नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया …..
आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू,रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.
मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्काराने मनावर बिंबवलेले विचार होते. बालपणीच संस्कारांनी रक्तांत शिरकाव केला व शरीराचे एक गुणधर्म म्हणून स्थित झालेले होते. फळाची आशा करु नकोस. कर्म करीत रहा. हा भगवंताचा संदेश तंतोतंत पाळण्याचे व्रत अनुसरीत होतो. पण चंचल मन हे जेवढे संशयी आणि दृढनिश्चयाला बाधा आणते, इतके बाह्य जगांतले कोणतेच विचार कार्य करणार नाही.
एकदा तारामावशी आल्या. त्यावेळी मी पूजा करीत होतो. एक विचीत्र व अफलातून विचार मनात चमकून गेला. मन जसे चपळ, तसेच संशयी पण असते. ते काय व कसा विचार करील हे कुणालाही सांगता येत नाही.
"हे आई जगदंबे, श्रीमती तारामावशी वयाची ९८ वर्षे जगल्या. अत्यंत सरळ व साधी बाई. त्यांच्या जीवनांत अद्यापी कोणतीही घटना अशी ऐंकवांत नाही, की ज्याचा विचार करतां तुझ्या अस्तित्वाची कल्पना मनाला वाटू शकेल. पण तू असे छोटेसे कां होईना, कांही तरी करून दाखव की ज्यामुळे ताराबाईना धन्यता वाटेल. व इतकी आयुष्याची वर्षे घलविली त्याचे समाधान होइल. "
हे जग ईश्वराच्या श्रद्धेसाठी, विजेच्या चमकण्याप्रमाणे एखाद्या चमत्काराची का अपेक्षा करते हे कळत नाही. दुसरय़ाच क्षणी मी माझ्या तंद्रितून जागा झालो. मला हंसू आले. श्रद्धा ठेवत जा. चमत्कार वा कांही प्राप्त होईल हा स्वार्थ तुझी तप साधना कवडीमोल करेल. मी चंचल मनाला आवरत ईश्वराची क्षमा मागीतली.
कांही दिवस गेले. अचानक दोन प्रतिष्ठीत माणसे माझ्या घरी आली. त्यांत एक ठाणे जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष, जे माझे जवळचे मित्र होते. व दुसरे नवोदित ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे याचे संस्थापक/संचालक होते. जे माझ्या परिचयाचे नव्हते. त्यांच्याकडून कळले की ठाण्यामध्ये १५० कोटीहून जास्त बजेट असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाची संकल्पना पूर्ण झालेली आहे. सामुग्रीने सुसज्ज व ज्येष्ठ डॉक्टर्स तज्ञ मंडळीनी परीपूर्ण असे अद्यावत हॉस्पिटल उभारले गेले आहे. त्यांच्या मँनेजमेंटने सामुहीक सल्ल्याने असे ठरविले आहे की ठाण्यातील जी सर्वांत वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती असेल, तीच्याकडून त्या हॉस्पिटलच्या उदघाटनाची फित कापली जावी. त्या व्यक्तीचे प्रथम पाऊल तेथे पडावे. हाती असलेल्या यादी प्रमाणे, श्रीमती ताराबाई यांचे नांव आम्हास कळले. त्या ठाण्यामध्ये ५० वर्षाहून अधीक काळ आहेत. सध्या त्या तुमच्या शेजारी राहतात. कृपया त्यांची अनुमती घेऊन द्याल कां ? त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, ह्याची काळजी घेतली जाईल.
आश्चर्य आणि कौतूकाने माझे ह्रदय भरुन आले.स्वप्नांत देखील ज्याचा विचार मनाला स्पर्ष करणार नाही, ती अघटीत घटना घडू पहात होती. अशा भव्य आणि दिव्य वास्तूचा उदघाटन सोहळा कदाचित् राष्ट्रपती यांच्या हस्ते पार पडेल हे ऐकत होतो. कारण त्या महाराष्ट्राच्याच म्हणून. अथवा पंतप्रधान वा मुख्यमंत्री यांच्या हस्ते. परंतु विधात्याने साऱ्याना एका वैचारीक लाटेमध्ये सहज बाजूस सारुन, श्रीमती ताराबाई ह्या ९८ वर्षाच्या शिक्षिका, एक सामान्य ज्येष्ठ नागरीक म्हणून त्यांच्या हाती उदघाटनाची फीत कापण्याची कात्री द्यावी, हे परम भाग्य सोपवावे, ह्याला काय म्हणणार ? एक दैवी चमत्कारच नव्हे ?
