(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • दुर्मीळ खजिना गवसला

    लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.

  • मी का लिहितो..

    ‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे.

  • उगाच काहीतरी – २

    सोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात.

  • जिम कॉर्बेट – भाग २

    नरभक्षकांची शिकार साधताना त्याला विलक्षण खडतर तपश्चर्या करावी लागली. हिमालयाच्या थंडीवाऱ्यात, पावसात, उघड्यावर रात्रंदिवस जागत, निश्चित अन्नपाण्याशिवाय दिवसामागून दिवस काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका वेळी तर गळू झाल्याने त्याचा डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. कानाच्या पडद्याला भोक पडल्याने ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत काहीवेळा दिवसरात्र झोपेशिवाय केवळ चहा बिस्किटांवर राहून काढल्यावरच त्याची नरभक्षकाशी गाठ पडली. तो म्हणतो, "नरभक्षकांच्या छायेत आपण किंवा आपल्या निकटवर्तीयांनी जगण्यासारखी भयंकर आपत्ती नाही.” नरभक्षकांच्या मागावर असताना नरभक्षक आपल्या मागावर असणार व आपली शिकार करण्याची संधी शोधत असणार, याची त्याला पूर्ण कल्पना असे. नरभक्षकाची शिकार हा खरे तर नरभक्षक आणि शिकारी यांच्यातील परस्पर शिकारीचा सामनाच असतो व परिस्थिती नरभक्षकाला पूर्ण अनुकूल असते. पण हा धोका पत्करूनही व त्याचप्रमाणे ज्या संपूर्ण कुमाऊँला नरभक्षकांच्या भीषण छायेतून वाचवण्याचा मान मिळवूनही या अत्यंत सुस्वभावी व विनयी माणसाच्या जंगल व जंगलवासींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काहीही बदल झालेला नाही. म्हणून तो चुकाचा नरभक्षक या आपल्या कथेत लिहू शकतो - "The thought of disabling an animal and a sleep-ing one at that simply because he occsionally liked a charge of diet was hatefull."

    वन्य प्राण्यांच्या सवयीची त्याला पूर्ण जाण होती. त्यांचे माग पाहून तो अचूक निदान करू शकत असे. प्राण्यांचे लिंग, वय, आकार एवढेच काय त्यांची मन:स्थितीसुद्धा तो ओळखू शके. सर्व वन्य प्राणी लाजाळू असतात. परिस्थिती त्यांना आक्रमक, हल्लेखोर बनवते. आज निसर्ग समतोल न्यायाच्या संदर्भात कोणताही प्राणी भुकेसाठी, भुकेपुरते व भूक लागेल तेव्हाच किंवा संरक्षणासाठी दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करतो ही वस्तुस्थिती मांडली जाते. या विचाराचा उगम कॉर्बेटच्या लिखाणात आढळतो. इतकेच नाही तर बलिष्ठ प्राणी दुबळ्या प्राण्यांचे संरक्षण करतात, त्यांना कधीही त्रास देत नाहीत व हाच जंगलचा कायदा आहे, असे कॉर्बेट निक्षून सांगत असे. जिम कॉर्बेटने आपल्या ‘माय इंडिया' या पुस्तकात एक अनुभव/गोष्ट सांगितली आहे. दोन अजाण बालके जंगलात हरवतात. त्या जंगलात वाघ, बिबटे, अस्वले तसेच अन्य वन्य श्वापदांचे वास्तव्य होते. ३ दिवसांनी जेव्हा ती मुले सापडली तेव्हा त्यांच्यावर नखाचा ओरखडासुद्धा नव्हता. या तीन दिवसात प्राण्यांनी ती मुले पाहिली नाहीत केली असे होणेच शक्य नाही पण कुणाही प्राण्याने त्या मुलांना कसलीही इजा नव्हती. कॉर्बेटने सांगितलेल्या गोष्टीमुळे त्याच्या विचारांना निश्चिती मिळते. जिम कॉर्बेटच्या ज्ञानाचे, अनुभवाचे, अनुमानाचे, निष्कर्षाचे प्रतिबिंब त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला स्पष्टपणे पहायला मिळते.

    जिम कॉर्बेटने नरभक्षकांच्या दहशतीच्या क्रौर्याच्या कथा रंगवल्या पण निसर्गातील समतोल शाबूत ठेवण्यासाठी सहाय्यभूत होण्याचे कार्य वाघाला पार पाडायचे असते व त्यासाठी वाघांच्या अस्तित्वाचे महत्त्व पण तो जाणून होता. वाघांची भलावणी तो 'सहृदय सद्गृहस्थ' अशी करत असे. वाघ नरभक्षक का बनतात व त्यात माणसांचा सहभाग किती, याची तो कारणमिमांसा करत असे. तो म्हणतो, "वाघ नरभक्षक होण्याची कारणे म्हणजे असह्य वेदना देणाऱ्या किंवा अपंगत्व आणणाऱ्या जखमा, वृद्धत्व किंवा अपुरे नैसर्गिक खाद्य! साळिंदर हा छोटासा प्राणी. हे वाघाचे आवडते खाद्य! पण साळिंदराचे काटे वाघाच्या पायात घुसत. त्या काट्यामुळे पायाला खोल जखमा होत. त्याला चालणे मुश्किल होई. त्याचे नैसर्गिक खाद्य मिळवणे मुश्किल होत असे. अशा परिस्थितीत जर चुकून त्याच्या हातून नरहत्या झाली तर हे सुद्धा एक खाद्य आहे हे त्याच्या लक्षात येई व तो नरभक्षक बने.” जिमने मारलेल्या बऱ्याच नरभक्षकांच्या पायातून त्याने साळिंदराचे काटे बाहेर काढले होते तर मुक्तेश्वरची वाघिण एका डोळ्याने आंधळी होती.

    त्याच्या म्हणण्याप्रमाणे नरभक्षकांच्या मोहिमेवर असताना त्याला एक आंतरिक संवेदना होत असे व त्यामुळे त्याचे संरक्षण होत असे.

    पण त्याला आलेला एक अद्भुत अनुभव म्हणजे पूर्णागिरीच्या पहाडावर त्याला दिसलेले दिवे! हा अनुभव त्याने आपल्या 'तालादेसचा नरभक्षक' या कथेत सांगतला आहे. टणकपूरपासून २५ कि.मी. अंतरावर माता भगवतीचे 'पूर्णागिरी' हे शक्तिपीठ आजही उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. पूर्णागिरी मंदिराच्या समोरील पहाडावर, देवीची कृपा असलेल्या श्रद्धाळू भक्तांना, त्या परिसरातील लोकांचे भले करणाऱ्या व्यक्तींना दिव्य ज्योतीचे दर्शन होते, अशी आजही ह्या परिसरात वदंता आहे आणि विशेष म्हणजे जिम जेव्हा तालादेसच्या नरभक्षकाच्या मोहिमेवर होता तेव्हा त्याला व त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांना या दिव्य ज्योतींचे दर्शन झाले होते. त्या संबंधी त्याने एका स्थानिक पत्रकात लेखही प्रसिद्ध केला होता. तो लेख जेव्हा पूर्णागिरीच्या मुख्य पुजाऱ्याच्या ते वाचण्यात आला तेव्हा हे दिवे पाहिलेला पहिला युरोपियन माणूस म्हणून स्वत: जिमला भेटण्यासाठी आले होते. या दिव्यांची वस्तुस्थिती त्यांना माहित होती तर जिमने ते प्रत्यक्ष पाहिले होते.

    वाघ वाङ्मयाला व शिकारकथांना प्रसिद्धी मिळाली ती केनेथ अँडरसन व जिम कॉर्बेटमुळे! पण जिम कॉर्बेटचं लिखाण अतिशय सुंदर आहे. या लिखाणात त्याने केलेली निसर्गाची वर्णने, प्राण्यांच्या सवयी, लोकांच्या भावना, त्यांचे स्वभाव, त्याला स्वत:ला आलेले अनुभव हे सर्व वाचताना या सर्व घटनांचे आपणही एक साक्षीदार आहोत असे वाटू लागते व त्यात आपण गुरफटू लागतो.

    जिम कॉर्बेटने लिहिलेल्या पुस्तकांना जगात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषात त्याची भाषांतरे झाली. अनेक आवृत्त्या निघाल्या. विक्रीचे उच्चांक मोडले. त्याच्या 'मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ' या पुस्तकाचा तर भारतात सिनीअर केंब्रिजच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. या पुस्तकांनी जिम कॉर्बेटला लक्षाधीश बनवले व निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसाला निसर्ग भरभरून देतो ही त्याची श्रद्धा खरी ठरली. पण हे मानधन माझे नाही तर हे पैसे निसर्गाचे आहेत या भावनेने मिळालेले सर्व मानधन त्याने भारत व ब्रिटनमधील वन्यप्राण्यांच्या रक्षणाच्या योजना आखण्यात, गिरीजनांना, गोरगरिबांना, युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांना, अंधांना मदत करण्यात खर्च केले.

    --प्रकाश लेले

  • माझा देव आहे कुठे

    बाबांचा (डॉ. बाबा आमटे) परमेश्वरावर विश्‍वास नव्हता. त्यांनी आपल्या कामातून प्रेरणा देणारे अनेक पर्याय निर्माण केले. अगदी तरुण वयात मी या कामात ओढला गेलो. बाबांच्या मुशीत तयार झाल्याने मीसुध्दा परमेश्‍वर नावाची कोणी अदृश्य शक्‍ती आहे ही संकल्पना मानत नाही.

  • वेगळा (कथा) भाग ४

    नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला.

  • मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

    मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- - -)

    दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून - Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्याच प्रकारचा आघात होत राहतो, परिणाम दिसून येतो.

    मेंदूचे कार्य अर्थात विचार करण्याचे. आणि हे कार्य सतत होत असते. विचारांची उत्पती हे जिवंतपणाचे लक्षण असून, त्यामुळे मेंदूला सतत चेतना मिळत राहते. मेंदूचे हे एक प्रकारे खाद्यच आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये. विचारांचे मार्ग एका दिशेने जाणे चागंले. त्याला लय असते. विचार भरकटत राहणे चांगले नव्हे. मनन, चिंतन, ध्यान creative विचार शोधबुद्धीचे विचार आध्यात्मिक विचार हे मेंदूला एकप्रकारे शांतता देते. त्याला कारण विचारांना एक दिशा, लय असते. विचार जेव्हा विखूरलेले असतात धावपळ करतात असंबध असता आणि सर्वांत निर्माण होणे हे धोक्याचे ठरते. अशी वैचारिक ठेवण शरिराला म्हणजे इतर अवयवांना धोका वा आघात निर्माण करु शकतात. ह्यालाच आपण तणाव म्हणतो. विचार करणे हेच तर मेंदूचे कार्य परंतू जेव्हा तोच तोच विचार सतत घोळत राहतो तणाव निर्माण करतो.

    माणसाला विवेक शक्ती दिलेली आहे. घटनांचे विश्लेषण करणे, त्यामधली सत्यता, नैसर्गिक परिणाम, जीवन चाकोरीवरील त्याचा आघात हे सारे आपण विवेकी विचारांनी ठरवू शकतो.

    होणाऱ्या घटनेत तुमच्या विचार करण्याने काही बदल होऊ शकतो. आणि जेव्हा हे आपल्या मनाला चांगले मान्य होते, तेव्हा तो विचार बाद करणे काढून टाकणे,त्याला प्रयत्नपूर्वक मनात येवू न देणे चांगले. जर तुमची विवेकबुद्धी, समजदारी सुस्थिर असेल तर तुमचे गैरविचार उत्पन्न होण्याच्या प्रक्रियेला तुम्ही रोखू शकता. अशा विचारांना चालना न देणे, त्याच्या लयीमध्ये न जाणे हे तुमच्या हाती असू शकते. तुमच्या स्वभावाची ठेवण ह्यास कारणीभूत असते. जो स्वभाव तुम्ही तुमच्या वागण्याच्या पद्धतीने निर्माण केलेला असतो. कित्येकजण प्रत्येक घटनाच्या प्रसंगाच्या मागे जावून त्यांत गुंतून राहण्यात समाधानी होतात. मग त्याचा संबंध नजदीकचा असो वा नसो. त्याच वृत्तीमधून त्या त्या घटनेबद्दल सतत विचार करण्याची सवय जडते. हेच विचारांचे चर्वण शरिराला धोकादायक ठरु शकते. ह्याचा परिणाम म्हणजेच मानसिक तणाव .

    २. एक उदाहरण देतो. कुणाचे १०० रुपये हरवतात तर कुणाचे १००० रुपये हरवतात. हे दोन्ही निश्चित की दोन्ही घटनांनी दुख होईल आणि विचारांच्या लगभगीमुळे तुमचे मन विचलीत होईल. कदाचित, ह्यालाच क्षणिक मानसिक तणाव संबोधता येईल. अशा मानसिक तणावांचा शरीरावर परिणाम होण्यासाठी असा तणाव सतत उत्पन्न झालेला असावा केवळ निर्माण झालेला विचार घातक नसतो तर तोच तोच विचार घोळत राहणे हे त्रासदायक असू शकते. येथे तुमचा स्वभाव विशेष असे होण्यास भाग पाडतात, पैसे हरवले ह्या बद्दल थोडीशी खंत करुन आपल्या विश्लेषणात्मक विचारांनी स्वत:ची समज घालतात आणि तो विचार मनांतून काढून टाकतात. ह्या उलट काही पैसे कसे हरवले ह्या बद्दल सतत सर्वांना वाच्यता करुन तोच तोच विषय घोळत राहतात. तणाव म्हणतात तो हाच. पैसे किती हरवले, नुकसान किती झाले ह्यावर मानसिक तणाव अवलंबून नसतो.

    निसर्गाने त्याच्या चक्रात अनेक लहान मोठे आणि काही तर भयावह प्रसंग निर्माण केलेले असतात. परंतू त्याचवेळी स्व सान्तवन, समजदारी प्रसंगामधून पुन्हा उभारी येण्याची कला माणसाला दिली आहे. अशी कला ही उन्नत करावी लागते. त्याचवेळी कोणत्याही दुर्धर प्रसंगाची धार बोथट होऊ शकते. सुसह्य होवू शकते. अशाच वृत्तीची माणसे मानसिक तणावापासून आपला बचाव करु शकतात.

    १०० रु याच्यापेक्षा १००० रु हरवणे म्हणजे जास्त मानसिक तणाव हे वैद्यकिय शास्त्रामध्ये साधे अंकगणित नव्हे. किती रुपयाच्या हानीचा विचार कितीवेळा हेच गणिताचे उत्तर ठरवितो.

    थोडेसे वैद्यकिय विश्लेषनाकडे जावू या. मेंदूमध्ये विचार करण्याचे एक अवयव असते. ते सतत चेतना मिळून कार्यरत असते. म्हणून विचार धारा सतत वाहत असते. जसे ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छवास, तसेच मेंदूचे विचार कार्य सतत Non-Stop चालू असते. अगदी झोपेमध्ये -विचार उत्पन्न होतो, पसरतो आणि नाहीसा होतो. ही समजण्यास सोपी चक्र- रचना. विचारांची साठवण होत जाते. काळाप्रमाणे व प्रसंगाच्या तिव्रतेनुसार आठवणी लोप पाऊ लागतात.

    जर विचार मंथनाचा आलेख काढला, तर हे एक सत्य आहे की विचार उत्पन्न होताच, तो पूर्णतेने आघात करतो. मग त्याला उत्पन्न करणारी चेतना कितीही छोटी असो. ग्राफ काढला तर काटा प्रत्येक विचार चेतनेला प्रथम सर्वोच्य जागी नेतो. व नंतर पायापाशी येत असतो. लहान चेतनेचा विचार आलेख चटकन पायाजवळ जाईल व जर चेतना फार प्रभावी असेल तर तीला पायाजवळ येण्यास वेळ लागेल. अर्थ असा की १०० रु. हरवले हे दोन दिवसांत विसरले जातील. वा १००० रु हरवलो हे चार दिवसात (समजण्यासाठी)

    ३. मात्र दोन्ही चेतना उत्पन्न होताना, विचारातील सर्वोच्य जागी गेल्याचे दर्शविले. जेव्हा विचार उत्पन्न होतो, तेव्हा तो प्रथम सर्वोच्य बिंदू गाठतो. असेच विचार सतत उत्पन्न होत राहतील तर प्रत्येक वेळी ते सर्वोच्य बिंदू गाठत राहतील. येथे मानसिक तणावाचा संबंध येतो. सतत तोच तोच विचार करण्यामुळे, विचार चेतना सतत जागृत राहते. हेच धोक्याचे ठरु शकते. त्यालाच मानसिक तणाव निर्मिती म्हणतात. तुमची वैचारिक ठेवण कशी असते, तुमच्या स्वभावाची ठेवण कशी तयार झालेली असते हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वैचारिक घटनांची सतत उजळणी करण्याचे त्या घटनांचे विश्लेषण करीत राहण्याचे काहींचे स्वभाव बनलेले असतात. अशी माणसे विचारांच्या विश्लेशनात्मक बाबींना फारसे महत्त्व देत नसतात. ते भावनिक बाबींना सतत समोर आणून भावनिक विश्लेषण करीत राहतात. त्यामुळे अशी माणसे तो विशिष्ट विचार मनातून दूर शकत नाहीत. स्वत:ला असमर्थ ठरवितात. विचार केला तर अशा भावनिक बाबींवर विचारला व्यवहारिक दबावाने, सत्य परिस्थितीचे अवलोकन करुन छेद देणे अशक्य नसते. ते अशी माणसे करीत नाहीत. अशानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

    मी माझे एक मित्र बघितले मी. वैद्य ते आणि मी गेली पाच वर्षे सततच्या सहवासात आहोत. दररोज संध्याकाळी भेटतो. बागेत फिरण्यास जातो. गप्पा-टप्पा होतात. सामाजिक विषय, राजकारण, देवधर्म बदलत जाणारा समाज, भूतकाळातील नोकरी व्यवसाय ह्यामधल्या रोमांचित प्रसंग इत्यादी विषयावर सततच्या गप्पा गोष्टी होत असतात. कुटूंब वा वैयक्तीक जीवनावर केव्हाच भाष्य होत नाही. संध्याकाळची निरामय वेळ कशी घालवावी व आनंद घ्यावा ही सर्वसाधारण धारणा.

    एका प्रसंगामध्ये मी सहज विचारणा केली, वैद्य साहेब आपण कुठे राहता? त्यांनी सोसायटीचे नाव सांगितले. घरी कोण कोण असते? आम्ही दोघेच. मी व माझी पत्नी. तुम्हाला काही मुले? मी चौकशी केली. वैद्य एकदम गप्प झाले. “नशीब आमचे, २७ वर्षांचा मुलगा होता. तरूण मुलगा, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला.

    आमच्याकडे राहयचा. दुर्दैवाने अपघात झाला व त्यातच तो खलास झाला.” वैद्यांचे डोळे पाणावले होते. आज त्याला जाऊन तीन वर्षे झाली. ते खिन्न मनाने सांगत होते.

    स्वत:चा एकूलता एक मुलगा, तरूण जीवनाच्या चक्राला हातभार लावणार आणि काळाच्या आघातामध्ये एकदम पडद्याआड होणे ही किती भयावह व दुख:द घटना आहे. मला नाही वाटत ह्या घटनेपेक्षा कोणत्याही घटनेची तिव्रता जास्त भयावह व परिणामर करणारी असू शकेल. परंतू एक गोष्ट मला जाणवली की माझा व वैद्यांचा सहवास पाच वर्षांपासून सततचा होता. परंतू तरीही मला ह्या घटनेची केव्हाच चाहूल लागली नाही. त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. न कोणता प्रसंग निर्माण झाला की ह्यांनी ती मला इतरांना सांगावी.

    ४. ह्यालाच स्वभाव विशेष म्हणतात. घटना घडली, तुफान निर्माण झाले, ते वादळच होते. थोड्याशा वेळेनंतर स्थिरस्थावर झाले. वैद्य रडले असतील, ओरडले असतील, त्यांची झोप, भुक काही दिवस त्यांना साथ सोडून गेली असेल. दुख:च्या त्या कोसळलेल्या डोंगरानी कोपाता आघात केला नसेल. परंतू ते दुखः ही पचविले होते. काळ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आठवणी विसरण्यास सतत मदत करीत असतो. निसर्गाचे हे चक्र आहे. ही इश्वरी इच्छा म्हणून त्याला आपण मान्यता द्यावी ही समजदारी. जी माणसे त्याला वैचारीक विश्लेशन करुन विसरत नाहीत, प्रसंगाना बाजूस सारत नाहीत, भावनीक चक्रातच अडकून राहतात,त्यानाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.

    एखादी भयानक, दुर्भाग्यपूर्ण, सहनशक्तीचा अंत बघणारी घटना घडते - जसे सख्यातल्याचा अनैसर्गिक मृत्यू, जन्मभर साठवलेली पूंजी नष्ट होणे, इत्यादी - एकदम प्रचंड आघात होतो, दुःखाचा डोंगर कोसळतो, हे नैसर्गिक आहे. परंतु ह्यातून स्वतःला सावरणे है काहीजण करतात. जीवनाच्या सुख दुःखाच्या चक्राचा विचार करतात. दुनियामे आये है तो जीनाही पडेगा । जीवन हे जहर तो पिनाही पडेगा । हे तत्वज्ञान ही मानसे बाळगतात. अशीच माणसे तणावमुक्त जीवन जगू शकतात.

    क्रमशः पुढे ३ वर चालू –

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तेरा इंतजार आज भी है (कथा)

    …किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ‘ भूपेंद्र आणि आशा भोसले यांचे गाणे चालू होते ..आणि ती माझ्या डोळ्यासमोर आली . डोळ्यासमोर म्हणजे प्रत्यक्षच माझा विश्वासच बसत नव्हता .अजून तशीच होती.

  • खासे सामोसे

    पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो.

  • लवणी फटका

    आजकालचे शिक्षण म्हणजे भलतीच सुधारीत आवृत्ती आहे. आताचे दुसरी तिसरीतले बाळ ज्या सफाईने इंग्लिश बोलते किंवा त्याच्या अभ्यासातल्या शंका विचारते, तशा प्रकारचे इंग्रजी आम्हांला इंटरव्युव्हला जाताना यायला लागले. आताची पिढी खूपच चुणचूणीत आहे यात वादच नाही. बर्याचदा त्यांनी विचारलेली शंका काय आहे हेच कळत नाही. पण आता मला जे काही थोडेफार इंग्लिश येते त्यात सर्वात मोठा वाटा आहे आम्हांला पाचवीत इंग्रजी विषय शिकवणार्या पाटीलसरांचा.

    एकतर आताप्रमाणे पहिलीपासून आम्हांला इंग्रजी हा विषय नव्हता. त्याची ओळख पाचवीत गेल्यावर झाली. आणि तेही रीड धिस, लिसन धिस असे नाही, तर ए बी सी डी पासून. पाचवीची सहामाही परीक्षादेखील या इंग्रजीच्या मुळाक्षरांवर व्हायची. त्याला कारण म्हणजे चौथीपर्यंतचे आमचे शिक्षण जि. प. शाळेत झालेले. गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर शाळा बदलायला लागायची. हायस्कुल दोन किलोमीटरवर होते. मग हायस्कुला जाणारी सिनीयर पोरं शायनिंग मारायला “आता पाचवीत आल्यावर बघा. घ्या लवणी फटके आणि लाल पावडर.” असे म्हणायची. ही लवणी फटका आणि लाल पावडरची काय भानगड आहे याची आम्हाला जरादेखील कल्पणा नव्हती. त्यासाठी पाचवीत जावे लागले.

    हायस्कुलला गेल्यावर पहिल्या दिवशी प्रार्थनेला उभे राहिल्यावर शिक्षकांची फौज बघूनच गार झालो. आमच्या मराठी शाळेत पहिली ते चौथी सगळी मिळून जेवढी मुलं नव्हती तेवढे शिक्षक प्रार्थनेला स्टेजवर उभा राहिलेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक विषयाला नवीन शिक्षक! आमच्या पंचवीसएक विद्यार्थ्याचा पट (पहिली ते चौथी मिळून) असणार्या शाळेला तशी चैन परवडण्यासारखी नव्हती. आमचे भस्मे आणि पाटील गुरुजी मराठी म्हणा, गणित म्हणा, इतिहास असो किंवा भुगोल, सगळे विषय एकट्यानेच शिकवायचे. पण इथे मामला वेगळा होता.

    बाकीचे सगळे ठीक आहे, पण लहानपणापासून इंग्रजीचा आम्हांला गंधच नव्हता. त्याची ओळख करून द्यायला आम्हांला सडपातळ बांध्याचे एक पाटीलसर होते. शाळेत रुळल्यावर लवणी फटका आणि लाल पावडर म्हणून ज्या गोष्टी प्रसिध्द होत्या त्या याच सरांमुळे हे कळले.

    लाल रंग त्यांचा आवडता रंग असावा कारण स्टाफरुममधून येताना फळ्यावर लिहायला ते लाल खडू घेऊन यायचे. फळ्यावर जी पण काही लिखापडी व्हायची ती लाल खडूने व्हायची. विदयार्थ्यांना इंग्रजी शब्द पाठ करायला लावणे आणि जो पाठ करत नाही त्याचा खरपूस समाचार घेणे हा त्यांचा पूर्वीपासूनचा कायदा होता. ते वर्गात आले की पाठ करायला सांगितलेल्या शब्दांची उजळणी व्हायची आणि ज्याचे शब्द पाठ नसतील त्याला ते पुढं बोलवायचे.

    नंतर नंतर त्यांचे हे वेळापत्रक आमच्या अंगवळणी पडले पण सुरवातीला काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी झाडून सगळ्या शाळांचा पांढरा शर्ट आणि खाकी हाफ चड्डी असा युनिफॉर्म असायचा. पालकलोक फुलपॅन्टसारखी चैन दहावीच्या पुढे करु द्यायचे. त्यामुळे गुडघाच काय, मांडीच्या खालचा भाग सतत उघडाच असायचा. बर्याच उपद्व्यापी नगांचे गुडघे तर हेडलाईट फुटल्यावर समोरुन कार दिसेल तसे दिसायचे.

    पाटीलसरांनी पुढं बोलवले की पोरगा बिचारा आधीच गोंधळलेल्या चेहर्यावर ‘बोंबलायला शब्दच पाठ होत नाहीत तर माझी काय चूक?’ हा प्रश्न घेऊन सर्वांसमोर यायचा. त्याला पाटीलसर सगळ्या वर्गाकडे तोंड करून उभा रहायला सांगायचे. ऑपरेशनच्या कॉटवर पडल्यावर आता पुढे काय होणार आहे अशी जशी पेशंटला कल्पणा नसते तशी अवस्था त्या पोराची व्हायची. मग ते सर त्याला तसाच उभा ठेऊन फळ्यावर जे काही लिहीले आहे ते डस्टरने न पुसता हाताने पुसायचे आणि पुढे काय होतंय हे समजायच्या आत वर्गात चटाक असा आवाज घुमायचा. गुडघ्याच्या बरोबर मागच्या बाजूला असणार्या पायाच्या लवणीत फटका बसायचा आणि पोरगा एका पायावर भांगडा करायचा.

    माराची ही अनोखी पध्दत शोधून काढणारे पाटीलसर नुसते मारायचेच असे नाही. कधी कधी ते शंभरएक शब्द पाठ करायला द्यायचे आणि जो कोण स्वेच्छेने हे आव्हान स्वीकारेल आणि निभावूनही नेईल त्याला पाटीलसरांनी स्वत:च्या पैशानी आणलेला बॉलपेन बक्षिस मिळायचा.

    मलाही लवणी फटक्याचा मोह बरेच दिवस होता. पण लवणी फटका बसला की दिवसा चांदण्या दिसतात असे बर्याचजणांचे मत पडल्याने पाटीलसरांकडून तो घेण्याच्या फंदात मी कधी पडलो नाही. त्याचा एकूणच पुढच्या आयुष्यात फायदा झाला, शाळेय जीवनात आगंतूक सामोरे आलेले अगम्य इंग्रजी आणि या पाटीलसरांच्या धसक्याने इंग्रजीशी कधीही पंगा घेतला नाही.

    ©विजय माने, ठाणे

    आपण माझ्या इतर कथा आणि लेख खालील लिंकवर वाचू शकता.
    https://vijaymane.blog/