहूर चालू होते. खूप पूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर आला.

    मी सर्व कुटुंबीयासह चार धाम व इतर धार्मिक स्थळ-दर्शनासाठी जाण्याचे योजीले होते. एक महीन्याच्या रजेची गरज होती. वैद्यकीय संचालक साहेब डॉ. वसंतराव काळे हेच होते. मी रजेसाठी विनंती केली. सर्व परिस्थिती व कौटूंबीक निकड व्यक्त केली. ते क्षणभर थांबले. विचार केला. " आहो देवदर्शनाला जात आहांत. मग कसा रोकू ? मजसाठी देखील प्रसाद घेऊन या. " किंचीत हसत ते म्हणाले. अतिशय सज्जन गृहस्थ. चांगले प्रशासक होते.

    डॉ. काळ्यांना ह्या स्थितीत बघताना मला क्लेशदायक वाटू लागले. मी फार बेचैन झालो. कोणती परिस्थिती उद्भवली असेल? कोणता आघांत जीवनावर झाला असेल की ज्याने त्यांचे उत्तुंग व श्रेष्ठ जीवन एका क्षणांत बदलून टाकले. मी जगदंबेचे दर्शन घेतले. मंदीराबाहेर आलो.

    मी डॉ. काळ्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यानी आनंद व्यक्त केला. मी आपूलकीने त्यांच्याविषयी चौकशी करु लागलो

    "आपण कसे आहांत ? आपण काय करतां हल्ली ? "

    " मी ८० वर्षे पूर्ण केली. काय करावे तुम्हाला वाटते ? "

    "आध्यात्म्याच्या पुस्तकातून कांही शोध बोध घेत आहांत कां? "

    "शोध घ्यावयाचा नसतो. शोध लागतो. "

    "कोणता शोध लागला ?"

    " वर्णन करता येणार नाही."

    काळेसाहेब सांगत होते. मी एक चित्त करुन ऐकत होतो.

    " मी आजपर्यंत काय केल उमगल नाही. शरीर मनाला वाटत होत. करीत गेलो. चाकोरीत फिरत होतो. सर्व सोडून दिले. न करण्यातच समाधान मिळू लागले. कुठे बसतो, काय करतो, ह्या अस्तित्वाच्या कल्पनेपेक्षा, कुठेच नाही ही जाणीव परम श्रेष्ठ वाटते. आवाजापेक्षा शांततेत समाधान. करण्यापेक्षा न करण्यांत समाधान. ते आपली दिनचर्या सांगू लागले.

    " मी मंदीर परिसरांत राहतो, जवळच एक विहीर आहे. ते पाण्याची गरज पूर्ण करते. मला निवृत्ती वेतन मिळते. दोन वेळा खानावळीतून जेवनाचा डबा येतो. त्यांत भाजी पोळी एक ग्लास दुध व एक फळ असते. मंदीर परीसर स्वच्छता आणि येथील बागेची निगा हे व्यायामाचे साधन. मुल, सुना, जावाई, नातवंड व इतर अधून मधून येऊन भेटून जातात. "

    थोड थांबून ते सांगू लागले. " हे माझे आधुनिक सन्यासी जीवन समजा. जो मार्ग थोर ऋषीमुनी, श्रेष्ठ संत मंडळी, धर्मग्रंथ यांनी सुचविले, त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या क्षणापर्यंत माझाच अन्तरात्मा जो ईश्वर आहे, तो इतर कोणता मार्ग दाखवित नाही, तो पर्यंत प्रस्तूत वाट चालणे हे मी योग्य समजतो.