सारे ऐकून ताराबाईंच्या डोळ्यांत पाणी आले होते. आणि त्यांच्या भावना बघून, माझे ह्रदय भरुन आले. मी पाणावलेल्या डोळ्यानी देव्हाऱ्यातल्या मुर्तीकडे बघूं लागलो. पुन्हा मनाने संदेश दिला. श्रद्धा ठेवीत जा, फळाची अपेक्षा करु नकोस. माझा प्रत्येक क्षण मुळी चमत्कारानी भरलेला असतो. त्याला फक्त जाणत रहा. ईश्वरी प्रचिति तेथेच येईल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती.
डॉ.देशमुख हे आम्हास Physiology हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध …..
वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. " माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? " मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदार, कुटूंब वत्सल, उत्साही आणि सुस्वभावी वाटला. तशी मला कुण्यातरी सहकाऱयाची गरज होती. चर्चा करुन मी त्याला मज बरोबर काम करण्याची सम्मती दिली.
आगदी अल्प काळांत तिवारीने माझे मन जींकून घेतले. त्याला कामाची हौस दिसली. त्याच्यासाठी वैद्यकीय विषय अपरीचित् होता. परंतु त्यांत त्यांने उत्साह व गोडी असल्याचे दाखवून दिले. त्याने एक नोटबुक बाळगले होते. माझा रोग्याशी होणारा संवाद, त्यांच्या तक्रारी, विकाराची वर्णने, रोग्याने आतापर्यंत केलेले उपाय, ह्या सर्व बाबींची तो अतिशय उत्सुकतेने एकाग्र चित्त करुन माहिती गोळा करीत असे. त्याच्या सर्व नोंदी तो वहीत लगेच टिपून घेई. रोग्याला दिलेली औषधी, त्यांची नांवे, घेण्याची पद्धत, ह्याची व्यवस्थीत नोंद तो करुन घेई. रोगी गेल्यानंतर तो त्याच्या शंका-कुशंका विचारीत असे. माझा देखील त्याला सहकार्य करण्याचा दृष्टीकोण असावयाचा. माझ्याच सल्ल्याने त्याने कांही प्राथमिक वैद्यकीय ज्ञानाची पुस्तके पण घेतली होती. प्रत्यक्ष अनुभवांत ( Practical Knowledge ) त्याच्या कल होता. औषधी देणे, तयार करणे, ड्रेसींग करणे, जखमांची काळजी घेणे, इन्जेक्क्षन देणे, हे त्याने शिकून घेतले होते. केंव्हा केंव्हा माझ्या गैर हजेरीत तोच माझा दवाखाना व्यवस्थीत चालवित असे.
काळाचा एक प्रचंड महीमा असतो. ओघ आणि बदल ही काळाची वैशिष्ठे. तो निश्चीत असला तरी जगाला त्याच्या परिणामाचे मुळीच ज्ञान नसते. म्हणूनच त्यांत रोमांच आहे, शंका आहे, आणि आश्चर्य आहे. वय व विकलांगपणा नेहमी जीवनमार्ग बदलण्यास भाग पाडतो. वाकत जाणारे शरीर विचारांनादेखील वाकवित जाते. जो मेंदू, विचार, चेतना एकेकाळी शरीरावर ताबा करुन होता, तोच आता शरीराच्या आधीन झालेला जाणवतो. डॉक्टराची भूमिका बदलून आतां रोग्याच्या भूमिकेत राहण्याचा काळ आलेला होता. खोकल्याने हैरान केले होते.
माहित असलेले सर्व उपाय संपले. तज्ञांचेही सल्ले निकामी ठरले.
समवयस्क मित्रांनी सल्ला दिला की क्रॉनिक झालेल्या खोकल्यासाठी आयुर्वेद शास्त्रामधील उपचार करावेत. त्यांनी एका क्लिनीकचे नाव देखील सुचविले. मी त्याप्रमाणे तेथे गेलो. मला तेथे जाताच आश्चर्याचा धक्का बसला. त्या क्लिनीकचा प्रमुख होता तरुणकुमार तिवारी. एके काळचा माझा कंपाऊंडर सहकारी.
माझ खूप आदरातिथ्य व स्वागत केल गेल, हे सांगणेच नको. तिवारीच्या अभ्यासू वृत्तीने त्याला शांत बसूच दिले नाही. वैद्यकीय विभागातील त्याची ओढ व रुची त्याला ज्ञानाच्या चक्रांत फिरवीत होती. त्यानी आयुर्वेद ह्या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. पुस्तके वाचली, सर्टीफिकीट कोर्स केला. ज्यामुळे तो स्वतंत्र व्यवसाय करु शकत होता. विषय वाचन, व त्याचे अद्यावत ज्ञान (Update Knowledge ) ह्या तत्वावर तो ठाम होता.
ह्याच विषयावर लेखन करुन त्या त्या विषयांच्या संबंधातील मासिकांना लेख, उतारे, प्रश्नोत्तरे, पाठवू लागला. आपल्या ईच्छाशक्ती व प्रचंड मेहनत यानी एक प्रकारे साम्राज्य निर्माण केले होते. निरनिराळ्या आयुर्वेदिक कंपन्यानी त्याला मार्गदर्शक म्हणून देखील मान्यता दिली होती.
वैद्यकिय शास्त्राची अ-आ-इ-ई जरी तो मजकडून शिकला, तरी य- क्ष- ज्ञ अर्थात वरच्या दर्जाचे ज्ञान हे त्याचे स्वतःचे होते. मजसाठी हे जरी नाविन्यमय होते, तरी माझ्याच अडचणीच्या काळांत मलांच आसरा देणारा तो ठरला. एक प्रकारे शिष्य म्हणून मजकडे आलेला तरुणकुमार तिवारी आता एका गुरुच्या – श्रेष्ठाच्या- भूमिकेत भासू लागला.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
दररोज आम्ही वयस्कर म्हणजे सर्वजण सत्तरीच्या पुढे गेलेली, एकत्र जमत असू. गप्पा टप्प्पा होत. आज एकनाथराव फारच मुढमध्ये होते. ते …..
अप्पा असे कां वागले ? खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. …..
अमेरिकेमध्ये मिनियापोलीस ह्या शहरांत कांही काळ राहण्याचा योग आला होता. मुलगा तेथे नोकरीला होता. प्रशस्त बंगलावजा घर. सर्व कॉलनितली घरे …..
काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचे अस्तित्व नसल्यासारखेच असेल मानवाने वर्ष महीने दिवस तास मिनीटे सेकंद आणि सेकंदाचा हजारावा भाग मॅक्रो सेकंद हा यांत्रीक साधनानी केला आहे. परंतु मानवाच्या बुद्धी अनुभवाने त्या Micro Second चा केंव्हाच अनुभव घेणे शक्य नाही. ते शरीराच्या कोणत्याच हलचालीमध्ये मोजता येणार नाही. म्हणूनच वर्तमान काळ मोजणयाच्या क्षमतेत येत नाही. काळ आला नी गेला. त्या दोन क्रियाच्या मधली कालपनीक दुभंगमारी रेषा काठ वा कुंपण म्हणा हवे तर. उपनिषदामध्ये तर वर्तमान काळाचे अस्तित्व पण दाखविले नाही. इतका तो क्षणीक वा नामधारक झालेला आहे. तरीही अध्यात्मीक क्षेत्रात मानवी जीवनात संसारात वर्तमान काळाला अत्यंत महत्व दिले गेले आहे. प्राप्त झालेले आहे.
सर्व श्रेष्ठ काळ म्हणजे वर्तमान काळाला समजले गेले आहे. दोन अ-सत्या मधले एक सत्य समजले गेले आहे. ईश्वरी अनुभवाची प्रचीती, मनाच्या शांततेचा सर्वोतम क्षण, आनंद उपभोगण्याचा खरा काळ, म्हणजे केवळ वर्तमान काळच असेल. भविष्य काळ सदा अनिश्चीततेच्या लाटेवर आरुढ झालेला असतो. त्याच्या कोणत्याच क्षणाच्या सत्यतेची कल्पना करता येत नाही. एक सत्य म्हणून निश्चीत म्हणून कुणालाही समजणे शक्य नाही. तर्कज्ञानाला मर्यादा असतात.जरी ते ईश्वरी वा नैसर्गिक चक्रामधले असले तरी मानवासाठी काल्पनीक अनिश्चीत म्हणूनच अ-सत्य असा तो काळ असतो.
भूत काळ तर तुमच्यापासून दुर गेलेला असतो. पून्हा कधीही न येणारा न मिळणारा. तो फक्त फोटो अल्बमप्रमाणे आठवणीच्या कप्यात कोरला जाऊन तुमच्या जीवनातील प्रसंगाची चाळवा चाळव करण्याच्या फक्त कामाचा ठरतो. निश्चीत परंतु गेलेला काळ. म्हणून तुमच्यासाठी शेवटी एक अ-सत्य म्हणूनच समजला जातो. अनुभवाच्या फक्त मर्यादा असतात. कारण येणारा प्रत्येक क्षण अर्थात भविष्य काळ सतत नाविण्याचे प्रयोग करीतच येत असतो. त्यामुळे गेलेला क्षण वा भूतकाळ वर्तमान काळाच्या सत्यतेला साथ देण्यास सक्षम रहात नाही. म्हणूनच तो एक असत्य विचारांत जातो. हाती फक्त राहतो तो वर्तमान काळ. एक सत्य, चैतन्यमय, चंचल Ever moving period. भविष्य काळ त्याला स्पर्श करताच त्याचे रुपांतर भूतकाळांत होऊन जाते.
बुद्धीचा जीवंतपणा म्हणजे विचारांच्या लाटा सतत निर्माण करणे. विचार उत्पन्न होणे व त्याचा लय होणे. भविष्य काळाच्या चक्रात उत्पन्न होणारे विचार एका मागोमाग एक उत्पन्न होतात. ते वर्तमान काळाच्या सिमेवर आदळत भूतकाळाच्या दालनात निघून जातात. शरीर मनाला वासना-इच्छा शक्तीचे वरदान असते. ती नैसर्गिक क्रिया शक्तीचा एक भाग असते. शरीर मनाला सतत चैतन्यमय उर्जा शक्तीमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम ह्या वासना शक्तीमुळे होत राहते.
वासना लाटाप्रमाणे उत्पन्न होत असतात. त्यातून निर्माण केला जातो उद्देश वा हेतू ( Object ). हा उद्देश शरीर मनाच्या हलचाली निर्माण करतो. भविष्यातले विचार व भूत काळांत आठवणीच्या दालनात गेलेले विचार, विचार म्हणून कदाचित मार्गदर्शक होऊ शकतील. परंतु 'क्षणाचा' 'वेळेचा ' विचार करताना वर्तमान काळावरची तुमची पकड सत्याचे दर्शन घडवणारी ठरते.
सतत उत्पन्न होणाऱ्या विचारांना थोपून धरण्याचा प्रयत्न करणे व उत्पन्न झालेले विचार त्वरीत बाजूस सारणे ह्या दोन प्रक्रिया आहेत. तुमच्या मनाच्या चंचल स्वभावाने ह्या दोन्हीही क्रिया सतत होत राहतात. त्या क्रियांच्या होण्यामध्ये बाधा निर्माण करणे म्हणजेच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे. विचार रहीत वातावरणाची निर्मीती करणे. Objectless Thought चे वातावरण निर्माण करणे. वर्तमान काळाचे खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणणे ह्यालाच म्हणतात. शरीरासाठी मनासाठी तुम्ही एका बाजूने भविष्याला जणू थांबवित असता व भूतकाळाला दुर सारुन ( काल्पनीक ) फक्त वर्तमान काळांत असतात. आणि हाच सत्याचा काळ असेल. ह्यालाच अनंत Infinite म्हणता येईल. यांत्रीक पद्धतीने ह्याचे मोजमाप करतां येणार नाही. परंतु आत्म्याच्या स्थरावरचा हा अनंत काळाचा क्षण असेल. ह्या ठिकाणी मिळणाऱ्या आनंदाला सिमा नसेल. Ecstasy of Joy हे सर्व फक्त ध्यान प्रक्रियेमध्ये Meditation मध्येच शक्य आहे. योग धारणा, प्राणायाम, अन्तःकरणातील मनाचा संकल्प जर मजबूत असेल, प्रयत्न तळमळीचे असतील तरच तुम्हाला वर्तमान काळामध्ये जगण्याचा खऱ्या अर्थाने अनुभव मिळू शकतो.
वर्तमान काळात विचार उत्पन्न होऊ शकत नाही. कारण भविष्यातील विचार झेपाऊन लगेच भूत काळांत जातो. त्यामुळे विचार रहीत काळ अर्थात शांतता ( Silence ) हाच वर्तमान काळाचा प्राण बनतो. ह्याच शांततेमध्ये ईश्वरी शक्तीचे आधीष्ठान वास करीत असते. ध्यान धारणेच्या सुरवातीला तुमची केलेली ईश्वरासाठीची प्रार्थना व संकल्प हा ध्यानावस्तेधील शांतता सफल करण्याचा प्रयत्न करते. शब्दाच्या ताकतीने जे साध्य होत नाही ते अव्यक्त स्थितीमुळे अर्थात शांततेच्या काळांत पूर्ण होऊ शकते. सतत वर्तमान काळांत जगा म्हणतात ते ह्याचसाठी. Experience the present by Objectless Silence.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
कालेजच्या होस्टेल मध्ये रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची …..
Copyright © 2025 | Marathisrushti