(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फोटो झिंको

    शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती.

      March 9, 2023


  • नर्मदामैय्याची लेकरं

    डॉ. सुलभा (पागे ) केंकरे यांनी केलेले हे ललित लेखन आहे. कथा, व्यक्तिचित्रे आणि तिसरा विभाग ललित लेखांचा आहे. त्यांतून लेखिकेने अनेक विषय हाताळले आहेत.

      February 18, 2024


  • मुंबअीचे डबेवाले आणि तीर्थक्षेत्रीचे बडवे

    मुंबअीचे डबेवाले फार शिकलेले नसतात. साधा पेहराव, साधी राहणी, कपाळी लाल गंध, डोक्यावर पांढरी खादी टोपी, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा खाक्या असतो.

      January 27, 2022


  • व्यवहार

    पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते .

      November 17, 2022


  • एक पाऊल ओल्या वाळूंत- भाग ३

    सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. “Is Ms. Lilly Sequeira staying here?” सुरेशने विचारलं. त्यावर त्या गहस्थाने आंत हांक मारली.”ऐ लक्की, हंग यो गो, कॉण आयलो पळे”

      July 9, 2018


  • प्रतिकृती (कथा)-भाग-६

    साधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत दृश्य कल्पनेपेक्षाही अचाट होतं. आमदाराची आकृती पूर्ण होताच मी दादाचा हात हातात घेतला आणि झटकन ओढून त्याला उठवलं. आम्ही घाईघाईने बाजूला लावलेल्या पडद्यामागे गेलो. दादाला तिथे उभं करून मी अत्यंत काळजीपूर्वक परंतु त्वरेने कुपी काढून घेतली. कुपीसाठी अत्यंत हलकं पण पारदर्शक काचेसारखं आवरण बनवलं हेतं. त्याची घडी करून ते बाजूला ठेवून दिलं. आता आमदारसाहेब डोळे मिटलेल्या अवस्थेत तिथे उभे होते! कुठल्याही क्षणी ते डोळे उघडतील, त्यापूर्वी मला पडद्यामागे जाणं भाग होतं.

      June 22, 2022


  • कृतज्ञता

    हा जीवनातील सर्व सद्गुणातील एक मानसिक स्वास्थ्य देणारा सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे.
    प्रत्येकाच्या जीवन प्रवासातील प्रत्येक क्षण हा संस्मरणीय आहे. आणि अशा जीवन प्रवासात जगतांना आपल्याला अगदी कळतय अशा शिशुशैशवास्थे पासून जन्मदात्यांचे , नातेवाइकांचे , गुरुजनांचे , शेजारीपाजाऱ्यांचे , मित्रसहकाऱ्यांचे अनमोल असे योगदान लाभलेले असते. त्यामुळे आपले जीवन अगदी सुखद समृद्ध झालेले असते ही वास्तवता कुणीही नाकारु शकत नाही.
    ज्या अज्ञात , अदृश्य , अनामिक शक्तिने आपल्याला जीव सृष्टितील सर्वश्रेष्ठ मानवी जन्म दिला आहे. आपले जीवन सावरले आहे त्याचेही आपण आभारच मानले पाहिजेत हेही तितकेच खरे.!!
    आणि या सर्वाप्रती ही आभार व्यक्त करण्याची भावनां म्हणजेच कृतज्ञता ..!!!
    आपल्याला सर्वार्थाने मदत करणाऱ्या प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तिबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजेच Thankful असणे यालाच कॄतज्ञता म्हटले आहे.
    To Express Gratitude असेही इंग्लिश मध्ये म्हणतात.
    म्हणजेच कृतज्ञतेने आभार व्यक्त करणे.
    कधी कधी आपल्यावर झालेल्या उपकारांची आपल्याला सातत्याने आठवण येत असते. त्या उपकारांच ओझं आपल्याला जाणवत असतं. अशा वेळी आपण त्याबद्दल कॄतज्ञता व्यक्त केली , त्याबाबत आपण आभार मानले तर आपल्या मनावरील ताण कमी होतो.
    तेंव्हा उपकारांच स्मरण ठेवून नम्रपणे कॄतज्ञता व्यक्त करणं हा सर्व सद्गुणातील सर्वश्रेष्ठ असा सद्गुण आहे.
    याबद्दल गुरुवर्य डॉ. न.म. जोशी यांनी एका कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट मी पुढे सांगत आहे.
    एकदा ब्रह्मदेवाने स्वर्गामध्ये सर्व सदगुणांची सभा बोलावली होती. साक्षात ब्रह्मदेवाने सभेचे आयोजन केले असल्यामुळे सर्व सद्गुण अगदी आवर्जून सभेला उपस्थित राहिले. सर्व सभागृह पूर्ण भरले होते . तरी देखील ब्रह्मदेव अजुन कुणाची तरी वाट पहात होते. त्या प्रतिक्षेत सभेला उशीर होत होता. बराच उशीर झाल्यामुळे जमलेल्या सर्व सद्गुणांची आपापसात चुळबुळ सुरु झाली , एकमेकांत चर्चा सुरु झाली .
    की हे ब्रह्मदेव असे कुणासाठी साठी इतकेवेळ थांबलेत.?
    पण इतका वेळ झाल्यामुळे वक्तशीर नावाच्या एका सद्गुणाने सरळ प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनाच प्रश्न विचारला की अहो अजुन किती वेळ वाट पहायची ? सर्वच खुपच वेळ थांबले आहेत. तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले आता फक्त 5 मिनिटे थांबुया आणि आपली सभा सुरु करूयात..
    एवढयात पाच मिनिटे होण्याच्या आतच सभागृहाच्या प्रवेशदारातून अगदी लगबगीने एक अगदी शांत , साधीसुधी , कृश , सडपातळ , सावळी अशी व्यक्ती सभागृहात आली देखील. उशीर झाल्यामुळे ती व्यक्ती सभागृहातील अगदी शेवटच्या आसनावर आसनस्थ झाली. हे पहाताच व्यासपीठावरुन साक्षात ब्रह्मदेव पायउतार झाले त्या उशिरा आलेल्या व्यक्तिकडे ( सद्गुणांकड़े ) गेले आणि त्या व्यक्तीला हाताला धरून व्यासपीठाकडे घेवून आले..
    सभा संपन्न झाली देखील.
    पण उपस्थित सर्व सद्गुणांच्यामध्ये चर्चा सुरु झाली की आपल्या सर्वामध्ये हा इतका मोट्ठा सद्गुण कुठला आहे ? ज्याला खुद्द ब्रह्मदेवांनी हाताने बोटाला धरून स्वागत केले ?
    तेंव्हा उपस्थिता मधील उत्सुकता या सद्गुणाने ब्रह्मदेवांना विचारले
    की हा सर्वश्रेष्ठ सद्गुण कोण आहे ?...
    तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले.... ..
    " हा सर्वश्रेष्ठ सद्गुण म्हणजे
    कृतज्ञता आहे..!!
    ताप्तर्य :
    माणसांन सदैव सर्वांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे , आपल्या जीवनात योगदान दिलेल्या सर्वांच्या बद्दल म्हणजे कुणी लहान असो कुणी मोठा असो, कुणी श्रीमंत असो , कुणी गरीब असो केवळ मानवधर्म म्हणून कॄतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
    हीच खरी मानसिक मन:शांती आहे..
    जीवनाची सात्विक कृतार्थता आहे
    इती लेखन सीमा.
    -- वि.ग.सातपुते.
    9766544908
    दिनांक:- २१ - ४ - २०२२.
    पुणे.

      May 24, 2022


  • एका कुटुंबाची करूण गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २८)

    तो भय्या इमानदार होता. वखारीचे उत्पन्न वर्षानुवर्षे तो त्यांना आणून द्यायचा. घर त्याच्यावर सोपवून बाळ दिल्लीला गेला. बाळला आतां त्या घरांत परत यावं असं वाटत असेल ? त्या घराचं भाडे भरायचा प्रश्नच नाही कारण विनाभाडे फक्त देवांची पूजा करण्याच्या अटीवर ते त्याच्या आजोबांकडे आले आहे. त्यामुळे ते विकताही येत नाही कारण त्यांच्याकडे मालकी हक्कच नाही. कोणी म्हणत त्या देवांमुळेच त्या कुटुंबाची वाताहत झाली. सुरूवातीला देवांची पूजा व्यवस्थित होई. कुटुंबावरची संकटे वाढली तशी त्यांना शंका यायला लागली. मग घरांतली देवांची खोली दिवसातून दोनदाच उघडू लागले. एकदा सकाळी पूजेसाठी आणि एकदा संध्याकाळी उदबत्त्या लावण्यासाठी. इतरवेळी दार बंद करून ठेवत. पण फार कांही फरक पडला नाही.

      September 20, 2022


  • आंबोली-आजरा परिसर …. दख्खनचं पठार !

    फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले….

      July 14, 2019


  • मना पालटे वादळातले वारे (सुमंत उवाच – ५२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    जे दिसत नाही त्यात इतकं सामर्थ्य आहे की जर त्या न दिसणाऱ्या मनाने ठरवलं तर वादळ क्षणांत शांत होऊ शकतं.

      October 13, 2021