(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • हळुहळु हळू किती वितळतो हा काळोख..

    १९७१ साली औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी अनिल औदुंबरला आले असताना त्यांच्या त्या मुक्कामातील हृद्य क्षण टिपले आहेत- प्रख्यात ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी.. त्यांच्या उत्कट, भावश्रीमंत शैलीत!


    १९७१ ची रात्र.
    शांत असलेले, अंधारात अधिकच दिसेनासे झालेले, काळ्या दगडी बांधणीचे भिलवडी रेल्वेस्टेशन.
    कसलीच जाग नव्हती.
    सिग्नल्सचे हिरवे-तांबडे दिवे. काळोखात तरंगत असल्यासारखे.
    दोन चाळीसला जनता एक्स्प्रेस येणार होती. त्या बेतानं मी आणि माझा लहानगा भाऊ श्रीधर औदुंबरातून जीप घेऊन स्टेशनवर आलो. उद्याला, संक्रांतीला भरणाऱ्या आमच्या औदुंबरच्या सदानंद साहित्य मंडळाच्या संमेलनासाठी कवी अनिल अध्यक्ष म्हणून येणार होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी आलो होतो.
    अनिलांना मी पाहिलेलं नव्हतं. पण त्यांची छायाचित्रं मी पाहिलेली होती. त्यांचे ‘पेर्तेव्हा’, ‘सांगाती’ हे कवितासंग्रह मी आवडीनं वाचले होते. त्यांच्या ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध होत असलेल्या, मोह घालणाऱ्या लयीतल्या दहा-दहा ओळींच्या अवीट कविता मी वाचत होतो.
    मी त्यांना पाहून ओळखेन या विश्वासानं त्यांना आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मी ती आनंदानं स्वीकारली होती. अनिलांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांचंही ‘मोळी’, ‘माध्यान्ह’, ‘चंद्रास्त’, ‘मराठी कादंबरी : पहिले शतक’ आदी लेखन मी वाचलेलं होतं.
    आम्हाला पुष्कळ वेळ थांबावं लागलं.
    गाडी दीड तास उशिरा पोचणार होती.
    जवळजवळ गाडी यायला चार वाजणार होते.
    आम्ही स्टेशनच्या इमारतीच्या बाहेर येऊन उभे राहिलो. वरती आकाश चांदण्यांनी लकाकत होतं. ते मुग्ध होऊन बघत होतो.
    पहिला कोंबडा आरवला.
    समोर पुष्कळ टांगेवाल्यांची घरं होती. त्यातले नेवर्ती, तुकाराम असे काही टांगेवाले माहीत होते. पण त्यांचं जग झोपलेलं होतं. बाहेर बांधलेल्या घोडय़ांना आता जाग येत चालली होती. काहीतरी काहीतरी त्यांच्या हालचाली चालल्या होत्या. त्यांतलं एक घोडं अवचितच खिंकाळलं. त्याला काय झालं होतं, कोण जाणे. त्याच्या खिंकाळण्यानं अवतीभवतीचा परिसर थरकला. क्षणभरानं दुसरं एक घोडं खिंकाळलं. दोन घोडय़ांतला तो काहीतरी संवाद असावा.
    प्राण्यांतले, पक्ष्यांतले संवाद आपल्याला आकळू येत नाहीत याचा विषाद मनात नेहमीप्रमाणं उतरत राहिला.
    आणि दूरातून धडाडत येणाऱ्या गाडीचा आवाज जाणवू लागला. हळूहळू आवाज मंद करत गाडी स्टेशनात शिरली.
    पहिल्या वर्गाच्या डब्यावर लक्ष देता देता उभ्या असलेल्या अनिलांना मी ओळखलंच. डब्याच्या दारात एका दाढीवाल्या गोऱ्यापान गृहस्थांशी बोलत उभे.
    रूपेरी पांढरे केस. गोरटेले.
    निळा-काळा सूट. पूर्वकालात ते न्यायाधीश होते.
    विचारताच म्हणाले, ‘‘हो. हो. मी अनिलच.’’
    जीपमधे बसल्यावर त्यांनी माझं नाव विचारलं.
    ‘‘नाव ऐकल्यासारखं वाटतं. लेखन करता काय?’’
    मी ‘हो’ म्हटलं.
    त्यांना म्हटलं, ‘‘हा माझा भाऊ. त्याला कविता फार आवडतात.
    तुम्हाला पहिल्यांदा बघायचं म्हणून जागरण करून माझ्याबरोबर आलाय.’’
    तो एवढासा. दहा-बारा वर्षांचा. शिडशिडीत. गोरा. रूपवान. अबोल.
    अनिलांनी त्याच्याकडं बघून घेतलं.
    म्हणाले, ‘‘मी याच्याएवढा असताना मला कवितेची गोडी लागली होती.’’
    अनिल म्हणाले, ‘‘गाडीत झोप काही लागली नाही. मला दोन वाजायच्या पुढं नेहमी झोप लागते. पण दोन चाळीसला जनता एक्स्प्रेस भिलवडीला येणार म्हणून उचक्यानं जागा राहून राहिलो. गार्डला उठवायला सांगितलं होतं. तो कऱ्हाडला सांगत आला- गाडी दीड तास लेट असल्याचं.’’
    मी त्यांना म्हटलं, औदुंबरला गेल्यावर त्यांनी थोडं झोपावं. उजाडायला उशीर असेल.
    अंधूक अंधूक दिसत होतं.
    पहाटेपूर्वीची पहाट होत होती वाटतं.
    टार रोडवरनं आमची जीप धावत होती.
    अनिल भवतालचा भूगोल विचारत होते.
    सगळा पंधरा-वीस मिनिटांचा रस्ता होता.
    खंडोबाची वाडी. माळवाडी गेली. ब्रह्मनाळची पांद. भिलवडीचा पूल. खाली कृष्णा वाहत होती. डाव्या हाताला भिलवडीचा प्रसिद्ध घाट. नदीत उतरायला लागलेला. खालून अगदी वरच्या उंच पायरीवर ठेवलेली सुपारी दिसावी अशी बांधणी. स्त्रियांना पाणी भरून नेणं सोपं व्हावं अशी रुंद पायऱ्यांची रचना.
    पूल ओलांडला.
    मळ्यांकाठची वस्ती आली.
    पहाटेच्या थंड हवेत कोंबडे उंचावून ओरडू लागलेले. एक ओरडला की पाठोपाठ दुसरा. तिसरा.
    अनिल म्हणाले, ‘‘यांची आरवण्याची स्पर्धा सुरू झालेली दिसते.’’
    औदुंबरात पोचलो. कवी सुधांशु यांच्या घरी.
    अनिलांनी अंग थोडंसं सैल केल्यावर सुधांशुंनी विचारलं, ‘‘चहा आणू दे ना?’’
    ‘‘वाऽ वा. आणा नं. पण यावेळी घरच्या माणसांना कशाला जागं करता?’’
    ‘‘हे करणं किती आनंदाचं आहे!’’ सुधांशु म्हणाले.
    अनिल म्हणाले, ‘‘मी आता थोडी झोप घेतो.’’
    पण बोलणी निघता निघता त्यांचा झोपायचा विचार मावळला. भिलवडीच्या घाटाच्या संदर्भात त्यांना त्यांनी पाहिलेले सुंदर घाट आठवले. अहल्याबाईंचं नाव निघालं.
    ‘‘आज कोठे नवीन घाट बांधले जातात का? बहुतेक कोठे नाहीत.’’
    अनिलांनी पानाचं खानदानी साहित्य बाहेर काढलं.
    ‘‘रामटेकचं पान आता इतिहासजमा झालं. ती जातच मेली. बोअर नावाचा किडा असतो. वेल मांडवावर चढली आणि हजारभर पानं वर लागली, की हा किडा वेलीच्या खालून मूळच कातरतो..’’ अनिल म्हणाले.
    पानांवरून संशोधनावर बोलण्यानं वळण घेतलं.
    सुधांशु म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीविषयीच्या तुमच्या ‘किलरेस्कर’मधल्या लेखानं पुष्कळांची उत्सुकता वाढली आहे.’’
    ‘‘मला नाही वाटत, ते लोकांना इतक्या लवकर पटेल असं. काळ जावा लागेल. पण मी जिद्दीचा माणूस आहे. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागलो की ते सोडायचं नाही. आयुष्याची जी काय पाच-सात र्वष उरली असतील ती या कारणी लावायची.
    ‘‘संशोधन करायला नको. ती दृष्टीच नाही आपल्या लोकांकडे. माझा दृष्टिकोन आशावादी आहे.. सांकलिया यांचे आणि माझे पुरातत्त्व संशोधनाच्या संदर्भात अनेकदा मतभेद झाले आहेत. ही माणसं ज्याचा प्रत्यक्ष पुरावा हातात मिळत नाही ते घडलंच नाही असं म्हणतात. उदाहरणार्थ रामायणातल्या गोष्टी. ते म्हणतात, भारतापासून लंकेचं इतकं मोठं अंतर. त्यावर सेतू बांधणं शक्यच नव्हतं. यावर मी त्यांना, १८ व्या शतकात पोर्तुगीज जहाज भारत आणि सिलोन यांमधून येताना अडकत होतं, इतका तो भाग अरुंद होता, हा उल्लेख दाखवला.
    ‘‘ख्रिस्तपूर्व दोन हजार र्वष तरी रामायणाचा काळ असेल की नाही? त्यावेळी लंका आणि भारताचं टोक यांत आजच्याइतकं अंतर असेल का?
    ‘‘तसंच रामायणकालीन घरांसंबंधी. पाच- पाच मजली घरं त्याकाळी वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं शक्य नव्हती असं त्याचं म्हणणं. पण ही घरं संपूर्ण लाकडाची होती असं मला वाटतं. या घरांचं एक तंत्र असे असं मला वाटतं. उत्तम जुनं लाकूड परीक्षा करून घेऊन, ते खोल पाया काढून त्यात रोवलं जाई. पाणी लागेपर्यंत पाया काढला जाई; आणि तो मजबूत बांधून त्यावर घराचा डोलारा उभा केला जाई. मोर्डीला तुम्ही चला. आजही संपूर्ण लाकडाचे वाडे तुम्हाला मी दाखवीन. आज तुम्हाला रामायणकालीन वाडय़ांचे अवशेष काय मिळणार? जळून गेलेल्या लाकडांची राख!
    ‘‘मी सांकलियांना म्हटलं, ‘तुम्हाला तत्कालीन वाडय़ांचे अवशेष हवे असतील तर अशा पायासाठी खोदलेल्या विहिरी मिळताहेत का ते शोधा.’ सांकलियांना माझं म्हणणं तर्कशुद्ध वाटलं आहे.’’
    अनिल पुढं म्हणाले, ‘‘संशोधनाच्या दिशा चुकताहेत असं मला पुष्कळदा वाटतं. व्हावं तसं संशोधन होत नाही. पुष्कळशा महत्त्वाच्या मूर्ती, पोथ्या, ग्रंथ अजून असंशोधित आहेत. ते अजून मिळतील असं वाटतं. पूर्वी परचक्र आलं की शहाण्या माणसांनी कोठे ना कोठे गोष्टी दडवल्या. आमच्याकडे मेहेकर या गावी एक मूर्ती नुकतीच सापडली. पद्मपुराणातल्या वर्णनाप्रमाणं ती हुबेहूब आहे. जुन्या गढीचा ढीग म्हणून तिच्याकडं पाहिलं जाई. त्या दिशेनं आरती करायचा प्रघात होता. पण ती का, कशासाठी, ते काही पिढय़ांनंतर लोक विसरून गेले. त्याचं संशोधन करावं असं कुणाला वाटलं नाही. योगायोगानं ती सापडली. तुमच्याकडे ‘गढी’ ही संस्था नाही. वऱ्हाडात त्या तुम्हाला दिसतील. पूर्वी पेंढारांचे हल्ले येत. हल्ला आला की उंच गढय़ांवर आपल्या चीजवस्तू घेऊन लोक जात. वर दगड ठेवलेले असत. ते पेंढारांना मारण्यासाठी.’’ मेहेकरच्याच ना. घ. देशपांडे यांच्या कवितेत गढीचा उल्लेख आहे तो मनात आठवत होता : काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे..
    सुधांशु म्हणाले, ‘‘औदुंबरला इथं डोहात ‘सिद्धमठ’ आहे. नेहमी पाण्याखाली असलेला. उन्हाळ्यातही त्याच्यावर पाणी असतं. उन्हाळ्यात त्याच्या पाण्यातल्या चौथऱ्यावर उतरता येतं. पण खोल पाण्यात आत काय आहे कळत नाही. त्या सिद्धमठाच्या दिशेनं आम्ही काठावरून आरती म्हणतो.’’
    अनिल म्हणाले, ‘‘त्याचं संशोधन करायला हवं. सिद्धमठाचा उल्लेख कुठं झाला आहे?’’
    ‘‘ ‘कृष्णामाहात्म्य’ ही संस्कृत हस्तलिखित पोथी मी पलीकडच्या आमणापूर या गावातून आणून वाचली होती. ती पोथी ‘गुरुचरित्रा’च्या आधीची. पाच-सहाशे वर्षांपूर्वीची आहे. अजून ती छापली गेलेली नाही.’’ सुधाशुंनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, ‘‘पाच-सहाशे वर्षांपूर्वी कृष्णेचा प्रवाह सिद्धमठाच्या पलीकडून वाहत असावा. आता तो मठ पाण्यात गेला असावा.’’
    अनिल म्हणाले, ‘‘संशोधनात अनेक अडचणी असतात. मी सातारच्या िखडीतल्या गणपतीचं संशोधन करावं म्हणतोय. तिथल्या मंडळींनी मान्य केलं, पण तिथल्या पुजाऱ्यांनी हरकत घेतलेली दिसतेय. बघू या, काय होतंय ते. मी पेरिस्कोपिक कॅमेरा मागवला आहे. आता ही हरकत उपस्थित झालीय. औरंगजेबच्या स्वारीच्या वेळी मूळ मूर्ती आत लपवली गेली; आणि बाहेरच्या भिंतीवर शेंदूर माखला गेला. त्याचाच गणपती झाला असावा. पूर्वीच्या मूर्ती रत्नजडित असत. कदाचित हीही मूर्ती तशी असेल. पाहायला हवे.
    ‘‘रत्नागिरीजवळ महाड रस्त्यावर गुळे नावाचं लहानसं गाव आहे. तिथंही असाच गणपती असावा असा कयास आहे. त्यासाठी गुळ्याच्या ग्रामस्थांनी मला बोलावलं आहे. मी त्यांना सांगितलं, तुमची सगळी तयारी असेल तर मी येतो. निदान आत काय आहे याचं निश्चित चित्र तरी तुम्हांस मिळेल की नाही?’
    ‘‘ज्ञानेश्वरमाऊलींच्या समाधीविषयी माझं हेच म्हणणं आहे. ज्ञानेश्वरमाऊलींचा मीही भाविक आहे. ‘अमृतानुभवा’चा मी सखोल अभ्यास केला आहे. ज्ञानेश्वरमाऊलीनं संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधीविषयी मला अजून वाचायला मिळालेलं नाही. माझ्या ओळखीतले एक गृहस्थ आहेत. अध्यात्मशास्त्राचं त्यांनी चांगलं वाचन केलं आहे. या समाधीविषयी त्यांनी वाचलं आहे. पण कोठे, ते त्यांना आठवत नाही. पण आठवून सांगतील. निरनिराळ्या संप्रदायांचे निरनिराळे साधनेचे, समाधीचे प्रकार असतात. ते सगळं एकटय़ाला वाचून शोधणं शक्य नसतं.
    ‘‘ज्ञानेश्वरमाऊली तिथून दैवी शक्तीनं अंतर्धान झालेली असली तर, तरी नामदेवांनी वर्णिलेलं समाधीच्या आतल्या भागाचं, तिथल्या ओटय़ाचं जरी छायाचित्र मिळालं तरी खूप नाही का? नामदेवांचे अभंग जे काल्पनिक मानतात- त्यांना उत्तर मिळेल की नाही? पाश्चात्त्य देशांत अशा संशोधनांना कोणी विरोध करत नाही.’’
    बोलता बोलता उजाडत आलं.
    अनिलांनी सकाळचं सगळं आवरायला सुरुवात केली.
    खाणं झालं.
    त्यांना नदीवर आंघोळ करायची होती.
    नदीपलीकडं उभं असलेलं, तेराव्या शतकातलं हेमाडपंती भुवनेश्वरीचं मंदिर बघायचं होतं.
    भुवनेश्वरीच्या देखण्या मूर्तीचं, मंदिराच्या हेमाडपंती रचनेचं, प्राकारात असलेल्या अन्नपूर्णेच्या दगडी शिल्पाचं, वेताळ, हनुमान आदी मूर्तीचं अनिलांना अप्रूप वाटत होतं.
    त्यांच्याबरोबर सुधांशु, प्रसाद जोशी आदी मंडळाचे सदस्य असे आम्ही मंदिराची चढण उतरत नदीकडे चाललो. धनगावहून मंडळाचे उपाध्यक्ष, मराठीतले प्रसिद्ध ग्रामीण लेखक म. भा. भोसले येऊन आम्हाला मिळाले. अनिलांना पाण्यातल्या ‘सिद्धमठा’कडे जायचं होतं. तिकडं नाव घेतली. सिद्धमठाच्या चौथऱ्यावर आम्ही उतरलो. अनिलही उतरले. गुडघाभर पाणी होतं. सिद्धमठाची मर्यादा संपली की डोहाचं खोल पाणी सुरू होत होतं. पाण्यात असलेली ही प्राचीन मंदिराची जागा अनिलांना रहस्यमय वाटत राहिली. ‘‘हे काय आहे, ते शोधलं पाहिजे,’’ म्हणाले. पलीकडं नाव निघाली होती. काठाला औदुंबराचे- उंबराचे खूप वृक्ष होते. औदुंबराच्या झाडांनी वेढलेलं गाव म्हणून गावाचं नाव- औदुंबर. अनिलांनी उंबर या झाडाच्या किती जाती आहेत ते सांगितलं.
    नंतर नावेतच म. भा. भोसले यांनी त्यांच्या ‘उघडय़ा जगात’ या कादंबरीचा विषय काढला. अनिलांना ते म्हणाले, ‘‘माझ्या या कादंबरीवर ‘जिवाचा सखा’ चित्रपट निघाला. अनेक वृत्तपत्रांनी या कादंबरीवर चांगले अभिप्राय छापले. ‘मौज’ साप्ताहिकानंही या कादंबरीची प्रशंसा केली. पण अलीकडंच कुसुमावतीबाई देशपांडे यांनी ‘सत्यकथा’ मासिकात दोन भागांत मराठीतल्या कादंबरी- लेखनाचा प्रदीर्घ आढावा घेतला आहे. त्यांनी अनेक उल्लेखनीय कादंबऱ्यांची नावे दिली आहेत. मात्र, माझ्या कादंबरीचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. यासंदर्भात मी कुसुमावतीबाईंना पत्र लिहिलं. त्याची त्यांनी पोचही दिली नाही. नंतर ‘आमच्यासारख्या खेडय़ातल्या लेखकांना दुर्लक्षानं मारलं जातं,’ असे पत्र मी ‘मौज’ साप्ताहिकाला पाठवलं. ते पत्र त्यांनी छापलं. पण कुसुमावतीबाईंनी माझ्या लेखनाची कसलीच दखल घेऊ नये याचं मला वाईट वाटलं.’’
    अनिल म्हणाले, ‘‘प्रत्येकाची वेगळी आवड-निवड असते. लेखकानं समीक्षकाच्या विशिष्ट दृष्टिकोनाचा एका मर्यादेपलीकडे विचार करू नये. आपली आपण वाट चालावी. कुसुमावतीबाईंनी तुमच्या लेखनाचा उल्लेख केला नाही तरी ते त्यांचं एकटीचं मत. तुमच्या कादंबरीची खूप वाहवा झाली आहे यात समाधान मानून आपलं लेखन करत राहावं, हे श्रेयस्कर. आणि कोणताही समीक्षक, हा लेखक खेडय़ातला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. कुसुमावतीबाई तर नाहीतच नाही.’’
    हळूहळू आम्ही मंडळाच्या कार्यालयात आलो. दुरून दुरून रसिक अनिलांना भेटायला येत होते.
    सदानंद सामंत या औदुंबरातल्या प्रतिभावंत लेखकानं वाङ्मयाची, निरनिराळ्या कलांची आवड भोवतीच्या तरुणांत निर्माण केली. सुधांशु, म. भा. भोसले अशी नामवंत मंडळी त्यातूनच उदयास आली.
    वडाखालचं आवार रसिकांनी भरून गेलं होतं.
    आणि अनिलांच्या भाषणासाठी, कवितावाचनासाठी सगळे उत्सुक झाले होते.

    -- संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.लोकसत्ता

    ## Atmaram Raoji Deshpande alias Kavi Anil

  • माणसं’ ब्लाॅक होतात, ‘मन’ नाही

    काॅलेजमध्ये असताना एक सिनियर मित्र होता. काॅलेजमधील सांस्कृतिक कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. तो बोलघेवडा असल्याने त्याच्या सर्व प्राध्यापकांशी ओळखी होत्या. त्याचा गैरवापर करून तो माझ्यावर दबाव आणू लागला.

  • उगाच काहीतरी – १७

    सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी.

  • चक्षु पटलावरील ती छबी

    माझ्या डोळ्यातही एक दैवी असा  कॉम्पुटर  (Computer ) आहे. असे  मला  वाटते.  तो दैवी माऊस( Mouse )  क्लीक केल्यावर, माझ्या मनावर  कोरल्या  गेलेल्या  साऱ्या आठवणीना  उजाळा मिळतो. त्या काळाची  त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत  सामावलेली ती छबी, आजही चटकन  Display अर्थात  प्रक्षेपित  होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.

  • उक्ती आणि कृतीतील अंतर

    कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक - उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ' 'ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. '' भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की '' या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. '' सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.

  • मातीवर मातीच

    निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून "लहान" असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले.

    मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय आहे ते माती बाजूला सारून पाहीले. तीला कळले की ज्ञानेश्वराचा आपल्यावर विश्वासा नाही.

    ती शांतपणे म्हणाली की "ज्ञानदेवा, संन्याशाला सोने आणि माती समान असताना, तू या कृतीतून "मातीवर मातीच" नाही का टाकलीस? का सोन्यात आणि मातीत तुला फरक करता येत नाही?".

    -- दीपक गायकवाड

  • अजब न्याय नियतीचा – भाग १०

    नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?”

  • सैतनामधील प्रेमओलावा !

    मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी  पडली होती. ” हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही  गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले.

  • इ-पुस्तक – आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे

    p-22189-EBook-Cover-Final-300मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे गेली अनेक वर्षे “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर नियमितपणे लेखन करत आहेत. हे लेख अल्पावधीतच आमच्या हजारो वाचकांच्या पसंतीला उतरले असून अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

    इ-पुस्तक फक्त रु. १००/-

    “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.

    स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्‍या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्‍या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्‍याने सत्ताधार्‍यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.

    इ-पुस्तक फक्त रु. १००/-

    या पुस्तकातील लेखांची यादी पुढील पानांवर :

    इ-पुस्तक फक्त रु. १००/-

    या पुस्तकातील लेख :

    • शूर शिपायाचा पोवाडा
    • अमृत-ओळी
    • अमेरिकन सैन्याची अफ़गाणिस्तान,पाकिस्तान मधून वापसी आणि त्याचा भारतावर परिणाम
    • बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचारांची पुन्हा पुनरावृत्ती
    • पश्चिम बंगालला घुसखोरीचा कर्करोग?
    • पाकिस्तानशी व्यापार संबंध वाढवा, तस्करी नाही
    • काश्मीरची काश्मिरीयत कडून वहाबी धर्माकडे वाटचाल
    • बांगलादेशातून स्थलांतर केलेल्या हिंदूना आसरा देणे आपले कर्तव्य
    • लडाख,अरुणाचल प्रदेशात रस्ते, रेल्वे, विमानतळे,पायाभूत सुविधा उभारणॆ अत्यंत जरुरी
    • लेफ्टनंट जनरल हेंडरसन ब्रुक्स अहवाल ५१ वर्षानंतर गुलदस्त्यात का ?
    • देशप्रेम हाच सैनिकांचा धर्म
    • ३७० कलम आणि काश्मिर खोर्‍यातील भावनिक एकात्मता
    • नेपाळ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माओवाद्यांचा पराभव भारतासाठी महत्वाची घटना
    • २०१३ मध्ये महाराष्ट्रात नक्षलवाद आणि आदिवासी विकास
    • काश्मीर, दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रीयसुरक्षेच्या बाबींवर आप पार्टीची ठोस भूमिका जरुरी
    • बनावट नोटांचा सुळसुळाट पाकिस्तान / चीन कडुन एक नवीन प्रकरचा दहशतवाद
    • सरकारकडून 'वन रँक, वन पेन्शन' योजनेच्या नावावर संरक्षण दलांची फसवणूक
    • काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा एक योग्य निर्णय
    • माओवाद्यांच्या बीमोडासाठी व्यापक संयुक्त कारवाई जरुरी
    • भारतातील बांगलादेशी घुसखोरांना शोधणे कठीण
    • पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे
    • संरक्षण क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुक एक चांगले पाऊल
    • बिगर सरकारी संघटना संशयाच्या घेर्‍यात
    • पुण्यातल्या फरासखाना पोलिस ठाण्यासमोर झालेला स्फोट
    • माओवाद संपवण्यासाठी सर्व समावेशक उपाय
    • विळखा दहशतवादी कारवायांचा : आय.एस.आय. वर नियंत्रण करण्याची गरज
    • जम्मू-काश्मीर वर राष्ट्रीय आपत्ती:अभुतपुर्व लष्करी मदतकार्यांमुळे परिस्थिती काबुमध्ये
    • अतिरेक्यांच्या धमक्या व ‘ब्रेकिंग इंडिया’ चे भाकीत
    • बांगलादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज
    • भारत-पाक संबंध एक शुन्याचा पाढा
    • मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमधे वाढता दहशतवाद
    • संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पाऊले
    • सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार
    • राजकीय पक्ष आणि माध्यमांचा बेजबाबदारपणा
    • ४० लाख तरुण व्यसनाधीन करणारा नार्को टेररिझम
    • ऑनलाईन जिहाद : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना
    • दहशतवादाचे बदलते स्वरुप, एकटे दहशतवादी : गरज तरुणांशी संवाद साधण्याची
    • पाक धार्जिण्या नेत्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता
    • पाकिस्तानला अद्दल घडवा : हुरियतच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा
    • मुफ्ती महंमद सईद आणि फुटीरतावाद्यांचा आगीशी खेळ
    • बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम
    • पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ?
    • आय.एस.आय. हजार जखमांनी भारतास रक्तबंबाळ करत आहे
    • भारताची राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे इंटरनेटवरील लेखन
    • ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांची पुस्तके
    • ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे इंग्रजीतून लेखन
    • राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे व्हिडिओ

    इ-पुस्तक फक्त रु. १००/-

  • मित्र! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १२

    कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!