    काळ्यांची दैनंदिनी, वयासाठी योग्य उपक्रम वाटला. पूर्वी सन्यास आश्रमांत लोक सर्वसंग परीत्याग करुन मंदीरी, निसर्गांत गंगातीरी, हिमालयी, आपले उर्वरीत आयुष्य व्यतीत करीत. त्यावेळी अंतःपेरणा, संस्कार धर्म संस्कृती यांचा मानसिक दबाव संकल्प होता. मनाला ह्या मार्गाने जाण्याची उपरती होत असे. काळा प्रमाणे काळ्यांच्या दैनदिनीतून जवळ जवळ हेच साध्य केले गेले. फक्त येथे सन्यासाचे अनेक जागी भ्रमण नसून, एक जागी बैठक होती. त्यांची वृत्ती एकदम सन्याशाच्या अवस्थेमधली वाटली. कदाचित् मी त्याला अधूनिक सन्यास आश्रमी म्हणेल. देहाच्या गरजा यांची त्यांनी व्यवस्था केली होती. मनाला मात्र आत्म्याशी केंद्रित करीत होते. स्वतःला विसरुन-जगाला विसरुन.

    ह्यात होता ईश्वरी सतसंगाचा विचार, जीवन कार्य व ओढ यातून निवृत्ती, निजी संबंधीता पासून अलीप्तता, कांहीही न करता मिळणारा आनंद शांतता व समाधान काळे उपभोगीत असल्याचे जाणवले. जीवनाच्या परीपूर्ण शेवटाची वाट बघत.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

    बालकवीची कविता वाचीत होतो.

    हिरवे हिरवे गार गालिचे

    हरित तृणाच्या मखमालीचे

    त्या मखमालीवरती

    फुलराणी ही खेळत होती.

    सुंदर गवतांची हिरवळ …..

  • मला भाराऊन टाकल याने

    बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.

  • पोकळ तत्वज्ञान

    कालेजच्या होस्टेल मध्ये रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची …..

  • मला समजलेले कर्मफळ

    प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो. व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणे त्याचे होणारे परिणाम. जीवन म्हणजेच एक हलचाल. हलचाल म्हणजेच कर्म. कर्म म्हणजेच सुख दुःखाचे चक्र. जीवनभर चालणारे. हे टाळता येत नसले तरी ते सहज आणि सुकर करता येवू शकते. निसर्ग हा त्याच्या ठरलेल्या नियमानुसार चालत असतो. त्यात कधीही बदल केला जात नाही. व्यक्ती आणि त्याचे कर्म ह्याच्याशी निसर्गाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. व्यक्ती आपल्या प्रत्येक हालचालीसाठी, म्हणजे कर्म करण्यासाठी स्वतंत्र असतो. ज्यामुळे ज्याचे कर्म त्याचे त्यालाच फळ. सुख वा दुःख ह्या भावनीक समस्या त्यानेच केलेल्या कर्माचे परिणाम असतात. व्यक्तीमध्ये कांही नैसर्गिक उपजत गुणधर्म असतात. अहंकार ( Ego) आणि वासना ( Desire ) . ह्यामुळेच निसर्गाने तुम्हास दिलेल्या जीवनाबद्दल आपूलकी (अस्था) (Attachment ) वाटते. जीवन जगण्या विषयी प्रेम वाटते. कर्माचे होणारे नैसर्गिक परिणाम ही व्यक्तीची चिंताजनक समस्या नसते. परिणाम कसे होईल हा त्यात खरा भाग असतो. व्यक्तीची समस्या असते ती त्याच्या अपेक्षित कर्मफळामुळे. कोणत्याही गोष्टीचे परिणाम कसे होतील, ह्यापेक्षा ते कसे व्हावे ह्या त्याच्या मनांत दडून बसलेल्या विचारामुळे. विद्यार्थी अभ्यास करताना पास होण्याची अपेक्षा करतो. प्रथम येण्याची इच्छा बाळगतो. हे केंव्हाही चांगले व प्रेरणादायी. परंतु हे सारे त्याच्या योग्य प्रयत्न्यावर अवलंबून असते. याची त्याला जाणीव असावी. म्हणजे यश वा अपयश ह्याचे तो विश्लेषन करु शकेल. वासना (Desire) ह्या सुख दुःख निर्माण करीत नसतात. त्या फक्त जीवनचक्र चालविण्यास देहाला मदत करतात. Desire creates attachments for the life. परंतु जीवन कसे असावे, कसे चालावे, कर्माचा कोणता परिणाम व्हावा, ह्या विचारांमध्ये व्यक्ती गुंतला जातो, त्याचवेळी त्याला सुख दुःखाशी सामना करावा लागतो. दुःखाचे कारण इच्छीत अपेक्षाभंग. निसर्गचक्र व निसर्ग नियम ह्यावरच जगातील घडामोडी घडत असतात. त्यामध्ये परिस्थिती, सभोवताल, व व्यक्ती ह्या सर्वांचेच समीकरण लक्षांत घेतले जाऊन घटनेचा सांघीक परिणाम होतो. परंतु व्यक्ती त्या घटनेमध्ये केवळ स्वतःला गुंतवून स्वतःच्या विचारानुसार त्या गोष्टीचा परीणाम कसा व्हावा ही अपेक्षा करतो. हेच कदाचित् निराशेचे कारण बनू शकते. कोणत्याही गोष्टीचा परीणाम प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे केंव्हाही होऊ शकणार नाही. हे सत्य आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य आणि खुप प्रयत्न करणे गरजेचे असते. यश संपादन करण्याचा तो मार्ग आहे. त्याचमुळे तुमच्या विचारांच्या झेपेला मर्यादा असतात.

    सभोवताल, काळ, वेळ, परिस्थिती इत्यादी अनेक पैलू प्रत्येक घटनामध्ये गुंतलेल्या असतात.त्या घटनेच्या गुंत्यामधले अनेक दोर त्या घटनेला बांधलेले असतात. ही व्यक्तीच्या अकलनाबाहेरची गोष्ट असते. निसर्गच त्यांच्या पद्धतीने तो गुंता सोडवू शकतो. व्यक्ती स्वतःच्या विचाराने त्या गुंत्याचा एखादा दोर खेचून निरनिराळ्या गाठी मात्र निर्माण करेल. म्हणूनच म्हटले जाते की घटनेची उकल निसर्गालाच करुं द्या. त्याने दिलेल्या निर्णयास अर्थात परिणामास मान्यता द्या. कर्माच्या फळाची अपेक्षा न करता फक्त योग्य प्रयत्न व्यक्तीने करावे. हाच जीवनाचा महान संदेश असेल. ईश्वरानी प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन उपजत चेतना शक्ती दिलेल्या असतात.

    १ ज्ञान शक्ती. (Power of Knowledge)

    २ इच्छा शक्ती. (Power of Desire)

    ३ क्रिया शक्ती.(Power of Action)

    ह्या सर्व उर्जा शक्ती आहेत. कोणतेही काम करण्यासाठी ह्या उत्तेजनात्मक गोष्टी असतात. ह्याच मुलभूत गोष्टीमुळे व्यक्ती कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होतो. एक महत्वाचे म्हणजे काम करण्यासाठी चेतना मिळणे ही बाब निराळी.ती निसर्ग देतो. परंतु कोणते काम करावे त्याची दिशा व योजना आखण्याचे कार्य मात्र निसर्ग केव्हांच करीत नसतो. माणसाला दिलेल्या मेंदू–बुद्धी–मन ह्या इंद्रियामार्फत ते होत असते. कार्य करणे ही चेतना वेगळी, कोणते कार्य करणे हा भाग सर्वस्वी निराळा असतो. ते व्यक्तीच्या संस्कारीत विचारावर अवलंबून असते. याचा अर्थ कर्म प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने, आवडी निवडी नुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार करीत असतो. त्याला निसर्ग फक्त शक्ती देतो. त्यामुळे कर्माचे स्वरुप व त्याचा परिणाम ह्याला फक्त व्यक्तीच जबाबदार असते. कर्मफळ हे त्यालाच भोगावे अथवा उपभोगावे लागते.

    येथेच एक गैरसमज निर्माण होत असतो. प्रत्येक कर्मामध्ये व्यक्ती स्वतःला

    " कर्म करता ( The Roll of DOER ) " याच्या भुमिकेत समजतो. हे अर्धसत्य आहे. कारण विचार, योजना, दिशा, कल्पकता, इत्यादी त्याच्या असतात. तो उर्जा शक्तीला (निसर्गाला ) दुय्यम स्थान देतो. किंवा दुर्लक्ष करतो. स्वताःकडे संपूर्ण घेतलेल्या कर्त्याच्या भूमिकेमुळे जेव्हां इच्छीत कर्मफळ न मिळाल्यास त्याला दुःखी व्हावे लागते. जर हाच कर्मफळाचा भाग प्रत्येक कर्म करताना ही "ईश्वरी ईच्छा वा योजना " समजून अंगीकारल्या, तर त्याचे तेच दुःख शिथील होईल. कर्माचा जो परिणाम होणार असतो, तो तर होणारच. परंतु " मी हे केले " हा अहंकार मीपणा कमी होण्यास मदत होईल समाधानी वृत्ती निर्माण होईल. ते कर्मफळ स्विकारण्याची मनाची तयारी असेल. असे म्हणतात की प्रत्येक काम ईश्वराला साक्षी ठेऊन, त्याची आठवण करीत करावे. आणि शेवटी ते कृष्णार्पण वा ईश्वरार्पण करावे. त्यांतच समाधान व शांतता लाभते.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • जीवन रंगभूमीवरील यशस्वी कलाकार

    वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.

  • जन्म-मृत्युचे चक्र

    खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी.
    माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतो. तीच्याजवळ एक दुसरी मुंगी आली. नंतर तीसरी. बघता बघता बऱ्यांच मुंग्या निरनीराळ्या मार्गाने तेथे जमल्या. सर्वजणींची हलचाल त्या मेलेल्या मुंगीभोवती होत होती. मुंग्यांचा आपसातील संवाद, मृतमुंगीला स्पर्ष करणे, कदाचित् हूंगणे, तिच्या अवयवाचा लचका तोडणे, तीला तेथून हलविण्याचा प्रयत्न करणे. अशा अनेक लहानसहान गोष्टी होत होत्या. सर्वांचा अर्थ वा उद्देश समजणे, ह्याचे अकलन होत नव्हते. यामागची निसर्ग योजना, काय असावी हे कळले नाही.

    हां एक मात्र लक्षात आले. ज्या मुंगीला मारले व टाकले होते, ती मृत होता क्षणीच कोणती तरी प्रक्रिया सुरु झाली. कदाचित् एखादी गंध निर्मीती असेल, की ज्याच्या पसरण्याने संबंधीत जीवजंतूना त्याचे चटकन आकलन व्हावे. तो सजीव प्राणी मृत झाला, ह्याची सुचना मिळावी. त्या मृत देहावर निसर्ग प्रेरीत, वा योजीत सोपस्कार व्हावे. ह्याच साऱ्यांचा उद्देश फक्त एकच वाटला. आणि तो म्हणजे मृत झालेल्या देहाचे विश्लेषन Analysis होऊन त्याच्यामधल्या घटक पदार्थाचे पुनरुजीवन Recycling process व्हावी. कुणीही नाशवंत नाही. तो फक्त आपला आकार बदलत जातो. हे मनाला पटू लागते.

    जीवन जशी एक चक्रमय क्रिया असते, तशीच मृत्यु ही देखील चक्रमय क्रिया असते. म्हणूनच म्हणतात जन्म-मृत्युचे चक्र.

    -- डॉ. भगवान नागापूरकर

  • माईल स्टोन्स ( Mile Stones )

    श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. …..

  • शतशब्द कथा – विषकन्या

    आई ग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष सहजच पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या’.

  • अट्टाहास ?

    एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास …..