(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • काच कांगऱ्या

    आईची बांगडी वाढली की तिचे तुकडे करून एक खेळ खेळला होतो आम्ही एकाच रंगाचे चार तुकडे असे घेऊन चौघे जण हा खेळ खेळू शकतात. समोरासमोर बसून. फरशी वर खडूने एक आकृती काढली जाते. तेव्हा समोरासमोर प्रत्येकाचे एक घर असते. म्हणजे चौकटीत फूली मारलेली असते. तिथे आपल्या कांगऱ्या ठेवायच्या. आणि मध्यभागी एक घर असते. खेळाची अशी तयारी झाली की मग बहुतेक कवड्या दिल्या जात नसल्याने चिंचोका घेऊन ते दगडाने फोडून दोन चिंचोक्याचे चार भाग करून त्याचा डाव टाकायचा. उताणे पडतील तेवढे घर कांगरी पुढे सरकवायची. वाटेत दुसर्‍या कांगरीला मारुन किंवा कुणी आपल्या कांगरीला मारले की आपापल्या घरात जायचे. पुन्हा डाव सुरू. अनेक वार झेलत. अनेक वार करत आतल्या चौकटीत गेल्या वर मध्यभागी असलेल्या घरात चारही कांगऱ्या गेल्या की तो सुटला. शेवटी शेवटी दोघात चुरस असते. एक कायमच बाहेर राहतो. खूप छान वेळ जातो. घरात बसून. कसलेही खर्च नको..
    खेळाचे नियम कुणीही मोडत नाही. भांडण नाही. घरात असल्याने घरचे लोक निर्धास्त. खेळ संपला की कांगऱ्या. चिंचोका. खडू एका डबीत आणि फरशी वरची चौकट फडक्याने पुसून टाकली की बस्स. आनंद आणि मजा हा फायदा. या वरुन मला सहजच वाटले की आपणही असेच आपल्या घरात राहतो. जीवनाची वाटचाल करताना अनेक प्रसंग असे येतात की कधी वार करावे लागतात तर कधी वार झेलावे लागतात. परिस्थितीचे वार अनेक प्रकारचे. प्रत्येक खेळ खूप काही शिकवून जातो. बघा ना आता चौघांची चार घरे. आणि शेवटी सगळ्यात मोठे घर यात फरक आहे तो असा विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब याची माहिती आहेच तुम्हाला.कधी कधी एकेक करुन जातात व दोघेच राहताता मग एकटेच रहावे लागते. त्यामुळे अशा वेळी रडायच नाही तर लढायचे असते . नियमानुसार वागले पाहिजे. जशी कांगरी जिला पूर्वी मारलेल असत पण ती त्याच्याच घरी गेल्यावर तर तिथे मारायचे नाही. वैरभाव ठेवू नये ही शिकवण. एकदा तरी एखाद्या कांगरीला मारुन तिला तिच्या घरी पाठवल्या शिवाय मोठ्या घरात जाण्याची परवानगी नसते. म्हणजे जिंकण्यासाठी लढावे लागते. मन मारुन धैर्याने. सगळे मोठ्या घरात एकत्र आले तर जास्त सुरक्षितता असते तसेच एकत्र कुटुंबात असते..
    लॉकडाऊन मुळे घरातील सुरक्षितता आपण समजू शकलो. त्यामुळे आता ही हेच तत्व पाळू या. यात आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना एकमेकांना समजून सांभाळून घेऊन आधार दिला जातो हे मधल्या मोठ्या घराची शिकवण आहे.. तेव्हा खेळ आणि त्यातून काय शिकायचे हे पाहिले पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

    –सौ. कुमुद ढवळेकर.

  • वैज्ञानिकाचा सत्याचा शोध – मनोगत

    मी प्रदीर्घ साधना आणि कसोटीच्या काळात गेलो ज्यांचा संदर्भ आवश्यक आहे. याशिवाय सर्वसंग परित्याग, मुक्तीची अतीव ओढ, भक्ती, योग्य गुरू या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या विचारात घेतल्याच पाहिजेत. या गोष्टी विचारात घेतल्या तरच पुस्तकातील विचारांना अर्थ राहील आणि वाचकांना त्याचा लाभ होईल.

  • भुरा….

    कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्‍याचीवाडी….चलो भुर्‍याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्‍यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं….! होय…. भुऱ्याचच…! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्‍या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्‍याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे.

  • बलिदान देना होगा ! ‘सॅक्रेड गेम्स’

    राजकीय रंग चढलेल्या धर्माच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेणारी सॅक्रेड गेम्स ही विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित असणारी वेबसिरीज ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी हा सीझन दिग्दर्शित केलेला असून कथा वरूण ग्रोवरने लिहिलेली आहे.

  • ८ वी ड – भाग ३

    मुलाला-मुलीला नवीन गणवेश आणला नाही म्हणून बातमी आपण वाचतो तर कधी शाळेत बाईनी बाकावर उभे केले याचा राग, संताप किवा लाज वाटल्यामुळे एखादा आत्महत्या करतो.

  • पहिला विमान प्रवास

    आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते.

  • हत्ती आणि पाऊस

    एके काळी निसर्गात दोन बलवंत शक्ती होत्या. हत्ती आणि पावसाचा देव. अभिमानी आणि बढाईखोर हत्ती पावसाशी नेहमी वाद घालायचा. दोघात हत्ती मोठा आहे असं पावसानं मान्य करावं हा हत्तीचा हेतू असायचा. एकदा अशाच वादात आपल्या ओल्या आणि खळखळाट करणाऱ्या आवाजात पावसानं हत्तीला विचारलं ‘अहो गजराज, जिथं मी तुम्हाला चारा देतो तिथं माझ्यापेक्षा तुम्ही कसे मोठे असाल ?’ अभिमानी हत्ती हे कसे मान्य करणार ? काहीही विचार न करता तो म्हणाला, ‘तू नाही मला चारा देत. माझा मी शोधतो आणि खातो. स्वतःच्या हिंमतीवर मी जगतो.’

  • शहाणी आणि समंजस

    मान्य केले पाहिजे की खरंच ही आजची पिढी समंजस आहे म्हणूनच हॅंडल करतात माझ्या नातवाने मला शहाणे करून पटवून दिले आहे की टेन्शन लेने का नही. त्यामुळे मी त्याचे व या पिढीचे अगदी मनापासून कौतुक करते.

  • फाटकी वस्त्रे अंगावरती (सुमंत उवाच – ३५)

    सुमंत जयंत परचुरे. 

    होम quarantine झाल्यापासून सगळेच आपण आपल्याला आजूबाजूच्या भौतिक सुखाचा प्रचंड loss झालाय नाही का?

  • माझी प्रवास’साठी’

    जन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो.