नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मध्यंतरी वर्तमानपत्रात बालाजी देवस्थान येथील एका भिकाऱ्याची बातमी आली होती. हा भिकारी बालाजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मागे लागून त्यांना पैसे मागायचा. अशी त्यानं अनेक वर्षे भीक मागून जिंदगी घालवली. नुकताच त्याचा मृत्यू झाल्यावर पोलीसांनी त्याच्या झोपडीची झडती घेतली, तेव्हा लाखो रुपयांची रोकड त्यांना मिळाली. एवढे रुपये जवळ असताना, त्याला भीक मागणे सोडून द्यावे, असं कदापिही वाटलं नाही… कारण, काहीही कष्ट न करता, पैसे मिळविण्याचे त्याला जडलेलं ‘व्यसन’!!
July 24, 2021
या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते
July 15, 2022
“ती” .. लहानपणापासून मुंबईतच वाढलेली .. घरची परिस्थिती तशी बेताची .. जेमतेम शिक्षण संपलं आणि वेळीच लग्न करून दिलं घरच्यांनी .. सासर मात्र अगदी लांब होतं .. कोकणातल्या एका छोट्याश्या गावात
February 4, 2026
जीवनरंगाचे नाविन्य रोज नवे असते, वेगळे असते आणि वैशिष्ट्येपूर्ण देखील असते. काल पाहिलेले जीवनरंग आज आपल्याला दिसत नाही, रोज ते नवे असतात. उगवणारा सूर्य तोच असतो मात्र रोज तो नवे रुप घेऊन, नवे तेज घेऊन येत असतो.
April 2, 2020
माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न केला होता. थेट सिमल्याहून बेणे आणल्याचं आठवतं. त्यानंतर काही काळ घरात केवळ चर्चा होती ती बटाटयाच्या शेतीची. अखेर एकदा घरात बटाटे आले. त्यांचा प्रत्येकी आकार फार तर खेळातल्या गोट्यांएवढा असेल. त्यानंतर बटाट्याची शेती मागे पडली ती कायमचीच; पण जेव्हा जेव्हा माझे काका घरी यायचे तेव्हा शेतीचा विषय निघायचाच. त्या वेळी आम्ही कोपरगाव तालुक्यातल्या कोळपेवाडी या साखर कारखान्याच्या गावी राहत असू. तेथून फार तर पन्नास किलोमीटरवर गंगापूर तालुक्यात माझं गाव होतं. मांजरी हे गावाचं नाव. लहानपणी या गावात गेलेलो, खेळलेलो. तिथलं देवीचं मंदिर, गावकऱयांनी तयार केलेला तलाव, आमच्या घरातलं रेशनचं दुकान आणि त्यासमोरचं पोस्ट, या त्यातल्या आठवणीच्या खुणा. शेतावर जायची कधी वेळ यायची नाही; कारण तिथं धड ना सावली ना पाणी. स्वाभाविकपणे नगर जिल्ह्यातील हिरवीगार शेती पाहिलेल्या मला ते शेत वैराणच वाटायचं. फार तर विसाव्याला एक चिंच होती. चिंचेच्या खाली पीर होता. त्यामुळं तिथं आम्हाला फारसा प्रवेशही नसायचा. तर, काका शेती करायचे आणि ते घरी आले की ज्या चर्चा होत त्यात शेतीचा विषय खूपच कमी असायचा. कुठे कर्ज घेतलंय, कुठलं पीक जळालं, या वेळी खायला दिढीनं दोन पोती घेतलीत (दिढीनं म्हणजे या हंगामात घेतलेलं एक पोतं धान्य दुसऱया हंगामात दीड पोतं द्यायचं) ही पोती कधी उत्पन्न आलं आणि परत करता आली, असं झालं नव्हतं. प्रत्येक वेळी वडील काही ना काही पैसे काढून देत. काकांचं आमच्या घरातलं वास्तव्य बरचसं तणावाचंच असे; पण माझ्या दृष्टीनं मात्र थोडा वेगळा अनुभव असायचा. काका परत जायला निघाले की मी त्यांच्याबरोबर स्टॅन्डवर जायचो. काकाला मिसळ आणि जिलेबी खूप आवडे. त्याच्या दृष्टीनं ती चैनच होती. आमच्याकडे आल्यावर बहुधा त्याला ती करता यायची.
शेती हा एकूणच विषय माझ्या आईच्या दृष्टीनं फारसा उत्सुकतेचा किंवा आत्मीयतेचा नसायचा. तिला घरात वाचविलेल्या पैशातून शेतीसाठी काही द्यावं लागायचं हे त्यामागचं कारण असावं; पण मला आठवतं, त्या वेळी शेती हा उत्साहाचा विषय बनला होता. सुरुंग, ब्लास्टिंग असे एरवी वापरात नसलेले शब्द चर्चेत असायचे. पैशाचा विषयही यायचाच, पण त्या चर्चेत निराशा-नाराजी नसायची. उत्साह असायचा. स्वप्नं असायची. एके दिवशी कळलं, की आपल्या शेतावर विहीर काढायची ठरलीय. विहीर आणि पाणी यांचा संबंधच इतका अभिन्न, की या कल्पनेनंच आम्ही भारावून गेलो होतो. चार-आठ दिवसांनी बातमी यायची. खोदकाम सुरू झालंय, एक परस झालं. दोन परस खोदलेत पण जमिनीला ओलावाही नाहीये. एके दिवशी काका आले ते चेहरा एवढासा करूनच. विहिरीत पक्का दगड लागला होता. पाच परस खोदल्यानंतरही पाण्याचा पत्ता नव्हता. गेले काही दिवस सातत्यानं पैसे गावी जात होते. आज ना उद्या पाणी लागेल ही आशा होती. पाणी रोज स्वप्नात पाहिलं जात होतं त्यावर आजचा दिवस सुखाचा होत होता. त्या रात्री केवळ विहीर अन् पाणी एवढाच विषय चर्चेला होता. काका निराश होता, तर वडील काहीतरी मार्ग निघेल, अशा प्रयत्नात. अखेरीला औरंगाबादेतून चार माणसं सुरुंग काढायला न्यायचं असं ठरविलं, तेव्हा पहाट झाली होती. सकाळी-सकाळी काका गावी गेला. आमची मिसळ-जिलेबी झालीच नाही. त्या दिवशी वडील दिवसभर काही मोठ्या बागाईतदारांशी बोलत होते, काही ठरवीत होते. अखेर ठरलं. गुरुवारी निघायचं. गाडी घेऊनच जायचं. कोपरगावहून ब्लास्टिंग मशिनची गाडी येईल. हे सारं तपशिलानं लक्षात रहायचं कारण म्हणजे त्या गाडीबरोबर मलाही नेणार होते. मी केवळ गुरुवारची वाट पाहत होतो. अखेर गुरुवार उजाडला आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शेतावर पोहोचलो तेव्हा मजुरांनी विहिरीच्या खड्यात किमान दीड-दोन फूट खोलीची नऊ बिळे तयार केली होती. त्यात स्फोटके भरण्यात आली. त्याला जिलेटीन म्हणत. या सुरुंगाचं सारं नियंत्रण या गाडीतून होणार होतं. सारं काही सज्ज होतं. सर्वांना विहिरीपासून दूर जायला सांगण्यात आलं. आता लवकरच स्फोट घडविण्यात येणार होते. उत्कंठा वाढत होती. सारे विहिरीपासून किमान शंभर मीटरवर होतो. काकाही मागे झालेला होता. इशारा झाला आणि बार उडाले. किती बार झाले कळलं नाही; पण विहिरीतून दगड उडाले, खपल्या उडाल्या. `थांबा।़ एवढ्यात पुढे जाऊ नका,' असं गाडीतून सांगण्यात येत होतं; पण आता बार थांबलेत म्हणून काका पुढे झाला तेवढ्यात एक स्फोट झाला. दगड उडाले. छोटे अन् मोठेही. एक कपटा उडाला तो काकाच्या कपाळावर. त्यानं कपाळाला हात लावला. तो ओला झाला होता. रक्त येत होतं. काका तसाच विहिरीकडे धावला अन् ओरडला, `दादा।़ पाणी!' कपाळाची खोक विसरून पाण्याचं ते निर्मळ रूप तो पाहत होता. विहिरीला तीन जिवंत झरे लागले होते. झऱयाच्या मुळाशी स्वच्छ पाणी मातीत मुरत होतं. आमचा आनंद कष्ट, वेदना थिट्या करीत होता.
आज हे सारं आठवलं ते वृत्तपत्रातल्या एका छोट्या बातमीवरनं. बातमीत म्हटलं होतं, `22 मार्च हा जागतिक जलदिन आहे.'
-- किशोर कुलकर्णी
March 22, 2006
महाराष्ट्रातल्या एसटी डेपोचा चेहरा एकसारखा असतो, किंबहुना तो वेगळा नसतोच. मोठ पटांगण. त्याच्या एकाबाजूने एसटी येण्याचा मार्ग, दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याचा मार्ग व मध्यभागी डेपो. येण्याच्या मार्गाच्या सुरवातीला उसाच गुऱ्हाळ, त्याच नाव कनिफनाथ रसवंती गृह. मालक फडतरे बंधू, मला न उलगडलेलं एक कोडं आहे की सगळ्याच उसाच्या गुऱ्हाळाची नावं कनिफनाथ व मालक फडतरे बंधू का ?
June 11, 2021
मला अद्याप कळले नाही कि आपण निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते.
March 20, 2020
सचिन बद्दल सांगायला लागले तर खूप लिहावे लागेल. परंतु त्याचे रेकॉर्डस् सर्वाना तोंडपाठ आहेतच तरीपण सांगतो.
August 25, 2021
ही घटना खूप जुनी. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळातली. अजूनही मनात ताजी असलेली. त्या वेळी पुण्यातल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वृत्तांकनासाठी हजर होतो. 27 जुलैचा तो दिवस. महाराष्ट्र विधिमंडळात त्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा ठराव संमत झाला. शरद पवार मुख्यमंत्री होते. मला आठवतं, त्या दिवशी विधानसभेत या ऐतिहासिक घटनेचं कौतुक करणारी भाषणं होत होती. पत्रकारितेत तसा मी जुना झालो नव्हतो. भाषणांनी भारावून गेलो होतो. एका सदस्यानं सांगितलं, ``आपण इतिहास घडविला आहे; पण आज आपण सर्वांनी मराठवाड्यात जाण्याची गरज आहे. तेथील जनतेला शासनाच्या निर्णयाची पार्श्वभूमी, भूमिका सांगण्याची गरज आहे.'' कौतुकाच्या भाषणात हे आवाहन, हा इशारा मागे पडला. त्याच दिवशी अधिवेशनाचं सूप वाजलं. मी पुण्यात येऊन माझ्या कामाला लागलो.
त्यानंतर मराठवाड्यातून येणाऱया बातम्या पहात होतो. त्या भागात कमालीची अस्वस्थता होती. सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. दोन दिवसांतच त्याला उग्र रूप आलं आणि सारा मराठवाडाच पेटला आहे की काय, असं वातावरण निर्माण झालं. माझी अस्वस्थता वाढत होती. माझ्यातला पत्रकार मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी थेट संपादकांना भेटलो. त्यांना म्हणालो, ``मला मराठवाड्यात जायचं आहे. रोज प्रत्यक्ष माहितीवर वृत्तांत पाठवीन.'' आजच्यासारखी त्या वेळी संवादसाधने विपुल नव्हती. फोन, तार, टेलेक्स असा तो जमाना होतो. संपादक म्हणून त्या वेळी श्री. ग. मुणगेकर होते. ते म्हणाले, ``तू जाऊ नयेस. ते धोक्याचं आहे. स्वतंत्र गाडी घेऊन जाणं अधिकच धोक्याचं आहे. स्थानिक पातळीवर आपले वार्ताहर आहेत, ते पाठवतील त्या बातम्या चांगल्या वापरा. वृत्तसंस्थांच्या बातम्या आहेतच.'' मी नाराज झालो; पण निराश नव्हे. मी म्हणालो, ``मला आठवडाभराची रजा द्या. मी बातम्या पाठवीन त्या वापरा. दुर्दैवानं काही घडलच, तर ती माझी जबाबदारी असेल. मी सुखरूप परत आलो, तर माझा दौरा अधिकृत समजा.'' माझ्या या प्रस्तावावर संपादक अधिक नाराज झाले. म्हणाले, ``तुम्ही तुमच्या जिवावर उदार झाला म्हणून काय झालं. माझ्याही काही जबाबदाऱया आहेत. तुम्हाला परवानगी देता येणार नाही.'' मी परतलो. त्या दिवशी रात्री झालेली घटना पत्नीला सांगितली. मी जावं, असंच तिलाही वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजले असतील. माझा एक सहकारी घरी आला होता. त्या वेळी घरात फोन नव्हता. तो म्हणाला, ``तुला मराठवाड्यात जायला संपादकांनी परवानगी दिलीय. तुझ्या सोयीनं तू जा. हा दौरा अधिकृत असेल.'' आनंद आणि उत्साह कशाला म्हणतात, त्याचा अनुभव घेतला मी अन् औरंगाबादकडे पहाटेच रवाना झालो. मजल-दरमजल करीत औरंगाबादेत पोहोचलो. परिस्थिती वाटत होती त्यापेक्षा गंभीर होती. महामार्गावर ठिकठिकाणी पूल कापण्यात आले होते. तारा बांधून रस्ता बंद करण्यात आला होता. रेल्वे जाळण्यात आल्या होत्या. आंदोलनाचा वणवा वाढत होता. औरंगाबादेत माझी भेट झाली `टाईम्स'चे प्रतिनिधी पडियार यांच्याशी. आज ते हयात नाहीत; पण अत्यंत शिस्तबद्ध पत्रकार. मला एकट्यानं नांदेडपर्यंत जाणं कठीण होतं. एसटी वाहतूक बंद होती. टॅक्सीही नव्हत्या. त्या वेळी औरंगाबादेत शहा नावाचे एक एजंट होते. त्यांची एक गाडी नांदेडकडे अंक नेण्याचा प्रयत्न करणार होती. त्यात मुंबईच्या मोठ्या दैनिकाचे म्हणून पडियार यांना नेण्याचं ठरलं होतं. मोठ्या हिकमतीनं पडियार यांना चिकटलो आणि आमचा दौरा सुरू झाला. घटना मोठी होती. टाईम्सनं स्वतंत्र फोटोग्राफरही दिला होता. टाईम्स या इंग्रजी दैनिकाची आणि आमच्या दैनिकाची स्पर्धा नाही, असं सांगत मी त्या छायाचित्रकाराकडून फोटो मिळण्याची व्यवस्था केली. त्या वेळी औरंगाबादेत नागनाथ फटाले नावाचे ज्येष्ठ पत्रकार काम पहात होते. आमच्यासाठीही ते बातम्या पाठवत. विशेष म्हणजे, एसटीच्या हमाल संघटनेचे ते अध्यक्ष होते. याचाच अर्थ, माझ्या अंकात फोटो प्रसिद्ध होण्यासाठी सायंकाळपर्यंत तरी ते औरंगाबदला पोहोचणे आवश्यक होते. पुढची जबाबदारी फटालेंची होती. काम सुरू झालं. वृत्तांत, मुलाखती, घटना, प्रतिक्रिया, असा रोजच्या रोज मजकूर जमा होत होता आणि फोन-तार या माध्यमातून जातही होता. टाईम्सचा फोटोग्राफर खऱया अर्थानं व्यावसायिक छायाचित्रकार होता. त्याचे फोटो उत्तम असत. ते मी पाठवीत होतो आणि आश्चर्य म्हणजे, माझ्या दैनिकात ते फोटो रोजच्या रोज ठळकपणे प्रसिद्ध होत असत. तेच फोटो टाईम्समध्ये दुसऱया दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध होत असत.
वृत्तपत्रात मग ते कोणत्याही भाषेतलं असो, स्पर्धा ही असतेच. आजही आहे; पण त्या काळी अत्यल्प साधनसामग्रीत टाईम्सच्या आधी ठसठशीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा मान माझ्या वृत्तपत्राला मिळाला आणि समाधान मला मिळालं.
मी जे काही केलं ते योग्य की अयोग्य, असा प्रश्न त्या वेळीही मला कोणी केला नाही. आज तो कोणी करील, अशी स्थिती नाही.
म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं!
तसंच काहीसं हे असावं
-- किशोर कुलकर्णी
March 30, 2006

तशी ती सॉलिड आहे , सगळ्यांना माहित आहे हे , तसे तिलाही माहीत आहे. पण मला ती फार उशीरा खरी कळली .
June 4, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti